मंगळवार, २ एप्रिल, २०१३

कुंडली दोष नाही हा तर वास्तू दोष


कुंडली दोष नाही हा तर वास्तू दोष 

बरेच दिवस वास्तूवर काही लिहिले नाही म्हणून वाचकांकडून विचारणा होत होती. आजचा प्रपंच त्यासाठीच. 
एकदा एक जोडपे मला भेटण्यासाठी आले होते. नील स्वतः डॉक्टर आणि परी इंजिनीअर . लग्नाला तीन वर्षे झाले तरी बाळाची चाहुल लागली नव्हती. घरचे,मित्रमंडळी, नातेवाईक सगळे विचारणा करत होते.  "Planning" आणि "Carrier" च्या नावाखाली नील व परी पुढचे बोलणे टाळत. परंतु आतल्याआत दोघांनाही ही गोष्ट खात होती. सगळ्या चाचण्या झाल्या. दोघांचे "Reports" अगदी Normal. मग असे का होतेय ते काळात नव्हते. त्यासाठी दोघे आले होते.

दोघांच्या कुंडल्या व्यवस्थित अभ्यासल्यानंतर मला जाणवले की दोघांच्या कुंडलीत तर काहीही दोष नाही मग… .? ? मग मी हा प्रश्न  "प्रश्नकुंडलीप्रमाणे" सोडवण्यासाठी त्यावेळेची प्रश्न कुंडली मांडली. माझ्याकडे आज त्याचे Records नाहीत. परंतु एक गोष्ट ठळकपणे त्या कुंडलीत जाणवली होती ती म्हणजे पूर्व दिशा व आग्नेय दिशा ह्यात दोष असावा. "तुमच्या घरी पूर्वेला काही जड वस्तू आहे का? मुख्यप्रवेशद्वार कुठे आहे ?" असे प्रश्न विचारल्यानंतर कोणाकडूनही उत्तर नाही. आज डॉक्टर आणि इंजिनीअर असलेल्या जोडप्याला पूर्व दिशा सांगता न यावी ???? कमाल आहे …..  त्यावर नील उत्तरला,"तुम्ही आमच्या घरी येऊ शकाल का ?"   मग वास्तू परिक्षणाचा दिवस ठरला.


ईशान्य दिशेत असलेले प्रवेशद्वार, पूर्णपणे बंद असलेली पूर्व दिशा व आग्नेय कट अशी नीलची वास्तू. 


१) पूर्व दिशा म्हणजे उर्जेचं स्त्रोत. सुर्य ह्या दिशेने उदय होतो व समस्त जगाला जगण्याची ऊर्जा,उर्मी व उत्साह देतो. अशी पूर्व दिशा नीलच्या घरी पूर्णपणे बंद होती म्हणजेच ह्या दिशेत एकही खिडकी नव्हती. पूर्व दिशेत जर दोष असेल तर घरातील पुरुषांचे वर्चस्व कमी होते,ठाम Decision घेत येत नाही, अत्यंत मानसिक गोंधळ होतो. 

२)ईशान्य दिशा म्हणजेच ईश्वराची दिशा. ईश्वर सर्व दिशेस असतो परंतु इथे ईशान्य दिशेत "Positive Energy" च्या संदर्भात आपण ही दिशा विचारात घेतो. साहजिकच इथे देवघर किंवा तत्सम चांगल्या गोष्टी असल्या तर घरातील चांगल्या उर्जेचा प्रवाह वाहण्यास मदत होते. नीलच्या घराचे प्रवेशद्वार नेमके ईशान्य दिशेत. आता तुम्ही म्हणाल ईशान्य दिशेत प्रवेशद्वार चांगली गोष्ट आहे ना Boss. वरकरणी चांगली वाटत असली तरी प्रवेशद्वार म्हणजेच वास्तूला त्या दिशेत कट आला असे वास्तुशास्त्र सांगते. ईशान्य दिशेत आलेल्या ह्या कटमुळे कर्त्या पुरुषाच्या प्रगतीत अडथळे येतात. 

३)आग्नेय दिशेत मोठी खिडकी होती. इथेच मोठी गोम होती. आग्नेय दिशेत जर कट असेल म्हणजेच खिडकी/मुख्य-प्रवेशद्वार असेल तर वंश वाढण्यास बरेच अडथळे निर्माण होतात. आग्नेय म्हणजेच अग्नि. ह्या दिशेतल्या दोषांचे परिणाम घरातील स्त्रियांना भोगावे लागतात. स्त्रीला पोटाचे विकार/तक्रारी सुरु होतात. 

ह्या सर्व गोष्टी मी नीलला विचारल्यानंतर त्याने हे मान्य केले कि ह्या वास्तूत आल्यापासून त्याला नोकरीत खूप त्रास होत होता. सात महिन्यांपुर्वीच त्याला परदेशात नोकरी मिळाली होती. पगार चांगला व इतर सुविधाही होत्या परंतु दोन वर्षांसाठी तिथे गेलेल्या नीलला चार महिन्यातच करमेनासे झाले व तो तडकाफडकी इथे निघून आला. इथे आल्यानंतरही त्याला काही ठरवता येईना. ( पूर्व दिशा दोष - निर्णयक्षमता कमकुवत), परीला नुकतीच नवीन नोकरी लागली होती परंतु तब्येतीच्या वारंवार तक्रारीमुळे तिला कामावर लक्ष केंद्रित करता येईना. तब्येतीच्या काय तक्रारी आहेत असे विचारल्यावर परीने सांगितले तिला गर्भाशयात "Fibroids" आहेत व त्याची Treatment चालू आहे. ( आग्नेय दोष  - स्त्रियांना पोटाचे विकार/ तक्रारी) सर्व कहाणी लक्षात आल्यानंतर नील व परीला वास्तुदोष नीट समजावले. त्यावरील उपाय काय आहेत ? कसे करायचे इ. त्यांना explain केले. त्यांनाही ते पटले. 

वास्तू-दोष परिहाणार्थ  काढलेल्या मुहूर्तावर काही ठराविक धातू - रत्ने दोष असलेल्या ठिकाणी मंत्रोच्चार करून पुरण्यात आली. नील व परीला काही स्तोत्रे दररोज वाचण्यास सांगितली. 

त्यानंतर दोन महिन्यांनी परीच मला भेटण्यास आली. काही बोलण्याच्या आधीच तिच्या चेहेरयावरील तेजस्वीपणा व टवटवीतपणा गोड बातमी सांगत होता. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नील भेटायला आला तोच पेढे घेऊन… "मुलगा झालाय …. बारसे आहे ३० नोव्हेंबरला.. तुम्ही यायचेच… कुंडली तुमच्याकडून बनवून घ्यायची आहे."  त्याला कुंडली बनवून दिली व बाळासाठी काही नावेही सुचवली. त्याला बारश्याला येण्याचे आश्वासन दिले व मनोमन शास्त्राला दंडवत घातला. 

काय ?? तुम्हीही मानले कि नाही ? मग कळवा मला ह्या ई-मेल ID वर - anupriyadesai@gmail.com
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

मंगळवार, २६ मार्च, २०१३

कधी होणार मी आई ??

कधी होणार मी आई ??


नोकरी - व्यवसाय ह्यावर आपण मागील लेखात काही उदाहरणे पहिली आज आपण कुंडलीतल्या "पंचम स्थानावर" अभ्यास करणार आहोत. पंचम स्थानावरून खालील गोष्टी कळू शकतात  : 
१) पंचम स्थान म्हणजे प्रेम (निःस्वार्थी प्रेम) २) संतत्ती होणार की नाही ? ३) होणारी संतत्ती कशी असेल ? मतिमंद तर नसेल ना ?  इ. गोष्टी पाहता येतात. 

पण ह्या पंचम स्थानाचा संबंध जर "लाभ" स्थानाशी असेल तर संतत्ती होण्यास काही त्रास नसतो. परंतु पंचमाचा संबंध जर "अष्टम", "चतुर्थ" किंवा "व्यय" स्थानाशी आला तर मात्र संतत्ती होण्यास त्रास असतो. आता हा त्रास म्हणजे नक्की काय तर, 
१) काही वेळेस कुंडलीतल्या बाकी योगांबरोबर पंचम स्थान जर अष्टमाशी व लाभ स्थानाशी निगडीत असेल तर संतत्ती होते परंतु पाहिल्यावेळेस "Miscarriage" होण्याची शक्यता असते किंवा संतत्ती होते परंतु "सिझरियान" पद्धतीने.  
२) जर पंचमाचा चतुर्थ व व्यय स्थानाशी संबंध आला तर "Miscarriage" तर होतेच परंतु पुन्हा "Conceive" होण्यासाठी व झाल्यावर प्रचंड काळजी घ्यावी लागते.  

आज आपण अश्याच एका कुंडलीचा आढावा घेणार आहोत ज्या कुंडलीत पंचम स्थानाशी निगडीत चतुर्थ व व्यय स्थाने असून एकदा "Abortion" करावे लागले व नंतर संतती झाली आहे. आज पारंपारिक व कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडलीचा अभ्यास करणार आहोत : 

ज्योतीची कुंडली 

पारंपारिक पद्धतीने : मिथुन लग्न व कुंभ राशीची ही कुंडली आहे. ह्या कुंडलीत पंचम स्थानात शनि व रवि सारखे ग्रह आहेत. पंचमात तुळ रास व त्या राशीचा मालक शुक्र स्वतः "चतुर्थ" स्थानात. (वरती आपण पहिलेच कि पंचमाचा जेंव्हा चतुर्थाशी संबंध येतो तेंव्हा संतत्ती होण्यास त्रास असतो.) 

कृष्णमुर्ती पद्धतीने : पंचम स्थानाचा उप-नक्षत्र स्वामी  (Sub Lord) हा शनि आहे व शनि पुढीलप्रमाणे कार्येश : शनि - ४,८,९ . शनि स्वतः राहूच्या नक्षत्रात व राहू - १ ,५,१२. तुमच्या लक्षात आलेच असेल इथेही पंचमाचा चतुर्थ व अष्टम स्थानाशी संबंध आला आहे. 

 वरील नमूद केलेल्या योगांमुळे ह्या स्त्री जातकाला( नाव : ज्योती) गर्भधारणा झाली परंतु ही गोड बातमी तिला स्वतःला कळण्या आधी एक घटना घडली. ज्योती नेहेमीप्रमाणे कामावर जात असताना तिला पोटात दुखू लागले परंतु फारसे दुखत नसल्याने तिने दुर्लक्ष केले व नेहेमीचे तिचे Jobचे  Routine सुरु झाले. दुपारी जेवणानंतर तिच्या पोटात जास्तच दुखू लागले. Office मधून सुट्टी घेऊन डॉक्टरांकडे जावे असे तिने ठरवले व ललितलासुद्धा  (नवरयाला ) तसे कळवले.  Office मधून निघून रेल्वेचा प्रवास करत(याही परिस्थितीत) ज्योती घरी आली. नेहेमीच्या डॉक्टरनी तपासल्यावर ताबडतोब Hospital मध्ये Admit करण्यास सांगितले. Hospital ला पोहोचेपर्यंत ज्योतीची शुद्ध हरपली. आता सर्वांना गांभीर्याची कल्पना आली व ज्योतीची काळजी वाटू लागली.

तिच्या सर्व तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून ललितला धक्का बसला. ज्योती गरोदर होती व दीड महिना उलटून गेला होता. (मुलींना pregnancyची news दीड ते दोन महिन्यानंतर  कळते.) आणि बाळची वाढ ही गर्भाशयात न होता Fallopian Tube मध्ये होत होती ज्यामुळे बाळ वाढू शकले नाही व अंतर्गत रक्तस्त्राव सुरु झाला व ज्यामुळे ज्योतीच्या जीवालाही धोका निर्माण झाला. वेळीच ज्योती हॉस्पिटलमध्ये दाखल झाली व परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली. काही दिवसांच्या उपचारानंतर ज्योतीला घरी पाठवण्यात आले व पुढचे काही महिने आराम व काळजी घेण्यास सांगितले.

ह्या सगळ्या घटनेनंतर जेंव्हा ज्योती मला भेटण्यास आली तेंव्हा तिला काही उपाय व एका स्तोत्रचे पठण नियमित करण्यास सांगितले. मधल्या काही महिन्यांनतर ज्योतीचा फोन आला तो गोड बातमी देण्यासाठी परंतु बातमी देताना तिच्या आवाजात काळजीही मला स्पष्ट ऐकू येत होती. तिला दिलेल्या स्तोत्राच्या पठणाची  पुन्हा आठवण करून दिली व हे ही सांगितले की तुला संतत्ती होईल, सिझर करावे लागेल त्यामुळे तशी मनाची तयारी ठेवणे.  

म्हणजे पहा ग्रह आपले काम कसे चोख निभावतात. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ललितचा फोन आला, हसता हसता म्हणाला," मुलगा झाला. तुम्ही म्हणल्याप्रमाणे सिझर करावे लागले. ज्योतीची तब्येतही व्यवस्थित आहे. बाळाबरोबर भेटायला येऊ नक्की".

कशी वाटली ही Case ? नक्की कळवा मला माझ्या ई-मेलवर - anupriyadesai@gmail.com

Bye


 Note : 

इथे पंचम स्थानाचा सब-लॉर्ड शनि हा  ४,८,९ चा कार्येश असून राहूच्या नक्षत्रात आहे व राहू पंचमाचा कार्येश आहे. त्यामुळे आधी Abortion करावे लागले परंतु नंतर संतत्ती झाली. 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com


रविवार, २४ मार्च, २०१३

एक मजेशीर योग….ज्योतिषाला Challenge

एक मजेशीर योग….ज्योतिषाला Challenge 

ह्या शास्त्राचा अभ्यास करताना काही कुंडल्या मनाला चटका लावून जातात तशा काही कुंडल्या खूप हसवून जातात. मागच्याच आठवड्यात सुनीलने फोने केला आणि भेटण्याची वेळ ठरली. जी वेळ ठरली होती त्यावेळी तो आला …. त्याची कुंडली वाचायला सुरु केले आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. 

वृश्चिक लग्न व मकर राशीची कुंडली. पण कुंडलीतल्या अष्टम स्थानात असलेली शुक्र,मंगळ आणि राहूची युती  बरेच काही सांगून गेली. ज्यांचा ज्योतिष-शास्त्राचा अभ्यास नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते :
१) अष्टम स्थानावरून तुमच्या शारीरिक संबंधांचा अभ्यास होतो.
२) शुक्र हा मुळातच Romantic आहे. शुक्र प्रधान व्यक्तींना टापटीप राहायला आवडते. सर्वांनी मला पहावे माझ्या मोहात पडावे अशा काही धारणा शुक्र प्रधान व्यक्तींच्या असतात. शुक्र हा कामातुर आहे. 
३) मंगळ आक्रमक,वर्चस्व गाजवणारा,परिणामांचा विचार न करताच एखादी गोष्ट करणे,हट्टी इ. असा ग्रह. तर …. 
४) राहु हा फसवा आहे. खोटे आकर्षण आहे. 
सुनीलची कुंडली 
मग पहा शुक्र जो मुळातच प्रणयी,मंगळ  आक्रमक व हट्टी,राहू खोटे आकर्षण तर अष्टम स्थान हे शारीरिक संबंध दाखवते हे संपूर्ण COMBINATION सुनीलच्या कुंडलीत हजर होते. आता मुळ मुद्याकडे वळूया,

सुनीलने प्रश्न विचारण्यास सुरवात केली : १) माझे पैसे खूप खर्च होतात. SAVINGS होत नाहीत. 
२) माझ्या BUSINESS मध्ये माझी कधी प्रगती आहे?
३) बायकोचे आणि माझे जराही पटत नाही.. ती सारखा संशय घेते.मी खूपच साधा आहे हो तिला पटतच नाही. मी मुलींशी बोलतही नाही हो. बघाना तुम्हालाही पत्रिकेवरून समजलेच असेल. 
सुनीलचे शेवटचे वाक्य ऐकून उडालेच. सरळ सरळ CHALLENGE ?? मी सुनील विचारले," ह्या आधी कुठल्या ज्योतिषाला पत्रिका दाखवली आहे का?" अपेक्षित उत्तर आले "नाही". मी म्हटले,"ठीक आहे. आत्ता ऐका …. तुमची पत्रिका मला हे सांगतेय की तुम्ही मुलींपासून जरा सावधान. त्यामुळे तुम्हाला खूप मनःस्ताप होऊ शकतो. तुम्ही मुलींशी बोलतच नाही ही चांगली गोष्ट आहे. माझ्या दृष्टीने तरी तुम्ही सावधगिरी बाळगावी. येत्या काळात एखाद्या महिलेमुळे तुम्ही गोत्यात येऊ शकता. मग त्यातून बाहेर पडणे शक्य नाही."

आत्ता उडण्याची वेळ सुनीलची होती. चेहरा पूर्णपणे पडला. थोडावेळ शांततेत गेला. आणि सुनील उदगारला," ताई मी एकदा एका मुलीकडून फसवलो गेलो आहे. ती माझ्याबरोबर फिरायची.. खुपदा आम्ही तसेही भेटलो आहे(इथे सुनील शारीरिक जवळीकीबद्दल बोलत आहे) आणि तिने मला माझ्याकडून बरयाचदा पैसेही घेतले होते. तिला सोन्याचे दागिनेही करून दिलेत परंतु नंतर तिचे लग्न झाले आणि ती ऑस्ट्रेलियाला निघून गेली."

मी म्हणाले," ठीक आहे जी चूक होऊन गेली ती गेली परंतु ह्यापुढे जरा आवरा स्वतःला …. नाहीतर कोणीही वाचवू शकणार नाही."

सुनीलचा पुढचा प्रश्न," ACTUALLY ताई तिचा मला सारखा फोन येतो. ती आत्ता पुन्हा मुंबईत आली आहे. तिचे तिच्या नवरयाबरोबर जराही पटत नाही. तिच्या नवरयाचे बाहेर संबंध आहेत असा तिला संशय आहे.  त्यामुळे तिने सर्व लक्ष तिच्या carrier वर केंद्रित केले आहे. तिला माझ्याबरोबर BUSINESS करायचा आहे. गुंतवणूक तिचा नवरा करणार आहे… त्यामुळे मला फक्त मेहनत करायची आहे … चालेल का??" (सुनीलने आधी विचारलेले प्रश्नांची उत्तरे ह्या त्याच्या नविन प्रश्नात लपलेली आहेत हे वाचकांच्या ध्यानात आलेच असेल.)

संतापानेच मी म्हटले," अहो सुनील साहेब आताच मी म्हणाले ना की, एखाद्या महिलेमुळे तुम्ही गोत्यात येऊ शकता. मग त्यातून बाहेर पडणे शक्य नाही. मग परत परत तेच काय विचारताय ???? Business म्हटले की तुमचा आणि तिचा पुन्हा संबंध आला म्हणजे पुन्हा येरे माझ्या मागल्या……. " 

त्यावर सुनील साहेब गप्प. मी एखाद्याला सल्ला देऊ शकते परंतु हेच करा आणि तेच करा हे सांगण्याचा अधिकार मला नाही. त्यामुळे मी काही  बोलले नाही. मला माहित होते येणारया काही दशा आणि अंतर्दशा सुनीलसाठी आर्थिक दृष्ट्या आव्हानात्मक असणार आहेत त्यामुळे त्याला त्याच्या मैत्रिणीकडून आलेली "Offer" स्वीकारावी लागणार आणि पुढच्या घटना क्रमवार घडणार. 

तर अशी आहे आपली कुंडली. आपल्या जीवनाचा आरसा. त्यामुळे जेंव्हा कधी ज्योतिषाकडे गेलात तर त्याला कधी Challenge करू नकाच परंतु खोटेही बोलू नका कारण चाणाक्ष ज्योतिषी तुमचे खोटे लगेच पकडेल.  लक्षात ठेवा नक्की …. 

भेटू लवकरच …. 




                                                               

गुरुवार, २१ मार्च, २०१३

अष्टम स्थान : मृत्यु की …???????

अष्टम स्थान : मृत्यु की …???????

ज्योतिषशास्त्र शिकत असताना एकदा माझ्या गुरु कुंडलीतील सर्व स्थाने समजावून सांगत होत्या. एकूण बारा स्थाने आणि प्रत्येकाचे वेगळेच महत्व ,कारकत्व वगैरे… प्रथम स्थान म्हणजे तुम्ही स्वतः -तुमचा स्वभाव-तुमचे कसे दिसता वगैरे,द्वितीय स्थान म्हणजे धन स्थान-तुमचे कुटुंब, चतुर्थ स्थानावरून मातृसौख्य ,स्थावर इस्टेट,वाहनसौख्य इ. 
जेंव्हा त्यांनी अष्टम स्थानावर बोलण्यास प्रारंभ केला तेंव्हा पहिलेच वाक्य हे होते : 

" अष्टम स्थान म्हणजे मृत्यू स्थान. ह्या स्थानावरून व्यक्तीला आयुष्य किती लाभले आहे हे विचारात घेतले जाते. अष्टम स्थान म्हणजे अपघात … तडकाफडकी आयुष्यात आलेले बदल,प्रवासातील अडथळे ,प्रवासातील त्रास,नोकरीतील बदल, मानहानी - अपमान वगैरे".   तेंव्हा पासून मला नेहेमी ह्या स्थान बद्दल कुतूहल वाटत आले आहे…(म्हणतात ना माणूस  नकारात्मक गोष्टींवर जास्त विचार करतो) पण ह्या विचारामुळे मला ह्या स्थानाबद्दलच्या बाकीच्याही बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. तो असा की, शास्त्रकारांनी जरी अष्टम स्थानाला मृत्यू स्थान संबोधले असले तरी त्याच्या खोलवर अजूनही मोठा अर्थ लपलेला आहे. तो अर्थ आज मी तुम्हाला एका उदाहरणाने सांगणार आहे. 

साधारणपणे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रशांतने त्याची कुंडली मला दाखवली होती…. तास.. दीड-तास आम्ही त्याच्या कुंडलीवर चर्चा करत होतो. नावाजलेल्या कंपनीत चांगल्या हुद्यावर असलेला प्रशांत खूप खुश होता…. येणारे वर्ष कसे असेल ? नोकरीबद्दलचे, कुटुंबाबद्दलचे प्रश्न इ अनेक प्रश्न आम्ही चर्चिले. 
तूळ रास आणि सिंह लग्नाची प्रशांतची कुंडली. कुंडलीचा अभ्यास करता करता मी त्याला प्रश्न विचारात होते…  कुंडलीत शनि महादशा व शनि अंतर्दशा सुरु आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून अष्टम स्थानाची म्हणजेच "गुरुची " विदशा सुरु होत होती. (गुरु कुंडलीत - ३,५,८ ह्यास्थानाचा कारक आणि तो राहूच्या नक्षत्रात. राहू - ११ ,२,११ ) मी म्हटले काय रे नोकरी सोडण्याचा काही विचार आहे का?? तो म्हणाला, "छे छे … चांगले चालले आहे …सध्या तरी तसा काही विचार नाही."  मी मनात म्हटले कमाल आहे… कुंडलीच्या दशा-अंतर्दशा तर काही वेगळेच चित्र दाखवताहेत आणि हा तर म्हणतोय कि नोकरी सोडणार नाही…. काय गौडबंगाल आहे बाबा … असा मी विचार करतानाच मला वेगळीच शंका आली…. मी विचारले " अरे तुझा येत्या वर्षात नोकरीच्या निमित्ताने प्रवास तर भरपूर होणार आहे परंतु तू नोकरी सोडशील असे ग्रह म्हणताहेत. तुला कदाचित तडकाफडकी नोकरी सोडावी लागेल.तेंव्हा काळजी घे"  त्यावर त्याचे उत्तर असे होते, " सध्या माझ्यावर कंपनीतल्या कामांची खूप मोठी जवाबदारी दिली आहे… बघू नंतर काही विचार बदलला तर…".   साडेसाती सुरु आहे तेंव्हा स्तोत्र व काही उपाय त्याला करण्यास सांगितले. 

मधल्या काळात त्याच्याबद्दल तो फोनवरून मला "UPDATES" द्यायचा. ऐकून बरे वाटायचे…. 

आणि मार्च महिन्याच्या दुसरया आठवड्याच्या एका रविवारी त्याचा फोन आला," तुम्हाला भेटायचे आहे. मोठा प्रोब्लेम झाला आहे. कधी येऊ भेटायला ??".  ठरलेल्या वेळी तो आला. आणि त्याने जे सांगितले ते ऐकून शॉक बसला. त्याच्या office मधल्या त्याच्याचबरोबर काम करणारया निलेशने प्रशांतची कंपनीच्या V. P. (VICE -PRESIDENT ) कडे तक्रार केली होती . प्रशांत दिलेली कामे वेळेत पूर्ण करत नाहीये त्याचबरोबर कंपनीच्या पैशांचा दुरुपयोग करतो,कंपनीतल्या managers ना पार्टी देतो वगैरे. हा निलेश स्वतः  V. P. साहेबांचा चेला. एकाच गावातून दोघेही मुंबईत नोकरीसाठी आले. परंतु निलेश नोकरीत बराच मागे राहिला व V. P. बराच पुढे.  परंतु दोघांमधली मैत्री मात्र घट्ट राहिली. जेंव्हा निलेशला कळून चुकले की प्रशांत असे पर्यंत त्याला ह्या कंपनीत पुढपर्यंत प्रगती साधता येणार नाही त्याने प्रशांतबद्दल तक्रारी करण्यास सुरवात केली.  व कसेही करून प्रशांत स्वतः नोकरी सोडेल असे कटकारस्थान निलेश व V. P.नी रचले. 
 

मार्चच्या  दुसऱ्या आठवड्याच्या शनिवारी Office ला सुट्टी असून सुद्धा प्रशांतला  V. P. ने office मध्ये बोलावून घेतले व त्याच्याबद्दलच्या तक्रारी त्याला ऐकवून प्रशांतवर आरोप करत त्याला Resignation देण्यास भाग पाडले. प्रशांतने समजावण्याचे खूप प्रयत्न केले. प्रशांतच्या Managerने सुद्धा V. P. ला खूप समजावले परंतु V. P. चा निर्णय पक्का झालेला होता. त्याच दिवशी प्रशांतला Resignation द्यावे लागले.  

प्रशांतला मी सांगितले जे होणार होते ते होऊन गेले. तुला नोकरी नक्की मिळेल. त्याला काही उपाय व मंत्र दिले. 

ह्यावरून एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या?? प्रशांतची अष्टम स्थानाची विदशा सुरु झाल्याबरोबर त्याला Officeमध्ये मानहानी सहन करावी लागली. नोकरीत तडकाफडकी बदल झाला. नोकरी अचानक गेल्यामुळे आयुष्याच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला. म्हणजेच अष्टम स्थानाची  सर्व फळे त्याला मिळाली. मी खूप खुश झाले कारण मला ही सुद्धा भीती होती की प्रशांतचा अपघातही होऊ शकतो …. अर्थात ती भीती त्याला मी बोलून दाखवली नव्हती. त्यामुळे जीवावर बेताण्यापेक्षा नोकरीवर बेतलेले काय वाईट????  
प्रशांतच्या पुढच्या प्रवासासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा….  

Bye  Bye 


NOTE : १) जातकाची साडेसाती सुरु आहे व जातकाला राजीनामा शनिवारी देण्यास भाग पाडले आहे. 
              २) ह्या जातकाची पंचम स्थानाची विदशा सुरु झाल्याबरोबर त्याला राजीनामा द्यावा लागला. गेल्या   दोन  CASES मध्ये आपण पहिलेच होते की जोपर्यंत कुंडलीत पंचमाची(पंचम स्थानाची) दशा-अंतर्दशा सुरु होत नाही तोपर्यंत जातकाच्या नोकरीत बदल होत नाही. वरील कुंडलीत पंचम स्थानाची दशा तर सुरु झालीच परंतु अष्टमाचीही दशा सुरु झाल्याने नोकरीत बदल झाला परंतु तो तडकाफडकी, अपमान होउन …. 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

शुक्रवार, १ मार्च, २०१३

दुहेरी कसरत - नोकरी व व्यवसाय


दुहेरी कसरत - नोकरी व व्यवसाय 

काल आपण योगेशला नोकरीतून व्यवसायाकडे वळताना पाहिले. ग्रह आपली कामगिरी कशी चोख बजावतात  ह्याचा अनुभव योगेशला आलाच. आज आपण अशी कुंडली बघुया ज्या कुंडलीत ग्रहांनी नोकरी आणि व्यवसाय ह्या दोन्हींचा छान मेळ बसवलेला आहे. ही कुंडली आहे अशा एका जातकाची ज्याच्यावर खूप लहान वयात कौटुंबिक जवाबदारी आली. कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीच्या मृत्युनंतर अर्चनाने घरचा व्यवसाय व स्वतःची उच्च पदावरची नोकरी ह्यात छान समतोल राखण्यात यश मिळवलं. आज अर्चनाच्या कुंडलीतील महत्वाच्या ग्रहयोगांवर नजर घालू. 

अर्चना प्रभुणे :  मीन लग्न. लग्नेश गुरु दशमात. षष्ठेश रवि स्वतः नवमात. कालच्या लेखात आपण हे समजून घेतलेच असेल की षष्ठेशाचा संबंध जर नवम स्थानाशी असेल तर व्यक्तिला उच्च-अधिकार प्राप्त होतात, मानसन्मान मिळतो. अर्चनाला नोकरीत खूप लहान वयात उच्च-अधिकार मिळाले. Office मध्ये तिच्या शब्दाला मान आहे. 
 

अर्चनाच्या कुंडलीत चतुर्थेश- सप्तमेश जो बुध आहे तो आहे दशमात. सप्तमेशाचा दशमाशी जर काही connection असेल तर जातक स्वतःचा व्यवसाय सुरु करतो हे आपण कालच पाहिले. इथे ह्या कुंडलीत हा नियम चपखल बसतो. अर्चना व्यवसायाची धुराही छान सांभाळते. परंतु  इथे सप्तमेश- दशमेशाबरोबर मी चतुर्थेशाचाही उल्लेख केला आहे. चतुर्थ स्थान म्हणजे आपले घर,घर संबंधातील गोष्टी. अर्चनाच्या कुंडलीत चतुर्थ (घर-घरासंबंधातील गोष्टी), दशम (व्यवसाय) सप्तम (व्यवसाय -भागीदारी वगैरॆ ) ह्यांचे connection आहे त्यामुळे घरच्या व्यवसायाची जवाबदारी तिच्यावर आली.  
आज अर्चनाला व्यवसाय व नोकरी ह्यातील ताळमेळ बसवताना पाहिले कि खूप कौतुक वाटते. येणारया पुढच्या काळात तिच्या कुंडलीतल्या दशा-अंतर्दशा व्यवसाय व नोकरी ह्यासाठी अत्यंत पूरक असल्याने तिला यश मिळणार हे नक्की. तिला भविष्याकाळासाठी शुभेच्छा. 
भेटू पुढ्या लेखात अशाच काही कुंडल्या घेऊन. 

बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१३

रंग माझा वेगळा

रंग माझा वेगळा 


बरेच दिवस BLOG वर काही लिहा म्हणून सगळ्यांचे SMS येत होते. FACEBOOK वरून विचारणा होत होती …पण  म्हणावा तसा विषय मिळत नव्हता. आज विषय मिळाला. 

माझ्या संपर्कातल्या काही लोकांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु केला तर अशा कुंडलीत काय योग असावेत बरे? एवढे धाडस करणे सोप्पे नाही. आज अशा एका कुंडलीबद्दल बोलू. 

त्याआधी कुंडलीतील काही स्थानांविषयी तोंडओळख करून देते.

षष्ठ स्थान :  कुंडलीतल्या ह्या स्थानावरून मुख्यत्वे रोग-आजार, नोकरी,नोकरीचा कालावधी,स्पर्धात्मक यश इ  पाहतात. सध्या आपण फक्त नोकरी संबंधी हे स्थान विचारात घेणार आहोत. कुंडलीतील ह्या स्थानावरून  ही व्यक्ती कुठे नोकरी करेल ? नोकरीत ह्या व्यक्तीचा हुद्धा ? ही व्यकी किती मेहनती आहे ?  ह्या गोष्टी पाहता येतात.

पंचम स्थान : ह्या स्थानावरून व्यक्तीची आवड-छंद, कला,आध्यात्मिक साधना,ध्यान-स्मरण इ. तर पाहता येतातच परंतु ह्या स्थानावरून व्यक्तीची नोकरी सुटणे,नोकरीतील बदल,नोकरी न मिळणे ह्याही गोष्टींचा पडताळा होतो.

दशम स्थान : ह्या स्थानावरून व्यक्ती नोकरी करेल कि व्यवसाय ? व्यवसायाचे साधारण स्वरूप, व्यवसायातील यश-अपयश,उच्च-अधिकार इ . चा विचार केला जातो. 

ज्या व्यक्तींच्या कुंडलीत षष्ठ स्थान व षष्ठ स्थानातील ग्रह हे पूरक असतील तर व्यक्ती आयुष्यभर "नोकरी" करते. जर षष्ठ स्थान बरोबर व्यक्तीला  नवम व दशम स्थानाचीही साथ मिळाली तर उच्चाधिकार प्राप्त होतात. मान-सन्मान मिळतो. परंतु जर ह्या षष्ठ स्थानाचा संबंध पंचमाशी असेल तर व्यक्ती नोकरी करू शकणार नाही. कोणाच्या हाताखाली काम करणे आवडत नाही. नोकरीत धरसोड होते. एखादी नोकरी ३-४ महिने केल्यानंतर कंटाळा यायला लागतो. तेच तेच काय काम करायचे असे वाटू लागते. 

परंतु जेंव्हा ह्याच " षष्ठ" स्थानाला  "पंचम" स्थानाबरोबर  "दशम" आणि  "सप्तम" स्थानाचाही संबंध येतो तेंव्हा जातक स्वतःचा व्यवसाय सुरु करतो. जेंव्हा तत्सम स्थानांच्या "दशा-अंतर्दशा" सुरु होतात तेंव्हा जातकाला  नोकरीला राम-राम म्हणण्याची हिंमत येते. अशाच एका जातकाच्या कुंडलीचे विवेचन आज मी करणार आहे. हे विवेचन "वैदिक व कृष्णमुर्ती" ह्या दोन्ही पद्धतीने करण्याचा प्रयत्न, 

  योगेश पाटील  ही व्यक्ती IT क्षेत्रातील नामवंत कंपनीत चांगल्या हुद्यावर होती. SAP का काय म्हणतात ते केले होते. पगार चांगला. परंतु नोकरी करताना नेहेमी असमाधानी. कायम दुसऱ्यासाठी काम करतोय ही भावना. पण स्वतःचा काय व्यवसाय सुरु करावा का हा संभ्रम. ह्या जातकाचे "कन्या" लग्न आहे व राशी आहे "वृश्चिक". लहानपणापासून अत्यंत कष्टाचे आयुष्य. स्वतःच्या  IT  शिक्षणाचा खर्च स्वतः छोटी - मोठी कामे करत college करत घेतले व नामवंत कंपनीत छान नोकरी मिळवली. अत्यंत हुशार व खूप मेहनती. काही काळातच  नोकरीत परीक्षा देत देत वरच्या हुद्यावर जागा मिळवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा लाडका. ह्या जातकाच्या कुंडलीत पंचम व षष्ठ ह्या स्थानात अनुक्रमे मकर व कुंभ राशी आहेत. ह्या राशीचा स्वामी शनि हा "नवम" स्थानात आहे. म्हणजेच ह्या कुंडलीत षष्ठ स्थानाचा नवम स्थानाशी संबंध आहे. त्यामुळे ह्या व्यक्तीला चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्यावर नोकरी मिळाली व बढतीही. नवम स्थानामुळे नोकरीच्या ठिकाणी नाव-लौकीकही चांगला प्राप्त झाला. पण आपण हे विसरता कामा नये की इथे षष्ठ स्थानाचा संबंध पंचमाशी सुद्धा आहे. पंचमात शनिचीच मकर राशी आहे आणि शनि आहे मंगळाच्या नक्षत्रात. मंगळ स्वतः सप्तमेश गुरु बरोबर पंचमात आहे. म्हणजेच इथे "पंचम,षष्ठ,सप्तम व नवम" स्थानांचा एकमेकांशी संबध आला आहे. पण नुसता कुंडलीत असा संबंध असून काही उपयोग नाही कारण जोपर्यंत पंचम व तत्सम स्थानाच्या दशा सुरु होत नाहीत तोपर्यंत कुंडलीतल्या योगांचे प्रत्यक्ष जीवनात परिवर्तन होत नाही. 

हा जातक माझ्याकडे साधारणपणे जानेवारी २००९ साली आला होता. त्यावेळी त्याची शुक्राची अंतर्दशा सुरु होती. शुक्र कुंडलीत ८,२,९ ह्या स्थानचा कार्येश आहे. शुक्र केतूच्या नक्षत्रात व केतू १०,१ चा कार्येश. "माझी आहे ती नोकरी सोडून मला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे. असे काही योग आहेत का माझ्या कुंडलीत ?"  हा त्याचा प्रश्न. त्याच्या कुंडलीतील इतर योग सांगत होते हा स्वतःचा व्यवसाय करणार. पण त्याची अंतर्दशा पाहता सध्या हा नोकरी सोडण्याच्या विचारावर तो ठाम नाही हे स्पष्ट दिसतेय… बरोबर ना ??  कारण पंचमाची अंतर्दशा सुरु झालेली नाहीये. जोपर्यंत पंचमाचा संबंध येत नाही तोपर्यंत जातक नोकरी सोडण्याच्या नुसत्या विचारात असतो पण नोकरी सोडू शकत नाही. त्यावेळी त्या जातकाला सांगितले," सध्या तरी तो योग तुझ्या कुंडलीत नाही. २०११ च्या जुलै महिन्यात हे धाडस तू करू शकशील. तुला मार्गही दिसेल. " हे मी कशावरून सांगितले हे तुमच्या लक्षात आलेच असेल. hmmmmmmm बरोबर पंचमातील "मंगळ" ग्रहाची विदशा ह्या कुंडलीला जुलै २०११ ला सुरु होणार होती. बाकीचे ही योग त्याच काळात व्यवसायासाठी पूरक दिसत होते. अत्यंत हिरमुसलेला चेहरा झाला होता त्याचा. परंतु इलाज नाही. ग्रह हेच सांगत होते. 

 नंतरच्या काही काळात त्या जातकाकडून काही कळले नाही. मी ही विसरून गेले. ऑक्टोबर२०११ च्या एका रविवारी स्वारी मला भेटण्यास आली. अत्यंत खुश दिसत होता. मी विचारले,"काय रे बाबा व्यवसाय सुरु केलास वाटते ?" हसत हसत तो म्हणाला," हो २००९ ला तुमच्याकडे आलो होतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे जुलै २०११ लाच व्यवसाय सुरु झाला. मधल्या काळात खूप धडपड केली परंतु कधी भांडवल तर कधी जागेचा प्रश्न. पण आता सुरळीत सुरु आहे. त्या संदर्भात काही प्रश्न विचारायचे आहेत."    

म्हणजे ग्रहांनी त्यांचा अंमल दाखवला होता. अशाच काही कुंडल्या घेऊन तुमच्या भेटीला येणार आहे लवकरच. 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

गुरुवार, ३ जानेवारी, २०१३

महिन्याचे राशी भविष्य

 राशीभविष्य 

मेष 
  • Carrierwise खूप चांगली सुरवात हे वर्ष तुम्हाला देणार आहे.
  • नोकरीच्या चांगल्या Offers तुम्हाला ह्या महिन्यात येण्याची शक्यता आहे.
  • नोकरीत तुमच्या शब्दाला किंमत असेल.तुमचे सल्ले महत्वाच्या गोष्टींसाठी घेतले जातील.
  • विवाहोत्सुक तरुण-तरुणींना स्थळे येतील परंतु सावधतेने त्याचा विचार व्हावा. 
  • व्यवसाय करणारया व्यक्तींनी समोरच्या व्यक्तीवर विश्वास न ठेवलेला बरां. प्रत्येक गोष्टीचा पडताळा (cross verification ) करूनच व्यवहार करावा.
  • केतूचा प्रवेश तुमच्या राशीत होत असल्याने Depression/Frustration ...डोकेदुखी जाणवेल.त्यासाठी Meditation/Yog व आध्यात्मिक साधना जमेल तर नक्की करावी.
  • घरात सध्या वाद-विवादाचे वातावरण राहील.सांभाळून घेणे.
  • तीर्थयात्रेचे योग आहेत.
  • स्थावर-इस्टेटी संदर्भातील गोष्टी पुढे सरकतील.
  •  विष्णुची उपासना फलद्रूप ठरेल. 
  • हिरवा रंग वापरावा. (हिरव्या रंगाचा रुमाल,एखादी वस्तू जवळ बाळगावी)
वृषभ 
  • शेअर मार्केट मध्ये सध्या तुम्हाला फायदा होईल असे दिसते.
  • विद्यार्थ्याना अभ्यासात गोडी लागेल. शैक्षणिक प्रगती साधता येईल.
  • जे विद्यार्थी परदेशातील विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतील त्यांना  यश मिळेल.म्हणजेच परदेशात शिक्षणासाठी योग्य काळ आहे.
  • नोकरीत तुमच्या कामावर वरिष्ठ खुश जरी असले तरी त्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढणार आहेत.त्यामुळे कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल.
  • वाहन सांभाळून चालवणे व प्रवासात तब्येतीची काळजी घेणे.
  • तब्येतीच्या बाबतीत पोट/किडनी विशेष काळजी घ्यावी. पाणी भरपूर प्यावे. खाण्यावर ताबा ठेवावा.
  • ज्यांना डायबेटीस आहे त्यांच्या रक्तातील साखरचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तेंव्हा काळजी घ्या.
  • शनि-स्तुती वाचणे.
  • गडद निळा रंग वापरणे. (निळ्या रंगाची वस्तू/रुमाल जवळ बाळगणे)
मिथुन 
  • तुम्हाला मुळातच गप्पा मारण्याची खूप आवड आहे. परंतु सावधान सध्याचा काळ तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. वायफळ बोलणे टाळा. मस्करी वगैरे सध्या नकोच.
  • शेअर मार्केट मध्ये सध्या नुकसान सहन करावे लागेल.
  • विवाहोत्सुक तरुण-तरुणींना स्थळे येतील.
  • संततीच्या आरोग्यास जपणे.
  • नोकरीत सहकारी व वरिष्ठ ह्यांच्या बरोबर जर नरमाईने घ्यावे.
  • नोकरीत झालेल्या वादामुळे नोकरी सोडण्याचा विचार ह्या काळात पक्का होईल.
  • स्थावर-इस्टेटी संदर्भात नजीकच्या काळात पैसे गुंतवू नये.
  • पाठदुखी,अपचनाचा त्रास संभवतो.
  • हनुमानजींची उपासना करावी - हनुमान चालीसा वाचणे.
  •  भडक लाल रंग वापरणे.(लाल रंगाचा रुमाल/वस्तू जवळ बाळगावी)
कर्क 
  • कर्क राशीसाठी हा काल अत्यंत सुखकारक ठरेल.
  • नोकरीत बढतीच्या संधी मिळतील. 
  • ह्या काळात विवाहोत्सुक मंडळींचे विवाह ठरू शकतील. 
  • विवाहित मंडळीना संततीच्या बाबतीत पोषक ग्रहयोग असल्याने लवकरच खुशखबर मिळेल.
  • Property/नवीन घर घेताना विशेष काळजी घ्यावी.
  • घरात Renovations/ Changes होतील.
  • परदेशात जाण्याचे योग आहेत.
  • आईच्या तब्येतीस जपणे.
  • सर्दी-खफ़ाचा त्रास होईल.
  • गुरुची उपासना करणे. (दत्तगुरू/स्वामी समर्थ/साई बाबा)
  •   पिवळा रंग वापरणे. (पिवळ्या रंगाचा रुमाल/वस्तू जवळ बाळगावी)
सिंह 
  • नोकरीचा-कामचा कंटाळा जरी आला असला तरी होणारा खर्च बघत कामाचा आळस करता येणार नाहीये. नजीकच्या काळात कामाचे ओझे जरा कमी होणार आहे.
  • मनावरचा ताण कमी झाल्याने  कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहील. बाहेरगावी जाण्याचे योग संभवतात.
  • धनार्जनाच्या दृष्टीने काळ उत्तम आहे.
  • १५ तारखेनंतर वरिष्ठांकडून तुमची मर्जी राखली जाईल.
  • तब्येतीच्या बाबतीत दाढदुखी,खांदे-मानदुखी डोके वर काढणार आहे.
  • प्रवासात तब्येत सांभाळ.
  • बाळकृष्णाची उपासना करावी. 
  • हिरवा रंग वापरणे 
कन्या 
  • शिकणे-शिकवणे ही तुमची आवड. सध्याचा काळ नवीन काही शिकण्यासाठी पोषक आहे.
  • अध्यात्म-उपासना ह्यासाठी उत्तम काळ.
  • नोकरीत बदल करावासा वाटेल.
  • विवाहित व्यक्तीना ह्यावर्षी येणारया नवीन छोट्या पाहुण्याच्या स्वागताची तयारी करावी लागेल. पण ह्या तयारीत तब्येतीची काळजी घेणे.
  • डोळ्यांची विशेष काळजी घ्या. डोळ्यांना allergy होऊ शकते. बाहेरचे खाणे जर जपून. अपचनाचा त्रास संभवतो.
  • विद्यार्थ्याना अभ्यासात लक्ष केंद्रीत करावे लागेल.
  • घराचे Interior बद्लावेसे वाटेल.
  • शिवाची उपासना करावी.
  • फिकट नारिंगी (Light Orange) रंग वापरावा. (त्या रंगाची वस्तू बाळगावी)

तुळ 

  • वर्षाची सुरवात थोडी अडथळ्यानी  होणार आहे. साडेसाती सुरु आहेच त्यातच तुमच्या राशीत राहूचेही  आगमन होणार आहे.
  • कामात उत्साह वाटणार नाही.वरिष्ठांचे बोलणे जाच वाटू लागेल.
  • घरी वातावरण तप्त राहील. सध्या मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करणे. वाद-विवाद टाळलेलाच बरा .
  • ह्या महिन्यात खर्च वाढणार आहे. Property किंवा गाडीवर खर्च होऊ शकतो.
  • बोलताना शब्द जपून वापरा कारण बोलण्यामुळे तुमच्या व समोरच्या व्यक्तीमध्ये गैरसमज वाढून नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.
  • मित्र-मंडळीसमेवत वेळ छान जाईल.
  • तब्येतीच्या बाबतीत डोकेदुखी,घसा खराब होईल.
  • सूर्याची उपासना फलद्रूप ठरेल.
  • भडक भगवा रंग वापरावा.(त्या रंगाची वस्तू बाळगावी) 

       वृश्चिक 
  • जेवढी मिळकत तेवढाच खर्च असे ग्रहांचे गणित तुमच्याबाबतीत सुचवते. त्यामुळे खर्च विचार करून करणे. 
  • Life Partner साठी खरेदी होईल.
  • विवाहोत्सुक मंडळींचे विवाह जमण्यास अतिशय उत्तम काळ.
  • सध्या दूरच्या प्रवासाचे योग आहेत.
  • जमीन-गाडी-घर  खरेदीसाठी ग्रहयोग छान जुळून आलेत.
  • मनावरचा ताण वाढल्याने निद्रानाश संभवतो त्यामुळे योगासने,ध्यान-धारणा इ. गोष्टींचा अवलंब करावा.
  • नोकरीत तुमचा वरचष्मा राहील. तुमच्या निर्णयामुळे कंपनीला फायदा झाल्याने वरिष्ठांची तुमच्यावर खास मर्जी राहील.
  • तब्येतीच्या बाबतीत अपचनचा व Throat Infection चा त्रास होईल.
  • गणेश उपासना फलद्रूप ठरेल.

  • भडक लाल रंग वापरणे.(लाल रंगाचा रुमाल/वस्तू जवळ बाळगावी)
     धनु 
  • मुळातच अधिकार गाजवण्याचा तुमचा स्वभाव. ह्या महिन्यात त्याला खत-पाणीच मिळणार आहे. 
  • नोकरीत/व्यवसायात कॉलर ताठ होणार आहे. नोकरीत बढती मिळणार आहे. त्यामुळे सढळ हाताने खर्चही होणार आहे. 
  • ज्यांचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी हा महिना धनार्जनाच्या दृष्टीने खूपच लाभदायक ठरणार आहे.
  • तब्येतीच्या बाकी काही तक्रारी नसल्या तरी पाठदुखी - मानदुखीचा त्रास होईल.
  • कुटुंबाबरोबर बाहेरगावी जाण्याचे योग आहेत. प्रवासात पाठदुखीचा त्रास अजून वाढेल त्यामुळे काळजी घेणे.
  • तापटपणावर नियंत्रण ठेवा. 
  • शेअर बाजारातून फायदा झाला असला तरी Short Term Investment करू नये. पैसा मेहनतीने आहे Short -Cut ने नाही.
  • देवीची उपासना करावी. श्री सुक्त वाचावे.

  • गुलाबी रंग वापरावा. (गुलाबी रंगाची वस्तू/रुमाल बाळगावा)
 मकर 
  • प्रचंड आळस वर्षाच्या सुरवातीलाच जाणवणार आहे.  
  • नोकरीत वरिष्ठांचे आदेश पाळणे महाकठीण जाणार आहे त्यामुळे नोकरीतील बदल आत्ता जरुरी वाटायला लागेल. 
  • वाचन-मनन-चिंतन वाढेल.
  • घरातील तप्त वातावरण सध्या निवळले असले तरी तुम्ही तुमच्या रागावर ताबा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
  • राहती वास्तू जर जुनी असेल तर "Redevelopment" होऊ शकेल.
  • घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घेणे.
  • विवाहित मंडळीना "संतत्ती योग" आहे.
  • तब्येतीच्या बाबतीत डोकेदुखी व पायाचे दुखणे संभवते.
  • विष्णुची उपासना करावी.
  • हिरवा रंग वापरावा.

                                                  कुंभ 
  • मुळातच हुशार व ज्ञानलालसा असणारया ह्या व्यक्तींना ह्या काळात ग्रहांनी सढळ हाताने "शिका व शिकवा आणि त्यातून धनार्जन" असे ग्रह योग दिले आहेत. त्यामुळे भरपूर वाचा शिका आणि शिकवा.
  • ज्यांचा इस्टेटी संदर्भातील व्यवसाय आहे त्यांच्यासाठी ह्या महिना अतिशय लाभदायक ठरणार आहे.
  • शेअर-मार्केट Trading साठी हा महिना तुम्हाला काही देऊ शकणार नाही.
  • वाहन-घर  खरेदीसाठी ग्रह योग चांगले जुळून आलेत.
  • संततीची तब्येत सांभाळणे.
  • लांबचे प्रवास संभवतात.
  • जोडीदाराबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. शब्द जपून वापरा.
  • गुरुची उपासना फलदायी ठरेल.(दत्तगुरू/स्वामी समर्थ/साई बाबा)
  • पिवळा रंग वापरणे. (पिवळ्या रंगाचा रुमाल/वस्तू जवळ बाळगावी)
                                      

मीन 

  • व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना मेहनत आणि अडथळ्यानीयुक्त जरी असला तरी धनलाभ होणार आहे.
  • नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास होतील.
  • कुटुंबासमेवत वेळ चांगला जाण्यास योग पोषक आहेत.
  • कविता-लेखन-वाचन हे मुळातच तुमची आवड. हा महिना नवीन पुस्तके -ग्रंथ तुमच्या वाचनात येतील.
  • वाहन जपून चालवणे.
  • ज्यांचा Marketing /Consultancy संदर्भातील व्यवसाय आहे त्यांना हा महिना लाभदायक ठरेल.
  • आधीच पोट नाजूक त्यात अष्टमातील शनि आणि राहूचे भ्रमण त्यात भर घालू शकतील त्यामुळे किडनीचा त्रास संभवतो.पोटदुखीकडे दुर्लक्ष करू नये.पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.
  • हनुमानजींची उपासना करावी - हनुमान चालीसा वाचणे.
  •   भडक लाल रंग वापरणे.(लाल रंगाचा रुमाल/वस्तू जवळ बाळगावी)
     
                                       

सोमवार, १७ डिसेंबर, २०१२

शासक ग्रह


प्रश्नकुंडली/शासक-ग्रह अर्थात Ruling Planets (कृष्णमुर्ती पद्धती)


"जन्मकुंडली,राशी,अंकशास्त्र,गुण-मिलन,नवमांश" ह्या शब्दांची ओळख वेगळी करून देण्याची गरज नाही परंतु "प्रश्नकुंडली" हा शब्द सर्वसामान्य जणांसाठी जरा वेगळा शब्द. त्याबद्दलच आज मी लिहिणार आहे. जन्मकुंडली बनवताना जर ज्योतिषाला अचूक जन्म वेळ दिली गेली नाही तर सांगितले गेलेले भविष्य हे चुकू शकते. पण काही वेळेस तुमच्याकडे तुमच्या जन्माचा पूर्ण तपशील नसतो. म्हणजे काही वेळेस जन्म तारीख माहिती आहे पण जन्म वेळ नाही. काहींनी तर मला खुपदा "जन्म ६.०० ते ७.०० च्या दरम्यान आहे पण madam सकाळी की संध्याकाळी माहिती नाही", काहीना जन्मवार अगदी पाठ पण जन्म तारीख माहित नाही???
असे जरी असले तरी आयुष्यातील प्रश्न तर प्रत्येकालाच भेडसावतात. मग अशावेळी करायचे का? hmmmmm......आहे... शास्त्रात ह्याला सुद्धा पर्याय आहे तो म्हणजे "प्रश्नकुंडली".
प्रश्नकुंडली म्हणजे ज्यावेळेस जातक ज्योतिषाला प्रश्न विचारतो त्या वेळेची ग्रहांची आकाशातील स्थिती कागदावर मांडणे. ही कुंडली ९९%वेळेस ज्योतिषाला जन्मकुंडलीपेक्षा ही अचूक उत्तरं देऊ शकते. काही वेळेला काही प्रश्नांची उत्तरे ही जन्मकुंडली वरून check करू शकत नाही. अशावेळेस प्रश्नकुंडलीचा वापर आपण करू शकतो. ह्यासाठी उदाहरण दिले तर तुमच्या लवकर लक्षात येईल.
नवीन घरी आम्ही नुकतेच shift झालो होतो आणि सोसायटीमध्यॆ जरा ओळख झाली होती. ऑगस्टच्या सकाळी ८.३० वाजता मला आमच्या सोसायटीतल्या सौ. जोशींनी फोन केला. "अग अनुप्रिया, माझं महत्वाचे काम आहे तुझ्याकडे.जरा urgent आहे आत्ता लगेच येऊ का ग?" झाले असे होते की सौ. जोशीना नुकतीच मुलगी झाली होती त्यामुळे घरी मोलकरीणीचा ताफा राबत होता. एका दुपारी सौ जोशीना लक्षात आले कि आपले मंगळसूत्र नेहेमीच्या जागेवर नाही. तेंव्हा सर्वत्र शोधले गेले,संध्याकाळ उजाडली परंतु मंगळसूत्र काही मिळाले नाही. आत्तामात्र परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात ४-५ नोकर..आत्ता संशय घ्यावा तरी कोणावर? कोणावर संशय घ्यावा आणि कोणी दुखावले गेले तर एखादी  मोलकरीण गमवावी लागेल..मुंबईत नोकर मिळणे सोप्पे आहे पण ते टिकवणे महाकठीण. त्यांनी झाला प्रकार श्री.जोशींना सांगितल्यानंतर सौ जोशीना त्यांच्या हलगर्जीपणाबद्दल काय काय ऐकावे लागले असेल ह्याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. श्री.जोशींनी सर्वप्रथम पोलिसांत रिपोर्ट करण्याचे ठरवले व त्यांनी सोसायटी समोरच्या पोलिस-स्टेशनात तक्रार नोंदवली सुद्धा....पोलिसांनी त्यांच्या नेहेमीच्या पद्धतीने तपासाला सुरवात केली व  दुसरया दिवशी सकाळी सकाळीच घरातील सर्व नोकरमंडळीना पोलिस-स्टेशनात हजर राहण्यास सांगितले. तेंव्हा घाबरून सौ. जोशीना माझी आठवण झाली. सर्व नोकर-मंडळी आणि श्री.जोशी पोलिस-स्टेशनात तर सौ.जोशी माझ्याकडे.....
माझ्याकडे सर्व कथाकथन झाल्यानंतर मी त्यावेळेची प्रश्नकुंडली मांडली.  

१) कन्या लग्नाची कुंडली
२) चंद्र होता तूळ राशीत म्हणजेच धन स्थानात. चंद्र हा मनाचा कारक असल्याने प्रश्न जर मनापासून विचारला गेला असेल तर चंद्र त्या संबंधातील स्थान कुंडलीत दशवतो. आणि इथे चंद्र होता "धन स्थानात" म्हणजे किती मनापासून प्रश्न विचारला गेला आहे.
३) चंद्राची "कर्क" राशी होती "लाभ" स्थानात. "लाभ","धन" ह्यावरून काही कळले का?? hmmmm म्हणजेच अपेक्षित "धनाचा लाभ" नक्की होणार. पण पुढचा प्रश्न कधी? सौ.जोशीना त्यांचे मंगळसूत्र मिळणार तरी कधी ?
४) ह्यासाठी "शासक ग्रहांची" मी मदत घेतली.  "शासक ग्रह" हा शब्द जोतिष-शास्त्रवर अभ्यास असलेल्यांसाठी नवीन नाही परंतु ज्यांच्यासाठी हा शब्दप्रयोग नवीन आहे त्यांनी एवढेच समजून घ्यावे ते म्हणजे "शासक ग्रह" हे प्रश्न विचारलेल्या वेळेचे महत्वाचे     ग्रह.
५) सौ जोशींनी जेंव्हा प्रश्न विचारला होता तेंव्हा शासक ग्रह होते : i) बुध   ii) राहू    iii) शुक्र   iv) गुरु  हे सर्व ग्रह fast moving किंवा ज्याला आपण जलदगती असणारे ग्रह म्हणतो.
६) Fast Moving ग्रह आहेत ह्याचाच अर्थ धन लाभ होणार आहे आणि तो ही लवकरच.
मग काही गणिते मांडून मी उत्तर सांगितले :  तुम्हाला मंगळसूत्र मिळेल. सौ.जोशींचा पुढचा(अपेक्षित) प्रश्न : कधी मिळेल ?  उत्तर : आज आहे गुरुवार. आज किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत मिळायला हवे.  प्रश्न : घरीच मिळेल ना? उत्तर : हो घरीच मिळेल.
जोशी काकू निघणार एवढ्यात त्यांना श्री. जोशींचा फोन आला ...त्यांना ताबडतोब पोलिस-स्टेशनात बोलावले होते. मलाही धागधुग होतीच की काय होतेय? संध्याकाळी सौ.जोशींचा फोन..."अनुप्रिया मंगळसूत्र मिळाले. हुश्श...अग आमच्या सुगंधानेच (मोलकरीण) नेले होते. सकाळी मी किचनमध्ये असताना लादी पुसण्यासाठी ती बेडरुममध्ये गेली होती आणि तिथे टेबलवर ठेवलेले मंगळसूत्र तिने नेले. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने विचारल्यानंतर तिने काबुल केले. व मंगळसूत्र घरी आणून दिले. Thanks a  Lot "
शास्त्राची प्रचिती पुन्हा एकदा आली. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com





शनिवार, १५ डिसेंबर, २०१२

वास्तू


वास्तू 


"आमचे घर वास्तूप्रमाणे आहे का जरा बघता का?" असा प्रश्न हल्ली मला मी कोणाच्या घरी समारंभाला गेले कि हमखास विचारला जातो.....मग काय हातातील फरसाणाची डीश बाजूला ठेवून घरात एक चक्कर मारायची...आणि घराचे अवलोकन करायचे...मला स्वतःला हे विषय खूप आवडीचे असल्याने ही request मी नाकारू शकत नाही....काहीना ह्या विषयावर विश्वास आहे काहीना विश्वास असूनही तो दाखवायचा नसतो तर काही लोकांच्या मते हे थोतांड आहे.ज्यांना ह्या गोष्टींवर विश्वास नाही त्यांना समजावण्यात मला माझा अमूल्य वेळ अजिबात वाया घालवायचा नाही. परंतु ह्या भूतलावर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याची आपल्याला कल्पनाही नाहीये...पण म्हणून त्या नाहीत हा समज चुकीचा आहे असे मला वाटते. 

वास्तू समजणे म्हणजे फार काही कठीण नाहीये. आपण ज्या घरात(वास्तूत) राहतो त्या घरात एक उर्जा असते. त्या उर्जेचा आपल्या जीवनावर negative  किंवा positive परिणाम होत असतो. होणारा परिणाम positive किंवा  negative असणे हे त्या उर्जेवर सर्वस्वी अवलंबून असते. आपल्या पूर्वजांनी फार पूर्वी काही नियम आपल्या दैनंदिन जीवनासाठी सूचित केले होते पण सध्या ते कालबाह्य झालेत. पण काही गोष्टी बदल्या नाहीत. सूर्य पूर्वेलाच उगवतोय..आणि पश्चिमेलाच मावळतोय. सूर्याकडून मिळणाऱ्या उर्जेची गृहिणीना अत्यंत गरज असते.त्यामुळे पूर्वेला स्वयंपाकघर असणे...किंबहुना तिथे असणाऱ्या खिडकीतून सूर्याची  किरणे आत यावीत व त्याचा आरोग्यपूर्ण उपयोग गृहिणी तसेच घरातील इतरांना व्हावा असा हेतू. परंतु आज बांधकामात असा विचार दिसत नाही. पूर्वेकडून व उत्तरेकडून  मिळणारी उर्जा ही positive आहे त्यामुळे ह्या दिशेला जास्तीत जास्त खिडक्या असणे महत्त्वाचे आहे. दक्षिण दिशा ही स्वाभाविकपणे negative उर्जेची मानली जाते. ह्याचाच अर्थ  दिशेकडून मिळणारी उर्जा/flow of energy ही घरात शक्यतो टाळण्यासाठी ह्या दिशेत कमीतकमी खिडक्या असाव्यात. ह्या दिशेत खिडक्या नसतील तर उत्तमच.

हा साधा नियम जरी कळला तरी आपल्या आता हे लक्षात येईल कि म्हणूनच घरातील देव्हारा हा "ईशान्य" दिशेत असावा जेणेकरून आपले मुख पूजा करताना "पूर्वेला" असेल.त्याच अनुषंगाने स्वयंपाकघर आग्नेयेत असावे. पूर्वीची जी घरे असायची त्यात "toilets"चा समावेश नसायचा. म्हणजेच toilets ही घराबाहेर असायची. शरीरातील निचरा/ घाण हा घराबाहेरच व्हावा असा हेतू. Toilets आणि बाहेर Ohh My God. सध्याच्या युगात आपण असा विचारही करू शकत नाही.

बिल्डर्सही कमीतकमी जागेचा जास्तीतजास्त वापर करू पाहतात. कारण सध्या राजा-राणीचा संसार हा बऱ्याच वेळा पहावयास मिळतो. मग हवे कशाला मोठे घर. Kitchen लहान झाले ....दिशेचा विचार न करता roomsची arrangement असते...म्हणजे जिथे देवपूजेची जागा असावी तिथे असते ह्यांचे Bedroom. जिथे असावे स्वयंपाकघर तिथे Toilets n Bathrooms. 

आता अशा प्रकारचे बांधकाम जवळजवळ ८०% ठिकाणी मी पाहिलेले आहे. ह्यावरून मला तुम्हाला माझी एक "Case" सांगावीशी वाटतेय. मागच्यावर्षी मी ज्या घरात वास्तू-अवलोकनासाठी गेले होते तो होता "One Room Kitchen".  मग त्या लोकांनी जिथे Kitchen होते तिथे Bedroom बनवला आणि Kitchen व Hallच्या मध्ये जिथे passageway होता तिथे बनवले Kitchen. कारण गृहिणी पूर्णवेळ कामावर...सकाळी ८.००ला घरातून निघणार ते थेट रात्री ९.०० ला घरी परतणार. म्हणजे स्वयंपाकघरात उभे राहण्यासाठीही वेळ नाही मग करायची काय आहे ही extra room ??? ह्या विचाराने जिथे Kitchen होता तिथे छान bedroom सजवला. Passageway मध्यॆ Kitchen बसवले गेले. चार चुलींची शेगडी,धूर होऊ नये म्हणून चिमणी ..इ. छानछान आधुनिक सोयींनीयुक्त असे "Kitchen". पण हा आपल्या सोयीचा विचार करताना एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष झाले ते म्हणजे Toilets आणि Bathrooms च्या बरोबर समोर ओटा बांधला होता. आत्ता काय सांगावे?? ज्यांचे घर होते त्यांना माझ्याकडून स्तुतीची अपेक्षा असावी कारण जेव्हा मी त्यांना स्वयंपाकघराबद्दल नाराजी दर्शवली तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांच्यामते त्यांनी कमीतकमी जागेचा जास्तीतजास्त वापर केला होता. पण मी माझ्या मतांवर ठाम होते कारण मला माझ्या शास्त्रावर  पूर्णपणे विश्वास आहे. त्यांच्या घरातील रचनेवरून जेंव्हा मी त्यांना त्यांच्या carrier व health बद्दल भविष्यात होणारया घटनांबद्दल ठामपणे सांगितले तेंव्हा ह्या सूचनांची तितकीशी दाखल त्यांच्याकडून घेतली गेली नाही.   

बऱ्याचदा घराच्या पूर्वेला खिडकीच नसते, घराचे मुख्यप्रवेश्द्वार दक्षिण किंवा उत्तरेकडे असते, संपूर्ण घर हे दिशाहीन असते ..म्हणजेच पूर्व-पश्चिम,उत्तर-दक्षिण ह्या दिशा घराच्या कोपऱ्यात असतात, ईशान्य दिशेत संपूर्ण बिल्डींगचे Drainage Pipes असतात इ. घरातील ह्या गोष्टींचा विचार करतो तसाच घराबाहेरील वातावरणाचाही विचार केला गेला पाहिजे. कधीकधी घरासमोर मोठा  नाला असतो कधी घरासमोरच स्मशान असते. मग घर असावे तरी कुठे आणि घरातील रचना असावी तरी कशी ?? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल...

सध्य परिस्थितीचा विचार करता अगदी पूर्वेकडे असणारे मुख्याप्रवेशद्वार,आग्नेयेकडे स्वयंपाकघर, घरासमोर बाग अशी रचना असणारे घर मिळणे दुर्लभ आहे. मग करायचे काय? आपले शास्त्र काळाच्या इतके पुढे आहे कि ह्याचाही विचार आपल्या शास्त्रकारांनी केला होता. त्यामुळे जर शास्त्रप्रमाणे घर नसेल तर काय करावे ह्यासाठी काही उपाय त्यानी सुचवले आहेत. त्याचा उपयोग आपण जरूर करू शकतो व सकारात्मक(positive) उर्जा आपल्या घरात वाहू शकते. 

हळूहळू ह्या शास्त्राचा व मला आलेल्या अनुभवांचा उलगडा मी पुढील काही भागात करणार आहे.       
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

बुधवार, १२ डिसेंबर, २०१२


12-12-12



दोन दिवसापासून नुसतं भंडावून सोडले आहे सगळ्यांनी ...१२ तारीख येतेय काही special होणार आहे का...घर book करू का?? सिझर चा मुहूर्त चांगला आहे का येणाऱ्या बाळासाठी? हे ना ते...१२-१२-१२ काय special आहे? नेहेमीच्या तारखेसारखी तारीख ....काय auspicious ? 
भारतीय वंशाच्या माझ्या बांधवानो आणि भगिनीनो ....आपल्या शास्त्राप्रमाणे आज चंद्र "वृश्चिक" राशीत, अनुराधा नक्षत्रात त्यात आज तिथी चतुर्दशी काय बरे एवढे चांगले पंचांग आहे ??? काहीही नाही ... नुसते तारखेच्या मागे जाऊ नका....भारतीय शास्त्र हे खूप प्रगत आणि अत्यंत सखोल आहे..तेंव्हा हे "auspicious" चे वेड सोडा आणि कामाला लागा...

nothing going to happen special ....dont wait for it...

bye 

शनिवार, ८ डिसेंबर, २०१२



अष्टमातील शुक्र आणि तो ही तूळ राशीतला 



ज्योतिष/कुंडली /ग्रह-तारे हे असे विषय आहेत कि ज्यांच्याबद्दल सर्वांनाच कुतूहलता असते. तशीच कुतूहलता मला माझ्या लहानपणा पासून होती.  दूरवर चमकणारे तारे आणि  आपण ह्यात नक्कीच काहीतरी नाते आहे असे नेहेमी वाटायचे.....ज्योतीशाशास्त्रावर मिळतील ती पुस्तके मी दिवाळीच्या सुट्टीत वाचून काढायचे. मग शाळा सुरु झाली कि मैत्रीणीच्या हातावरील रेषांचा अर्थ समजून घेणे ..व त्याचा काहीबाही अर्थ सांगू लागले..मैत्रिणीनाही त्याचा छंद लागला.....मला ही मज्जा वाटायची. शाळेनंतर college सुरु झाले.  Lecturesला बसण्यापेक्षा groupमध्ये सगळ्यांच्या हातावरील रेषा वाचणे आणि त्याचा अर्थ त्यांना सागणे...ह्यात  जास्त interest वाटू लागला.

College नंतर ज्योतिषशास्त्राचे शास्त्रोक्त शिक्षण घेतांना जगात घडणाऱ्या बऱयाच गोष्टींचा उलगडा होत गेला. लोकांबरोबर घडणाऱ्या गोष्टी आणि ग्रह-ताऱ्यांचा त्यांच्या कुंडलीवरून होणारा फेरा ह्याचा संबंध कळू लागला. ग्रह-तारे,साडेसाती,दशा,गोचर इ. सतत सुरु असायचे. ह्या ग्रहाची दशा सुरु आहे म्हणून का ह्याला हा त्रास झाला असावा?मग त्यावर खोल विचार करून निष्कर्ष काढण्यापर्यंत सराव झाला...आत्ता वेळ आली होती ती थेट अनोळखी माणसाची कुंडली मांडून आपले ज्ञान check करणे. 

एक challenging कुंडली जेंव्हा माझ्याकडे आली...तेंव्हा त्यातील मोजक्यां पण काही ठळक गोष्टी मी सांगितल्या आणि ज्यांची कुंडली होती ते अचंबित झाले. ह्याच कुंडलीचे काही मुद्दे मी इथे मांडणार आहे.: १) जातकाचे मीन लग्न आहे. २)लग्नेश स्वतः लाभ स्थानात  वक्री ३) चंद्र राशी कर्क. ४)तुळेचा शुक्र अष्टमात ?? ह्या व्यक्तीला नक्कीच ""किडनी"चा त्रास असावा. ५)सप्तम स्थानातील कन्या राशीतील हर्षल-बुध उटी पाहिल्यावर माझा निष्कर्ष ठाम झाला. हे मी त्या व्यक्तीला विचारताच तो म्हणाला अग अनुप्रिया एवढे कळते पत्रिके वरून?? मी म्हणाले बरेच काही कळते हे खरे आहे कि नाही ते सांग ....त्यावर त्याने सांगितलं ते असं : त्याला जन्मतः  एक "किडनी'च  नाहीये...आणि हे त्याला त्याच्या वयाच्या २५-२६ व्या वर्षी समजले...

एक "किडनी' नसल्यामुळे त्याला त्याच्या day to day life मध्ये बरेच बदल करावे लागले..त्यावर काही उपाय मी त्याला suggest केले जेणे करून त्याला त्याच्या carrier मध्ये प्रगती साधता येईल तर असे हे शास्त्र. ज्या ग्रह स्थितीत व्यक्ती जन्म घेते त्याचा आयुष्यात नक्कीच काही चांगले तर काही वाईट परिणाम दिसून येतात...तेंव्हा ह्याचा सखोल अभ्यास खूप जरुरी आहे...अशाच काही वेगळ्या कुंडल्या तुमच्या समोर पुढच्या वेळेस मी घेऊन येईन...bye 

READERS ALL OVER THE WORLD