मंगळवार, ४ मार्च, २०१४

Missing Person - तो परत येईल का ??

Missing Person -  तो परत  येईल का ??

मार्चच्या पहिल्या तारखेला सकाळी ८.३३वाजता ज्योतीचा फोन. एवढ्या सकाळी फोन केला म्हणजे नक्कीच अत्यंत गंभीर प्रश्न असणार. ज्योतीचा प्रश्न तिच्या मैत्रिणीच्या नवऱ्याबाबत होता. "मैडम माझ्या मैत्रिणीचा नवरा शेखर जो software Engg आहे तो काल संध्याकाळपासून घरीच आलेला नाही. म्हणजे सकाळी नेहेमीप्रमाणे कामावर गेला आणि निघतांना संध्याकाळी त्याचा फोन सुद्धा आला होता कि ऑफिस मधून निघतोय म्हणून. पण नंतर रात्री उशीरापर्यंत तो घरीच आला नाही. आता तर त्याचा फोनही लागत नाहीये. सहसा कामावरून तो लगेच घरीच येतो आणि खूप साधा मुलगा आहे. घरी अत्यंत काळजीचे वातावरण झालेय."  मी म्हटले," ठीक आहे तुला कळवते थोड्या वेळेत". 

दिवसाचा पहिलाच प्रश्न असल्याने प्रश्न कुंडलीने सोडवायचे ठरवले :

प्रश्न विचारला तेंव्हाची कुंडली आणि शासक ग्रह खालील प्रमाणे : 


प्रश्न कुंडली 

शासक ग्रह :  

L  - गुरु(वक्री) ४, १, १०   न. स्वा.-  राहू ७, ३, ८ 
S  - राहू ७, ३, ८            न. स्वा. - राहू ७, ३, ८ 
R  - शनि ८, ११, १२       न. स्वा. - गुरु(वक्री) ४, १, १० 
D  - शनि ८, ११, १२       न. स्वा. - गुरु ४, १, १० 

हरवल्येल्या अथवा परागंदा झालेल्या व्यक्तींबद्दल काही जाणून घ्यायचे झाल्यास प्रश्न कुंडली अत्यंत उपयुक्त ठरते. सर्वात आधी मनात प्रश्न येतो तो हा कि,


 ही व्यक्ती सुखरूप आहे का ?(जिवंत आहे ना ?) 
ह्या प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास नियम असा आहे की लग्नाचा सब लॉर्ड जर शासक ग्रहांमध्ये असेल तर व्यक्ती हयात असते. शेखरच्या case मध्ये लग्नाचा सब लॉर्ड गुरु आहे आणि तो शासक ग्रहांमध्ये आहे. त्यामुळे शेखरच्या मृत्यूची शक्यता नाहीच. परंतु  लग्नेश गुरु स्वतः वक्री आहे. लग्नेश जर वक्री असेल तर व्यक्तीला काही इजा झाली असण्याची शक्यता असते.      कुंडलीतील चंद्र हरवल्येल्या व्यक्तीबद्दल माहिती देतो.चंद्रावर गुरुची दृष्टी आहे. (म्हणजेच शेखर Safe आहे.) कुंडलीत चंद्र व्यय स्थानात कुंभ राशीत रविच्या युतीत आहे. चंद्र व्ययात असेल तर व्यक्ती हॉस्पिटल/जेल किंवा बंधनात असणे - Kidnapping असू शकेल. चंद्र जर पापग्रहांबरोबर असेल तर व्यक्तीला कोणीतरी डांबून ठेवले असण्याची अथवा गुंडांच्या तावडीत सापडली असण्याची शक्यता असते. 

व्यक्ती कुठे आहे ?

पुढचा येणारा प्रश्न म्हणजे जर व्यक्ती जिवंत आहे तर ती आहे कुठे ? त्यासाठी नियम असा आहे कि चंद्र जर स्थिर राशीत असेल तर व्यक्ती एका जागी असते. जर चंद्र चर राशीत असेल तर व्यक्ती प्रवासात असते. इथे चंद्र कुंभ राशीत म्हणजेच स्थिर राशीत आहे. ह्याचाच अर्थ शेखर एकाच ठिकाणी आहे आणि प्रवासात नाही. चंद्र जर केंद्र स्थानात असेल तर व्यक्ती राहत्या शहराच्या आसपासच असते परंतु ह्या कुंडलीत चंद्र केंद्रात नाही  म्हणजेच शेखर स्वतःच्या घरापासून बराच लांब असण्याची शक्यता आहे. 

हरवल्येल्या व्यक्ती बरोबर कोण आहे का ?

ह्या प्रश्नासाठी चंद्राबरोबर असणारे ग्रह तपासावेत. इथे चंद्राबरोबर रवि सारखा "पापग्रह" आहे (युतीत आहे.) चंद्र रवि बरोबरीनेच नेपच्यून बरोबर सुद्धा युतीत आहे. (काही ज्योतिषी हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो सारख्या ग्रहांचा विचार करत नाहीत परंतु ह्या Case मध्ये मी आवर्जून ह्याचा अभ्यास अंतर्भूत केला) ह्याचाच अर्थ व्यक्ती बरोबर कोणी पुरुष व्यक्ती (रवि) आणि नेपच्यून (नेपच्यून हा बेशुद्धाअवस्थेत नेणारा ग्रह आहे ) असल्या कारणाने शेखरला भूल दिली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

व्यक्ती परत केंव्हा येईल ?

शासक ग्रहांमध्ये दोनदा शनि आणि एकदा गुरु जे Slow Moving Planets असल्याने शेखर आजच्या आजच घरी येईल असे वाटत नाही. 

शासक ग्रहांनुसार गुरु ग्रह चतुर्थाचा कार्येश असला तरी बाकी शनि आणि राहू अष्टम,व्यय आणि सप्तम स्थानाचे कार्येश आहेत. त्यामुळे व्यक्ती घरी जरी आली तरी व्यक्तीला अत्यंत गंभीर स्वरूपाची इजा झाली असण्याची शक्यता नाही Guarantee आहे

तेंव्हा एकूण विचार करता मी ज्योतीला उत्तर दिले कि, 

१) शेखर कुठेतरी अडकला असण्याची शक्यता आहे. गंभीर स्वरूपाने त्याला इजा झालेली असावी. तो घरी नक्की परतेल परंतु माझे शास्त्र असे सांगते कि काहीतरी गोष्ट शेखरने लपवली असावी आणि त्याचाच परिणाम आज त्याला मिळतोय जसे कि, कोणाकडून उधार घेतले असावेत आणि ते परत दिले नसतील व म्हणूनच अशा व्यक्तींकडून त्याला मारहाण वगैरे झाली असावी. 

२) शेखर जरी परत आला तरी धडधाकट परत येईल ह्याची शाश्वती नाही. तेंव्हा सांभाळून. 

३) चंद्र व्ययात असल्याने मी पोलिस चौकीत रीतसर तक्रार नोंदवून हॉस्पिटलमध्ये वगैरे तपासण्यास सांगितले. 

४) शेखरला घरी परतायला वेळ लागेल म्हणजेच आजच परत येईल असे नाही असे तिला सांगितले. (शासक ग्रहांमध्ये गुरु एकदा तर शनि दोनदा आलेला आहे. Slow Moving Planets ) 

५) कुंडलीत अष्टमात असल्येल्या मंगळ व राहू ह्यांची युती आणि शनिमुळे आणि व्ययात असल्येल्या रवि चंद्र नेपच्यून युती ह्यामुळे प्रकरण बरेच गंभीर असलेले दिसतेय तेंव्हा शेखरच्या पत्नीला काही उपाय करण्यास दिले. 

त्याच दिवशी साडे चार वाजता ज्योतीचा फोन आला. "मैडम तुम्ही सांगितले तसेच झाले ……… ".  पुढे तिने दिलेल्या माहितीनुसार,  

१) दिलेले सर्व उपाय शेखरच्या पत्नीने केले. 
२) शेखर दुपारी सव्वा तीन आणि साडे तीनच्या सुमारास घरी परत आला. (कर्क लग्नावर ) 
३) घरात आल्या आल्याच तो खाली कोसळला. त्याला कोणीतरी गंभीररित्या मारहाण केलेली दिसत होती. तो अजिबात शुद्धीत नव्हता. त्याच्या पाकिटातील पैसे,कार्डस सर्व गायब होते. (कार्डस वापरून सर्व पैसे काढण्यात आले होते हे मागाहून पोलीस तपासणीत कळले)
४) त्याला ताबडतोब हॉस्पिटलला भरती करण्यात आले. पोलीस आणि घरच्यांनी वारंवार विचारल्यानंतरही कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शेखरने दिले नाही. किंबहुना आल्यापासून तो बोलतच नाहीये आणि नुसताच शून्यात पहात राहतो असे घरच्यांचे म्हणणे आहे. त्याला नेमके काय झाले आहे ते येत्या काही काळात कळेल अशी अशा आहे. 

पुढे जी काही माहिती मिळेल ती ज्योती मला कळवेलच.

Note : ज्योतीने पहिल्यांदा फोन केला तेंव्हा व्ययात अमावास्या योग होत आहे. ही अमावास्या त्यादिवशी शेखरच्या मूळ कुंडलीत सप्तम स्थानात होत होती. सप्तम स्थान हे मारक स्थान मानले जाते.  इथे मी वर्तवल्येल्या सर्व गोष्टींपैकी शेखर त्याच दिवशी परत येणार नाही हे एकच माझे वर्तवलेले भविष्य चुकले.  

  प्रश्न कुंडली आणि शासक ग्रहांनी स्पष्टपणे किंबहुना ठळकपणे घडल्येल्या घटनेचे स्वरूप दर्शविले आणि शेखर परत येईल ह्याची शाश्वती दिली. ह्या शास्त्राचे आणि शास्त्राचा सातत्याने अभ्यास करून संशोधन करणाऱ्या ज्योतिषांचे आभार मानावे तितके कमीच. त्या सर्वांनाच माझे कोटी कोटी प्रणाम.  

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com


शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०१४

वास्तू प्रश्न

वास्तू प्रश्न 

नमस्कार 

वास्तूवर लेख लिहिल्यानंतर बरयाच जणांनी ई-पत्राद्वारे वास्तू संदर्भात त्यांचे शंका निरसन करून घेतले. इतक्या लोकांची पत्रे मिळाल्यानंतर खूप आनंदही झाला आणि लोकांच्या मनामध्ये असलेल्या वास्तूशास्त्राबद्दलच्या उत्सुकत्तेबद्दल खूप कौतुकही वाटले. त्यापैकी सर्वांपैकी लक्षात राहील असा प्रश्न आहे सामीधाचा. गेल्या आठवड्यात लिहिलेल्या वास्तूशास्त्रावरील लेखाबाबत समीधाचा प्रश्न असा होता :

   समीधा, "माझ्या घरातच मंदीर आहे. माझ्या सासूबाइंची श्रीकृष्णावर अपर भक्ती होती आणि त्यांना सिद्धी प्राप्त होती. परंतु आम्हां कुटुंबियांना मंदीर व कृष्णाचा नेहेमीच आधार वाटतो आणि आशीर्वादाचा नेहेमीच प्रत्यय  येतो. मग मंदीर घरसमोर असणे हे शास्त्रीय दृष्टया चुकीचे असतांना आम्हांस मात्र असा कधीच अनुभव आलेला नाही. ह्यामागील नक्की शास्त्रीय कारण काय आहे हे सांगू शकाल का ?" 

त्यावर माझे उत्तर असे आहे :

खूप छान प्रश्न विचारला आहे. तुमच्या प्रश्नातच तुमचे उत्तर आहे. शास्त्रात 

असे म्हटले गेले आहे कि जर तुमच्या घराच्या समोर मंदिर असेल आणि 

त्याचा कळस तुमच्या दारासमोर किंवा खिडकीसमोरच असेल तर 

त्याच्या उर्जेमुळे घरातील व्यक्तींना त्रास होऊ शकतो. त्रास का होऊ 

शकतो? तर त्याचे कारण असे कि त्याची पवित्रता इतकी असते कि 

आपल्यासारख्या सामान्य लोकांना त्याचे तेज सहन होऊ शकत नाही.
ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पूर्वीच्या काळी "संध्या" करणे किंवा सूर्याला 

अर्ध्या देणे हे अनिवार्य होते. संध्या करताना किंवा सूर्याला अर्ध्य देताना 

कंबरेपर्यंतच्या पाण्यात उभे राहून संध्या करावी लागते. ह्याचे कारण 

म्हणजे जेंव्हा सूर्याची किरणे थेट तुमच्या हृदयाच्या चक्रांपर्यंत(Heart 

Chakra) पोहोचतात तेंव्हा शरीरात अत्यंत उष्णता निर्माण होते. त्या 

उष्णतेचा प्रतिकूल फळ न मिळता उष्णता शमवण्यासाठी व्यक्तीला 

पाण्यात उभे राहून अर्ध्या द्यावे लागते. 
 

सामान्य व्यक्तीमध्ये ते(कळसातले) तेज/ओज/उर्जा सामावून घेण्याची 

कुवत कमी असते.ज्यांना सिद्धी प्राप्त असते त्यांच्यात ही उर्जा/तेज 

सामावून घेण्याची शक्ती असते.
 तुमच्या सासूबाईंना सिद्धी प्राप्त होती असे तुम्ही लिहिले आहे. ज्यांना 

सिद्धी प्राप्त होते त्यांच्या पुढच्या सात पिढ्यांचा उत्कर्ष होतो अशी 

मान्यता आहे. त्यामुळे तुमच्या घरातच असलेले मंदिर हे तुमच्यासाठी 

नेहेमीच हितावह ठरेल परंतु घरातील सर्वांनीच अध्यात्माची ही 

मिळालेली संजीवनी सांभाळून ठेवणे. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com
      

रविवार, २६ जानेवारी, २०१४

वास्तू - समज-गैरसमज

वास्तू -  समज-गैरसमज 


नमस्कार,
मधला बराच काळ ब्लॉगवर काही लिहिता आले नाही. दिवसभर जातकांची रीघ,वास्तू visits आणि घरची जवाबदारी ह्यामुळे वेळच मिळत नव्हता. येणारे सगळे जातक सध्या ब्लोगवर नवीन काही लिहिले का नाही म्हणून विचारीत होते. आज योग साधला आहे. मागच्या दोन महिन्यात वास्तू-संदर्भात मला बरयाच ठिकाणी जाण्याचा योग आला. वास्तू संदर्भात मला जेंव्हा जातकांचे फोन येतात तेंव्हा जातकांना बरयाच गोष्टींबाबत संभ्रम असतात. तर त्यातल्या काही गोष्टींबद्दलचे समाज आणि गैरसमज आज मी इथे मांडणार आहे. 

घराचे मुख्य दार - अनुकूल दिशा 

दक्षिण दिशेस दरवाजा : 

घर निवडतांना बरेचजण पूर्व-पश्चिम दार असलेल्या घरालाच प्राधान्य देतांना आढळतात. दक्षिण दिशेस दार असल्येल्या घरांना कोणी वाली नाही. ठाण्यात जेंव्हा एका ठिकाणी मी वास्तू परीक्षणेसाठी गेले असता त्या tower (१५ मजली tower ) मधील दक्षिण दिशेला मुख्य दार असलेले एकही घर विकले गेले नव्हते. 
हा असलेला समज अंशतः चुकीचा आहे. जशी प्रत्येक व्यक्ती वेगळी,तिचा स्वभाव वेगळा तसेच प्रत्येक वास्तू वेगळी आणि त्याची उर्जा वेगळी. प्रत्येक व्यक्तीसाठी एखादी वास्तू,त्या वास्तूची उर्जा इतकी अनुकूल ठरते कि त्याच घरात त्या व्यक्तीची किंबहुना त्या कुटुंबाची भरभराट होते. किंवा मग काही वेळेस लोक अशी तक्रार करतात मी तर घर पूर्व -पश्चिम दरवाजा पाहूनच निवडले होते मग माझी अधोगती का झाली ?  हे वास्तू वगैरेचे मग तुमचे नियम इथे खोटे ठरतात. अशा वेळेस खरे तर मला त्यांची कीव येते. Crocin हे औषध जरी तापासाठी असले तरी प्रत्येक तापासाठी औषध वेगळे असते कारण रोगाची लक्षणे वेगळी असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती,त्या व्यक्तीच्या व्यवसायाप्रमाणे आणि त्याच्या कुंडलीप्रमाणे वास्तू, वास्तूचे मुख्य दार कुठे असणे अनुकूल ? हे ठरवणे महत्वाचे आहे. तेंव्हा दक्षिण दिशेचा दरवाजा नेहेमीच वाईट नाही. 

दिशेचा गोंधळ : 

हा प्रश्न तर बरयाच जणांना Confuse करतो. अगदी कालची गोष्ट, वेदिकाला तिच्या नवीन घराच्या निवडीसाठी माझी मदत हवी होती. बोरिवलीत एकाच Tower मधली दोन घरे तिने पसंत केली होती परंतु मुख्य दाराच्या दिशेचा गोंधळ होता. एका घराचे मुख्य दार दक्षिण दिशेस तर दुसरया घराचे उत्तरेला. आणि गोंधळ वाढवायला तिचे वास्तू संदर्भातले ज्ञान. वास्तू वरील बरीच पुस्तके,वर्तमान पत्रात येणारी संपूर्ण (?) माहिती ह्यामुळे दक्षिणेस दार म्हणजे वाईट एवढे पक्के अनुमान तिचे झाले होते. त्यामुळे दक्षिण दिशेला असल्येल्या घरास तिची एवढी पसंती नव्हती. पण अभयला (वेदिकाचा नवरा) तेच घर आवडले असल्याने त्यांचा निर्णय होत नव्हता. बर वेदिकला मी विचारले तेंव्हा तिचा पहिला प्रश्न होता कि,"मी घराच्या आतून बाहेरच्या दिशेस पाहिले की उत्तर दिशा येते आणि घराच्या बाहेरून आत पहिले कि समोर दक्षिण दिशा येते. मग ह्याला दक्षिणेचा दरवाजा म्हण्याचा का ?"  हा प्रश्न मला असंख्य वेळेस विचारला जातो. साधा नियम असा आहे कि तुम्ही घराच्या आत आहात आणि दारासमोर बाहेरच्या बाजूस जी दिशा येते तीच मुख्य दाराची दिशा. 

घराच्या बाजूस असलेले स्मशान/कबरीस्तान : 

पूर्वीच्या काळात स्मशान हे गावाच्या बाहेर नदीकाठी असायचे. म्हणजे अगदी दूर,नजरेआड. परंतु सध्या मुंबई आणि त्याच्या आसपासच्या परिसरात इतकी लोकसंख्या वाढली आहे कि बरेच towers स्मशानाच्या बाजूसच असतात. काही व्यक्तींना स्मशानाच्या आसपास आपले घर असणे खूप negative वाटू शकते आणि काहींना  त्यात काहीच तथ्य नसल्याचे मत असू शकते. स्मशानाच्या आसपास आपली वास्तू असू नये ह्याचे एकमेव शास्त्रीय कारण म्हणजे आपल्या हिंदु धर्म शास्त्राप्रमाणे अंत्यविधीत व्यक्ती पंचतत्वात विलिन होत असते आणि त्यासाठी अग्नि संस्कार सूचित केलेला आहे. हा संस्कार जेंव्हा एखाद्या व्यक्तीवर स्मशानात केला जातो त्यामुळे होणारा धूर,प्रदुषण हे आसपासच्या वातावरणात पसरतो. सध्या तर बरेच असाध्य असे रोग असलेले लोक आसपास आपण पाहतो. जर अशा व्यक्तीला अंत्यसंस्कारच्या वेळेस दिलेल्या अग्नीमूळे हवेत पसरणारे प्रदूषण तुमच्या घरात येत असेल तर घरातील व्यक्तींच्या आरोग्यासाठी कदाचित घातक ठरू शकेल. आणि ह्याच कारणासाठी आपल्या पूर्वजांनी स्माशान हे गावाबाहेर असण्याची सोय सांगितलेली आहे. एकवेळेस कबरीस्तान वास्तूच्या आसपास असणे चालू शकेल परंतु शक्यतो स्मशानाच्या आसपास वास्तू न घेतलेली बरी. आता किती Risk घायची ते तुम्ही ठरवा. 

घराच्या समोर मंदिर :

हे एक नवीन Fad आलेले आहे. हल्ली ९०% सोसायटीच्या Compound मध्येच मोठे मंदिर असते. सोयीचे वाटत असले तरी ते वास्तूच्या नियमांविरुद्ध आहे. ह्यासाठीही मी पुन्हा तुम्हाला आपल्या शास्त्राचेच संदर्भ देईन. पूर्वी बांधलेली बहुतांश मंदिरे ही उंच डोंगरमाथ्यावर बांधली गेली आहेत. उदा. केदारनाथ,गिरनारचे दत्त मंदिर, वैष्णव  देवी मंदिर. ही सगळी मंदिरे अगदी उंच ठिकाणी बांधण्यात आली.  असे का ? असा प्रश्न तुमच्याही मनात बरयाच वेळेस आला असेल परंतु त्याचे उत्तर ? त्याचे उत्तर असे आहे कि संसारात गढून गेलेल्या लोकांनी त्यांच्या आयुष्यातला काही वेळ हा ह्या संसारापासून दूर जाऊन मनः शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी व्यतीत करावा. मंदिरात हजारो लोक नामस्मरण,देवाचा जयघोष करत असतात त्यामुळे मंदिरात एक वेगळे वातावरण तयार होत असते आणि प्रत्येक मंदिराची एक उर्जा असते. ही उर्जा आणि तयार झालेले वातावरण हे मंदिराच्या वर असणाऱ्या घुमटात/कळसात साठून रहाते. आणि जर हा कळस तुमच्या खिडकीच्या किंवा मुख्य दाराच्या समोर येत असेल तर त्या उर्जेचा स्त्रोत सतत तुमच्या घरी प्रवाहित होतो. ही उर्जा अत्यंत powerful असते.  जर सतत तुमच्या घरी हा स्त्रोत प्रवाहित होत असेल तर शास्त्राप्रमाणे तुमच्यासाठी ही वास्तू राहण्यायोग्य नाही.  परंतु आज देव इतका स्वस्त झाला आहे कि लोकांना अगदी त्यांच्या घरा समोर मंदिर हवे आहे. अगदी छोटे मंदिर असणे ठीक आहे परंतु घरासमोर/खिडकीसमोर मोठे मंदिर असणे घरातून मंदिराचा कळस दिसणे, घरात मंदिराच्या घंटांचा आवाज घुमणे हे वास्तू शास्त्राच्या नियमांविरुद्ध ठरते.  

वास्तू संदर्भातले मला सतत विचारण्यात येणारे समाज-गैरसमज मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तू निवडताना तुम्ही ह्यां सर्व गोष्टी लक्षात ठेवालच त्याच बरोबरीने हे ही ध्यानात असू दे प्रत्येक वास्तू चांगलीच असते. व्यक्तीप्रमाणे,त्याच्या कुंडलीप्रमाणे वास्तूची निवड करणे हितावह ठरते. 

प्रतिक्रियांची वाट पाहतेय : anupriyadesai@gmail.com  किंवा vaastupriya@gmail.com वर 





   

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१३

वास्तूचे ब्रम्ह स्थान आणि तुम्ही

वास्तूचे ब्रम्ह स्थान आणि तुम्ही


ज्योतिष आणि वास्तू ह्या शास्त्राचा अभ्यास करताना जस जसे त्यात संदर्भ येत गेले त्या अनुसार मी आपल्या  धार्मिक ग्रंथांचेही वाचन केले. आपली भारतीय संस्कृती महान आहेच परंतु आपल्या शास्त्रकारांनी/संतांनी  लिहिलेल्या ग्रंथांवरून ते काळाच्या कितीतरी पुढे होते ह्याची जाणीव होते. ज्ञानेश्वरांनी तेंव्हा लिहून ठेवलेली ज्ञानेश्वरी,रामदास समर्थांनी लिहिलेला दासबोध आता वाचतांना ज्ञानेश्वर,समर्थ आजच्या काळाबद्दलच बोलत आहेत कि काय असे वाटते. ज्योतिषशास्त्र म्हणजे प्रत्येक ग्रह आणि त्याचा मानवावर होणारया परिणामांचे शास्त्र. काहीजण त्याला Scientific मानतात तर काहीजण नाही. परंतु आज जेंव्हा चंद्राच्या  मानवी जीवनावर होणारया परिणामला सर्वच शास्त्रात मान्यता मिळालेली आहे तर बाकी ग्रहांबद्दलही लवकरच मतं बदलतील अशी मला खात्री आहे. अगदी अमावस्या आणि पौर्णिमेच्या आसपास होणारे जन्म- मृत्युचे प्रमाण हे बाकीच्या दिवसात होणारया जन्म -मृत्युच्या प्रमाणापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. (This is Scientific). म्हणजेच चंद्राचा मानवी जीवनावर बरयाच मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय. ह्या सर्व गोष्टी तुम्ही एखाद्या Municipal Corporation मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला विचारू शकता किंवा आयुर्वेदिक वैद्यांना.  असो तर आपला आजचा मुद्दा आहे वास्तू.

वास्तुसंदार्भात आपल्या वास्तु-शास्त्रकारांनी ब्रम्हस्थान हे नेहेमी मोकळे असावे असा उल्लेख केलेला आहे.वास्तूसंदर्भात लिहिलेल्या मागच्या एका लेखात मी ब्रम्हस्थानाचा उल्लेख केला आहे. ब्रम्हस्थान म्हणजेच आपल्या वास्तूचे मध्यवर्ती स्थान. शास्त्रात अशी मान्यता आहे की वास्तूदेवतेचे मुख हे ईशान्य दिशेस तर पाय हे नेऋत्य दिशेस आहेत. त्या अर्थाने वास्तुदेवतेचा पोटाचा भाग हा वास्तूच्या मध्यवर्ती येतो.  ब्रम्हस्थान जर सदोष असेल तर त्याचा कितीतरी विपरीत परिणाम त्या वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींवर होतो. त्याच संदर्भात माझ्याकडे ह्या वर्षीच्या मे महिन्यात एक वास्तूची Case आली. कुंडलीसंदर्भात चर्चा झाली आणि त्यांनीच त्यांच्या वास्तूसंदर्भात विषय काढला. स्वतःचा गेले दीड वर्ष न चालणारा व्यवसाय आणि घरातील सततच्या आजारपणामुळे ते कंटाळले होते. मग वास्तू-परिक्षणाचा दिवस ठरला. 

बरं एक नवीन गोष्ट वाचकांच्या लक्षात आणून द्यायची आहे ती म्हणजे जसे प्रत्येक शास्त्रात दररोज नवनवीन गोष्टींबाबत संशोधन होत असते तसेच वास्तूशास्त्रातही संशोधन सुरूच आहे.तर ते संशोधन असे की वास्तू आणि ज्योतिष ह्यांची सुंदर सांगड म्हणजे वास्तू-ज्योतिष शास्त्र. हे नवीन नाही पण ह्याचा उपयोग करणारे मात्र खूप कमी आहेत. हे वास्तू-ज्योतिष शास्त्र म्हणजे एखादी व्यक्ती जेंव्हा तुम्हांला त्यांच्या वास्तूबद्दल काही सांगत असते तेंव्हा त्यावेळेची कुंडली वास्तूतज्ञाला अधिक उपयोगी माहिती देवू शकते. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे कि जेंव्हा जातक मला त्यांच्या वास्तू बद्दल सांगतो तेंव्हाची कुंडली मांडल्यानंतर घराचे मुख्यप्रवेशद्वार कुठे आहे ? घरात पाण्याचासाठा कुठे आहे ? घरात मुख्य दोष कुठे आहे ? कशामुळे जातकाला नक्की त्रास होतोय ? ह्याची कल्पना होरा कुंडली देवू शकते.

होरा कुंडलीवरून ह्या जातकाला मी (वास्तू Visit करण्याआधी) घरात पूर्व दिशेला रद्दी,चपला बरेच वापरात नसलेले सामान किंवा अडगळीत पूर्वजांचे फोटो ठेवले आहेत का ? घराच्या मध्य ठिकणी काही अवजड वस्तू ठेवल्यात आहेत का ?? असे विचारले तेंव्हा बरयाच जातकांप्रमाणे त्याने  उत्तर दिले,"मला घरातून पूर्व दिशा कशी बघतात माहीत नाही. पण स्वयंपाक घरात एका ठिकाणी रद्दी ठेवलेली आहे. घराच्या मध्ये तर काहीच नाही मोकळी जागा आहे". मी म्हणाले,"ठीक आहे मी येतेच आहे मग पहाते."

जेंव्हा वास्तू परीक्षणासाठी ह्या वास्तूत गेले असता स्वयंपाक घरात पूर्व दिशेला फ्रीज होता. त्याखाली जाते (धान्य दळण्यासाठी पूर्वीच्याकाळी वापरात असलेले साधन )ठेवलेले. फ्रीजच्याच बाजूला रद्दी रचून ठेवलेली. रद्दीच्या थोडं वरती फळकुट बनवलेले आणि त्यात चादरीने काहीतरी झाकून ठेवलेले. मी विचारल्यावर घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी दिलेले उत्तर," अहो काही नाही …ते तुमच्या वास्तूवगैरेची पुस्तके मी ही वाचतो. घरात मृत व्यक्तींचे फोटो ठेवू नयेत असे म्हणतात ना ?? मग आम्ही ते चार-पाच  वर्षांपूर्वी भिंतीवरून काढून तिथे ठेवले आहेत."  मला उत्तर मिळाले. पूर्व दिशेला शक्य तितके स्वच्छ,मोकळे ठेवावे हे ही बरयाच पुस्तकांत लिहिलेले असते पण आजोबांनी आपल्या सोयीप्रमाणे वास्तूतील मृत व्यक्तींचे भिंतीवरचे फोटो काढले आणि त्यांना अडगळीत ठेवून दिले आणि ते ही पूर्वेला. आधीच पूर्वेला त्यांनी फ्रीज ठेवलेला त्याखाली जाते बाजूला रद्दी, त्यावर पूर्वजांचे फोटो. म्हणजे एकाच जागी किती दोष निर्माण झाला. 

 स्वयंपाक आणि बैठकीची खोली ह्यांच्या मध्ये एक दार आहे आणि त्या दारालाच लागून पूर्वेला घराचे मुख्यद्वार. शक्यतो जिथे मुख्यदार असते तिथेच चपलां ठेवण्याची जागा असते. हे घर चाळीतले त्यामुळे घराबाहेर फार जागा नव्हती. त्यांना तुम्ही चपला कुठे ठेवता असे विचारल्यावर त्यांनी मुख्यादाराकडे बोट दाखवले. मुख्य दारावरती एक खिडकीची झडप होती तिथे त्यांनी एक लाकडी Box बनवला होता आणि त्यावरच सर्वांच्या चपला ठेवण्यात येत होत्या. म्हणजे मुख्यादारावरच चपला. ज्या पूर्व दिशाकडून चांगल्या उर्जेचा प्रवेश होत होता तिथेच वरती चपला ठेवण्यात आलेल्या.  पूर्व दिशा पूर्णपणे दुषित झालेली दिसत होती. मग गेल्या दीड वर्षापासून त्या जातकाचा व्यवसाय का व्यवस्थित चालत नव्हता ह्याचे कारण कळले.

ह्या जातकाचा अजून एक प्रॉब्लेम होता आणि तो त्याने मला वास्तू परीक्षणासाठी गेले असतां सांगितले. तो म्हणजे त्याला एकच मुलगी होती आणि दुसऱ्या अपत्याची अपेक्षा होती. चार वर्षापूर्वी ह्याला स्वतःला नोकरीनिमित्ताने आफ्रिकेत जावे लागले. तेंव्हा जातकाची पत्नी गरोदर होती. दीड महिनाच झाला होता. ह्याच काळात घरात बरेच बदल करण्यात आले होते. पूर्वजांचे फोटो काढून ठेवण्यात आले होते आणि नवीन फ्रीज घरी आला होता. सर्वजण खुश होते. परंतु आठवा  महिना संपता संपता हिला रात्री दोन वाजतां दुखू लागले. हॉस्पिटल घराच्या अगदी खालीच होते परंतु बाळ वाचू शकले नाही. डॉक्टरांनी सांगितले हिच्या गर्भाशयाला भरपूर इजा झाली असून आता हिला पुन्हा बाळ होऊ शकणार नाही. आणि तिचे गर्भाशय काढून टाकावे लागेल अन्यथा  Infection वगैरे होऊन पुढे Cancerचाही धोका आहे.  ह्या घटनेनंतर दोनच दिवसात जातकाच्या वडिलांना छातीत अचानक कळ आली. तपासणी करण्यास गेले असता आन्जीयोप्लास्टी करावी लागेल असे सांगण्यात आले. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना जातकाला मात्र इथे येता आले नाही कारण त्यांचे काही Contract वगैरे असते तेंव्हा असे मध्येच सुट्टी घेऊन येता येत नाही. घरात आनंद नांदू पाहत असतानाच तो पाठ फिरवून निघून गेला.

ह्या प्रोब्लेमसाठी घरातील सदोष ब्रम्ह्स्थान कारणीभूत असते. म्हणून मी माझा मोर्चा घराच्या ब्रम्हस्थानाकडे वळवला. कधी कधी घराची रचनाच अशी असते की ब्रम्ह्स्थान कुठले ह्याबाबतीत घरातील व्यक्तींनाच संभ्रम असतो. ह्या घराच्या ब्रम्हस्थानावर बाथरूम आणि टोयलेट होते. मी पूर्ण घराचे परीक्षण आणि मोजमाप केल्यानंतर जातकाच्या तसे लक्षात आणून दिले. घराचे ब्रम्ह्स्थान म्हणजे घराचा Backbone. त्यावरच तुम्ही हल्ला केलात तर घर तुटण्यास वेळ कसला ?? तुमची पाठ जराजरी दुखत असेल तर तुम्ही ना धड बसू शकत ना उभे राहू शकत. मग घराच्या पाठीवरचे ओझे घर किती काळ सहन करणार. सहनशक्ती संपली कि मग घरतील व्यक्तींना हृदयरोग,मणक्याचे त्रास, पोटाचे त्रास,गर्भपात इ. होणारच. अर्थात ह्यासाठी फक्त वास्तूतील दोषच कारणीभूत नसून कुंडलीही तेवढीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ह्या सगळ्या गोष्टींची सांगड झाली की मग एके दिवशी त्याचा स्फोट होतो आणि त्याचे परिणाम दिसायला लागतात. मग आपल्याला वाटते हे असे अचानक काय झाले??  हे अचानक होत नसते. त्याची सुरवात हळूहळू होत असते फक्त आपल्याला तेंव्हा त्याचे परिणाम जाणवत नाहीत एवढेच. 

ह्या जातकाला घरातील पूर्व दिशा मोकळी करून तिथले सामान दक्षिण दिशेस ठेवण्यास सांगितले. चपलांसाठी पश्चिमेला एका ठिकाणी जागा ठरवून दिली. पूर्वजांच्या फोटो संदर्भातील गैरसमज दूर करून दक्षिण भिंतीवर त्यांना स्थान दिले. 

ब्रम्ह्स्थानातील दोषासाठी ठराविक दिवशी काही ठराविक मंत्रोक्त रत्ने पुरावी लागतील असा सल्ला दिला. कारण बाथरूम आणि टोयलेट तर दुसरीकडे हलवणे शक्य नाही.

बाकीही काही सूचना दिल्या जसे त्यांची मुलगी चवथी इयत्तेत शिकत आहे त्यामुळे तिने अभ्यासासाठी कुठल्या दिशेस बसावे ? कुठल्या देवतेचे स्मरण करावे ? जातकाचा व्यवसाय गेले दीड वर्ष थंड होता. त्यालाही काही स्तोत्रे वाचण्यास सांगितली. व्यवसाय घरातूनच करत असल्याने घरात व्यवसायाचे सामान कुठे ठेवावे ? पैसे कुठे ठेवावेत ? जातकाची बसण्याची दिशा कोणती असावी ? इ. संदर्भात आमची चर्चा झाली. त्यांनतर काल जातकाचा फोन आला. गेल्या चार महिन्यात व्यवसाय नुसता सुरु झाला नाही तर व्यवस्थित धावतोय. एका मोठ्या नावाजलेल्या कंपनीचेही contract मिळाले तेंव्हा त्याने  दुकानासाठी एक जागा पसंत केली आणि त्याच्या परीक्षणासाठी मला फोन केला. त्याच्या आनंद मला ऐकू येत होता. परीक्षणाचा दिवस ठरला. फोन ठेवताठेवता तो म्हणालाच,"मैडम हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. घरी सगळे खुश आहेत. त्यांचा आनंद बघून कामासाठी खूप उत्साह आला आहे."  मी म्हटलं,"नाही अजिबात नाही. ही शास्त्राची कमाल आहे. आभार शास्त्राचे मान. बाकी तुझीही मेहनत आहेच ना."

इथे काही गोष्टी वाचकांनी लक्षात घ्याव्यात : १) प्रामुख्याने घरात धन-संपत्ती असणे,येणे आणि ती टिकणे हे घराच्या निर्दोष पूर्व आणि उत्तर दिशेवर अवलंबून आहे. इथे जातकाला सोपा उपाय म्हणजे पूर्व दिशा मोकळी आणि स्वच्छ करण्यास सांगितले. त्याचे चांगले परिणाम म्हणजे त्याचे अर्थार्जनाचे मार्ग मोकळे झाले.  

२) जातक स्वतः चाळीत राहणारा. तरीही त्याने ब्रम्ह्स्थानावर रत्नाध्याय करून घेतला. बरेच लोक खर्च होतो… नको…. बघु… नंतर अशी टाळाटाळ करतात. परंतु जातक तत्काळ तयार झाला आणि त्याचे चांगले परिणाम म्हणजे बाबांच्या तब्येतीत चांगलाच सुधार आहे.  

आज त्याचा आनंद पाहून माझा शास्त्रावरचा विश्वास द्विगुणीत होतो. शास्त्राला कोटी कोटी प्रणाम. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com
  

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३

अनुभवाचे बोल

अनुभवाचे बोल 


गेल्या महिन्यात चैतालीचे आलेले हे पत्र. ती माझ्याकडे आली होती तेंव्हा लग्न होऊन चार वर्ष झाली होती परंतु बाळाची चाहूल नव्हती. तेंव्हा कुंडलीत काय योग आहेत हे जाणून घेण्यासाठी ती माझ्याकडे आली होती. त्यांनतर तिला ज्योतिष- शास्त्राचा अनुभव कसा वाटला ह्याबद्दल तिने लिहिले आहे.  



श्री स्वामी समर्थ 

माझ्या लग्नाला चार वर्षे झाली होती परंतु मला अपत्य होत नव्हते. मी बरेच उपाय केले, बरयाच जाणकार ज्योतिषांना विचारले पण सगळ्यांनी सांगितले की बाळ होईल पण कधी होईल ह्याबद्दल नक्की कोणीच सांगत नव्हते. ऑफिसमधल्या एका colleague बरोबर चर्चा करत असतना त्यांनी मला सांगितले कि अनुप्रिया देसाई म्हणून एक ज्योतिषी आहेत त्या तुम्हाला ह्याबाबतीत मार्गदर्शन करतील. त्याप्रमाणे मी त्यांची appointment घेतली.  


आमची ही पहिलीच भेट. परंतु त्यांनी माझ्या आयुष्यात पूर्वी घडून गेलेल्या काही गोष्टींबद्दल अचूक सांगितले. माझ्या लग्नात बरीच विघ्ने आली होती त्याबद्दलही त्यांनी उल्लेख केला. 

त्यांनी आमच्या दोघांचीही कुंडली संततीच्या संदर्भात अभ्यासली.
 त्यांनी मला सांगितले की तुमच्या दोघांच्याही कुंडलीत २०१२ च्या ऑगस्टनंतर संततीप्राप्तीचे योग आहेत परंतु काही complications आहेत त्यामुळे Pregnancy राहिल्यानंतर खूप काळजी घ्यावी लागेल. त्यांनी मला त्यासंदर्भात काही स्तोत्रे आणि मंत्र सांगितले. त्यात स्वामींचा तारक मंत्राचाही समावेश होता. बाकी उपायांबरोबरच तारकमंत्रचा ११ वेळा जप मी करत होते. 

दिलेले उपाय तर करतच होते आणि मला फेब्रुवारीच्या २०१२च्या शेवटच्या महिन्यात मला प्रचीती आली. मला गोड बातमी मिळाली. अनुप्रियाला सांगितल्यानंतर त्यांनी उपाय सुरु ठेवायला सांगितले आणि काळजी घ्यायला सांगितली. दिलेल्या स्तोत्रांचे वाचन चालू होते. आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मी Regular Check-up साठी गेले असता डॉक्टरांनी मला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये Admit होण्यास सांगितले. काही Complications आहेत असे सांगण्यात आले. १४ ते १५ दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते. अक्षरशः कंटाळले होते. हॉस्पिटलच्या वातावरणाचा उबग आला होता. अनुप्रियाच्या सतत Contact मध्ये होतेच. डॉक्टरांनी सिझर करावे लागेल असे सांगितल्यावर खूप निराश झाले होते. अनुप्रियाला विचारल्यावर तिने मला समजावले की Complications तर आहेत त्यामुळे उगीच risk घेण्यापेक्षा C- Section चा  मार्ग बरा. आणि १६ ऑक्टोबर २०१२ला आम्हांला मुलगी झाली.  

आमचा त्यांच्यावरचा विश्वास द्विगुणीत झाला आहे.  मला महत्वाचा निर्णय घ्याचा असेल तर त्यांना जरूर विचारते. आज त्या माझ्या friend आणि Guide दोन्ही आहेत. त्यांचे खूप खूप आभार. 


चैताली जोशी 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१३

गर्भधारणा झाली पण …….

गर्भधारणा झाली पण …….



आई होणे हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. काहीं जोडप्यांना ते खूप सहज आहे तर काही जोडप्यांना ह्यासाठी संघर्ष आहे. बरीच जोडपी माझ्याकडे हा प्रश्न घेऊन येतात की  लग्न होऊन बरीच वर्ष झाली पण बाळ होत नाहीये, वैद्यकीय तपासण्या आणि उपचार सगळे झालेत पण यश नाही. पण काही स्त्रिया अशाही आहेत ज्यांना गर्भधारणा झाली पण गर्भपात झाला. दोन्ही Cases मध्ये फरक हा आहे कि पहिल्या case मध्ये Conceive होत नाहीये आणि दुसरया Case मध्ये गर्भाची पूर्ण वाढ होण्याआधीच गर्भपात होतोय. आज मी ह्याच संदर्भातील सोनालीची Case तुम्हाला सांगणार आहे.

सोनाली माझ्याकडे २०११च्या मे महिन्यात आली होती. तेंव्हा लग्न होऊन ४ वर्ष झाली होती. त्यामुळे सगळीकडून बाळाबद्दल विचारणा होत होती. बारसे,डोहाळजेवण,लग्न कुठेही सोनाली गेली कि सगळे नातलग तोच प्रश्न विचारून भंडावून सोडायचे. सोनालीने कुठल्याही कार्यक्रमाला जायचे सोडून दिले. कुंभ लग्न आणि मेष राशीची कुंडली. कुंभ लग्नाप्रमाणेच सावळी,शांत अशी सोनाली. पारंपारिक आणि कृष्णमुर्ती ह्या दोन्ही पद्धतीने कुंडलीचे केलेले विवेचन खालीलप्रमाणे : 

पारंपारिक : 
  •  कुंभ लग्न त्यामुळे पंचमेश आहे बुध. बुध स्वतः मेष राशीत आणि शुक्राच्या नक्षत्रात. 
  • शुक्र चतुर्थात. चतुर्थ हे पंचमाचे व्यय स्थान म्हणजे पंचमेश बिघडलेला आहे. 
  • संततीसाठी पारंपारिक ज्योतिष-शास्त्रात गुरु ह्या ग्रहाला अत्यंत महत्त्व दिलेले आहे. इथे गुरु आहे लाभत आणि त्याची संपूर्ण दृष्टी जरी पंचमावर असली तरी गुरु वक्री असून शुक्राच्याच नक्षत्रात आहे. 
  • सोनाली मला भेटण्यास आली तेंव्हा तिला रवि महादशा आणि बुध अंतर्दशा सुरु होती. बुध पंचमेश आहे आणि रवि चतुर्थात. ह्याचा अर्थ सोनालीला "Pregnancy" राहिली असणार परंतु गर्भ जास्त वेळ राहिला नसणार. सोनालीला तसे विचारल्यानंतर सोनालीने सांगितले ते असे," हो लग्नानंतर मला दोन वेळेस दिवस गेले होते परंतु २-३ महिन्यातच माझा गर्भपात झाला. डॉक्टरांनाही कारण समजले नाही. आता तर डॉक्टरांकडे जायची भीतीच वाटते. माझ्या एका मैत्रिणीला तुमच्यावर खूप विश्वास आहे. तिनेच तुम्हाला कुंडली दाखवण्यास सांगीतली. आता जे तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी."
  • पंचम स्थानाबरोबरच द्वितीय आणि लाभ ह्या स्थानांचाही संततीप्राप्तीसाठी विचार होतो. ह्या कुंडलीत द्वितीय स्थानात गुरुची मीन राशी आहे. आणि लाभ स्थानात गुरु स्वतः आहे. मग तर संतती होणारच असे जरी वरवर वाटत असले तरी कुंडलीला पुढे येणाऱ्या दशा-अंतर्दशांचाही विचार व्हावा. येणाऱ्या दशा चतुर्थ स्थानाचीच फळे देत आहेत.   
कृष्णमुर्ती (के.पी.) पद्धतीने : 
  • पंचम स्थानाचा सब लॉर्ड आहे रवि. आणि तो पुढीलप्रमाणे कार्यरत आहे :                                                                               
  •   रवि    ४   ७                                                                                                                                   
  •   न. स्वा. चंद्र  २  ६                                                                                                                          
  •  सब लॉर्ड राहू  ४  ४  ९                                                                                                                     म्हणजे कुठेही पंचम स्थानाचा लवलेश नाही. चंद्र जरी द्वितीय स्थानाचा कार्येश होत असला तरी तो बलवान कार्येश ग्रह नाही. 
  • तीच गात द्वितीय आणि लाभ स्थानाच्या सब लॉर्डची आहे. कुठेही पंचम,द्वितीय आणि लाभ स्थानाचे बलवान कार्येश कोणतेही ग्रह नाहीत. 
  • येणारया दशा- अंतर्दशा,सब period कुठेही संतती होण्यासाठी मदत करत नाहीये. 

सोनाली अगदी आशेने माझ्याकडे पाहत होती. खोटे सांगावे तर व्यक्तीच्या आशा/अपेक्षा वाढतात आणि खरे सांगावे तर ते कसे ? शेवटी तिला म्हणाले,"तुझ्या कुंडलीत मला संततीबाबत जे चित्र दिसतंय ते असं आहे की तुला गर्भधारणा २०१२ला पुन्हा होईल परंतु खूप काळजी घ्यावी लागेल. नोकरी सोडावी लागेल. Bed Rest compulsory आहे. डॉक्टरांनी दिलेले पथ्य -औषधे काटेकोरपणे सांभाळावे लागतील. त्याच बरोबर मी तुला काही स्तोत्र आणि जप देते ते regular करत रहा. आणि माझ्याही contact मध्ये रहा." ती खूप खुश झाली. "हो नक्की हे सगळे मी व्यवस्थित लक्षात ठेवेन. कळवते तुम्हाला."

 त्यानंतर  ऑगस्टमध्ये तिचा फोन आला. "तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळ्या गोष्टी करतेय. आणि मला  शंका आहे कि मी गरोदर आहे. माझी डॉक्टर दोन दिवसांनी येणार आहे बाहेरगावहून. तपासणीनंतर बातमी confirm  होईल."  सोनालीचा आनंद ओसंडून वाहत होता पण मला खूप tension आलं. तिला म्हटले," Congrats. पण काळजी घे. जे जे सांगितले आहे ते सोडून देऊ नकोस. स्तोत्र वाचत रहा. आणि जमल्यास नोकरीत रजा घेतलीस तर बरे होईल. आणि मला कळवत रहा." "हो हो नक्की" असे म्हणून सोनालीने फोन ठेवला. 

सप्टेंबरच्या गौरी- गणेश उत्सवात एक दिवस मला सोनालीचा फोन आला. फोनवर बोलण्यापेक्षा सोनालीचे नुसते हुंदकेच ऐकू येत होते. मी समजले. तिला म्हटले, "सोनाली शांत हो. आणि …… "  मी काही म्हणण्याआधी सोनालीचे,"पण असे कसे झाले…. मी कोणाचे काय बिघडवले आहे ? माझ्याबरोबर असे का होतंय  ????". तिला काय समजवणार. 

काही Cases मनाला खूप चटका लावून जातात. पुढच्या आमच्या भेटीत मी सोनालीला ज्योतिष-शास्त्र काय सांगते हे नीट समजावून सांगितले. ती बरीच शांत दिसत होती. "मग असेच होणार असेल तर मग मी मुलं  दत्तक घेतले तर ?"  हा तिचा आशावादी स्वभाव मला खूप आवडला. जे नाहीच मिळणार त्यावर रडत राहण्यापेक्षा तिने नवीन मार्ग स्वीकारला. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१३

वाचकांसाठी काही सूचना

वाचकांसाठी काही सूचना 


 सर्वात आधी सर्वांना माझा नमस्कार. कसे आहात ? दिवाळीची खरेदी सुरु केली कि नाही ??  सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. येणारया वर्षात तुम्हा सर्वाना समृद्धी,बुद्धी आणि भरपूर धन-संपत्ती मिळो ही सदिच्छा.

 सध्या ब्लॉगच्या  वाचकांची संख्या जशी वाढतेय त्याच पटीने मला रोज ई-पत्रातून मला सतत विचारणा होत होती की मैडम तुम्ही article कधी लिहिणार ??? ब्लॉग अत्यंत वाचनीय आहे तुम्ही लिहित रहा वगैरे. काही वाचकांनी मला articles च्या संदर्भात suggestionsही दिले आहेत त्याचा मी जरूर विचार करेन. 

बरे आता मुद्याकडे वळूया. सध्या मला बरयाच ई -पत्राद्वारे "Consultation" साठी सतत विचारणा होत आहे. आणि मघाशी मी म्हटल्याप्रमाणे वाचकांची संख्या वाढते आहे आणि वाचक फक्त मुंबई तलेच नसून मुंबई बाहेरही जसे पुणे,नागपूर, नाशिक,कोल्हापूर,बंगळूरू,दिल्ली,राजस्थान,केरळ कर्नाटक,हैदराबाद आणि भारताबाहेरून ऑस्ट्रेलिया,अमेरिका, इंग्लंड,जर्मनी,आफ्रिका,दुबई,रशिया, फिलिपिन्स इ. देशातूनही आहेत. प्रत्येक व्यक्ती वेगळी आणि त्याचे प्रश्न वेगळे. प्रत्येकालाच समस्या आहेत आणि त्यातून बाहेर पडण्यची सर्वांचीच धडपड सुरु आहे. काहीना लग्न जमत नाही म्हणून tension आहे तर काहीना लग्नानंतरच्या घरी होणारया वादविवादांमुळे Tension. काही वाचकांना पैसे हातात टिकत नाही ही समस्या तर काहींना आलेले पैसे कुठे आणि कसे गुंतवायचे ही समस्या. काही जोडपी बाळ होत नाही म्हणून चिंताग्रस्त आहेत तर काही आपले बाळ खूप हट्टी आणि मस्तीखोर आहे म्हणून चिंताग्रस्त. 

समस्या आहेत तसे त्याचे समाधानही आहे. बरयाच वाचकांनी ह्याच संदर्भात मला विचारणा केली आहे की आम्हालाही तुमच्याकडून ज्योतिषीय मार्गदर्शन हवे आहे परंतु तुम्ही मुंबईत आणि आम्ही इथे लांब ?? किंवा काही वाचक मुंबईत आहेत परंतु सध्या ऑफिसमध्ये शनिवार आणि रविवार सुट्टी मिळतेच असे नाही आणि सुट्टी असली तरी त्या दिवशी नेमके घरी पाहुणे यायचे असतात किंवा काहीतरी प्रोग्राम असतोच मग प्रत्यक्षात येऊन कुंडलीबद्दल discussions होऊ शकत नाही तर ह्याला Option काय ? तर आज त्याबद्दलची माहिती देत आहे,


 ज्यांना वेळेअभावी वा दुसरया कुठल्याही कारणामुळे मला प्रत्यक्ष भेटून  ज्योतिषीय मार्गदर्शन घेणे शक्य नाही त्यांच्यासाठी फोनवरून अथवा facebook chat  इथून ज्योतिषीय मार्गदर्शन मिळू शकेल. 

 ह्या संदर्भातील काही गोष्टी मला इथे नमूद करीत आहे : 

१) फोनवरून मार्गदर्शन हवे असल्यास माझ्या खाली नमूद केलेल्या  इ-पत्त्यांवर मला आपली माहिती पाठवणे. 

२)माझा ई-पत्ता ( E-Mail IDs ) - vaastupriya@gmail.com किंवा anupriyadesai@gmail.com 
3) आपली कुंडली बनवण्यासाठी मला पुढील माहितीची गरज आहे - 
        अ) आपली जन्मतारीख 
        ब) अचूक जन्मवेळ 
        क) जन्म झाले ते ठिकाण 
जन्मवेळेबाबत बरयाचजणांचा नेहेमी होणारा गोंधळ म्हणजे जन्मतारीख आणि जन्मठिकाण सांगता येते परंतु जन्मवेळ लक्षात नसते त्यामुळे मग काहीजण सकाळी ७ आणि ८ च्या दरम्यान किंवा सकाळी ८ कि संध्याकाळी ८ हे लक्षात नाही असही सांगतात. तुमच्याकडे असलेल्या तुमच्या कुंडलीच्या पहिल्याच पानावर जन्मवेळ लिहिलेली असते परंतु त्यातही स्थानिक जन्मवेळ आणिस्टैन्डर्ड जन्मवेळ असे नमूद केलेले असते. कुंडली बनवण्यासाठी स्टैन्डर्ड जन्मवेळच विचारात घ्यावी लागते. त्यामुळे तीच जन्मवेळ तुमच्या माहितीत नमूद करणे. 
अचूक जन्मवेळ मिळाली तर कुंडली तर Perfect बनवता येते आणि भविष्यही अचूक सांगता येते त्यामुळे जन्मवेळ अचूक असणे अत्यंत महत्वाचे आहे. 
[ कृपया मला तुमच्याकडे असलेल्या कुंडलेची Scan Copy पाठवू नका. बरेच वाचक मला Scan Copy पाठवतात. सध्या Technology च्या दरदिवशीच्या होणारया प्रगतीमुळे Computer वर काही सेकंदातच कुंडली बनवता येते.] 
४) आपल्याला काय समस्या आहेत त्याची थोडक्यात माहिती देणे. 
५) आपल्याला फोनवरून मार्गदर्शन हवे आहे/ई-मेल द्वारे/फेसबुक chat वरून हे स्पष्ट करणे. 
६) Technology ने प्रगती केल्यामुळे कुंडली जरी काही सेकंदात बनवता आली तरी अचूक भविष्य वर्तवणे हे ज्योतिषावर अवलंबून आहे. प्रत्येक कुंडलीचा सखोल अभ्यास करून भविष्यात तुमच्या आयुष्यात घडणारया घटना जसे नोकरीत Promotion,नोकरीत होणारी मानहानी,Propertyत गुंतवलेले पैसे बुडणार तर नाहीत ना?? संतती कधी होणार ?  भाग्योदय कधी होणार ? ह्या गोष्टी वर्तवण्यास ज्योतिषाच्या बुद्धीची कसोटी लागतेच आणि त्यासाठी अमुल्य वेळ द्यावा लागतो त्यामुळे ही "Professional Service" FREE  नाही.   (Fees प्रत्येक case प्रमाणे वेगळी आकारण्यात येईल)
७) प्रत्येक कुंडलीच्या विवेचानासाठी अर्धा तास देण्यात येईल. त्यामुळी शक्यतो तुमचे प्रश्न एका कागदावर लिहून तयार ठेवावेत म्हणजे फोनवर बोलताना तेवढा वेळ वाचेल. 
८) Appointment चा दिवस आणि वेळ ठरवून देण्यात येईल. appointmentचा जो दिवस ठरलेला असेल त्याच्या दोन दिवस आधी Professional Fees, Bank Account मध्ये transfer करावी. बँक details तुमच्या ई-पत्त्यावर पाठवण्यात येतील.  
९) ज्यांना प्रत्यक्ष येऊन भेटणे शक्य आहे त्यांनीही वरील माहिती मला माझ्या ई-मेल पत्त्यावर पाठवावी. त्यांना appointment चा दिवस आणि वेळ ठरवून देण्यात येईल. 

आता निरोप घ्यायची वेळ झालीये. मधल्या काळात Consultations मध्ये busy असल्यामुळे लेख लिहिता आला नाही. ह्या अनेक cases पैकी बरयाच कुंडल्या मला वेगळ्या आढळल्या. पुढच्या वेळेस एक अत्यंत Interesting अशी Case घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

शुक्रवार, ५ जुलै, २०१३

ज्योतिषाचे भविष्य

ज्योतिषाचे भविष्य 


प्रसंग एक - संध्याकाळची अनुजला भेटण्याची वेळ ठरली होती ४.३० ची. त्यानंतर शिल्पासाठी ५.३० ते ६.३० ची वेळ आणि त्यापुढे अजून कोणीतरी. पावणे पाच वाजले…पाच आणि सव्वा पाचला मी अनुजला फोन लावला पण त्याचा फोन संपर्कक्षेत्राच्या बाहेर आहे असा मला मेसेज येत होता. अपघात वगैरे चे योग तर नव्हते कुंडलीत त्यामुळे मला ती शंका नव्हती. साडे पाचच्या ठोक्याला शिल्पा हजर झाली. तिच्या बरोबर कुंडलीचे discussion झाले. appointments संपता संपता रात्रीचे नऊ वाजले तरी त्याचा फोन नाही. म्हटलं जाऊ दे बघू … दुसऱ्या दिवशी ११.०० ला त्याचा फोन आला,"मैडम आज येऊ का मी ४.३० ला ??" काल येऊ शकलो  नाही त्याबद्दल sorry तर नाहीच नाही त्याबद्दल चक्कार शब्द नाही. मीच विचारले,"काय रे काल का नाही आलास ? आणि फोन नाही काही नाही ?? मी फोन केला तर लागला नाही ?? काय झाले ?".  "तसे नाही हो मैडम काल मी सिनेमाला गेलो होतो. मित्रांबरोबर अचानक प्रोग्राम ठरला. म्हटले उद्या करुया फोन आणि भेटू". मी म्हटले," अरे हो ठीक आहे पण ती  वेळ मी दुसऱ्या कोणालातरी दिली असता ना ??".   अनुज,"नाही माझ्या लक्षातच आले नाही".  आता काय बोलणार ह्या बेजबाबदारपणाला ?? 

प्रसंग दोन - बाजारात एकदा मी भाजी घेत असतना एक बाई," अगं तू xxx ची सून नां ? तूच कुंडली वगैरे पाहतेस ना ? तुझा पत्ता दे मी येईन सवडीने मला वेळ असेल तेंव्हा". मी,"हो काकू मीच कुंडली पाहते. माझा नंबर देते तुम्हाला तुम्ही फोन करून या". "अगं मला फोन लावायला वगैरे जमत नाही. (काकुंचे शिक्षण यथातथाच) तू मला संग कुठे येउन भेटायचे मी येईन." इति काकू. आता ह्यांना appointment वगैरे काय समजावणार?? तरी प्रयत्न केला," काकू अहो मी नक्की भेटेनच असे नाही. कारण लोक appointments आधीच book करून ठेवतात आणि मग ठरल्येल्या वेळेला भेटायला येतात मग ती वेळ दुसरया कोणालाही दिली जात नाही मग व्यवस्थित बोलता येतं आणि घाई होत नाही. आणि तसे ही मी वास्तू - परीक्षणासाठी गेले असेन तर तुमची फेरी वाया जाईल." काकुंच्या चेहेरयावरचे मोठे प्रश्नचिन्ह स्पष्ट दिसत होते." अच्छा असे असते काय ? मला वाटले कधीही येउन तुला भेटू शकेन??"

प्रसंग तीन - संध्याकाळची ७.३० ची वेळ मी गार्गीला(नावाजल्येल्या कंपनीत मोठ्या पोस्टवर) दिली होती. बरोबर त्यावेळेला ती हजर झाली. career आणि लग्न ह्या विषयावर चर्चा (प्रश्न -सत्र ) सुरु झाली. गार्गी खूप महत्वाकांक्षी त्यामुळे career बाबतीत तिच्याकडे  प्रचंड प्रश्नांचे भंडार होते. सध्याचा जॉबमध्ये promotion कधी मिळेल ?? दुसरा चांगला जॉब कधी मिळेल ? तो खूप लांब असेल कि घराजवळ ? नवीन जॉब मध्ये पण हाच job- profile असेल का ? कि वेगळा असेल ? abroad जाण्याचे काही chances आहेत का ? कधी ? कुठल्या देशात जाऊ शकेन ? किती काळ असेन मी तिथे ?? 
career बरोबरच तिचे लग्नाचे भरमसाठ प्रश्न होते. लग्न कधी होईल ?? साथीदार कसा असेल ? कुठल्या शहरातून स्थळ येईल ? मुलगा किती शिकलेला असेल ??  job करणारा असेल कि व्यवसाय ? घराची परिस्थिती कशी असेल ? तो ही भविष्यात abroad ला काम करू शकेल का ? (इथपर्यंत ठीक होते तिचा पुढचा प्रश्न ऐकून ब्रम्हदेवही बुचकळ्यात पडला असता.) मला नणंद असेल का ?? जमेल का माझे तिच्याशी ?? सासू कशी असेल ???  प्रश्न उत्तरे चालूच होती. रात्रीचे साडे- दहा वाजले. मैडम निघाल्या. म्हटलं," जेवून जातेस का? भूक लागली असेल तुला ?" "नाही नको… तुमची फी किती झाली ?" मी म्हटले,"xxx". त्यावर गार्गी,"मैडम माझ्याकडे सध्या एवढेच आहेत आणि मला ह्या वेळेला रिक्षेनेच जावं लागेल. तुम्हाला नंतर आणून दिले तर चालतील का ?? नाही तर उद्याच मी बँकेतून पैसे transfer करते. महटले,"अगं ठीक आहे तू घरी पोहोचणे महत्वाचे. पैसे नंतर दे सावकाश."  मैडम ज्या गेल्या त्यानंतर आल्याच नाहीत. ह्या गोष्टीलाही तीन वर्ष झाली. फेसबुकवर असतात मैडम. नवनवीन फोटो update करतात. कधी ह्या हॉटेलात बसून चहा पितांना कधी कॅफे-कॉफी डे मध्ये कॉफी पितांना. एकदा आठवण केली तर म्हणे सध्या वेळच मिळत नाहीये तुमच्याकडे यायला. मी म्हटलं अगं  transfer  कर ना मग??? त्यावर मैडमचे उत्तर,"माझ्याकडे पैसे नाहीयेत सध्या". मनात म्हटले हे बरे आहे. इतका वेळ घ्यायचा एखाद्याचा, आणि मग अशी वागणूक ???  (महिनाभर काम करून घेतल्यानंतर तुम्हाला Boss ने पगारासाठी पैसे नाहीत असे सांगितले तर कसे वाटेल मैडम?) 

प्रसंग चार - (हा प्रश्न तर मला नेहेमी विचारला जातो) हितेशचे त्याच्या कुंडलीचे संपूर्ण विवेचन झाले. निघता निघता त्याचा प्रश्न मैडम मग तुम्ही कुठे Job करता ?? मी म्हटले," अरे हजारच्या वरती माझे Clients आहेत. रोज १५ ते २० फोन येत असतात त्यांचे प्रश्न- कुंडलीवरून  उत्तरे आणि वास्तू ह्यात संपूर्ण दिवस जातो. मला वेळच नाहीये Job  करायला." 
आणि असाच एक प्रश्न ओळखीतल्या व्यक्तीने विचारला होता," अगं  कॉम्पुटरवर एखाद्या व्यक्तीचे आपोआप भविष्य येतेच ना तेच तू वाचून दाखवतेस ?? बरे आहे तुझे Profession."  मी," काका तुम्ही घ्याना कॉम्पुटर. नाही तरी सध्या Retire झाला आहात. तुम्हीही सुरु करा हा BUSINESS. काय ??" माझा खोचकपणा काकांना समजला. 

प्रसंग पाच - एकदा ट्रेन मध्यॆ सतीश भेटला. हाय हेल्लो झाल्यावर त्याचे प्रश्न सुरु झाले. "मैडम आता मला गुरु आठवा येतोय ना ?" माझा प्रश्नार्थक चेहरा बघून सतीशने त्याच्या ज्ञानाचा (अर्धवट ) पेटारा उघडला. "अहो असं काय करताय माझी कर्क रास नाही का ?? साडेसाती सुरु आहे मला ? मला नवीन जॉब शोधायचा आहे. काय करू ?सध्या योग आहेत का माझ्या पत्रिकेत ?"  आता मी काय बोलणार ह्यावर ह्याची पत्रिका  मला पाठ असल्याप्रमाणे तो बोलत होता. मी म्हटले,"अरे तू मला नंतर फोन कर सध्या मला नही आठवत तुझी पत्रिका." त्यावर सतीश," अहो विसरलात ?? लक्षात राहायला हवी तुम्हाला माझी कुंडली ??"  आता ह्याला काय सांगायचे रोज १५ - २० फोन येतात कुंडली बघण्यासाठी. प्रत्यक्ष ६-७ जण  रोज भेटायला येतात म्हणजे averagely रोज २२ कुंडल्या नजरेखालून जातात आता ह्यात ह्याची कुंडली कुठली बाबा ??? तरी काही न म्हणता त्याला म्हटले," नाही रे लक्षात राहत. तू फोन कर"  


ह्या आणि अशा अनेक अनुभवानंतर मला लोकांची चीड येण्यापेक्षा कीव येते. कारण समाज अजुनही बुरसटल्येल्या विचारांचाच आहे. आधी जसे गुरुजी देवळात पूजा आटोपली कि कुंडली वाचनाला बसायचे. मग एकेका श्रद्धाळूंची  कुंडली पाहत त्यांचे प्रश्न सोडवायचे. प्रश्न म्हणजे काय तर फार फार तर मुलाचे किंवा मुलीचे लग्न कधी होईल ?  मंगळ आहे का ? कालसर्प  दोष आहे का ?  एवढेच प्रश्न. मग गुरुजी कुठली तरी शांती सांगायचे आणि मंडळी निघायची, निघताना गुरूजीना ११/- नाही तर काही फळ अथवा धान्य ठेवले जायचे. बस्स एवढेच communication. मी इथे ज्योतिषांना दोष देत नाहीये पण त्यावेळी प्रश्नच मर्यादित होते. जसा जसा समाज प्रगत होतोय प्रश्न वाढत चालयेत ( हास्यास्पद असले तरी हे सत्य आहे) 

पूर्वी ज्योतिषविद्या ही परंपरागत पद्धतीने मिळायची. सध्या गल्लोगल्ली ज्योतिषशास्त्राचे क्लासेस आहेत. ज्यांना आवड आहे ते हे शास्त्र शिकू शकतात. पण आवड म्हणून शिकणे आणि सखोल अभ्यास करून भविष्य वर्तवणे ह्यात फरक आहे. 

परंतु समाज अजूनही ह्याच गैरसमजुतीत आहे ज्यात पूर्वीच्या ज्योतिषाची त्यांच्या मनातील Image तशीच राहिली आहे. ज्योतिष-शास्त्राला महाराष्ट्रात अंधश्रद्धा मानून ह्या शास्त्राला आपल्या महाराष्ट्राच्या कुठल्याही विद्यापीठात शास्त्र म्हणून मान्यता मिळालेली नाही. महाराष्ट्राबाहेरून तुम्ही ह्या विषयात Ph.D करू शकता. आहे ना आश्चर्य ??? 

सध्या मला भरपूर E - Mails येत आहेत. कुंडलीबद्दल विचारले जाते. त्यांच्यासाठी सुद्धा खालील माहिती :
१) ज्योतिषाचे ज्ञान घेण्यास फार वेळ लागत नाही पण अचूक भविष्य सांगणे हे येड्यागबाळ्याचे काम नाही त्यामुळे त्याला वेळ लागू शकतो. अनुभवावरूनच अचूक भविष्य सांगता येते. त्याला सतत वाचन मनन चिंतन  ह्याची गरज असते.  (त्यामुळे त्या ज्ञानाचा आणि ज्योतिषाच्या वेळेचा मान ठेवून फुकटात भविष्य ऐकायला मिळेल ह्या भ्रमात राहू नका )
२) नुसते राशीवरून लोकांचे वर्णन करणे सोप्पे आहे त्यांच्या आयुष्यात घडणारया घटना कधी घडतील हे अचूक सांगता येणे म्हणजे खरे ज्योतिष.
३)  सध्या ज्योतिषांकडे जाण्याआधी त्यांची रीतसर appointment घ्यावी. तुम्ही busy आहात तसेच astrologer ही busy असतात ह्याचे स्मरण ठेवा. 
४) ठरलेल्या वेळी तुम्हाला जाता येणार नसेल तर फोन करून ज्योतिषाला तसे सांगा तुम्हला देलेली वेळ दुसऱ्या गरजवंताला देता येईल.  
५) ज्योतिषाकडे सगळे प्रोब्लेम्स घेऊन येणाऱ्यांचा भरणा जास्त असतो त्यामुळे अमुक एका माणसाची appointment cancel करून ती वेळ मला द्या हे सांगणे उचित नाही. 
६)रस्त्यात कोणी ज्योतिषी भेटले तर स्वतःच्या कुंडलीबद्दल चौकशी करू नका. ज्योतिषांना रोज कित्येक कुंडल्यांचा अभ्यास करावा लागतो … प्रत्येक कुंडली लक्षात राहतेच असे नाही.  
७)  तुम्हाला सांगितले गेलेले भविष्य अचूक ठरले किंवा नाही हे त्या ज्योतिषाला नक्की कळवा. काही अभ्यासू ज्योतिषी स्वतःचे Research करतात त्यामुळे ते त्यांना कळवणे जरुरी आहे. 

त्यामुळे please वाचकहो ज्योतिषीकडे आणि त्याच्या professionकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला. 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

READERS ALL OVER THE WORLD