गुरुवार, २७ जून, २०१३

Medical Astrology - My Fav. Subject


Medical Astrology - My Fav. Subjec

ही आहे नेल्सन मंडेला ह्यांची कुंडली. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना मला कुंडलीतील ६ वे स्थान आणि ८ वे स्थान नेहेमी अचंबित करायचे. ह्या स्थानांवरून व्यक्तीला होणारे त्रास/ रोग इ पहिले जातात. ज्यांना ज्योतिष-शास्त्र म्हणजे नेहेमी "राशी भविष्य" इतकेच वाटते त्यांच्यासाठी इथे नमूद करते, जसे Graduation घेताना काही विषयात specialisation करून तुम्हाला Degree मिळते त्याचप्रमाणे ज्योतिष-शास्त्रातही प्रत्येक ज्योतिषाची एक आवड असते त्यानुसार त्याचा अभ्यास आणि भविष्य वर्तवणे असे असते. म्हणजे काही ज्योतिषी Natural -Calamities वर अभ्यास करतात आणि भविष्यात होणारे भूकंप,पूर इ. बद्दल सांगू शकतात.त्यांना मेदनिय ज्योतिष किंवा इंग्लिशमध्ये "Mundane Astrology" असे म्हटले जाते. काही ज्योतिषी फक्त राशी भविष्यच सांगू शकतात, काहींचा जातकाला होणारे रोग त्याची कारणे त्यावरचे इलाज ह्यावरचा अभ्यास असतो त्यांना "Medical astrologer" संबोधले जाते, काहींना जातक काय शिक्षण घेणार आहे,काय Carrier करेल ह्याचा अभ्यास करायला आवडतो, काही ज्योतिषांना सगळ्याच विषयात इंटरेस्ट असतो.

मला मात्र Medical Astrology मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्यामुळेच आज मी नेल्सन मंडेला ह्यांची कुंडली explain करणार आहे. सध्या मंडेलांना फुफ्फुसाचे Infection झालेले आहे. फुफ्फुस हा अवयव कर्क राशीवरून पहिला जातो. ज्यांचा ज्योतिष-शास्त्राचा अभ्यास नाही त्यांच्यासाठी, प्रत्येक रास ही व्यक्तीचे वेगवेगळे अवयव दर्शवते. जसे मेष रास मेंदू/डोक्याचा भाग, वृषभ रास घसा/गळा/डोळे इ. फुफ्फुस/छातीचा भाग हा कर्क राशीवरून आणि चतुर्थ व दशम स्थानावरून check केला जातो. आता कर्क रास म्हणजे कुंडलीत जिथे "4" आकडा लिहिला आहे.

चतुर्थ स्थानात म्हणजेच जिथे १२ लिहिले आहे तिथे एकही ग्रह नाही. दशम स्थानात म्हणजेच जिथे ६ आकडा आहे तिथे मंगळासारखा उष्ण ग्रह आहे. द्शमचा स्वामी बुध अष्टमात आहे आणि तो ही शनि सारख्या ग्रहाच्या युतीत.

जिथे ४  आकडा लिहिला आहे ते कुंडलीतील अष्टम स्थान आहे. अष्टम स्थानावरून व्यक्तीला होणारे त्रास/मृत्यु ह्या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. मंडेलांच्या कुंडलीत अष्टम स्थानातच आणि कर्क राशीतच रवि,शनि,बुध आणि नेपच्यून सारखे  ग्रह आहेत त्यामुळे Lungs Infection होणे स्वाभाविक आहे.

ह्या कुंडलीला सध्या राहू महादशा सुरु आहे. राहू - १२, ६   न. स्वा. बुध ९, ७, ८,११
राहू अंतर्दशा आणि शुक्र विदशा सुरु आहे. शुक्र - ६,  १२   न. स्वा. मंगळ ११, ६ (२६ जुलै पर्यंत)
त्यामुळे Hospitalisation/Medicines इ. स्पष्ट दिसतेच आहे. सध्या प्रकरण खूप serious आहे. २३ जूनला बुध प्राण दशा सुरु झाली आहे ती १६ जुलै पर्यंत आहे. बुध ९,७, ८, ११  न. स्वा. बुध ९,७, ८, ११ त्यामुळे मंडेला ह्यांची प्रकृती जरी सुधरली तरी पुन्हा खालावण्याचे chances आहेत. 

माझ्या बुद्धीने जितके जमेल तितके सोप्पे करून वाचकांसाठी ही कुंडली explain केली आहे. अभिप्राय नक्की कळवा : anupriyadesai@gmail.com वर 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

रविवार, २३ जून, २०१३

अनुभवाचे बोल



अनुभवाचे बोल 

गेल्या आठवडाभरात वाचकांचे सतत e-mails आणि फोन येत होते ब्लॉगवर लिहा म्हणून. पण पावसाला सुरु झाला आणि सर्दी-खोकला झाला त्यामुळे काही लिखाण करता आले नाही. क्षमस्व. एक लेख लिहायचा म्हणजे दोन तास गेले. त्यामुळे आजही लेख लिहिण्यापेक्षा एका आमच्या जातक- मित्राने त्याला आलेला शास्त्राचा अनुभव इथे नमूद करतेय. नाव गुप्ततेच्या कारणास्तव लिहिलेले नाही. अनुभव लिहिताना त्याने मोठेपणा मला दिलाय पण तो मोठेपणा शास्त्राचा आहे. त्यामुळे वाचकांनीही शास्त्रालाच महत्व देत हा अनुभव वाचावा. 


श्री स्वामी समर्थ !!!
माझा भविष्य अथवा पत्रिकेवर कधीच विश्वास नव्हता, मी २००७  साली दुबई मध्ये होतो त्या वेळेला सहज कुतहूल म्हणून मी माझी जन्मतारीख ,जन्म वेळ तसेच जन्मस्थान अशी माहिती अनुप्रिया देसाई यांना दिली ,त्यांना अभ्यास करण्यासाठी माझी माहिती हवी होती ,ती देताना पण मी त्यांना सांगितले की या सगळ्यावर माझा विश्वास नाही माझा स्वामींवर विश्वास आहे, पण एक कुतहूल म्हणून आणि तुम्हाला हवी आहे म्हणून मी तुम्हाला ही माहिती देतो. त्यांनी माझी कुंडली /पत्रिका बनवली अभ्यास केला आणि ठळकपणे दोन गोष्टी सांगितल्या. त्या म्हणजे १)तुझे लग्न जुलै-ऑगस्ट  २००८ मध्ये  होईल, २) तुझा प्रेमविवाह होईल. मला खरतरं थोडा धक्का बसला कारण त्यावेळेला मला एक मुलगी आवडत होती पण ही गोष्ट तेव्हा कोणाला माहिती नव्हती.  त्यामुळे मला हा सुखद धक्का होता. 

त्यांनी माझ्या भूतकाळाविषयीही   सर्व गोष्टी अचूक सांगितल्या ,तसेच भविष्यात घडणाऱ्या गोष्टी सांगितल्या ज्या कालांतराने शत प्रतिशत खऱ्या  निघाल्या. 
१) जुलै  २००८ मध्ये माझा प्रेम विवाह झाला ,
२)मला त्यांनी पुढील वाट चालीसाठी पण मार्ग दर्शन केले ,माझ्या संपूर्ण कुटुंबाची कुंडली त्यांनी बनवली ,माझ्या अनेक मित्रांना पण त्यांनी अचूक भविष्य सांगितले तसेच मार्गदर्शन पण केले .

शनिवार, ८ जून, २०१३

परीक्षेचा रिजल्ट आणि ढोंगी बाबांची चलती …….

परीक्षेचा रिजल्ट आणि ढोंगी बाबांची चलती ……. 


काल माधुरीचा फोन आला. "Madam मुलाचा बारावीचा रिजल्ट लागला. तुम्ही म्हणला होतात ७० आणि ७५ टक्केच्या दरम्यान मार्क्स मिळतील. त्याला ७४% मिळाले."
मी म्हटले," अरे वाह छान. मग पुढचे काय ? पुढे काय म्हणतोय काय करायची इच्छा आहे ?"
"तुम्ही सांगिल्याप्रमाणे त्यालाही सिव्हिल इंजिनीरिंगच करायचे आहे. ते करू शकेल ना ? पुढे काही अडचणी तर येणार नाहीत ना ? कारण तुम्हाला तर माहीतच आहे तो जराही स्थिर नाही. दहावीपर्यंत कसा अभ्यास करून घेतलाय ते  मलाच माहीत.बारावीचाही त्याने शेवटी शेवटी अभ्यास केलाय. त्यामुळे भीती वाटतेय. करेल ना पुढचे नीट?"
काही वेळेस काही जातक पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारात असतात. काळजी वाटत असल्याने ठीक आहे पण म्हणून कुंडलीचे विवेचन एकदा झालेले असताना पुन्हा पुन्हा तेच तेच विचारले कि मग त्रास होतो. कारण उत्तर तर बदलणार नसते. असो तर मी म्हटले, "गेल्यावेळेस आपले बोलणे झाले आहे ना ? करेल तो व्यवस्थित. तरी सुद्धा तुम्हाला वाटत असेल तर पुन्हा एकदा मी कुंडली check करते."
  "तसे नाही madam पण काय झालेय की मी मध्ये खूप Tension मध्ये होते अमोदच्या रिजल्टच्या संदर्भात,तेंव्हा माझ्या मैत्रिणीने मला एका ज्योतिषाबद्दल सांगितले. मी गेल्याच आठवड्यात त्यांच्याकडे गेले होते. त्यांनी तर स्पष्ट सांगितले कि हा मुलगा नापास होणार. मंगळ आणि राहूची युति आहे. ह्याला शिक्षणात खूप अडचणी आहेत. पुढे जास्त शिकू शकणार नाही.
मी खूप घाबरले हो. मी म्हटले मग काय करायचे? एकुलता एक मुलगा आहे तो पण नाही व्यवस्थित शिकला तर मग झालेच. त्यावर ते म्हणाले ह्यावर एक उपाय आहे. तो केल्याने तो पासच नाही तर मार्कही तुम्हाला हवे तसे मिळतील. आहे का तयारी ? मी विचारले काय उपाय आहे ? त्यावर त्यांनी मंगळ आणि राहुच्या शांतीचा उपाय सांगितला. ३०,०००/- रु. खर्च होईल पण तो उपाय केल्याने  फरक पडेल असे सांगितले. मला काय करावे काय कळतच नव्हते. मग पुन्हा आमची वारी माझी मैत्रीण दुसऱ्या ज्योतिषाकडे घेऊन गेली. खूप प्रसिध्द आहेत ते. त्यांनी ही तेच सांगितले आणि शांतीचा खर्च ३५०००/- रु.  सांगितला. इतकी घाबरली होते ना  madam घरी आल्यावर मी ह्यांना सांगितले. ते तर इतके रागवले. मला म्हणाले काय गरज होती तिथे जायची? एकदा आपल्याला अनुप्रियाने सांगितलेय ना ?? आणि ही शांती बिंती काही करायची गरज नाही. मी हा खर्च करणार नाही. 
रिजल्ट लागेपर्यंत मी इतकी tension मध्ये होते ना  madam. काय सांगू ?? आणि जिने मला त्या ज्योतिषांकडे नेले होते तिचाही सारखा फोन येत होता. ते ज्योतिषी सारखे तिला फोन करून विचारात होते कि लवकर करा शांती मग मुहूर्त नाहीत आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल मग आपल्या हातात काहीच नाही वगैरे. पण ह्यांनी नाहीच सांगितलेले त्यामुळे मी तिला तसे सांगितले. 

आणि रिजल्टच्या  दिवशीतर मी सगळे फोन बंद केले होते. सगळ्या नातेवाईकांना काय सांगायचे ह्याची भीती. मुलगा घरी आला तेंव्हा रिजल्ट कळला आणि इतका आनंद झाला ना. हे पण म्हणाले बघ उगीचंच tension घेतलं होतीस. अनुप्रियाने ७० आणि ७५ च्या दरम्यान सांगितलं होत ७४%मिळाले आणि ते ही कुठलीही शांती बिंती न करता."

एका दमात माधुरी बाईनी आपली कहाणी सांगितली. ऐकून रागही आला आणि समाधानही वाटले.  माधुरीच्या ह्यांनी शास्त्रावर दाखवलेला विश्वास मला नवी स्फूर्ती देऊन गेला. माधुरीला सांगितले,"चला बरे झाले त्या निमित्ताने तुम्हालाही कळले ढोंगी लोक कसे असतात ते. आता लक्षात ठेवा आणि काळजी करू नका. अमोदची कुंडली व्यवस्थित आहे. काहीही अडचणी नाहीत. पुढचेही सगळे व्यवस्थित होईल."

ह्या शास्त्राचा वापर बरेच लोक आपल्या फायद्यासाठी करतात. लोकांना घाबरवून,खोटे सांगून पैसे कमवण्याचे नवीन नवीन मार्ग असतात ह्यांच्या कडे. पण लोकांनी सद्सदविवेकबुद्धीने विचार करावा म्हणून ही Case आज इथे Publish करतेय. चार दिवसांनी रिजल्ट लागणार आहे आणि त्याची आज शांती करून मार्क्स वाढतील असा विश्वास बरयाच ज्योतिषांकडून (ढोंगी) दिला जातो आणि भरगच्च रक्कम सांगितली जाते. चार दिवसात शांतीने रिजल्ट बदलू शकतो का ?? ह्याचा विचार पालकांनी करावा आणि अशा सगळ्या लोकांना थारा देऊ नये. कारण माधुरीने एकदा का शांती करून घेतली असती आणि रिजल्ट चांगला लागला आहेच तर ह्या ढोंगी लोकांनी त्याचे सर्व credit स्वतःला घेतले असते आणि भविष्यात अजून घाबरवून शांती वगैरेचा खर्च उकळला असता. पण अशा लोकांमुळे समाजाचे नुकसान तर होताच आहे त्याचबरोबरीने ह्या शास्त्राचा प्रांजळपणे अभ्यास करणारया लोकांवर(ज्योतिषांवर) मग समाज विश्वास ठेवत नाही आणि मार्गदर्शनापासून वंचित रहातो. 

तुम्हीही नीट विचार करा आणि माधुरीसारखे कोणाच्या बोलण्याला बळी पडू नका.
प्रतिक्रिया नक्की कळवा : anupriyadesai@gmail.com

 

सोमवार, ३ जून, २०१३

घे भरारी


घे भरारी 

"मला आणि आईला तुम्हाला भेटायचे आहे कधी येऊ ?" समिधाचा २०१०च्या  ऑक्टोबर महिन्यात फोन. कधी भेटायचे तो दिवस आणि वेळ ठरली. ठरल्या दिवशी दोघी आल्या. आईनेच सुरवात केली,"हिचे लग्नाचे योग कधी आहेत ? ते बघा जरा.  आता स्थळ येतात तर ही लगेच नाही म्हणते. अजून शिकायचं म्हणते. आमच्या समाजात मुलीना जास्त शिकवत नाहीत. नोकरी तर करू देत नाहीत त्यामुळे शिकवून काय फायदा ? आणि शिकलेल्या मुलींची लग्न लवकर होत नाहीत हो madam.  B.com. तर झाली त्यानंतर MBA करतेय.  मला तर काही समजत नाही काय करायचं ते. तुम्हीच समजावा."

मी समिधाच्या कुंडलीचा आढावा घेण्यास सुरवात केली. आजकालच्या मुला-मुलींना लग्नाची घाई नसते आणि लग्ना आधी "settle"  व्हायचे असते. त्यामुळे किंवा मग साथीदाराची निवड झालेली असते परंतु सध्या घरी सांगायचे नसते अशा काही कारणांमुळे मग आलेल्या स्थळांना नकार देणे असे प्रकार सुरु असतात. असेच काहीसे मला समिधाच्या बाबतीत वाटले. परंतु तिच्या कुंडलीचा आढावा घेत असतानांच मला जाणवले कि माझा अंदाज साफ चुकीचा आहे. समिधाची कुंडली खालीलप्रमाणे :

समिधाची कुंडली 

वैदिक पद्धतीने :  १) वृषभ लग्न आणि मकर राशीची कुंडली. दोन्ही पृथ्वी तत्वाच्या राशी.
२) मकर राशीचा चंद्र म्हणजे ह्या व्यक्ती आपल्या कर्माबद्दल नेहेमीच सतर्क असा माझा अनुभव आहे.  
३) लग्नेश शुक्र जो  षष्ठेशही आहे तो स्वतः धन स्थानात बुधाच्या राशीत. बुध म्हणजे व्यापारीवृती. ज्यांचा बुध चांगला ते मातीही सोन्याच्या भावात विकू शकतील. इथे लग्नेश स्वतः बुधाच्या राशीत.
४) दशम स्थान - ज्यावरून व्यक्ती नोकरी करणार कि व्यवसाय हे समजते. इथे दशमाचा स्वामी शनि सप्तमात  वृश्चिक राशीत. दशमाचा संबंध साप्तमाशी. गेल्या एका लेखात(योगेश पाटील) - आपण पहिलेच दशम आणि सप्तम ह्यांचा संबंध म्हणजे व्यक्ती मुळातच व्यापारीवृत्तीची असते.

कृष्णमुर्तीपद्धतीने :  १) लग्नाचा SL - गुरु - १०, ८, ११   NL -  गुरु - १०, ८, ११  म्हणजेच लग्नाचा सबलॉर्ड सुद्धा दशमाचा कार्येश. ही व्यक्ती नोकरी करणार नाही हे निश्चित.

२) षष्ठ स्थानाचा SL - बुध - १२, २, ५  NL - चंद्र - ८  ३)षष्ठाचा सबलॉर्ड पंचमाचा कार्येश म्हणजे नोकरी करणार नाहीच आणि केली तरी फार काळ टिकणार नाही.

मी आईना म्हटलं," ही काही नोकरी करणार  नाही."

मी पुढे काही बोलण्याच्या आधीच आई," मग तेच तर म्हणते मी. नोकरीसाठी आम्ही काही बोलत नाही पण मग लग्नाचं तरी बघावं."

जेंव्हा समिधा माझ्याकडे आली होती तेंव्हा तिला राहू महादशा आणि  बुधाची अंतर्दशा सुरु होती. बुध - १२, २, ५  NL - चंद्र ८ ३. बुध अंतर्दशा संपणार ऑक्टोबर २०१२ला. म्हणजे तोपर्यंत तरी MADAM बोहल्यावर चढणार नाहीत हे नक्की. आईना तसे सांगितल्यावर त्यांचा हिरमोड झाला.
आता समिधाची कळी खुलली. समिधा," तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. मी दोन ते तीन ठिकाणी नोकरीसाठी गेले होते परंतु प्रत्येक ठिकाणी ३ दिवसापेक्षा जास्त राहूच शकले नाही. मला नोकरी करायची नाही हे मी निश्चित केले आहे आणि दोनच दिवसापूर्वी मी एका सेमिनारला गेले होते तिथे एका BUSINESS बद्दल सांगत होते. मला त्यांचा CONCEPT आवडला. त्यांनी खूप छान EXPLAIN  केले. त्यांची FRANCHISEE घ्यायची आणि BUSINESS पुढे चालवायचा. सुरवातीला सगळी मदत ते करणार. जागा आपली आणि ७ ते ८ जण आपल्याला ह्या कामासाठी लागतील."
मी म्हटले,"O.K. पण हा CONCEPT काय आहे ?"
समिधा,"आपल्याला जे MOBILE वर एखाद्या ऑफरबद्दल SMS येतात जसे hmmmm तुम्हाला car loan हवे असेल तर ह्या नंबरवर संपर्क करा किंवा astrology consultation हवे असेल तर ह्या नंबरवर फोन करा. हे असे sms आपण bulk मध्ये पाठवतो म्हणजेच थोडक्यात एखाद्या व्यक्तीच्या business बद्दल आपण advertise करायची. ह्यासाठी लागणारा Database (फोन नंबर) ज्यांच्याकडून franchisee घेऊ त्यांच्याकडून मिळणार."

वरती आपण पाहिलेच बुध म्हणजे व्यापार. बुध एखादी गोष्ट खुलवुन सांगू शकतो. बुधाकडे convincing power आहे.  कुंडलीत लग्नात बुध, लग्नेश शुक्र बुधाच्या राशीत आणि षष्ठ स्थानाचा सबलॉर्ड पण बुधच.अंतर्दशाही बुधाचीच.  काय ? काही लक्षात आले का वाचकांच्या ?? 
समिधाला म्हटले,"बिनधास्त सुरु कर."  बाकीचे औपचारिक बोलणे झाले आणि आई आणि समिधा निघणार तेवढ्यात पुन्हा आईंचा प्रश्न,"आमच्याकडे मुली शिकतच नाहीत तर नोकरी कुठून करणार ? हि हुशार म्हणून शिकली पण आता ही म्हणते business करायचा. कस काय व्हायचं हीच पुढे?? पुढचं जाऊदे आता हिच्या बाबांना काय सांगायचं ?? ते तर नाहीच म्हणतील. ही तर म्हणते businessला जागा पाहिजे. मग जागा वगैरे कशी काय होईल ??  कोण देईल जागा ??"
समिधा संपूर्ण गृहपाठ करून आली होती. तिला आई- बाबांच्या विरोधाची कल्पना होती. समिधा,"madam मी जागा बघून ठेवली आहे. सध्या भाडे तत्वावर घेईन. भाडं सुद्धा कमी आहे. सध्या त्या जागेत एक भाडेकरू आहेत. त्यामुळे ती जागा आपल्याला कधीपर्यंत मिळू शकेल हे कळू शकेल का ?"
समिधाच्या कुंडलीत चतुर्थेश आहे रवि. रविची विदशा सुरु होणार मार्चच्या एक तारखेला. तिला म्हटले,"मार्चच्या पहिल्या तारखेला जागा मिळेल".  समिधा खुश झाली.

 मार्चच्या पहिल्या तारखेला आठवणीने तिने फोन केला. जागा ताब्यात आली आणि उद्यापासून म्हणजेच दोन तारखेपासून office सुरु करणार. तिला शुभेच्छा दिल्या. पण एक गोष्ट खटकत होती ती म्हणजे बुधाच्या अंतर्दशेत ह्या गोष्टी घडल्या. बुध म्हणजे Duality. आता Dualityचा संदर्भ लागत नव्हता. 

मधल्या काळात ती माझ्या Continuous Contact मध्यॆ होती. तिची प्रगती पाहून आई- बाबांचा विरोध मावळला होता. अत्यंत खुश होती पण बोलता बोलता नेहेमी म्हण्याची मला अजून काहीतरी करायचे आहे पण काय ते काळात नाही. हा business सध्या व्यवस्थित settle होतोय मग अजून एखादा business option चा विचार करतेय. पण options मिळत नाहीयेत. 
आणि २०१२ च्या सप्टेंबरला ती भेटायला आली."madam business तर व्यवस्थित सुरु आहे आणि अजून एक (बुध - duality - दोन business )  संधी मला मिळतेय. माझ्या ओळखीत एक व्यक्ती आहे त्यांचा घरगुती पापडाचा business आहे. त्यांचे स्वतःचे पापड बनवण्याचे machine आहे. पण सध्या त्यांना त्यांच्या आजारपणामुळे लक्ष देत येत नाही. तर ते machine मला विकण्याची त्यांची इच्छा आहे. रक्कम खूप मोठी आहे आणि machine ठेवायला जागा पण लागेल. जागेसाठी शोधाशोध सुरूच आहे आणि machine साठी लागणारे पैसे आहेत माझ्याकडे. आता प्रश्न एवढाच आहे की  हा business माझ्या कुंडलीला suit होतो का ? आणि पुढे व्यवस्थित होईल ना सगळे ?"
कुंडलीला केतूची अंतर्दशा सुरु होती आणि केतू मंगळाच्या नक्षत्रात. मंगळाच्या अंमलाखाली पापड-लोणची हे पदार्थ येतात. म्हटले,"कर business. हा business suit  होतोय. मंगळाची विदशा सुरु होतेय फेब्रुवारी २०१३ ला. म्हणजेच फेब्रुवारीनंतर business settle होण्यास सुरु होईल." तिला धीर तो कसला ?? जागेची शोधाशोध सुरु होतीच. 

जागा मिळाली जानेवारी २०१३ ला आणि ती सुद्धा आधीच्या जागेला लागुनच. (Duality ) (पुन्हा रवि विदशेतच जागा मिळाली.) machine मिळाली. पापड कारखाना सुरु झाला. पण पापडाच्या business ने उंच भरारी घेण्यास सुरवात केली मार्च महिन्यापासूनच. गेल्याच आठवड्यात समिधा भेटायला आली होती. आधीचा business व्यवस्थित सुरु होताच आणि पापड व्यवसायसुद्धा वेग घेतोय. catering business करणाऱ्या संस्थांशी समिधा contract करतेय. पुढील सहा सात महिन्यात तिला ह्या business कडून बरयाच अपेक्षा आहेत.  

शहरात राहून, खूप शिकून आई-वडिलांचा support घेऊन business करणे  कठीण नाही परंतु एखाद्या गावात राहून शिकून,तिथे एक नाही दोन वेगळ्या पद्धतीचे business करणे तेही घरच्यांचा विरोध असतांना…. हे सोप्पे नाही. समिधा जेंव्हा भेटते तेंव्हा हेच बोलते,"madam हे सगळे तुमच्यामुळे शक्य झाले. तुम्ही कुंडलीवरून माझ्या carrier बद्दल स्पष्टपणे सांगितले आणि मी ठामपणे निश्चय घेऊ शकले."  माझे तिला हेच उत्तर असते,"मी तर फक्त मार्ग दाखवला. मेहनत आणि destiny ही पूर्णतः तुझीच." 

येणारा पुढील काळातही समिधाने अशीच प्रगती साधावी व उंच भरारी घ्यावी ही इच्छा.  
 तिला खूप खूप शुभेच्छा देऊन हा लेख इथे थांबवते.   

Note : बुध हा communication शी संबंधीत आहे म्हणजे computer,mobile इ. पहिला व्यवसाय हा mobile/sms संदर्भात होता आणि त्याचवेळी बुध अंतर्दशा असल्याने हा व्यवसाय खूपच चांगला चालेल ह्या बद्दल कुंडलीने खात्रीच दिली आणि त्याचा प्रत्यय समिधाला मिळाला. दुसरा व्यवसाय हा पापडाशी निगडीत होता आणि त्यावेळी केतू अंतर्दशा आणि केतू मंगळाच्या नक्षत्रात. पापड व्यवसाय मंगळाच्या अंमलाखाली येतो त्यामुळे तिथेही तिला प्रगती साधता येईल याबद्दल खात्री आहे. 

READERS ALL OVER THE WORLD