मंगळवार, २३ डिसेंबर, २०१४

आणि बाबा सापडले …….

आणि बाबा सापडले ……. 


१३ डिसेंबरच्या रात्री १०.४५ ला हेमंतचा फोन. शनिवार असल्याने दिवसभर जातकांची रीघ होती. दिवसभर वेगवेगळ्या कुंडल्या अभ्यासून आणि बोलून बोलून डोक जडं झालेलं. एवढ्या रात्री ह्याचा फोन कसा काय बुवा ? असा विचार करतच फोन घेतला. "बोल रे काय झालं ?" समोरून हेमंत," ताई  sorry. एवढ्या रात्री फोन करतोय. अगं पण आमचे बाबा गायब झालेत. म्हणजे झालाय असं कि आज आम्ही गोरेगावला एके ठिकाणी सत्यनारायण पूजेसाठी आलो आहोत. आठ-साडेआठच्या दरम्यान सर्वांची जेवणे आटोपली. त्यांनतर आम्ही सर्वजण गप्पा मारत होतो आणि अचानक लक्षात आले कि बाबा घरात नाहीत. सगळीकडे शोधाशोध सुरु आहे पण काहीच पत्ता लागत नाहीये. गेल्या काही वर्षांपासून त्यांना स्मृतीभ्रंशाचा त्रास आहे त्यामुळे कुठे गेले जरी असले तरी त्यांना परत येण्याचा रस्ता आठवणे कठीण आहे. त्यांच्याकडे mobileही नाही. कारण कित्येकवेळा ते mobile घेऊन जाणेही विसरतात. त्यांचा फोनही इथेच घरात आहे. त्यामुळे खूप काळजी वाटतेय. please जर सांगशील का कुठे असतील आणि सुखरूप असतील ना ??" मी म्हणाले," कळवते तुला ". 


लगेचच प्रश्नकुंडली मांडली. १३-१२. २०१४ रात्री १०.४५ मुंबई. सिंह लग्नाची कुंडली. शासक ग्रह खालीलप्रमाणे :


L  - रवि ४,१


S  - शुक्र ५,३,१०


R  - रवि ४,१


D  - शनि ४,६,७


गेल्या एका अशाच प्रकारच्या लेखात मी सांगितले होते कि लग्नाचा सबलॉर्ड जर शासक ग्रहांमध्ये असेल तर व्यक्ती सुखरूप (जिवंत) असते

१) इथे लग्नाचा सबलॉर्ड शुक्र शासक ग्रहांमध्ये आहे म्हणजेच बाबा सुखरूप आहेत. 

२) चंद्र केंद्रात आहे ह्याचाच अर्थ बाबा सुखरूप आहेतच आणि घरात/घराच्या आसपास आहेत. 


३) वर शासक ग्रहांच्या significations वर नजर टाकली तर लक्षात येईल कि कुठेही अष्टम आणि व्यय स्थानाचा संबंध आलेला नाही उलटपक्षी ४ स्थान सतत दर्शवले जात आहे. त्यामुळे १००% बाबांना कसलीही दुखापत झालेली नाही आणि बाबा लवकरच सापडतील. 


४) आता ते कधी सापडतील ? कारण ते स्वतःहून परत घरी येणं मुश्कील आहे. (स्मृतीभ्रंश ) त्यासाठी शासक ग्रह मदतीला घेतले. 


५) सिंह लग्न सुरु आहे २ अंशावर. लग्न केतूच्या नक्षत्रात आणि शुक्राच्या उपनक्षत्रात आहे. शासक ग्रहांमध्ये रवि दोनदा आणि शुक्र एकदा आलेला आहे. त्यामुळे सिंह लग्नावरच व्यक्ती सापडू शकते. आता सिंह लग्न संपणार  रात्री १२.४४ ला. त्यामुळे  नक्की कधी हे सांगण्यासाठी लग्नाचा नक्षत्र स्वामी आणि उपनक्षत्र स्वामी ह्यावरच लक्ष केंद्रित करावे लागेल. सध्या लग्न केतूच्या नक्षत्रात आहे परंतु केतू रुलिंगमध्ये नाही म्हणजेच केतू सोडून द्यावा. केतू नंतर येतो शुक्र. शुक्र रुलिंगमध्ये( दुसऱ्या क्रमांकावर ) आहे. लग्न शुक्राच्या नक्षत्रात १३ अंश २० कला ते २६ अंश ४० कला असे पर्यंत असणार आहे. तेंव्हा घडाळ्यात वेळ असेल रात्रीचे ११.३५ ते १२.३०.  अजून detail मध्ये जायचे म्हणजे लग्न शुक्राच्या उपनक्षत्रात आहे,रुलिंग मध्ये राशी स्वामी म्हणून तिसऱ्या क्रमांकावर रवि आलेला आहे. म्हणजेच लग्नाचे अंश शुक्राच्या नक्षत्रात आणि शुक्राच्याच उपनक्षत्रात असतील तेंव्हा (घडाळ्यात वेळ असेल - ११ वाजून ३३ मिनिटे ते ११ वाजून ४२ मिनिटे किंवा लग्नाचे अंश शुक्राच्या नक्षत्रात आणि रविच्या उपनक्षत्रात असतील तेंव्हा(घडाळ्यात वेळ असेल - ११ वाजून ४२ मिनिटे ते ११ वाजून ४५ मिनिटे ) बाबांचा शोध लागला पाहिजे. 


हेमंतला सांगितले,"अजिबात काळजी करू नकोस बाबा सुखरूप आहेत. घराच्या आसपासच आहेत. साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान शोध लागेल. शोध लागल्या लागल्या मला कळव". हेमंत निश्चिंत झाला कि नाही ते माहित नाही पण मी शासक ग्रहांच्या भरोशावर निश्चिंतपणे झोपून गेले. 


रात्री ११.४५ ला हेमंतचा फोन आला," ताई बाबा सापडले. सुखरूप आहेत आणि ते दादरच्या आमच्या दुसरया घरी आहेत. मी आता त्यांना घ्यायला जातोय. त्या घरी माझी काकी राहते. तिनेच फोन करून कळवले. तिचा फोन ठेवला आणि लागलीच तुला फोन करतोय." 

शासक ग्रहांनी पुन्हा एकदा दिलेला हा प्रत्यय. केंद्रातील चंद्र जातक घराच्या आसपासच असल्याचे निर्देशित करतो. इथेही जातक स्वतःच्याच दुसऱ्या घरी होता. जातक सुखरूप आहे. मला ११.४५ ला हेमंतचा फोन आलेला ह्याचाच अर्थ बाबांचा शोध ११ वाजून ४० मिनिटे ते ११ वाजून ४४ मिनिटे ह्या दरम्यान लागला. पैसे आणि mobile जवळ नसताना केवळ पूर्वीच्या स्मृतीवर ते दादरच्या घरी एवढ्या रात्री पोहोचले कसे हा एक प्रश्नच आहे. 

पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम गुरुवर्य के.एस. कृष्णमुर्ती सरांना.     
 ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

SAGITTARIUS / धनु राशी - सावधान साडेसाती सुरु झाली


SAGITTARIUS / धनु राशी  - सावधान साडेसाती सुरु झाली 


साडेसातीवर लेख लिहिल्यानंतर बरयाच वाचकांचे फोन आले आणि पत्रही आली. कन्या राशीचे लोक सध्या सुटकेचा श्वास घेत आहेत. कारण नोव्हेंबरला कन्या राशीची साडेसाती संपून धनु राशीची साडेसाती सुरु झाली आहे. साडेसाती म्हणजे काय ? साडेसातीत काय नियम पाळले पाहिजेत हे मी गेल्या लेखात स्पष्ट केले आहे. आज मी राशी नुसार त्या त्या लोकांना काय त्रास होऊ शकेल आणि त्यांनी स्वतःच्या स्वभावात काय बदल केले पाहिजेत हे सांगणार आहे. 

सध्या तुळ,वृश्चिक आणि धनु राशीची साडेसाती सुरु आहे. तुळ राशीची शेवटची अडीच वर्षे,वृश्चिक राशीची पाच वर्षे आणि धनु राशीची साडे सात वर्षे साडेसाती बाकी आहे. 
तुळ

तुळ - तुळ राशीत शनि उच्चीचा होतो. तुळ रास ही शुक्राची राशी आहे. शनि आणि शुक्र ह्या दोन्ही ग्रहांमध्ये मित्रत्वाचे/जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तुळ राशीची व्यक्ती ही मुळातच कलाकार. Acting,Dance,Drawing किंवा उत्तम स्वयंपाक म्हणजेच काहीतरी कलात्मक नक्कीच. ह्यांना सगळ्याचा आळस. कुठे वेळेवर पोहोचायचे म्हणजे ह्यांचे धाबे दणाणले. ह्यांना प्रवासाची खूप आवड असते. साडेसातीतील शेवटची अडीच वर्षे बाकी आहेत. ह्या काळात तुम्ही तुमच्या पुढील आयुष्यात ह्या मंत्राचा अवलंब केला पाहिजे -  
आळस झटकून कामाला लागणे. आजचे काम उद्यावर ढकलू नका.  अवाक्याबाहेरची आश्वासने कोणाला देऊ नका. 
तब्येतीच्या बाबतीत लिवर,किडनी,हार्निया आणि दात ह्या अवयावांबाबत त्रास होऊ शकतो. 
वृश्चिक

वृश्चिक - सध्या २ नोव्हेंबरपासून शनि महाराजांनी वृश्चिक राशीत बस्तान मांडले आहे. वृश्चिक राशीचे लोक हे अविश्रांतपणे  काम करणारे,लगेच राग येणारे, आतल्या गाठीचे,बोलण्यात उद्धट. वृश्चिक राशीचे लोक एखाद्याचा वचपा काढण्यात जाम हुशार असतात. स्वतः सतत कामात असल्याने दुसऱ्या व्यक्तींकडूनही हीच अपेक्षा असते. आळशी लोकांबरोबर ह्यांचे फार जमत नाही. risk घेण्याची क्षमता खूप चांगली असते परंतु कधी कधी फाजील आत्मविश्वासाने ह्यांचे दात ह्यांच्याच घशात येतात. साडेसातीचे चटके गेल्या २ वर्षांपासून जाणवत असतीलच त्यामुळे तुम्ही पुढील मंत्राचा अवलंब करणे - 
अति risk घेऊन कुठल्या गोष्टीची संपूर्ण माहिती नसताना गुंतवणूक करू नये. ( वृश्चिक राशी अति रिस्क घेते त्यामुळे ही special warning.) बोलून कोणाला दुखवू नये. फार घाई घाईत काम पूर्ण करण्यापेक्षा व्यवस्थित काम करण्यावर भर द्या
तब्येतीच्या बाबतीत किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो. पाणी जास्त पिणे. 


धनु


धनु - अत्यंत महत्वाकांक्षी,परोपकारी,थोडी घमेंडी,स्पष्टवक्ती आणि सतत बडबडणारी माणसे म्हणजे धनु. प्रवासाची आवड,घरात ह्यांचा पाय टिकणे अवघड आहे. स्वतः च्या कमाईचां काही हिस्सा हा दुसऱ्यांना मदत म्हणून देण्यात ह्यांना आनंद मिळतो. ह्यांचा मित्र परिवारही खूप मोठा असतो परंतु ह्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे हे दुसऱ्यांची मने दुखावतात. ह्यांनी ह्या साडेसातीच्या काळात घ्यायची काळजी म्हणजे - 
खर्चावर नियंत्रण ठेवणे,येणाऱ्या अडीच वर्षात खर्च भरपूर होणार आहे त्यामुळे आलेला पैसा साठवण्याचे मार्ग शोधा. लांबचे प्रवास भरपूर होतील,ज्यांना परदेशी जाण्याची इच्छा आहे ती ह्या अडीच वर्षात पूर्ण होईल. अडीच वर्ष हे अत्यंत बिकट (Frustrating Period )असणार आहेत आणि त्याची सुरवात किंबहुना झालीच असावी. बोलण्यात शब्द जरा जपून वापरणे. 
तब्येतीच्या बाबतीत - दाताचे Root Canal करून घ्यावे लागेल. घराचे Interior बदलाल किंवा नवीन घरही घेण्याचे योग आहेत (अर्थात ह्याला संपूर्ण कुंडलीचा support हवा )       

त्यामुळे साडेसातीला घाबरू नका पण फाजील आत्मविश्वासही बाळगू नका नाहीतर जमिनीवर येण्यास वेळ लागणार नाही. वृद्ध आणि अपंग लोकांना तुमच्या कुवतीनुसार मदत करा. (पैशांचीच मदत नव्हे परंतु त्यांना मानसिक आधाराचीही गरज असते) शनिवारी मारुतीच्या मंदिरात रांग लावून दर्शन घ्या अथवा नका घेऊ परंतु गरजूंना नक्की मदत करा मग तुमचे भले झालेच म्हणून समजा. 

भेटू पुढच्या लेखात. प्रतिक्रिया नक्की कळवा. ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

सोमवार, १७ नोव्हेंबर, २०१४

Shani Sadesati,Remedies And You शनिची साडेसाती आणि उपाय


निची साडेसाती आणि उपाय 

Shani Sadesati,Remedies And You 

२ नोव्हेंबरला शनि महाराजांनी वृश्चिक राशीत प्रवेश केला आणि त्यामुळे धनु राशीला साडेसाती सुरु झाली आणि कन्या राशीची साडेसाती संपली. मी मागच्या काही लेखात हा उल्लेख केला आहे कि मार्च २०१४ पासून माझ्याकडे जितके जातक आले आहेत त्यातले सगळेच धनु राशी किंवा धनु लग्नाचेच आले. एखादा अपवाद असला तर. ह्याचाच अर्थ साडेसातीचा त्रास खूप आधीच सुरु झालेला जाणवतो. २ नोव्हेंबरला शनिने तुळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केला. शनि ज्या राशीत असतो त्या राशीला,त्या राशीच्या मागच्या राशीला आणि त्याच्या पुढील राशीला साडेसाती सुरु असते. म्हणजे उदा. सध्या शनि वृश्चिकेत आहे त्यामुळे वृश्चिक राशीला, वृश्चिक राशीच्या मागच्या म्हणजेच तूळ राशीला आणि वृश्चिकेच्या पुढील राशीला म्हणजेच धनु राशीला सध्या साडेसाती सुरु आहे. 
शनि म्हटले की सर्वांच्या अंगावर काटा उभा रहातो, नाहक भीती वाटू लागते. त्यातच टी. व्ही. वर शनि बद्दल कोणी ना कोणी काही ना काही तरी बोलतच असतात. त्यातून काही तरी माहिती मिळते - शनि म्हणजे वाईट, खराब, प्रत्येक बाबतीत विलंब...त्यातच शनिची साडेसाती, शनिची दृष्टी, शनिचा प्रभाव...वगैरे वगैरे....म्हणजेच थोडक्यात लोकाना भरपूर घाबरवले जाते...पण खरे सांगायचे झाले तर शनि सारखा प्रामाणिक,न्याय देणारा, आध्यात्मिक,सचोटीने व सातत्याने काम करणारा, संशोधनवृत्ती असणारा दूसरा कोणताही ग्रह ग्रहमालेत नाही.ज्योतिषशास्त्रीयदृष्टया शनि हा वायुतत्वाचा तसेच मकर व कुंभ राशींचा अधिपती आहे.त्याची आवडती रास कुंभ आहे  
शनि संस्कराचा बराचसा भाग पत्रिकेत दाखवत असतो. हा ग्रह पुर्वकर्मांचा व प्रारब्धाचा कारक आहे. बरयाच कालावधिने घडणारया गोष्टी शनि दाखवतो..... पण त्याचबरोबर अनेक कष्ट करण्याची ,दिर्घोद्योगाची चिकाटी शनि जवळ आहे. उत्तम प्रकारचे नियोजन,सुत्रबद्ता,सुसंगता उभी करणारा असा आहे. मोठमोठी, प्रचंड, यशस्वी,दूरगामी परिणाम करणारी कामे शनिच करू शकतो. तरीही शनिला नेहेमी हिणवले जाते त्याचे वाईट वाटते...साडेसाती : शनिची साडेसाती बापरे....कधी दुसरया ग्रहाची साडेसाती ऐकली आहे का तुम्ही ?? त्याचे कारणही तसेच आहे..... 
शुक्र,चंद्र,सूर्य,गुरु,बुध इ.ग्राहांबद्द्ल नेहेमीच चांगले वाचत आलो आहोत आपण.....ते ग्रह पत्रिकेत कशी चांगली फळ देतात ते तर अनेक ज्योतिषांकडून ऐकलेलेही असेल. पण मला असे वाटते की हे सर्व ग्रह हे फसवे आहेत...कारण जीवनाची खरी बाजू दाखवण्याची ताकद ही फक्त शनितच आहे.... 

साडेसाती म्हणजे साडेसात वर्षांचा कालखंड. आपल्या मागची रास,आपली रास व त्याच्या पुढील रास अशा तीन राशीतून जेंव्हा शानिचे भ्रमण होते असते तेंव्हा त्याला साडेसाती असे म्हणतात. शनीला एक राशी भोगण्यास अडीच वर्ष लागतात. अर्थात तीन राशी भोगण्यास साडेसात वर्ष लागतात...म्हणजे समजा तुमची राशी सिंह आहे....त्याच्या आधीची राशी आहे कर्क.......म्हणजेच जर शनिने सिंह राशीत प्रवेश केला तर कर्क, सिंह आणि कन्या ह्या तिन्ही राशीना साडेसाती सुरु झाली. 
पण साडेसातीचाही खुप बाऊ केला जातो, साडेसाती म्हणजे वाईट घडणारया गोष्टींचा काळ, कुठलेही काम व्यवस्थीत होणार नाही, कामे रेंगाळत रहातील वगैरे ......पण खरे तर शास्त्रात असेही म्हटले आहे साडेसाती म्हणजे ह्या सर्व गोष्टी होणारच परंतु जी व्यक्ती सचोटीने काम करते... खोटे बोलत नाही.. आळस करत नाही .....न्यायाने वागते...त्या व्यक्तीना साडेसातीचा त्रास जाणवत नाही. पण खरे म्हटले तर आताच्या युगामध्ये हे सर्व पाळणे अशक्य आहे....सचोटीने काम करणारयालाच प्रमोशन मिळत नाही, खोटे तर दिवसातून कित्येकदा बोलावे लागते...मग ह्यावर उपाय काय ?? ह्यावरून मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती ही की तुम्ही साडेसाती साडेसाती म्हणुन ज्या गोष्टीचा बाऊ करताय ती तर पन्नास-शंभर वर्षापूर्वीपासून आहे....मग आजच इतकी बोंबाबोंब का होते ?? ह्याला जबाबदार आपणच आहोत...ह्या बदलत्या सामाजिक व्यवस्थेचे हे सर्व परिणाम आहेत......जेंव्हा एकत्र कुटुंबपद्धती होती तेंव्हा म्हातारया-कोतारयांपसून अगदी शेंबड्या पोरापर्यंत सर्व एकाच घरात...एकाच छताखाली रहात.....प्रामाणिकपणा होताच पण त्याच बरोबर त्याने सर्वांमध्ये एकप्रकारची बांधीलकी होती...प्रत्येकाकडून घरातल्या म्हातारया-कोतारयांची सेवा होत होती.... प्रेम होते, आपलेपणा होता आणि मुख्य म्हणजे पैशांचा हव्यास नव्हता. जे जसे चालू आहे त्यात सर्व सुख आणि समाधान मानून चालणारे होते.... आज हे सर्व नाही जमले तरी आपल्या आई- वडिलांची सेवा जरुर करू शकता...सेवा म्हणजे कमीत कमी त्यांच्याजवळ बसून काही वेळ जरी त्यांच्या बरोबर व्यतीत केला.... सुट्टीच्या दिवशी त्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी नेले...हे जरी करू शकलो तरी त्यांना बरे वाटेल....तुम्हाला आशिर्वाद तर मिळेलच त्याच बरोबर एक समाधानही वाटेल...शनि हा वृद्ध व्यक्तींचा कारक आहे असे म्हटले जाते....जेव्हा तुमच्याकडून आई-वडिलांची किंवा कुठल्याही वृद्ध व्यक्तींची सेवा होते,त्यांना अपशब्द बोलले जात नाहीत....तेंव्हा असे म्हटले जाते शनिची कृपादृष्टी तुमच्यावर पडायला वेळ लागत नाही. उलटपक्षी साडेसातीत बरयाच लोकांचे भले झाले आहे.... शैक्षणिकदृष्टया व आर्थिकदृष्ट्या लोकांची प्रगती झालीआहे ... ....मोठमोठ्या उद्योजकांचे नवनवीन कारखाने उभे राहीले आहेत............. 

ह्याचबरोबरीने अजुन एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे शनि हा जीवनाची खरी बाजू, खरे स्वरुप तुम्हाला जाणवून देतो...जेंव्हा साडेसातीची सुरवात होते तेंव्हा त्या लोकांना त्याची जाणीव होते ती एकामागोमाग होत असलेल्या संकटाच्या मालिकेतून ........ह्याच वेळी खरया अर्थाने आपली माणसे कोणती .....ऐनवेळी मदतीचा हात अपेक्षीत असताना आपल्याला सोडून जाणारी माणसे कोणती ते ह्याच वेळी लक्षात येते.... 
म्हणुन मला वाटते की एकदातरी माणसाच्या आयुष्यात साडेसाती यावी आणि त्याला त्याच्या खरया माणसांची ओळख पटावी... 
Shani Sadesati,Remedies And You 

To interpret Sadesati we have to understand Saturn. Saturn is described as the son of the Sun, the king of all planets, by his Queen Chhaya, “the shadow”. The sun is the creator of light, and Chhaya is indicator of darkness. Saturn partakes of the apparent physical characteristics of his mother and remains dark. Saturn, being so opposed in nature to this father, Saturn or Sani is said to be banished by the Sun.

Characteristics of Saturn are - 

Saturn is said to be concerned with fairness or justice, (No injustice with anybody)
Saturn makes things slow but stable,(Teaches us Patience)
Saturn is dark complextion,
Saturn is handicap by one leg,
Saturn is Service oriented and hard worker (Teaches us to be with No Ego)
Saturn is deep thinker,Researcher,Scientist,
Saturn is Reserved in character.

What is Sadesati ?

Sadesati is a 7.5 years of Saturn's Transit twelfth,First and Second house from the house where Moon is placed in Natal Chart. (Moon Sign /Chandra Rashi). For Example - If your Moon Sign is Scorpio. The sign before Scorpio is Libra and Sign after Scorpio is Sagittarius. When Saturn enters in Libra Sign your Sadesati will start. 
Why 7 1/2 Years ?

Saturn is slow moving planet so to transit from one sign to another it takes 2.5 years. So first Phase for Sadesati is of 2.5 years, Scond Phase of 2.5 years and Third Phase of 2.5 years. If you calculate sum of these 2.5 years total comes to 7.5 years. Thats why it is called Sadesati ( 7.5 years). 

Sadesati starts means bad luck starts, now there will be loss in Business, You will loose your Loved ones, Your Career will be ruined,you will be shattered etc. According to me this is all nonsense. I will not deny all points but we have to observe these points from other perspective. 

I have explained you the the characteristics of Saturn. Saturn is concerned with fairness and Justice. If you are doing or you have done injustice to anyone, you will get the effects for this Karma during your Sadesati. When First Phase of Sadesati begins Saturn effects Starts like - Saturn makes things happen slowly and person who is going through this phase gets puzzled. He suddenly could not understand why things are being so slow around him. For e.g. if he has given an Interview and waiting for a Call from a Company, he has to wait for really long time to get the Job. So the person thinks this is really very bad thing happening with him and that is because of Sadesati.  He started feeling negative about Saturn but please hold on, here Saturn wants to teach us Patience. Patience to wait for your turn. 

So basically, you have to be loyal,do your work without corruption, do not lie, don't be greedy, help to needy people to get them Food,Shelter,Education etc. according to your budget. Saturn gets impressed by such things. So next time before blaming this Planet,peek inside you. 

Saturn's Gemstone- Blue Sapphire. Do not use Blue Sapphire without consent of Astrologer. 

Saturn's Colour - Navy Blue/Black


वाचकांसाठी टीप - For Astrological and Vasstu Consultation Contact -  www.kpastrovastu.com


बुधवार, २२ ऑक्टोबर, २०१४

GEM STONES /भाग्य रत्ने

रत्ने आणि भाग्योदय 


सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष सुखाचे,समृद्धीचे,आनंदाचे तसेच Healthy,Wealthy ठरू देत हीच सदिछा. 

आज विषय आहे रत्नांविषयी. आपल्या मनानेच रत्न वापरणारे,टी. व्हि. वरील जाहिरात पाहून रत्ने ORDER करणारे महाभाग माझ्या पाहण्यात आहेत. पण आजच्या लेखात मी माझ्या एका जातक मैत्रीणीची कहाणी (हो वाचतना कहाणीच वाटेल ) सांगणार आहे. तिचे नाव दिप्ती. 

दीप्तीचा स्वतःचा व्यवसाय आहे. गेल्या चार - पांच वर्षापासून ती माझ्या संपर्कात आहे. व्यवसाय सुरु करण्यापासून ते व्यवसायाचा आलेख उंचच उंच वाढण्याकरिता तिने नेहेमीच प्रामाणिकपणे आणि विश्वासाने  मी शास्त्रानुसार दिलेले सर्व उपाय केले आणि तिला त्याची वेळोवेळी प्रचीती सुद्धा मिळाली. परंतु…………… २०१३ च्या डिसेंबर मध्ये तिची आई साताऱ्याला स्वतःच्या गावी गेली होती. तिथे दीप्तीचा सहज विषय निघाला …तिचा व्यवसाय कसा सुरु आहे ? कमाई किती आहे ? वगैरे…. घरातील वडील स्त्रियांनी मग गावातीलच एका गुरुजींना दीप्तीची कुंडली दाखवण्यास सुचविले. आईच ती … काळजीपोटी किंवा उत्सुकतेपोटी तिने गुरुजींची भेट घेतली. त्या गुरुजींनी दीप्तीची कुंडली तयार न करिता नुसतीच तिची राशी विचारली. (राशीवरून भविष्य सांगणारे भरपूर आहेत. राशीवरूनच कशाला नावावरून भविष्य सांगणारेही आहेत. शास्त्र त्याला मान्यता देत नाही. मनुष्य ज्या दिवशी,ज्या वेळेला जन्माला येतो तो दिवस आणि त्या वेळेची  कुंडली बनवून जर भविष्य कथित केले तरच ते १००%  अचूक येउ शकते आणि  त्या व्यक्तीला मार्गदर्शन उपयोगी ठरते. ह्या विषयावर एखादा लेख नक्कीच लिहीन. असो ) दीप्तीची मकर राशी आहे. मकर राशीचा स्वामी आहे शनि. त्यावरून त्या गुरुजींनी तिच्यासाठी शनिचे नीलम रत्न वापरावे हे सुचविले. त्यांच्याकडूनच ते रत्न विकत घेऊन त्या माउली आपल्या मुलीला धारण करण्यास दिले. त्यानंतर दिप्तीनेही विचार न करिता ते धारण केले. आणि त्याचा परिणाम …….

नीलम धारण केल्यानंतर दीप्तीच्या आयुष्यात काय बदल झाले हे मी पुढे सांगणारच आहे त्या आधी नीलम रत्नाबद्दल थोडी माहिती देते.



Amitabh Bachhan wearing Two Neelam Stone Ring 



नीलम हे रत्न गडद निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटेत उपलब्द्ध असते. हे रत्न फार किमती असून,हे रत्न धारण केल्यानंतर त्याचे परिणाम त्वरीत दिसून येतात. जर जाणकार आणि अनुभवी ज्योतिषाकडून तुमच्या कुंडलीनुसार तुम्हाला हे रत्न भाग्यकारक असेल तर तुमचा नजिकच्या काळात भाग्योदय झालाच म्हणून समजा. परंतु जर अर्धवट ज्योतिष ज्ञानाने फुशारकी मारणारया ज्योतिषाने तुम्हांला हे रत्न धारण करण्यास दिले तर मात्र होत्याचे नव्हते होण्यास फार वेळ लागणार नाही. त्याचे दुष्परिणाम म्हणजे सर्व प्रथम व्यवसायात तुम्हाला  नुकसान होण्यास सुरवात होणे,अचानक व्यवसायात आणि व्यक्तिगत आयुष्यात संकटांची मालिका सुरु होणे आणि हळूहळू त्याचा गुंता वाढत जाणे इ. हे जरी विश्वास ठेवण्यासारखे वाटत नसले तरी अत्यंत खरे आहे आणि त्याचाच अनुभव दीप्तीला ह्या वर्षी मिळाला.

तर पुन्हा आपल्या मुळ विषयाकडे वळूया. दिप्तीनेही साधारण डिसेंबर २०१३ च्या शेवटच्या आठवड्यात नीलम रत्न फार विश्वासाने धारण केले. डिसेंबर महिना तर सुरळीत गेला परंतु जानेवारी महिन्यात तिच्या व्यवसायावर बराच परिणाम झाला. महिन्याला दोन Commercial जागेचे  प्रत्येकी १५०००/- भाडे,हाताखालील १० लोकांचा पगार आणि इतर बरेच खर्च, इतकी Capacity असणाऱ्या दीप्तीच्या बँक अकौंट मध्ये जानेवारी महिन्याच्या १५ तारखेला  फक्त ५०००/- इतकेच शिल्लक होते. परंतु आत्ताशा दीप्तीची परीक्षा सुरु झाली होती. त्यानंतर Office मधून बराचसा स्टाफ निघून गेला.  कामाचीही मागणी अचानक थंडावली. दीप्ती हतबल झाली होती कारण व्यवसाय सुरु केल्यापासून इतके नुकसान पहिल्यांदाच झाले होते. व्यवसायात होते असे कधी तरी असे मानून तिने स्वतःलाच समजावले.

होता होता जानेवारी महिना संपून फेब्रुवारी सुरु झाला. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तिच्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या महिलेला तिचा १० वर्षांचा मुलगा सहज म्हणून भेटण्यास आला. येताना त्याच्या बरोबर त्याचे काही मित्रही आले. (दीप्तीचा महिला गृहउद्योग संदर्भातील व्यवसाय आहे . त्यामुळे ऑफिस road  side ला तळमजल्याला आहे )  तेवढ्यात पेट्रोलिंग करणारी पोलिसांची गाडी त्याच रस्त्याने चालली होती. दुकानात लहान मुलांना बघून पोलिसांनी विचारणा करण्याआधी सरळसरळ आरोप केले की ह्या दुकानात बालमजूर कामाला ठेवले आहेत. त्या मुलांनी, त्यांच्या मातोश्रींनी, दीप्तीने," असे काही नाही साहेब ऐकून तर घ्या" म्हणून पोलिसांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो पूर्णपणे फोल ठरला. पोलिस ऐकून घेण्याच्या तयारीतच नव्हते. त्यांनी दीप्तीला पोलिस स्टेशनात येण्यास बजावले. madam च्या पायाखालची जमीनच हादरली आणि तिला माझी आठवण आली. 


पोलिसांना पैसे खायचे आहेत हे उघड आहे परंतु आधीच व्यवसायात नुकसान झालेले आणि बँकेत असलेले फक्त ५०००/- रुपये. मला फोन करून पुढे काय होणार आहे हे तिला जाणून घ्यायचे होते. प्रश्न कुंडली मांडून फार tension घेण्याची गरज नाही हे सांगितल्यावर दीप्तीच्या बोलण्यात आत्मविश्वास आला. तिला काही उपायही सुचविले जे पोलिस स्टेशनला जाता जाता तिला करता येतील. तिथून निघाल्यानिघाल्या दीप्तीचा मला फोन," madam झाले काम. सगळ्या मुलांवर आणि माझ्यावर प्रश्नांचा भडीमार झाला. दीड तास होतो पोलिस स्टेशनला. पैसेच खायचे होते त्यांना पण कमी रकमेवर निभावले. पण madam मला तुम्हाला एकदा भेटायला यायचे आहे. व्यवसायात आणि वैयक्तिक आयुष्यात गेल्या दोन -तीन महिन्यापासून बरीच उलथापालथ सुरु आहे."  तिला लगेच appointment चा दिवस आणि वेळ निश्चित करून दिली.


ठरलेल्या दिवशी दीप्ती आली. तिने सर्व कथाकथन केले आणि खरी गोम लक्षात आली. तिला मी नीलम रत्नाचा वापर ताबडतोब थांबवण्यास सांगितले. त्यासाठी दिवस आणि विधी निश्चित करून दिला. तिला काही मंत्र दिले आणि उपायही दिले. निश्चिंत होऊन दीप्तीने नीलम रत्नाचे विधिवत विसर्जन केले आणि दिलेले उपाय सुरु केले. आणि ह्या सर्वांचा सुंदर परिणाम एका महिन्यातच तिला मिळाला. तिच्या व्यवसायात वाढ झाली, गेलेले सर्व employee पुन्हा आले आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे तिला एका मोठ्या व्यवसायिकाकडून त्यांच्या व्यवसायात भागीदारीबद्दल विचारण्यात आले. दिलेले उपाय प्रामाणिकपणे केले आणि त्याचा सुंदर परिणाम मिळाला की जातकांच्या बोलण्यातून जो आनंद असतो तो ऐकून खरोखर खूप समाधान लाभते. 


बरेच जातक जेंव्हा माझ्याकडे येतात तेंव्हा नावावर किंवा राशीवर खूप भर देतात म्हणजे माझी वृषभ राशी आहे पण मला फार नटण्याची आवड नाही मग असे कसे तुमचे ज्योतिष ? किंवा माझे नाव सचिन आहे मग नावावरून माझी कुंभ राशी आहे ना मग कुंडलीत कन्या कशी लिहिली आहे ? किंवा काही जातकांची कुंडलीच बनवलेली नसेल तर माझे नाव अमित आहे मग मेष राशीवरून कुंडली बनवा आणि भविष्य सांगा अशीही( हास्यस्पद ) विनंती होते. टी.व्हि. वरही हल्ली अशा बरयाच जाहिराती असतात की ज्यात अमुक राशीच्या लोकांनी हेच रत्न वापरावे ह्यावर खोट्या दाढीमिशा लावून,अंगाला भस्म लावून,भगव्या कपड्यात असलेले (ढोंगी ) बाबा ठासून सांगताना दिसतात.  मग त्या रत्नाचे लॉकेट,अंगठी तयार असते फक्त तुम्ही पैसे भरायचे आणि त्यांना फोन करायचा. अगदी Discounted Rates मध्ये तुम्हाला रत्ने दिली जातात. मला ह्या माध्यमातून सर्व वाचकांना हे सांगायचे आहे की तुमचे नाव आणि राशीचे महत्त्व तर आहेच परंतु अचूक भविष्य आणि रत्न मार्गदर्शनासाठी कुंडलीचे महत्त्व जास्त आहे.

राशी -राशी म्हणजे काय तर तुमच्या जन्माच्या वेळेस चंद्र ज्या राशीत असतो ती असते तुमची राशी. परंतु चंद्र साधारणपणे अडीच दिवस (२.५ days)  एका राशीत असतो.  उदा. समजा तुमचा २९ तारखेचा जन्म आहे आणि तुमची राशी आहे सिंह तर तुमच्या एक दिवस आधी (२८ तारखेला )जन्म झालेल्या किंवा तुमच्या एक दिवस नंतर (३० तारखेला ) जन्म झालेल्या व्यक्तीचीही सिंह राशी असू शकेल. मग त्या व्यक्तीच्या आणि तुमच्या आयुष्यात एकाच प्रकारच्या आणि एकाच वेळेस घटना घडू शकतील का ???  ह्याचा सुज्ञ वाचकांनी जरूर विचार करावा. अगदी एकाच वेळेस जन्मलेल्या जुळ्या( Twins ) व्यक्तींच्या आयुष्यातही घडणारया घटनेत समानता नसते. मग राशी वरून भविष्य कसे सांगता येईल ???? हां ढोबळमानाने सध्या कितवा गुरु आणि शनि आहे ह्याची चर्चा करता येईल परंतु भविष्य मार्गदर्शन ?? मुळीच नाही.एका दिवसांचे  २४ तास. एका तासाची ६० मिनिटे ह्याप्रमाणे गणित मांडल्यास २४ * ६० = १४४० मिनिटांचा काळ येतो.  मिनिटांचा विचार केला तर प्रत्येक दिवसाच्या १४४० कुंडल्या तयार होतील आणि साधारणपणे प्रत्येक कुंडलीचे भविष्य वेगळे असेल. त्यामुळे फक्त राशीवर आणि नावावर भविष्य मार्गदर्शन होत नसते. 

ज्योतिष- शास्त्रात पारंपारिक,कृष्णमुर्ती,फोर स्टेप थेअरी,कस्पल इंटरलिंक अशा विविध पद्धतीने भविष्य मार्गदर्शन करता येते. पारंपारिक पद्धतीने कुंडली अभ्यासणार्यांची संख्या जास्त आहे. पारंपारिक पद्धतीनंतर कृष्णमुर्ती पद्धत ( K. P. System ) पूजनीय अशा K. S. KRISHNAMURTHY  सरांनी अवघ्या ज्योतिष - शास्त्राला अमूल्य भेट दिली आहे ज्यामुळे भविष्यात घडणारी घटना अगदी मिनिटापर्यंत सांगता येते( अर्थात त्या व्यक्तीचा तेवढा अभ्यासाचा व्यासंग असावा ). असो तात्पर्य असे कि  - १) स्वतःच स्वतःचा डॉक्टर होऊन औषध करणे जितके हानिकारक आहे त्याचप्रमाणे स्वतःच्याच ज्योतिषज्ञानाने (अर्धवट) रत्नांचा वापर घातकच ठरेल. 

२) राशीवरून आणि नावावरून वर्तवलेल्या भविष्यावर विश्वास ठेवू नये.
३) काही रत्ने अत्यंत प्रभावी असतात. जसे मा णिक,गोमेद,लसण्या,पुष्कराज आणि  नीलम इ. ह्यां रत्नांना धारण केल्यानंतर नजीकच्या काळात लगेचच प्रिय/अप्रिय घटना घडू शकतात त्यामुळे ही रत्ने स्वतःच्या मनाने अजिबात वापरू नयेत.
४) रत्ने सुचविणारी व्यक्ती ह्या विषयातील जाणकार आहे ह्याची खात्री असावी.
५) हल्ली टी. व्ही. वरही रत्नांबद्दलच्या काही जाहिराती तासंतास दाखविल्या जातात ज्यात राशीवरून रत्ने वापरण्यास उद्युक्त केले जाते आणि मग अशी रत्ने ऑर्डर केली जातात आणि नको ते परिणाम भोगावे लागतात.  त्यामुळे अशा जाहिरातीपासूनही सावधान.   

ज्योतिषांसाठी विशेष टीप : हा लेख १८ ऑक्टोबरपासून तयार आहे परंतु ब्लॉगवर प्रसिध्द करताना  Fonts चे काही settings बदलत होते. सतत चार दिवस पाठपुरावा केल्यानंतर आज त्याचे fontचे setting व्यवस्थित झाले आणि आज लेख पुर्णपणे तयार आहे. ह्याआधी इतके लेख लिहितांना असे कधीच झाले नाही. शनि हा विलंबाचा कारक आहे. नीलम संदर्भातील लेख लिहिला आहे. नीलम रत्नाचे काही फोटोही मी ब्लॉगवर घेतले आहेत. त्यामुळे असे झाले असावे की निव्वळ योगायोग ? तुमची मते नक्की कळवावीत. ( अंधश्रद्धा पसरवण्याचा अजिबात हेतू नाही )

वाचकांसाठी टीप : अमिताभ बच्चन ह्यांचा मधला काळ अत्यंत Difficult होता. मध्ये त्यांनी स्वतःची ABC कंपनी सुरु केले होती जी कर्जबाजारी निघाली. त्यानंतर अमिताभ बच्चन ह्यांना स्वतःलाही फिल्म मध्ये विशेष यश मिळाले नाही. ह्या सगळ्या घटनेनंतर त्यांच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटात नीलम रत्नाची अंगठी दिसू लागली. त्यानंतर Kaun Banega Crorepati (KBC ) हा प्रोग्रामचे hosting करण्यात ते बिझी झाले. हळूहळू काही दिवसांनी त्याच बोटात एकाचवेळेस दोन अंगठ्या दिसू लागल्या. हा प्रोग्राम तुफान सुरु आहे तो आजगायत. त्यांनतर पुन्हा गेल्या दोन वर्षापासून एकच अंगठी दिसू लागली आहे. जाहिराती,फिल्म, KBC प्रोग्राम एवढ्या सगळ्या व्यापात आज अमिताभ बच्चन कोणत्याही तरुण star पेक्षाही जास्त व्यस्त आहेत.       


सर्व वाचकांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. 

मंगळवार, ५ ऑगस्ट, २०१४

अनुभवाचे बोल

अनुभवाचे बोल 

नमस्कार, सर्वांना श्रावणाच्या शुभेच्छा. माधवी मला मार्च महिन्यात नोकरी संदर्भातील प्रश्नांसाठी भेटण्यास आली होती. तेंव्हा तिचे नोकरीत बरे चालले होते. तरीसुद्धा पुढे काय ? ह्यावर आमची चर्चा झाली. त्यानंतर माधवीचे आलेले हे इ-पत्र वाचकांसाठी. 


Good Afternoon Mam,

Details for Job prediction given by You :- 


Your Prediction

Real Life Incidents
1
I will face trouble in job till 28-05-2015
Actually my Boss hinted at sacking me on 16-05-2014. Later I learnt, he was not serious, but I underwent that pressure and trouble
2
I will get Job after 28-05-2014
I got offer on 28-05-2014. And now I have joined there.





माधवीला मी मे महिन्यात नोकरीत खूप त्रास संभवतो आणि त्यामुळे ही नोकरी सोडावी लागेल असे भविष्य वर्तवले होते. त्यावर तिचा पुढचा प्रश्न होता,"मग मला लगेचच नोकरी मिळेल का ?" त्याचे उत्तर मी असे दिले,"नवीन नोकरीची संधी  २८ मे नंतर मिळेल आणि मग लागलीच तू ही नोकरी सोडशील."  त्याप्रमाणे नोकरीत वातावरण तयार झाले परंतु २८ मे ह्याच दिवशी तिला नवीन नोकरीची संधी मिळाली आणि तिने आधीची नोकरी सोडली. आता नवीन नोकरीत ती खूप खूश आहे.  

जातकांच्या अशा प्रतिक्रिया म्हणजे खरोखर उदंड उत्साह आहे पुढच्या अभ्यासासाठी. Thanks माधवी.
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com   

मंगळवार, ८ जुलै, २०१४

स्वयंपाकघर कसे असावे ? My Kitchen as per Vaastu Shastra - भाग ३

 स्वयंपाकघर  कसे असावे ? My Kitchen as per Vaastu Shastra - भाग ३ 

नमस्कार,

वास्तू-टिप्स संदर्भात लिहिलेल्या मागील दोन्ही लेखांनंतर वाचकांची भरपूर ई- पत्र आली. काहींनी वास्तूवर लेख लिहिल्याबद्दल आभार मानले आहेत,काहींनी वास्तू परिक्षणासाठी बोलावले आहे,काहींनी त्यांच्या राहत्या  वास्तुसंदार्भात प्रश्न विचारले आहेत. पुन्हा एकदा ह्या लेखाच्या निमित्ताने मी इथे नमूद करते कि ह्या सर्व टिप्स ह्या घर घेतांनाच उपयोगी पडतील. ज्यांची वास्तू शास्त्राप्रमाणे नाही त्यांच्यावर फार मोठ संकट कोसळणार असे अजिबात नाही. जर काही Major Defects असतील तर मात्र वास्तू संदर्भात उपाय योजना करावी. म्हणजेच समजा तुमचे स्वयंपाक घर ईशान्येला असणे,Toilets उत्तर दिशेत असणे ह्यासाठी मूळ बांधकामाला धक्का न देता (तोडफोड न करता) उपाय शास्त्रात आहेत. तेंव्हा फार घाबरून जाऊ नका.  
[सूचना - हा ब्लॉगच्या इतर भाषिक वाचकांनी मला हिंदी किंवा इंग्रजी मध्ये भाषांतर करण्याची सूचना दिली आहे. परंतु वेळेअभावी ते सध्या तरी शक्य वाटत नाही. त्यामुळे ब्लॉगच्या वरती TRANSLATE म्हणून एक  बटण आहे.  त्याचा वापर करावा.  ] 

तर आज वळूया स्वयंपाक घराकडे. स्वयंपाकघर म्हणजे घरातील सर्वात महत्वाचा घटक. भारतीय संस्कृतीत स्वयंपाक घराला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. घर छोटे असले अगदी झोपडे असले तरी खोपट्यात चूल ही मांडलेलीच असते. भारतीय संस्कृती आणि वास्तू शात्राप्रमाणे बाहेरील प्रज्वलीत अग्नि आणि पोटातील अग्नि ह्याचा संबंध आहे. पोटातील अग्नीचे प्रमाण हे समतोल असावे. म्हणजेच अग्नि योग्य प्रमाणात असेल तर अन्न व्यवस्थित पचते आणि शरीरात वायू धरत नाही. आणि जर अग्निचा समतोल बिघडून त्याचे प्रमाण वाढले तर पूर्ण शरीरास हानी पोहोचू शकते. त्यामुळेच वास्तूत ही आग्न्येय दिशेत स्वयंपाक घर असेल तर उत्तम आरोग्य लाभते.  


१) ओटा कुठे असावा - ओटा पूर्व दिशेला आणि दक्षिणेला असावा. ( L - Shape ) शेगडी कुठे असावी - शेगडी ही आग्न्येय दिशेत असावी परंतु गृहिणीचे मुख स्वयंपाक करतांना पूर्व दिशेत येईल अशी व्यवस्था असावी. 
२)खिडकी कुठे असावी - स्वयंपाक घरात खिडकीची रचना पूर्व दिशेत असेल तर उत्तम. 
३) सिंक कुठे असावे - सिंकची रचना ईशान्य दिशेत असावी. 
४) पाण्याचा माठ किंवा पाणी साठवण्याची जागा - पाण्याचा माठ ईशान्य दिशेत उत्तम. पाण्याचा साठा ईशान्य आणि उत्तर दिशेत असावा. 
५) फ्रीज - फ्रीज नैऋत्य दिशेत असावा. नैऋत्य दिशेत नसेल तर किमान दक्षिण किंवा पश्चिम दिशेत असावा. 
६) Microwave/Mixer - ह्या सारखी तत्सम बाकी उपकरणे पूर्व -दक्षिण भागात ठेवावीत. 
७) धान्य साठा -  साठवणीची धान्य जसे, गहू,तांदूळ वगैरे ह्यांची साठवण दक्षिण ओट्या खाली असावी. 
८) रंग - स्वयंपाक घरात फरशीचा रंग हा फिक्कट असावा. पिवळ्या आणि पांढऱ्या रंगातील छटा चालतील. भिंतींचा रंग फिक्कट हिरवा,भगवा पिवळा ह्यांच्या छटेत असावा. फार गडद लाल,भगवा शक्यतो असून नये. 

सर्वात महत्वाचे म्हणजे स्वयंपाक घरात स्वच्छता असावी. रात्री उष्टी भांडी ठेवू नयेत. मुंबईत Working Women चा इलाज नसतो कारण कामवाली बाई येतेच सकाळी. त्यामुळे उष्टी भांडी रात्री ठेवावी लागली तरी शक्यतो विसळून तरी ठेवावीत. 

जेवढी महत्वाची माहिती देत येईल तेवढी इथे नमूद केली आहे. वाचकांना ह्याचा जरूर फायदा होईल अशी अपेक्षा. 

प्रतिक्रियांची वाट पाहतेय. ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

मंगळवार, १ जुलै, २०१४

VAASTU TIPS - वास्तूची निवड कशी करावी ? भाग - २

VAASTU TIPS - वास्तूची निवड कशी करावी ? भाग - २

वास्तूची निवड कशी कराल ह्या माझ्या मागील लेखाला वाचकांनी दिलेल्या उत्सुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ह्या भागात मी  बैठकीची खोली कुठे असावी ? स्वयंपाक घर कुठे असल्यास गृहस्वामीस सौख्य लाभेल ? आणि  शयनकक्ष कुठे असल्यास आरोग्य लाभेल ह्या बाबत मार्गदर्शन करणार आहे.
१) स्वयंपाक घर - सर्व प्रथम आपण स्वयंपाक घराकडे वळूया. स्वयंपाकघर(KITCHEN) हे वास्तुशास्त्राप्रमाणे नेहेमी आग्नेय(SOUTH-EAST) दिशेत असावे. ह्या वरून मला एक Case आठवली. जातकांपैकी एकाने नुकतेच घर घेतले होते. (घर घेऊन झाल्यानंतर त्याने मला ह्या संदर्भात Consult केले ) घर संपूर्ण वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घेतले होते.( ? ).  
स्वयंपाक घर आग्नेयेत 
स्वयंपाकघर आग्नेय दिशेत असावे असे म्हटले आहे म्हणून घर घेताना त्याने ह्या गोष्टीची काळजी घेतली. स्वयंपाक घर आग्नेय दिशेत परंतु ओटा मात्र दक्षिण दिशेत होता. म्हणजेच स्वयंपाक करताना गृहिणीचे मुख दक्षिण दिशेत येणार. जे अत्यंत चुकीचे होते. स्वयंपाक करताना गृहिणीचे मुख हे पूर्व दिशेत असावे. सकाळची सूर्याची किरणे गृहिणीच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी आहे. त्याला हे शास्त्र नीट व्यवस्थित समजावून सांगितले. आणि त्यालाही ते पटले. त्याने लगेचच बदल करून घेतले. वरील फोटोवरून  तुमच्या लक्षात येईल. KITCHEN SHOULD IN IN SOUTH EAST CORNER.

२) शयनकक्ष (BEDROOM) - 

(अ) Master Bedroom - सर्वप्रथम आपण MASTER BEDROOM बद्दल जाणून घेऊ. MASTER BEDROOM हे घरातील वयाने मोठ्या व्यक्तीने नव्हे तर कर्त्या पुरुषाने वापरावी असे सांगितले गेले आहे. MASTER BEDROOM ही वास्तूच्या दक्षिण पश्चिम ह्या भागात म्हणजेच नैऋत्य (SOUTH WEST) असावी.  घरातील मोठ्या भावाची खोली नैऋत्य दिशेत असावी किंवा छोट्या भावाचे नुकतेच लग्न झाले असेल तर त्याला ती बेडरूम वापरू द्यावी. बेडरूम मधील बेड हा लाकडाचाच असावा. गादी एकसंध असावी.

(ब) लहान मुलांची बेडरूम - लहान मुलांची बेडरूम पूर्व किंवा ईशान्य दिशेत असावी. त्यांच्या बेडरूम मध्ये जर स्टडी टेबल असेल तर ते ईशान्य कोपरयात पूर्वेकडे तोंड करून बसता येईल असे असावे. टेबल आणि खुर्ची शक्यतो लाकडाचीच असावी. फायबरचे मटेरीअल शक्यतो टाळावे. खालील चित्रात जरी फायबरचे मटेरीअल दिसत असले तरी ते प्रतिकात्मक आहे. ईशान्येकडचा सूर्यप्रकाश कसा मुलांच्या टेबलवर यावा हे दर्शवण्यासाठी हा प्रयत्न. 
अभ्यासाचे टेबल 

मुलांचा बेड 

(क) वयोवृध्द व्यक्तींची बेडरूम - घरातील वयोवृद्ध (वय वर्षे  ६० च्या पुढे ) जोडप्याची झोपण्याची खोली (जरी ते नोकरी/Business करत असले तरी ) ही ईशान्य भागात असणे हितावह.

३) देवघर - मुंबईत देवघरासाठी वेगळी खोली असणे म्हणजे उच्च श्रीमंत वर्गातच शक्य आहे. बाकी मुंबई बाहेर जिथे स्वतःची जमीन घेऊन घर बांधू शकतो तिथे एक ईशान्येकडची खोली देवघरासाठी ठेवू शकतो. देवघरासाठी जरी वेगळी खोली शक्य नसेल तरी घराच्या ईशान्य कोपरयात देव्हारयाची स्थापना करावी. 
देव्हारयात गणेश,बाळकृष्ण,अन्नपूर्णा ह्यांच्या स्थापन केलेल्या मुर्त्या असाव्यात. मूर्ती ही कर्त्या पुरुषाच्या अंगठयापेक्षा मोठी असून नये. आणि मूर्ती ही चांदीत घडवलेली असेल तर उत्तम. प्लास्टरच्या मूर्त्या असू नयेत. भेगा पडलेल्या मुर्त्यांचे त्वरीत विसर्जन करावे. 

४) बैठकीची खोली - शास्त्राप्रमाणे बैठकीची खोली ही वास्तूच्या वायव्य दिशेत असावी. पश्चिम,उत्तर ह्या दिशाही उत्तम आहेत. 

सर्वात शेवटी महत्वाचे म्हणजे संपूर्ण खोल्यांमध्ये सकाळचा भरपूर सुर्यप्रकाश येईल अशी रचना असेल तर अत्यंत उत्तम. शक्यतो दिवसा घरात ट्युब लाईट लावावी लागू नये एवढा तरी निदान प्रकाश घरात असावा. पुन्हा एकदा सांगते ह्या सर्व गोष्टी मी घर घेताना काय काळजी घ्यावी ह्यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे. ह्या मार्गदर्शनाने ज्यांना नवीन घर घ्यायचे आहे त्यांना ही माहिती नक्कीच उपयोगी ठरेल.  

तुमच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांची वाट पाहतेय. 


     

बुधवार, २५ जून, २०१४

VAASTU TIPS- वास्तूची निवड कशी करावी ?

VAASTU TIPS- वास्तूची निवड कशी करावी ? भाग - १ 

वास्तू वरील लेखानंतर मला बरीच वाचकांची ई-पत्र आली. त्यात बहुतांश वाचकांनी वास्तू विषयक टिप्स देऊ शकाल का ? ह्या बद्दल विचारणा केली आहे. वास्तुविषयक टिप्स देण्या अगोदर आपण ज्या वास्तूत राहणार आहोत ती वास्तू असावी कशी ? इथून मी सुरवात करते. 
१) वास्तूची दिशा : ह्याबाबत सल्ला देतांना सर्वप्रथम मी हे सुचित करेन कि तुमची वास्तू ही शक्यतो दिशांना समांतर असावी. वास्तू विदिशा असू नये.विदिशा वास्तू म्हणजे हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल, सुदिशा आणि विदिशा वास्तू खालीलप्रमाणे : 

सुदिशा वास्तू (वास्तू अशी असावी ) 


विदिशा वास्तू ( वास्तू  अशी असू नये)

मी मागील बरयाच लेखात उल्लेख केलेला आहे कि वास्तू विदिशा असू नये. विदिशा ह्याचा अर्थ दिशाहीन वास्तू. दिशाहीन ह्याकरिता म्हटले आहे कारण कोणतीही दिशा वास्तूला समांतर न येता काटकोनात येतात. अशी वास्तू तुम्हाला सकारात्मक उर्जा देण्यास असमर्थ ठरते. मुंबईतील नव्याने झालेल्या बांधकामांमध्ये ९५% वास्तू ह्या विदिशा प्रकारात मोडतात. ( ह्या साठी उपाय आहेत )

२) घराचे मुख्य प्रवेशद्वार :  सर्वसाधारण असा समज आहे कि प्रवेशद्वार पूर्व अथवा पश्चिम दिशेत असावे. दक्षिणेचा प्रवेश चांगला नाही. परंतु शास्त्रात खालील प्रमाणे प्रवेशद्वाराची रचना असावी असे नमूद केले आहे. खालील चित्रात जिथे हिरव्या रंगाने निर्देशित केले गेले आहे तिथे प्रवेशद्वार असावे आणि जिथे गुलाबी रंगाने निर्देशित केले आहे तिथून प्रवेश निषिद्ध मानले गेले आहे. ह्यावरून लक्षात येते कि दक्षिणेचा मुख्य प्रवेश नेहेमीच वाईट नाही परंतु तो नियमाप्रमाणे असावा. 

घराचे मुख्य प्रवेशद्वार कुठे असावे 
३) घरातील खिडक्या :  वास्तूतील जास्तीत जास्त खिडक्या मुख्यत्वे पूर्व आणि उत्तर दिशेत असतील तर ही वास्तू तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. हल्ली घराला खूप मोठ्या खिडक्यांची रचना असते. उद्देश हा आहे कि जास्तीत जास्त प्रकाश आणि हवा घरात खेळती रहावी. परंतु वास्तू शास्त्राप्रमाणे दक्षिण आणि पश्चिम दिशेत कमीत कमी खिडक्या असाव्यात किंबहुना असूच नयेत. ह्याचे शास्त्रीय कारण म्हणजे आपले संपूर्ण शास्त्र हे चंद्र आणि सूर्य ह्यांच्या भ्रमणावर आधारीत आहे. सूर्य पूर्व दिशेस उगवून पश्चिमेत मावळतो. सूर्याची सकाळ्ची कोवळी किरणे अत्यंत लाभदायक आहेत. परंतु सकाळी ११.०० ते ४.३० पर्यंतची किरणे घरात प्रवेश करू नयेत अशी घराची रचना असावी असे शास्त्र  सांगते. ह्याला कारण म्हणजे सूर्याची UV किरणे सकाळी ११.०० ते ४.३० पर्यंत अत्यंत प्रखर असून आरोग्यासाठी घातक आहेत. आणि सूर्याचे भ्रमण दक्षिणायन असताना पूर्व-दक्षिण-पश्चिम असे असते. आणि ह्या दिशेत खिडक्या असतील तर संपूर्ण वेळ म्हणजेच ११.०० ते ४.३० ह्या वेळेतील सूर्याची(घातक)किरणे घरात येतात. ह्याच अनुभव मला माझ्या बरयाच वास्तू परीक्षणासाठी गेले असता आलेला आहे. ज्या ज्या वास्तूत पश्चिम आणि दक्षिण दिशेत जास्त खिडक्या अथवा French Windows आहेत किंवा दक्षिणेस मोठा व्हरांडा,गच्ची आहे त्या त्या घरात एकतरी Cancer पिडीत रुग्ण असण्याचे निर्दर्शनास आले आहे आणि त्याच बरोबरीने घरातील बाकीही सदस्यांना दर महिन्याला डॉक्टरांची भेट घ्यावीच लागते. त्यामुळे मोठ्या खिडक्या,गच्ची पूर्व व उत्तर दिशेत असावी आणि दक्षिण व पश्चिम दिशेत कमीतकमी खिडक्या असाव्यात. शक्यतो पश्चिमेस अथवा दक्षिणेस गच्ची असू नये.  ( असल्यास उपाय आहेत )

४) Toilets  आणि Bathroom :  घरात Toilets  आणि Bathroom कुठे असावेत ह्याबाबत खूपच संभ्रम आहे. Toilets  आणि Bathroom वास्तूच्या उत्तर आणि पूर्व दिशेत नसावेत. पूर्व आणि उत्तर दिशेत असलेल्या Toilets  आणि Bathroom मुळे शिक्षणात आणि अर्थार्जनात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे  Toilets  आणि Bathroom वास्तूच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेत असावेत. दक्षिण आणि पश्चिम दिशेतही त्यांची रचना विशिष्ट ठिकाणी असावी. 

वास्तू निवडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी ह्या संदर्भात काही टिप्स मी ह्या पहिल्या भागात देण्याचा प्रयत्न केला आहे. वरील मुद्यांमध्ये मी पूर्वेस,उत्तरेस Toilet असू नये असे नमूद केले आहे परंतु जर तुम्ही सध्या राहत असलेल्या वास्तूत जर ह्या दिशेत Toilets असतील तर शास्त्रामध्ये ह्यासाठी आणि बाकी वास्तूतील दोषांसाठी विना तोडफोड उपायही सूचित केले आहेत. त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. 
वास्तू हा विषयावर बोलावे,लिहावे हे कमीच त्यामुळे वाचकांनी मला वास्तूच्या कुठल्या टिप्स बद्दल मी विस्ताराने लिहावे ते जरूर कळवा. मी पुढील लेखात त्याबद्दल लिहिण्याचा विचार करेन. 

तुमच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांची वाट पाहतेय.   

READERS ALL OVER THE WORLD