बुधवार, २२ मे, २०१३

कोणीतरी आहे तिथे - एक हटके Case

कोणीतरी आहे तिथे - एक हटके Case 

दोन वर्षापूर्वी माझ्याकडे एक विचित्र Case आली होती. विचित्र ह्यासाठी कारण प्रश्नच असा विचारला गेला होता. वैशाली माझ्याकडे २०१० च्या ऑगस्टला आली होती. "मी कुंडलीबद्दल नाही माझ्या घराबद्दल विचारायला आले आहे. तीन वर्ष झाली मला ह्या घरात. घर अतिशय छान आहे. प्रशस्त आहे. पण हॉलमधून किचन मध्ये जाताना जो Passage आहे तिथे एक विचित्र वास येतो. कुबट किंवा काहीतरी जाळल्यासारखा नाहीतर काहीतरी सडल्यासारखा." 
मी (गेल्या इतक्या वर्षांच्या consultation मध्ये पहिल्यांदा असा प्रश्न मला विचारला गेला)  म्हटले," घरी उंदीर वगैरे येतात का ?? किचन मध्ये जाताना वास येतो मग passage च्या बाजूलाच बाथरूम वगैरे आहे का ?" 
वैशाली," हो बाथरूम आहे. पण बाथरूम मध्ये check केले. हा वास तिथे येत नाही. आणि मलाही पहिल्यांदा उंदराचाच संशय आला त्यामुळे बरेच महिने Rat kill, Pest Control केले. पण काही फायदा झाला नाही."
"मग किचनमध्ये सिंक वगैरे खराब झालेय का ?" मी. 
वैशाली,"ते ही तपासून झालेय. पण हा वास संध्याकाळीच ६ ते ७ च्या दरम्यान येतो नंतर पुन्हा सगळे normal."
माझा बापुडा प्रश्न,"मग तुमच्या building मध्ये काही Drainage pipes खराब झालेत का?"
वैशालीचा कंट्रोल  सुटला,"नाही हो गेले तीन वर्ष हाच वास ठराविक वेळेस घरात त्या passage मध्येच येतो. सबंध घरात कुठेही हा वास येत नाही. संध्याकाळी ६ आणि ७ च्या दरम्यान हा वास येतो. अत्यंत असह्य असा वास आहे. अर्धवट जळल्यासारखा आणि सडल्यासारखा. पेस्ट कंट्रोल, Drainage Pipes, सिंक सगळे check  करून झालेय. कुठेही प्रोब्लेम नाही कारण बाकी घरात कुठेही हा वास येत नाही. १ तास हा वास continue राहतो मग आपोआप बंद होतो. घरी पाहुणे,मित्र-मंडळी सगळयांना हे जाणवले आहे. आता बरेचजण  घरी येण्यास पण नाकारतात. मलाही मग नको नको ते विचार येतात. मला लहान मुलगा आहे. तो शाळेतून घरी ५.३० पर्यंत येतो. मला कामावरून घरी पोहोचेपर्यंत ६.३० होतात. तोपर्यंत तो घरी एकटाच असतो त्यामुळे भीती वाटते. धावपळत घरी पोहोचते. कधी उशीर झाला कि खूप tension येत. घर बदलूही शकत नाही. कारण सध्या माझी तेवढी मिळकत नाही."
मी म्हटले,"ठीक आहे. तुमची समस्या तर समजली पण ह्यावर जे उपाय आहेत ते करण्याची तयारी आहे का ?" 
वैशाली," तुम्ही सांगा मी ते उपाय करते. कारण घर बदलू तर शकत नाही मग घरात जर काही उपायांनी ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या तर खरेच माझे खूप मोठे Tension दूर होईल." 
म्हटले," सर्वात पहिले घरात तुमच्या म्हणण्याप्रमाणे अनाहूत शक्ती आहे असे आपण समजू. जर तसे आहे तर
 १)घराची फारशी दिवसातून दोन्ही वेळेस खड्या मिठाने पुसून घ्या. (मीठामुळे  घरातील नकारात्मक उर्जा निघून जाण्यास मदत होते.) साधा वाटत असला तरी खूप effective उपाय आहे.  
२)संध्याकाळी घरी आल्यानंतर घरातील प्रत्येकाने पाय स्वछ धुतलेच पाहिजेत. 
३) सांजवात घरी झालीच पाहिजे. 
४) सर्वात महत्वाचे घरात रामरक्षा संध्याकाळच्या वेळेस म्हटली गेली पाहिजे. आपल्या स्तोत्रात बरीच अशी शक्ती आहे ज्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा थारा घरात राहत नाही. जर रामरक्षा म्हणता येत नसेल तर बाजारात ह्याची CD मिळते ती संध्याकाळच्या वेळेस सुरु ठेवावी. 
५) हनुमान चालीसा रोज सकाळी किंवा संध्याकाळी वाचावी आणि वाचताना हनुमान चालीसाचे पाणी तयार करावे. हे पाणी घरातील सर्वांनी पायचे आणि उरलेले पाणी संपूर्ण घरात शिंपडणे. 
६) दोन - तीन महिन्यातून एकदा तरी सप्तशतीचा पाठ गुरुजींकडून करून घेणे. 
हे सगळे करून पहा. एक दोन महिन्यात फरक पडावयास हवा. फरक नाही जाणवला तर कळवा मला."

वैशालीने निट सगळे लिहून घेतले. मधले बरेच महिने तिचा काही फोन आला नाही. २०१२ च्या डिसेंबर मध्ये वैशालीचा फोन आला. " भावाची कुंडली तुम्हाला दाखवायची आहे. लग्नाचे योग वगैरे." 
म्हटले,"ठीक आहे. ह्या रविवारी जमेल का?" 
भेटण्याची वेळ ठरली. तिला घराबद्दल विचारावेसे वाटले पण म्हटले ती येतेच आहे तेंव्हा विचारू. 
ठरल्यावेळी वैशाली आली. भावासंदर्भात बोलणे वगैरे झाले. मग तिला घराबद्दल विचारले. 
वैशाली हसत हसत म्हणाली," अहो काय सांगू. इतके वर्ष आम्ही इतके त्रस्त झालो होतो त्या वासाने. कळतच नव्हते वास कुठून येतोय. नको नको त्या शंका यायला लागल्या होत्या. घर सोडावे लागणार असे वाटत असतानाच तुमचा नंबर माझ्या मैत्रिणीने दिला. तुम्ही दिलेले उपाय केले आणि दीड महिन्यातच वास आपोआप बंद झाला. एवढे साधे वाटणारे उपाय इतके effective असतील असे वाटले नव्हते."
मी म्हटले," ही स्तोत्र म्हणजे आपल्या पूर्वजांनी देलेली अमुल्य अशी भेट आहे. घरात येणारा वास बंद झाला म्हणून उपाय बंद करू नका. सप्तशती पण सूरु  आहे ना ?"
वैशाली," उपाय आणि बंद ??? नाही अजिबात नाही. हे उपाय सुरु केल्यानंतर आम्हालाही खूप प्रसन्न वाटतेय. मनावरची मरगळ गेलीये. खूप प्रसन्न वाटतंय. सप्तशती सुरु आहेच. गुरुजींना सांगूनच ठेवले आहे. गेल्या दोन वर्षात तर ह्याची सवय झालीये. thanx to you अनुप्रिया."
"अरे मला काय thanx ??? हे तर त्या स्तोत्रांची कमाल आहे. continue ठेवा म्हणजे झाले."
खूप आनंद झाला हे सर्व ऐकून. आपली शास्त्र/स्तोत्रं ह्यात खूप ताकद आहे. काही लोकांचा ह्यावर विश्वास नाही. काहींचा विश्वास ठेवायचा कि नाही ह्यात संभ्रम आहे. कदाचित उद्या अमेरिकेने सिद्ध करून दाखवले कि हे लोक त्यावर विश्वास ठेवतील. काहीना ही अंधश्रद्धा वाटू शकेल. पण इथे फार मोठे कुठलेही अवडंबर/शांती/खर्च न सांगता घरच्या घरी करता येणारा,खर्चिक नसलेला उपाय सांगितला आहे आणि ज्या घरात तीन वर्ष सतत त्रास होता तिथे हे उपाय केल्यानंतर गेले दोन वर्ष त्रास कमी नव्हे बंद झालेला आहे ह्याची नोंद घ्यावी.

लोकांना असाच शास्त्राचा फायदा होवो ही सदिच्छा.                 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

शुक्रवार, १७ मे, २०१३

ईशान्य Toilets - वास्तू महादोष

ईशान्य Toilets - वास्तू महादोष


गेल्या लेखात पंचमहाभूते किंवा पंचतत्व ह्या बद्दल आपण वाचलेत. आज तुम्हाला एक Case सांगणार आहे ज्या वास्तूत ईशान्येला व पूर्वेला  Toilets आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम गृहस्वामिनी तसेच मुलांच्या तब्येतीवर कसा झाला ते पाहू. ह्या वास्तूबद्दल एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही वास्तू दिशाहीन आहे म्हणजेच पूर्व -पश्चिम -उत्तर -दक्षिण ह्या मुख्य दिशा ह्या वास्तूच्या चार कोपरयात निर्देशित आहेत. अशी वास्तू कुठल्याही मुख्य दिशेची सकारात्मक उर्जा वापरू शकत नाही. त्यामुळे शक्यतो अशी वास्तू घेणे टाळावे. 

ही Case सांगण्याआधी तुम्हाला background सांगते. जाधव कुटुंब आधी एकत्र कुटुंब पद्धतीने राहत होत. म्हणजे आई वडील,दोन भाऊ- सत्यम आणि निलेश. मोठया भावाची म्हणजेच सत्यमची बायको,दोन मुले असा परिवार 1BHK मध्ये रहात होता. छोट्या  भावाच्या लग्नाची बोलणी सुरु झाल्याबरोबर सत्यमने दुसरे घर शोधायला सर्वात केली. काही महिन्यातच सत्यमला एक घर आवडले. भावाचे लग्न झाले की रहायला येऊ असा plan होता. निलेशचे लग्न झाले आणि सत्यमही नवीन घरात रहायला आला.

काही दिवसांनी रेश्माला (सत्यमची बायको) पोटात खूप दुखू लागले. तपासणीत समजले तिच्या Appendixचे ऑपरेशन करावे लागेल. ऑपरेशन झाले रेश्मा घरी आली. एक दोन महिने व्यवस्थित गेले. रेश्माच्या भावाचे लग्न ठरले म्हणून रेश्मा आणि मुले लग्नाला गेले होते. तिथे मुलांच्या मस्तीत रेश्माच्या मुलीचा पाय बाईकच्या चाकात अडकला आणि Fracture झाले. लग्न सोडून हॉस्पिटलच्या फेऱ्या सुरु झाल्या. तिचा पाय बरा होतो न होतो तोच मुलाला काविळ झाली. दोन- तीन महिन्यांनी सत्यमला त्याच्या कपाळावर एक गाठ जाणवली. डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन करण्यास सांगितले. त्यातच सासूबाई बाथरूम मध्ये पडल्या आणि त्यांचा हात Fracture झाला. कहाणी वाटत असली तरी हे सत्य आहे. मी जेंव्हा हे ऐकले तेंव्हा मलाही खूप आश्चर्य वाटले. 

ह्यानंतर रेश्मा माझ्याकडे आली होती. सगळे कथाकथन झाल्यानंतर घरातील सगळ्यांच्या पत्रिका मागवून घेतल्या. पत्रिका अभ्यासल्यानंतर मी रेश्माला फोन केला तेंव्हा कळले रेश्माचा पाय Fracture झाला आहे. रेश्माला त्यानंतरच्या भेटीत मी वास्तूबद्दल विचारणा केली. तेंव्हा तिने घराचा नकाशा काढण्याचा प्रयत्न केला पण ती दिशा व्यवस्थित सांगू शकली नाही. मग वास्तू Visit चा दिवस ठरवून तिच्या घरी गेले. 
सत्यमची वास्तू 

अत्यंत स्वच्छ आणि ऐसपैस असे घर. मोठीशी बैठकीची खोली, स्वयंपाक घर, झोपण्याची खोली. पाहताक्षणी आवडावे असे घर. पण दिशेचे काय ?? होकायंत्र काढले आणि खरी गोम लक्षात आली. पूर्व दिशा घराच्या समोर न येता घराच्या एका कोपरयात आली होती त्या अनुषंगाने बाकीच्या दिशा. इथपर्यंत ठीक होते. परंतु घरातील एक Toilet हे ईशान्य दिशेला आहे आणि दुसरे आग्नेय दिशेला. मागच्या दोन- तीन लेखात मी उल्लेख केला होता जर आग्न्येय (South -East ) दिशेत जर दोष असेल तर त्याचे परिणाम म्हणजे घरातील स्त्रीला पोटाचे आणि पायाचे विकार. आणि इथे वास्तू नेमके हेच दर्शवत होती. वास्तूचे  खालीलप्रमाणे विश्लेषण :

१) दिशा-हीन वास्तू - मुख्य दिशा वास्तूच्या काटकोनात आहेत
२) ईशान्य दिशेत Toilet  
३) आग्न्येय दिशेत Toilet 
४) पूर्व दिशेला कट 
५) ब्रम्ह स्थानावर भिंत 
६) मुख्यद्वार वायव्य दिशेत. 

ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम घरातील स्त्रीवर होणार हा नियम आहे. आणि परिणाम हा पोट आणि पायावर होणार. त्यामुळे रेश्माबरोबर झालेल्या पहिल्या भेटीच्या चर्चेत मला तिचे बोलणे ऐकून आश्चर्य वाटले होते पण वास्तू निरीक्षणानंतर फार आश्चर्य राहिले नाही. लेख वाचतानाच तुमच्याही हे लक्षात आलेच असेल, पाय आणि पोटासंबंधीचे त्रास जास्त झाले आहेत. आता ह्यावर काय उपाय केले पाहिजेत आणि त्याचे कसे Results मिळतील ह्या संदर्भात रेश्मा आणि सत्यमला व्यवस्थित समजावले. ईशान्य आणि आग्नेय दिशेत असलेले toilet कसे विपरीत परिणाम देत आहेत आणि पुढे काय परिणाम होतील हे सांगितले. दोघांना माझे म्हणणे पटले. परंतु त्यानंतर त्यांचा फोनही नाही की भेटही नाही. 

ह्या त्यांच्या भेटीला दोन- तीन महिने उलटून गेले. मी ही विसरून गेले. आठवण तेंव्हा झाली जेंव्हा रेश्माचा मला फोन आला. मी म्हटले," काय चाललय ?" 
 रेश्मा,"गेल्या वेळेस तुम्ही वास्तूबद्दल समजावले होते तर त्याच संदर्भात बोलायचे आहे."  म्हटलं,"बोला." "काही नाही वास्तूने पुन्हां एकदा प्रत्यय दिला. ५- ६ दिवसांपूर्वी घराची साफ- सफाई करायला घेतली होती. दिवाळी जवळ येतेय ना. पंखा साफ करत होते स्टुलावर चढून. तोल जाऊन पडले आणि हात सध्या गळ्यात आहे. वैताग आलाय हॉस्पिटलच्या वा-या कधी संपणार. ऐन दिवाळीच्या तोंडावर हात मोडून बसलेय. मुलांचा आणि सत्यमचा तर हिरमोड झाला आहे. तुम्हीच सांगा काय करायचे."  
मी रेश्माला म्हटले," जे करायचे आहे ते मी तुम्हाला आधीच सांगितलेय आता तुम्हीच ठरावा."  
रेश्मा," हो ते आहेच लक्षात म्हणूनच call केलाय. पण सत्यमचा वास्तू वगैरे गोष्टींवर विश्वास नाहीये. त्या दिवशी तो तुमच्या समोर काही म्हणाला नाही पण …………… "

मी समजले. रेश्माला सांगितले," ठीक आहे तुम्हाला वास्तूचे उपाय नसतील करायचे तर निदान वास्तू बदला. दुसरी वास्तू घ्या आणि तिथे किमान दिशा काटकोनात नसतील हे नक्की तपासून घ्या."

त्यानंतर तिचा फोन आलेला नाही. आता ते नवीन वास्तूत राहायला गेले किंवा नाही हे माहीत नाही. दिवाळी नंतर आज सहा - सात महिने झालेत परंतु त्यांची काही माहिती नाही. जर वास्तू बदलली असेल तर अत्यंत उत्तम नाहीतर हा सिलसिला कायमच राहणार. 

सत्यमसारखे काही वाचक असतीलही ज्यांचाही ह्या गोष्टींवर विश्वास नसेल. कदाचित हे ही म्हटले जाईल रेश्माने स्वतःची काळजी घेतली तर हे प्रसंग उद्भभवणारच नाहीत. पण एखाद्या वास्तूत राहायला गेल्यानंतर लागोलाग इतक्या वेळेस हॉस्पिटलच्या वा-या झाल्या ???? वास्तूत येण्याच्या आधी रेश्माला किंवा इतर मंडळींना असा त्रास का नाही झाला ??? प्रत्येक एक - दोन महिन्याच्या अंतराने घरातील कोणीतरी आजारी आहे किंवा अपघात झालाय ??  हा निव्वळ योगायोग ???? मला तसे वाटत नाही. जर सत्यमने ही वास्तू घेण्याआधीच वास्तूतज्ञाला विचारले असते तर एवढा मानसिक आणि आर्थिक त्रास झाला नसता. 

म्हणूनच नवीन वास्तू घेण्याआधीच वास्तूतज्ञांची भेट घ्या, चर्चा करा. वास्तू नंतर Rectify करण्यापेक्षा आधीच काळजी घ्यावी. आणि हो वास्तूतज्ञ निवडतानाही काळजी घेणे.    

कशी वाटली ही case ??? जर अशा अजून काही Cases तुम्हाला वाचायच्या असतील तर मला जरूर कळवा : anupriyadesai@gmail.com 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

शुक्रवार, १० मे, २०१३

वास्तू तथास्तु

वास्तू तथास्तु 

गेल्या महिन्यात मानेंकडे वास्तुपरीक्षणासाठी गेले होते. बैठकीच्या खोलीचे परीक्षण झाल्यानंतर आम्ही स्वयंपाकघराकडे वळणार तेवढ्यात दाराची बेल वाजली आणि साठे काकूंनी घरात प्रवेश केला."हे कोण आले आहेत ? हे काय ते काय ??" ही विचारणा सुरूच होती त्यांची. शेवटी न राहवून माने काकूंनी त्यांना सांगितले, "ह्या वास्तू परीक्षणासाठी आल्या आहेत". "अच्छा म्हणजे ते वास्तुबिस्तु बघतात ते का ?… आम्हाला नाही हो विश्वास ह्यावर. माणसाने कसे स्वतःवर विश्वास ठेवून चालावे म्हणजे सगळे व्यवस्थित असते. हे असे वास्तू बघून का कधी प्रगती होते? उगीच आपले पैसे उकळायचे." - इति सौ. साठे. त्या त्यांच्याच धुंधीत माने काकुंना  सांगत होत्या आणि त्यांना कल्पनाच नव्हती मी त्यांच्या मागेच उभी आहे. मला पाहिल्यावर बाहेर पळाल्या.

हा माझा अनुभव इथलाच नाही तर नेहेमी मला हे अनुभवाला येते की लोक ह्या शास्त्राला खूप दुषणे देतात. ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र हे सगळे बकवास आहे. असे काही नसते. लोकांची Psychology वापरून हे लोक स्वतःचे Bank Balance वाढवतात,लोकांची फसवणूक करतात. एवढेच बोलून हे लोक थांबत नाहीत तर त्याही पुढे कोणाचेतरी उदाहरण देतात…अरॆ त्या अमुकच्या घरी "वास्तुवाले" आले होते … घरात सगळ्या गोष्टींची जागा बदलली,तोडफोड केली,Pyramids ठेवले तरी त्याला काही फायदा झालाय का ??  मला राग येण्यापेक्षा ह्या आणि अशा लोकांची कीव येते. 'कुठल्याही गोष्टीची पूर्ण माहिती नसेल तर आपण त्यावर भाष्य करू नये' अशी एक नीती आहे. आजारी असल्येल्या व्यक्तीला जेंव्हा आपण डॉक्टरकडे घेऊन जातो तेंव्हा त्या डॉक्टरचे औषध लागूच पडत नाही. बरयाच लोकांना असा अनुभव आला असेल. मग अश्यावेळी आपण काय करतो ?? डॉक्टर बदलतो की त्या Medical Science ला नावे ठेवतो ??????

विश्वासाचा आणि अविश्वासाचा प्रश्न नसून हे एक शास्त्र आहे आणि हे आपल्या ऋषीमुनीनी (जे काळाच्या बरेच पुढे होते ) लिहून ठेवलेले आहे. त्या शास्त्राचा आपल्याला फक्त फायदा घ्यायचा आहे. हे शास्त्र आहे तरी काय ?? खरेच खूप तोडफोड करावी लागते का ??  ह्याचा खरेच काही फायदा आहे का आणि असेल तर आम्हाला कसा फायदा होईल ?? खूप खर्चिक आहे का ?? वगैरे प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.

वास्तू म्हणजे फार काही complicated नसून ज्या घरात आपण राहतो ती जागा व आजूबाजूचा परिसर/वातावरण. इंजिनिअर्स कुठलेही बांधकाम करताना पंचमहाभूतांचा विचार करतात. उदाहरणार्थ फ्लायओवर बांधतानाही वातावरणाचा विचार केला जातो. पाऊस,भूकंप, वादळ इ गोष्टी ध्यानात घेऊन बांधकाम केले जाते. मग ज्या घराची ओढ आपल्याला कायमच असते, ज्या घरातून आपल्याला नेहेमीच चांगल्या उर्जेची अपेक्षा असते, कामावरून घरी कधी एकदा पोहोचतोय असे वाटते त्या घराची, एकदा घरी गेल्यावर relax वाटते. मग ह्या घराची, घरातल्या वातावरणाचाही आपण विचार केला पाहिजे. 

काही घरांमध्ये खूप कोंदट वातावरण असते. तिथे गेल्यानंतर कोंडल्यासारखे कोंडल्यासारखे वाटते. कधी एकदा तिथून निघतोय असे वाटते. काही घरात इतके Friendly वातावरण असते कि तिथे कधीही जा तुमचे स्वागतच असते. वातावरण खेळीमेळीचे आणि घरातील व्यक्ती आपल्याशी इतक्या आपुलकीने वागतात कि आपण त्या घरातीलच आहोत असे वाटू लागते. इथे घर लहान-मोठे, गरीब- श्रीमंत मला अजिबात म्हण्याचे नाही. हे आनंदी वातावरण तुम्हाला एखाद्या चाळीतही अनुभवास येईल आणि गर्भश्रीमंत घरात कोंडल्यासारखे वाटू शकेल. घर म्हणजे चार भिंती आणि त्यातील व्यक्ती.घराचा परिणाम त्या व्यक्तींच्या स्वभावावर,आरोग्यावर तर होतच असतो परंतु घरातील व्यक्तींचाही परिणाम त्या वास्तूवर होत असतो असा माझा अनुभव आहे. त्यामुळे घरातील सर्वांनी हे वातावरण कसे आनंदी राहील ह्यासाठी प्रयत्नशील असावे असे माझे स्पष्ट मत आहे.

पंचमहाभूते म्हणजेच 'अग्नि,पृथ्वी,वायू,जल  आणि आकाश'  ही पंचमहाभूते जर दुषित झाली नसतील म्हणजेच घरातील त्यांच्या दिशांना काही हानी झालेली नसेल तर ही पंचमहाभूते आपल्याला Positive results देतील अथवा काही काळानंतर त्याचे दुष्परिणाम जाणवायला लागतील. ही तत्वे जर बिघडली तर घरातल्या व्यक्तींना त्रास होण्यास सुरवात होते. ही पंचमहाभूते खालीलप्रमाणे स्थित असतात.



१) अग्नितत्व -  पूर्व दिशेच्या आणि दक्षिण दिशेच्या मध्ये ही आग्नेय दिशा असते. अग्नीतत्वाचा संबंध आपल्या पचनशक्तीशी निगडीत आहे. पोटातला अग्नी बिघडला तर काय होईल ? पित्ताचा त्रास,अंगावर उष्णतेचे पुरळ/गांधी इ. स्वयंपाक घर आग्नेय दिशेत अपेक्षित आहे. म्हणजेच ह्या आग्नेय दिशेत जर काही दोष असेल जसे की ह्या दिशेत मोठा कट असणे, खिडकी असणे,दरवाजा असणे हा एक वास्तूदोष आहे. ह्याचा परिणाम म्हणजे घरातील स्त्रीला पोटाचे विकार किंवा गुडघ्याचा त्रास. पुरुषाला पाठीच्या कण्याचा त्रास असणे. 

२)  पृथ्वीतत्व - नैऋत्य  दिशा ही दक्षिण आणि पश्चिम ह्यांच्या मधली दिशा. तिजोरी किंवा दागिने/ पैसे ह्या दिशेत असावेत. ह्या दिशेत जड वस्तू जसे कपाट , साठवणीच्या वस्तू - धान्य इ. असेल तर ह्या दिशेतून येणारी Negative ऊर्जा आपण Control करू शकतो. ही दिशा कधीही मोकळी असू नये. ह्या दिशेत जर दोष असेल म्हणजेच ह्या दिशेत Toilets असणे, विहीर असणे, underground water tank,गच्ची  असणे  म्हणजे संकटाला आमंत्रण देणे. असे दोष जर असतील तर अचानक आर्थिक संकट,अपघात किंवा आत्महत्या इ. घटना घडतात. (दक्षिण ही यमाची दिशा संबोधीत आहे. यमाची दिशा म्हणजे negative energy / confidence कमी असणे.) ह्या दिशेतील दोष लवकरात लवकर दुरुस्त करणे. 

३) वायुतत्व - वायव्य दिशा. पश्चिम आणि उत्तर ह्या दोन दिशेतील ही दिशा. ह्या दिशेची देवता पवनदेव आहेत. ह्या दिशेत दोष म्हणजे दरवाजा असणे, टेरेस असणे,विहीर असणे. ह्या दिशेतील दोष घरातील व्यक्तींना मानसिक व शारीरिक पिडा दर्शवते. मानसिक चंचलता, घराबाहेर वारंवार रहाणे इ. वायुत्तत्वाचा आणि व्यवसायाचा घनिष्ठ संबंध आहे. ह्या दिशेत वस्तू ठेवल्यास त्यांची लवकर विक्री होण्यास मदत होते. 

४) जलतत्व -  ईशान्य दिशा ही पूर्व व उत्तर दिशेच्या मधली दिशा. ईश म्हणजे ईश्वर- ईश्वराची दिशा. ह्या दिशेकडून प्राणिक उर्जा मिळते. त्यामुळे ह्या दिशेत जास्तीत जास्त खिडक्या असणे, मोकळी असणे म्हणजेच अडगळ अजिबात असू नये आणि अवजड वस्तू असे नये  हे अपेक्षित आहे. ह्या दिशेत जर दोष असेल तर शैक्षणिक प्रगतीत अडथळे निर्माण होतात. चांगला प्रवाह वाहण्यास अजून मदत व्हावी ह्यासाठी ह्या दिशेत देवघर,देवांच्या तसबिरी ह्यांची स्थापना करावी. अभ्यासासाठी व ध्यानासाठी उत्तम दिशा असे म्हटले गेले आहे. जर ह्या दिशेत कचरा,रद्दी इ. असेल खूप अवजड वस्तू ठेवल्या गेल्या असतील तर साहजिकच प्राणिक उर्जा मिळण्यास अडथळा निर्माण होतो. जलतत्व ह्या दिशेस असल्याने ह्या दिशेत Artificial Waterfall, पाण्याचा साठा असेल तर दुधात साखर. ह्या दिशेत सर्वात मोठा दोष म्हणजे इथे Toilets असणे. जर इथे Toilets असतील  तर ते तब्येतीच्या बाबतीत फार वाईट फळे मिळतात. (अशी एक वास्तू Case पुढील भागात मांडेन). ताबडतोब ह्या दोषाचे निवारण करावे. Toilets जर घराच्या दुसऱ्या जागी हलवता येणार नसतील तर त्यासाठी विनातोड्फोड उपाय आपल्या वास्तूशास्त्रात सांगितलेले आहेत. 

५) आकाशतत्व - आकाश म्हणजेच घराचे ब्रम्ह्स्थान (मध्यभाग) जर तुम्हाला आठवत असेल तर आधी गावच्या घरी घराचा मध्यभाग मोकळा ठेवून तिथे तुळशीवृंदावन असायचे. अजूनही कर्नाटक किंवा दक्षिण भारतात घराचा मध्यभाग मोकळा असून तिथे तुळशीवृंदावन असते. आणि त्या मोकळ्या जागेवर कधी कौलेही घातली जायची नाही.


संपूर्ण घराला कौले करणारे आपले पूर्वज घराचा मध्यभाग का बरे मोकळा आणि कौलाविना ठेवत असतील ?? असा कधी विचार केला आहे ?? आपल्या पूर्वजांना ह्याची संपूर्ण कल्पना होती कि सर्व तत्वांप्रमाणेच आकाशतत्वाची ही आपल्याला तितकीच गरज आहे. आकाशतत्व म्हणजेच ब्रम्हस्थान, वास्तुपुरुषाचा पोटाचा भाग. जर ह्या भागात अवजड वस्तू/अडगळ, भिंत, toilets इ  असेल तर हा महादोष आहे. ह्या दोषाचा परिणाम म्हणजे पोटाचे अत्यंत भयंकर विकार- आतड्यांचा त्रास, हार्निया,गर्भपात इ. त्यामुळे हा भाग मोकळाच असला पाहिजे. 

आता तुम्ही म्हणाल एवढे सगळे नियम आताच्या बांधकामात कसे काय बसणार ?? सध्या घर पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तसे घर मिळतानाच मुश्कील आहे त्यात हे सगळे नियम बघून घर म्हणजे तर झालेच…. आपले वास्तुशास्त्र इतके सक्षम आहे की काही साधे उपाय केल्यानेही(तोडफोडीशिवाय) घरातील दोष नष्ट होऊन घरात सकारात्मक उर्जा प्रवाहित तर होईलच आणि त्यामुळे सर्वांचे आरोग्य,आयुष्य उत्तम राहून प्रगती साधता येईल. काही उपाय तर मी वर नमूद केलेच आहेत जसे ईशान्य दिशेत अडगळ नको, नैऋत्य दिशेत कपाट- दाग-दागिने,पैसे वगैरे. जसे डॉक्टरांकडून औषध घेतले म्हणजे चमत्काराप्रमाणे रोग लगेच बरा होत नाही आणि पथ्यपाणी सांभाळल्याने रोग बरा होतो त्याप्रमाणे वास्तुदोष निवारण झाल्यानंतर सुद्धा वास्तूततज्ञाने सांगितलेल्या इतरही गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात. 


लक्षात ठेवा : १. वास्तू नेहेमी तथास्तु म्हणते.
२. त्यामुळे वास्तूत नकारात्मक गोष्टींची चर्चा,कटकट,सततचे वादविवाद टाळावेत. 
३. सकारात्मक संदेश देणारी चित्रे घरात लावावीत.  
४.मित्र मंडळी,नातेवाईक ह्यांच्या भेटीगाठी महिन्यातून एकदा तरी झाल्याच पाहिजेत. वास्तू हसत रहायला हवी. तुमची प्रसनत्ता तुमच्या वास्तूत प्रतिबिंबित होते. आणि नेहेमी हसणारी वास्तू आनंदी रहाते आणि आनंद देत राहते. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com




रविवार, ५ मे, २०१३

"सुखी सोनाराकडे आणि दुःखी ज्योतिषाकडे"

"सुखी सोनाराकडे आणि दुःखी ज्योतिषाकडे" 

"अनुप्रिया मैन बहौत थक गयी हुं. अभी सहेन नही होता. लगता है अब Suicide कर लु." हे धक्कादायक उदगार निशाचे. मला पहिल्यांदाच भेटायला आली आणि हे असे बोलणे. "सुखी सोनाराकडे आणि दुःखी ज्योतिषाकडे" अशी म्हण मला रोज प्रत्ययाला येते. लोकांना Problems असतील कि अनुप्रिया आठवते जसा Problem संपतो लोक ज्योतिषाला साधा फोन करून सांगण्याची तसदीही घेत नाहीत. फार कमी लोक फोन करून सांगतात,  "तुम्ही सांगितलेले तसे झाले ". पण काही लोकांना एवढे एक वाक्य सांगायलाही वेळ उरत नाही. "गरज सरो आणि वैद्य मरो" 

ज्योतिषी किंवा कुठलाही Professional हा आजीवन विद्यार्थी असतो. एका कुंडलीवर खोल अभ्यास करणे आणि त्या अभ्यासावरून जातकाला अमुक ह्या तारखेला तुझे काम होईल,तू ह्या क्ष्रेत्रात नोकरी कर तुझा फायदा होईल, तू नोकरीपेक्षा Business चांगला करू शकशील,तुझे लग्न ह्या महिन्यात होईल, तुला बाळ होईल पण ही काळजी घे, नॉर्मल कि सीझर इ. हे सांगणे हे सोप्पे मुळीच नाही.  त्यामुळे एखादी घटना ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे घडली हे त्याला सांगणे हे अत्यंत जरुरी आहे. तेंव्हा ज्योतिषाने सांगितलेले भविष्य बरोबर आले किंवा चुकले हे त्याला सांगितले पाहिजे. 

बरे आता निशाच्या Case कडे वळूया. निशाचे गेल्याचवर्षी लग्न झाले. ती स्वतः सिंधी आणि लग्न भरतेश ह्या गुजराथी मुलाबरोबर. निशा स्वतः माटुंग्याला रहाणारी आणि नोकरी करायची भायखळ्याला पण लग्न करून आली डोंबिवलीला. सुरवातीला सगळे छान चालले होते. नंतर नंतर निशाला घर आणि ऑफिस जमेना. मग काय नवरयाचा चांगला चालणारा Business होताच. निशाने चांगली लठ्ठ पगाराच्या नोकरीवर पाणी सोडले. घरी राहिल्यापासून निशाला  जास्तच त्रास होउ लागला. सासरकडची मंडळी जुन्या वळणाची,डोंबिवलीत पाणी न विजेचा लपंडाव, घरी सासू सतत तिच्या समोर बसून रहायची. निशा दुसरया समाजातली असल्याने आमच्या समजातल्या मुली किती वळणदार, कामसू ह्याचा पाढा रोज ऐकवला जाई. स्वयंपाक,धुणी कधी न केलेले आणि आता ते करावे लागतेय, घरी फोन करायचा झाला तरी निशाला फुरसत मिळायची नाही. आधीच नोकरी सोडलेली, कधी न केलेली कामे करावी लागत होती ,सासू येत जाता टोमणे मारायची,नवरा रात्री उशीरा आल्यानंतर तो तक्रार ऐकण्याच्या स्थितीत नसायचा, निशाचा कोंडमारा होऊ लागला. निशाने आत्महत्येचा विचार मैत्रिणीला सांगितला तेंव्हा निशाला तिच्या मैत्रिणीने माझा नंबर दिला. 
निशाची कुंडली 
निशाचे बोलणे ऐकता ऐकता तिची कुंडली अभ्यासत होते. (वैदिक पद्धतीने)(Married Life ) - :  १)वृषभ लग्न आणि वृषभ राशीची कुंडली. निशा दिसायलाही सुंदर वृषभ राशी सारखी. 
२)सप्तमात वृश्चिक राशीत बुध,रवि आणि नेपच्यून सारखे ग्रह. 
३)सप्तमाचा स्वामी मंगळ अष्टमात धनु राशीत. मागच्या जवळ जवळ सगळ्या लेखात आपण हे पहिलेच आहे की अष्टमाचा संबंध आला की अडथळे आलेच. इथे सप्तमाचा स्वामी अष्टमात आणि तो ही मंगळासारखा ग्रह. म्हणजे ती जे काही वैवाहिक जीवनाबद्दल सांगतेय ते खरे आहे. (ज्योतिषाने नेहेमीच जातकाने सांगीतल्येल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. जातक काही गोष्टी लपवू किंवा खोटेही सांगू शकतो.)

कृष्णमुर्ती पद्धतीने : १) सप्तमाचा सब लॉर्ड गुरु आणि तो ३, ८, ११ चा कार्येश. इथेही अष्टम स्थान आहेच. पण कोणताही ग्रह हा त्याच्या नक्षत्रस्वामी प्रमाणे फळ देतो त्यामुळे गुरुचा नक्षत्र स्वामी पहावा लागेल. गुरु आहे शनिच्या नक्षत्रात आणि शनि ४, ९, १० चा कार्येश म्हणजे फार Negative नाही. कुरबुरी आहेत त्या सगळ्याच वैवाहिक जीवनात असतात. त्यामुळे निशाला व्यवस्थित समजावणे गरजेचे होते. त्याप्रमाणे तिला समजावताना तिला नोकरी करण्याचा सल्ला दिला म्हणजे नोकरीत वेळ जाईल आणि काही काळासाठी ती घरापासून दूर राहील. तिचे म्हणणे आता लगेच नोकरी मिळेल ?  म्हटले हे योग आहेत का ते पाहू ? 

नोकरी(कृष्णमुर्ती पद्धतीने) :  सध्या निशाला गुरु महादशा चालू आहे. २०११ ते २०१४ शनि अंतर्दशा. शनि  ४, ९, १०  आणि शुक्राच्या नक्षत्रात. शुक्र ६,१, ६ चा कार्येश. निशा माझ्याकडे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आली होती. तेंव्हा तिच्या कुंडलीत चंद्र विदशा ३ मार्च २०१३ ते २० मे २०१३ पर्यंत आहे. चंद्र खालील प्रमाणे :
चंद्र १  ३  न.स्वा. चंद्र १  ३ सब गुरु ३, ८, ११ सब सब शनि ४, ९, १०  
म्हणजेच नोकरी एप्रिल -मे च्या दरम्यान मिळायलाच हवी. परंतु अष्टम स्थान विसरून चालणार नाही. नोकरीसाठी काळ अनुकूल असला तरी अष्टम स्थानामुळे काहीतरी तडजोड करावी लागते. म्हणजेच कदाचित कमी पगाराची नोकरी पदरात पडून घ्यावी लागेल. त्याप्रमाणे तिला सांगितले.  
आता नाईलाज को क्या इलाज? ह्या उक्तीप्रमाणे तिने ही ते मान्य केले. काही स्तोत्रे आणि उपाय तिला दिले. २४  एप्रिलला संध्याकाळी आनंदी स्वरात निशाचा फोन," अनुप्रिया मुझे Interview के लिये दो अलग अलग  कंपनीसे Call आया है. Thanx To You.  एक कंपनी मार्केटिंग related कामकाज है और दुसरी मेरेही बँकसे मुझे call आया है.लेकिन बँकमें Package कम मिल राहा है.  क्या करू ? बहोत Confusion  है."  म्हटल," ठीक आहे. मला अर्ध्या तासाने फोन कर". 

तिची कुंडली Marketing साठी कि बँकेच्या जॉबसाठी Suitable आहे ते पाहिले पाहिजे. marketing साठी द्वितीय स्थान, द्वितीयाचा सब लॉर्ड check करावा. वृषभ लग्न म्हणजेच द्वितीयात बुधाची मिथुन राशी. हे पाहिल्यावर marketing असे सांगावेसे वाटेल परंतु खोल अभ्यासल्यास बुध स्वतः मंगळाच्या वृश्चिक राशीत आणि शनीच्या नक्षत्रात. marketing ??? शक्यच नाही. षष्ठेश शुक्र तुळ राशीत (तुळ - वजाबाकी no marketing ) वजाबाकी ही बँकेतच होत असते रोज. शुक्र राहूच्या नक्षत्रात आणि राहू शनि बरोबर. (शनि - किचकट कामे,वेळ काढू कामे) . बँकेत तिचा Job लोन Department मध्ये असणार आणि तिथे तिला Documents Verificationचे काम. मग काय ? कळले का तिला कुठला Job Suggest  केला मी ???? 

Note : hmmmm बरोबर. मे  महिन्याच्या ६ तारखेपासून निशा तिच्याच बँकेत परंतु  घाटकोपरच्या Branch ला जाणार आहे.  आणि हो तिला सध्या कमी पगार मान्य करावा लागला. वरती आपण पहिलेच तिला तडजोड करावी लागेल. निशा अत्यंत खुश होती. आयुष्यातले खूप मोठे कोडे सुटल्यासारखा आनंद झाला होता तिला. ज्योतिषशास्त्राचा फायदा आत्महत्येचे विचार घेऊन आलेल्या निशाला अशा प्रकारे झाला. 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

सोमवार, २९ एप्रिल, २०१३

ऑपरेशन ??? छे मुळीच नाही.

ऑपरेशन ??? छे मुळीच नाही. 


रात्रीची जेवण झाली आणि शतपावली करण्यासाठी सोसायटीच्या Garden मध्ये जाण्यासाठी निघणार तेवढ्यात फोन आला.…. इतक्या रात्री कोणी फोन केला ?? असा विचार करतानाच फोन घेतला. समोरून सौ.जोग," अनुप्रिया अगं माझ्या भाच्याला हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल केलेय. संध्याकाळी खेळताना त्याचा पाय लचकला…. डॉक्टरकडे नेले तर त्यांनी ताबडतोब हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. आत्ताच त्याचा  Report  "Pulmonary Embolism" असा आलाय आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करावे लागेल म्हणून सांगितलेय. आम्हाला Tension आलेय ग. कारण खेळता खेळता जरासा पाय लचकला तर काय ऑपरेशनची गरज आहे का ?  तर जरा कुंडली बघून सांगतेस का ऑपरेशन करावे लागेल की नाही ?"  म्हटलं, "ठीक आहे बघून सांगते". 

[Pulmonary Embolism - In most cases, pulmonary embolism is caused by a blood clot in the leg that breaks loose and travels to the lungs.Pulmonary embolism is the sudden blockage of a major blood vessel (artery) in the lung, usually by a blood clot . In most cases, the clots are small and are not deadly, but they can damage the lungIf symptoms are severe and life-threatening, "clot-busting" drugs called thrombolytics may be used. These medicines can dissolve clots quickly, but they increase the risk of serious bleeding. Another option is surgery to remove the clot (embolectomy).]

मुळ कुंडलीपेक्षा प्रश्नकुंडली अचूक उत्तरे देते. त्यामुळे ज्या वेळेस सौ. जोग यांनी फोन केला होता त्यावेळची कुंडली मांडली. ती खालीलप्रमाणे, 

Ruling Planets : 

L - मंगळ  ५,१, ५, १२           न. स्वा.  केतू  ५,१, ५, १२ 

S - राहू  ११, ६, ७,११              न. स्वा.  गुरु  ६, २, ४ 

R - शुक्र ५, ६, ७, ११              न. स्वा.  शुक्र  ५, ६, ७, ११   

D - गुरु   ६,२,४                     न. स्वा.  चंद्र ११ 


  • षष्ठ स्थानाचा( रोग स्थान)    सब लॉर्ड  -  गुरु  ६,२,४             न. स्वा. ११ 
  • लाभ स्थानाचा (लाभ स्थान) सब लॉर्ड - शुक्र ५, ६, ७, ११          न. स्वा.  शुक्र  ५, ६, ७, ११   
षष्ठ स्थानावरून रोग,रोगाचे स्वरूप लक्षात येते. इथे षष्ठ स्थानाचा सब लॉर्ड गुरु आहे. गुरु हा ग्रह गाठीचा(Clots) कारक आहे. षष्ठ स्थानाशी गुरुचा संबंध आहे म्हणजेच शरीरात गाठ आहे. डॉक्टरांचे निदान बरोबर आहे. आता हे ऑपरेशन करावे लागेल की नाही हे बघू. 

 षष्ठ स्थान - गुरु  ६,२,४  गुरुचा  न. स्वा. ११  जर षष्ठ स्थानाचा अष्टमाशी संबंध असेल तर ऑपरेशन करावे लागते. वर रूलिंग मध्ये कुठेही कुठलाही ग्रह अष्टम स्थानाचा कार्येश नाही. त्यामुळे ऑपरेशन करावे लागणार नाही. परंतु १२ स्थान (१२ वे स्थान - बंधन, Hospitalisation,घरापासून दूर इ.) दर्शवत असल्याने हॉस्पिटलमध्ये काही काळ राहावे लागेल इतकेच. पंचम(रोगमुक्ती) आणि लाभ (११ स्थान - लाभ स्थान ) स्थान वरती रुलिंग मध्ये आहेत त्यामुळे लवकरात लवकर रोगमुक्ती आहे ती ही ऑपरेशन शिवाय. 

मी सौ. जोगना तसे सांगितले. त्यांच्या आवाजातली काळजी कमी झाली. दोन दिवसांनी त्यांचा फोन आला, "डॉक्टरांनी ऑपरेशनची गरज नाही असे सांगितलेय आणि औषधांनी गाठ Dissolve होईल असे म्हणालेत त्यामुळे बरेचसे Tension कमी झालेय". मी," वा great. मग आता कसा आहे भाचा ?". "हॉस्पिटलमध्येच आहे अजून. डॉक्टर म्हणताहेत काही दिवस त्याला ठेवावे लागेल इथे." 

इतके अचूक Prediction कृष्णमुर्ती पद्धतीने देता येते. काय Case Interesting वाटली ना? 


रविवार, २१ एप्रिल, २०१३

परदेशगमन योग

परदेशगमन योग 


आजकाल चांगली नोकरी कधी मिळेल हा प्रश्न विचारला तर जातोच त्याचबरोबर नोकरीनिमित्ताने परदेशात रहायचे योग आहेत का माझ्या कुंडलीत ???? हा प्रश्न सर्रास विचारला जातो. 

दिनेश प्रसिध्द अशा IT कंपनीत नोकरीला आहे. मागच्या सहा वर्षापैकी ३ वर्षे तो अमेरिकेला राहिला आहे. त्यानंतर काही कौटुंबिक कारणामुळे त्याला भारतात परतावे लागले.  भारतात परतल्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा त्याला अमेरिका ,तेथील राहणीमान याची आठवण येऊ लागली. बरयाचदा मी हे ऐकते आणि पाहिले आहे कि एकदा अमेरिकेला गेल्यावर तिथल्या राहणीमानाची लोकांना सवय होते. मग त्यांना भारतात करमेनासे होते. दिनेशलाही आता अमेरिकेचे वेध लागले होते परंतु गेल्यावेळेस तडकाफडकी भारतात निघून आल्याने वरिष्ठ त्यावर नाराज होते. आता करायचे काय ? जायचे तर अमेरिकेला आणि वरिष्ठ जाऊ देत नाहीत आणि त्यात त्याने जाऊ नये म्हणून इथले म्हणजे भारतातले काही Projects त्याला देण्यात आले. आता ही गुगली होती कारण एकदा हा Project हातात घेतला कि वर्षभर तरी त्याची रवानगी अमेरिकेला नाही आणि Project वर काम करणार नाही असे म्हणूनही चालणार नाही. कारण त्याने Ratings वर परिणाम झाला असता. मग आता ????? 

दिनेश अगदी बारीकसा चेहेरा करून मला विचारात होता …मी  कधी जाऊ शकेन ? मी इथे आता जास्त काळ नाही राहू शकत. काय सांगतेय माझी कुंडली?? कुंडलीवरून ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यापेक्षा प्रश्नकुंडलीवरून हा प्रश्न सोडवावा म्हणून मी प्रश्नकुंडली मांडली. 

तूळ लग्नाची कुंडली. ज्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नाही त्यांच्यासाठी :  जेंव्हा जातक मनापासून प्रश्न विचारतो तेंव्हा कुंडली तसे Reflect करते. चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यामुळे जातकाने जरी काही प्रश्न स्पष्टपणे ज्योतिषाला नाही विचारले तरी चंद्र प्रश्नकुंडलीत व्यवस्थितपणे जातकाच्या मनाचे प्रतिबिंब दाखवतो. तर इथे तुळ लग्न. चंद्र स्वतः षष्ठ स्थानात (नोकरीचे स्थान ) चंद्राची कर्क राशी लाभ स्थानात. म्हणजेच नोकरीत त्याला अपेक्षित आहे त्याचा त्याला लाभ होणार आहे. खाली त्यादिवशीचे रूलिंग मांडतेय. रूलिंग म्हणजेच प्रश्न विचारल्येला दिवशीचे Dominating Planets. तर रूलिंगज़   खालीलप्रमाणे :

L  - शुक्र ८, १, ८          न. स्वा. चंद्र ५, १० 

S  - शनि १२, ४, ५      न.स्वा. मंगल १०, २, ७ 

R  - गुरु ७, ३, ६          न.स्वा. शुक्र ८, १, ८ 

D  - बुध  ५, ९, १२       न. स्वा. शनि १२, ४, ५ 

कुंडलीतील बारावे स्थान हे जन्मठिकाणापासून दूर जाण्याचे योग दर्शवतो. जर जातकाला भारताबाहेर जायचे आहे तर बारावे स्थान हे बलवान हवे. [फार ज्योतिषशास्त्राचे "किचकट" गणित इथे संपूर्णपणे उलगडत नाहीये कारण त्यामुळे ज्योतिषाचा अभ्यास नसलेल्यांचा Interest जाईल.]  इथे बुध १२ व्या स्थानाचा निर्देशक आहे आणि तो शनिच्या नक्षत्रात आहे. शनि सुद्धा १२व्या स्थानाचा निर्देशक. 

हा प्रश्न मला दिनेशने गेल्या एप्रिलमध्ये विचारला होता. येणारया दशा सप्टेंबर व ऑक्टोबर ह्या काळात अमेरिकेला दिनेश जाईल असे चित्र होते. आता हे दिनेशला सांगायचे म्हणजे पंचाईत कारण दिनेशला उद्याच जा असे Managerने म्हटले असते तरी त्याची तयारी होती. अशा व्यक्तीला सांगायचे अरे तुला पाच महिने तरी निदान थांबावे लागेल. शास्त्राचे नियम चुकत नाहीत. त्याला स्पष्टपणे सांगितले, "दिनेश तुला जरी घाई असली तरी नियतीने तुझे अमेरिकेला जाणे सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या दरम्यान ठरवलेले आहे." चेहेरा हिरमुसलेला झाला पण इलाज नाही. "ठीक आहे बघू ", असे म्हणून दिनेश निघाला त्याला काही मंत्र व उपाय दिले. 

मे व जुन महिना दिनेश अथक प्रयत्न करत होता पण त्याला दाद मिळत नव्हती. तोपर्यंत त्याच्या managerने त्याची वरती तक्रार केली होती ती न जुमानता दिनेशचे प्रयत्न सुरूच राहिले. ह्या प्रयत्नांना यश मिळाले आणि त्याला अमेरिकेचा Project मिळाला आणि तोही जुलैच्या पहिल्या आठवड्यात. दिनेशचा आनंदाने मला फोन आला पण एक गडबड होती. आता Project तर मिळाला परंतु तोपर्यंत दिनेशचा Visa संपला. [शक्यतो ज्यांचा Visa  आहे त्याच व्यक्तीला Project दिला जातो परंतु इथे दिनेशने काही प्यादी वेगळ्या पद्धतीने हलवली होती.] आता Visaची वाट बघा. Visaसाठी दिनेशला मद्रासला जावे लागले तिथे सगळ्या तांत्रिकी गोष्टी झाल्या आणि काही दिवसातच Visa मिळेल म्हणून सांगण्यात आले. सप्टेंबर उजाडला. दिनेशला धाकधूक होती. सप्टेंबर आला तसा गेला आणि दिनेशचा Patience संपला. कारण Project Manager चा सतत फोन येत होता. 

ऑक्टोबरच्या पहिल्या तारखेला दिनेशशी  माझे बोलणे झाले त्याला म्हटले जरा थांब. सांगितलेली उपासना सुरूच ठेव. ऑक्टोबर गेला नाहीये. त्याला कसला धीर,"ताई ही संधी गेली तर माझे Rating खूप कमी होईल. इथे मला त्रास देतील तो वेगळाच कारण इतके महिने इथल्या कुठल्याही Project ला मी हात लावलेला नाही." मी जास्त काही म्हणाले नाही कदाचित काळ उत्तर देईल. आठ ऑक्टोबर उजाडला आणि सकाळी सकाळी मला दिनेशचा फोन आला ती खुशखबर देण्यासाठी. त्याला Visa ही मिळाला आणि १४ ऑक्टोबरचे तिकीटही मिळाले. खूप खुश होता दिनेश आकाश ठेंगणे झाले होते त्याला त्यादिवशी. 

नेहेमीप्रमाणे शास्त्राने आपले काम चोख बजावले. मी संपूर्णपणे नतमस्तक आहे आणि तुम्ही ????
 कळवा मला इथे नक्की  : anupriyadesai@gmail.com 

NOTE : Ruling मध्ये शनि आहे. जरी तो १२ स्थानाचा कार्येश होतोय तरी शनिचे नैसर्गिक गुणधर्म "विलंब करणे" हा आहे त्यामुळे दिनेशला Visa मिळण्यास विलंब झाला. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

मंगळवार, १६ एप्रिल, २०१३

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा  



सकाळी ११. ३० ची appointment आवरली आणि मी नेहेमीचे वाचन सुरु केले तेवढ्यात शीतलचा फोन. " मला तुमचा नंबर माझ्या मैत्रिणीने दिला. तुम्ही कुंडली पाहता ना ? मला तुम्हाला भेटायचे आहे … कधी येऊ शकते ?"  तिला दोन दिवसांनंतरची appointment दिली. ठरल्यावेळी शीतल आली आणि तिच्या चेहेऱ्यावरचे tension बघून मी समजले काहीतरी मोठा Problem आहे. (आणि Problem नसेल तर ती माझ्याकडे आली कशाला असती ??) उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे गार पाणी दिले थोडा वेळ जाऊ दिला. ती जरा शांत झाली.


तिच्या पत्रिकेवर दृष्टीक्षेप टाकला असता दशमातील तुळ  राशीतील शुक्र व राहू युति कुंडलीचा वेगळेपणा  सांगून गेली. तिला विचारले तुझे काही सौंदर्यप्रसाधना संदर्भात कामकाज आहे का ? ती हसली आणि म्हणाली ,"हे समजते कुंडलीवरून ????"  म्हटलं …"त्यालाच कुंडली म्हणतात." तर तिची नोकरी ही अत्तराशी संबंधात होती. अत्तर म्हणजेच आताच्या भाषेत "Perfume"च्या  कंपनीत हिचे काम चांगल्या दर्जाचे सुगंध निवडणे. पुढे त्यावर Processing होऊन Brand Name वगैरे वगैरे…सप्तमात असलेला कर्केचा शनि बुधाच्या नक्षत्रात. सप्तम स्थान प्रत्येकाच्या Married Life ची Story सांगते.फक्त शनि आला म्हणून वाईट नाही परंतु कुंडली बघितल्यावर हे लक्षात आले का सप्तमाचे जे अष्टम स्थान आहे म्हणजे जिथे कुंभ ही राशी आहे आणि त्याचा स्वामी शनि सप्तमात आला आहे. शनि स्वतः बुधाच्या नक्षत्रात. (बुध म्हणजे Duality. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा दोनदा effect मिळणे. ज्यांच्या कुंडलीत बुधाचा सप्तम स्थानाशी संबंध येतो व बाकी ग्रहही पूरक असतील तर व्यक्तिचा दोनदा विवाह होतो.) सप्तम स्थानात कर्क रास. कर्केचा स्वामी चंद्र हा कुंभ राशीत आहे व कुंभेचा स्वामी शनि आत्ताच पाहिले …. बुधाच्या नक्षत्रात.

आत्ता पारंपारिक ज्योतिषीय पध्दतीने मला तिची व्यथा समजली परंतु म्हटले कृष्णमुर्ती पध्दतीनेसुद्धा बघू. म्हणून कृष्णमुर्ती पध्दतीचे Significator Page काढले आणि इथे मी ठाम झाले कि इथे ती तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलयला आली आहे. सप्तमाचा सब लॉर्ड रवि आणि तो अष्टम स्थानाचा बलवान कार्येश.  मागच्या एका लेखात मी सांगितले होते अष्टम स्थान म्हणजे अडथळे,अपघात,प्रचंड मनःस्ताप कधीतर मृत्यूच.  मृत्यू म्हणजे काय?? एखाद्या गोष्टीचा अंत म्हणजे मृत्यू. इथे वैवाहिक जीवनात बरीच वादळे येऊन शीतलला प्रचंड मानसिक त्रास झालेला असण्याची शक्यता आहे. बरे हा मानसिक त्रासाचे कारण काय ते तरी बघुया म्हणून तिच्या पंचम स्थानावर दृष्टी टाकली आणि उत्तर सापडले. पंचम स्थान म्हणजेच संतत्ती स्थान. लग्नानंतर काही वर्षात होणारया बाळाची सर्वचजण वाट बघत असतात. हिच्या पंचम स्थानात गुरु तोही वक्री. गुरु ज्या स्थानात असतो त्या स्थानाची फळे नष्ट करतो. पंचम स्थानावर मंगळासारख्या ग्रहाची आठवी दृष्टी. कृष्णमुर्ती पध्दतीने पंचमाचा सब लॉर्ड सुद्धा गुरुच असून तो चतुर्थ व व्यय म्हणजेच प्रतिकूल भावांचा कार्येश आहे. तेंव्हा हिला Pregnancy राहिली तरी पुढे धोका आहे. म्हणजेच Miscarriageचे योग आहेत. सगळी कहाणी लक्षात आल्यावर तिला तसे विचारले आणि ती स्तब्ध झाली. मला उत्तरे मिळाली. 

लग्नाला ९ वर्षे झाली तरी शीतलच्या घरी बाळाचे आगमन झाले नव्हते. मधल्याकाळात तिला दोनदा Pregnancy राहिली परंतु दोन्ही वेळेस Miscarriage झाले. डॉक्टरांनी तिला पुढे कधीही बाळ होणार नाही हे सांगितले. त्यामुळे तिच्या सासरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले होते.परंतु माणूस आशेवर जगतो. पुढे काही आशा आहे का हा तिचा प्रश्न होता. येणाऱ्या पुढील दशा- अंतर्दशा ह्या संततीसाठी पूरक नाहीत ह्याची तिला स्पष्ट कल्पना दिली.  काही वेळेस खूप स्पष्ट बोलावे लागते कारण जातकाला त्या स्पष्टपणाची गरज  असते.  

तिला बाळ होत नाहीये म्हणून तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली गेली होती. भविष्यात काय लिहिले आहे हे जाणून घेऊन तिला निर्णय घ्यायचा होता. तिला तिचे उत्तर मिळाले आणि मला ग्रहांनी पुन्हा एकदा प्रचिती दिली. धन्य ते शास्त्र आणि धन्य ते के एस कृष्णमुर्ती  ज्यांच्यामुळे इतके अचूक भविष्य सांगता येते आणि त्यामुळे आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेण्यास मदत होते. 

Note : सप्तम स्थानही बिघडलेले असल्याने इथे घटस्फोट मिळणार हे निश्चित आहे. 

तिची कहाणी ऐकल्यावर मनात आले, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा 

कशी वाटली ही Case?? नक्की कळवा - anupriyadesai@gmail.com

मंगळवार, २ एप्रिल, २०१३

कुंडली दोष नाही हा तर वास्तू दोष


कुंडली दोष नाही हा तर वास्तू दोष 

बरेच दिवस वास्तूवर काही लिहिले नाही म्हणून वाचकांकडून विचारणा होत होती. आजचा प्रपंच त्यासाठीच. 
एकदा एक जोडपे मला भेटण्यासाठी आले होते. नील स्वतः डॉक्टर आणि परी इंजिनीअर . लग्नाला तीन वर्षे झाले तरी बाळाची चाहुल लागली नव्हती. घरचे,मित्रमंडळी, नातेवाईक सगळे विचारणा करत होते.  "Planning" आणि "Carrier" च्या नावाखाली नील व परी पुढचे बोलणे टाळत. परंतु आतल्याआत दोघांनाही ही गोष्ट खात होती. सगळ्या चाचण्या झाल्या. दोघांचे "Reports" अगदी Normal. मग असे का होतेय ते काळात नव्हते. त्यासाठी दोघे आले होते.

दोघांच्या कुंडल्या व्यवस्थित अभ्यासल्यानंतर मला जाणवले की दोघांच्या कुंडलीत तर काहीही दोष नाही मग… .? ? मग मी हा प्रश्न  "प्रश्नकुंडलीप्रमाणे" सोडवण्यासाठी त्यावेळेची प्रश्न कुंडली मांडली. माझ्याकडे आज त्याचे Records नाहीत. परंतु एक गोष्ट ठळकपणे त्या कुंडलीत जाणवली होती ती म्हणजे पूर्व दिशा व आग्नेय दिशा ह्यात दोष असावा. "तुमच्या घरी पूर्वेला काही जड वस्तू आहे का? मुख्यप्रवेशद्वार कुठे आहे ?" असे प्रश्न विचारल्यानंतर कोणाकडूनही उत्तर नाही. आज डॉक्टर आणि इंजिनीअर असलेल्या जोडप्याला पूर्व दिशा सांगता न यावी ???? कमाल आहे …..  त्यावर नील उत्तरला,"तुम्ही आमच्या घरी येऊ शकाल का ?"   मग वास्तू परिक्षणाचा दिवस ठरला.


ईशान्य दिशेत असलेले प्रवेशद्वार, पूर्णपणे बंद असलेली पूर्व दिशा व आग्नेय कट अशी नीलची वास्तू. 


१) पूर्व दिशा म्हणजे उर्जेचं स्त्रोत. सुर्य ह्या दिशेने उदय होतो व समस्त जगाला जगण्याची ऊर्जा,उर्मी व उत्साह देतो. अशी पूर्व दिशा नीलच्या घरी पूर्णपणे बंद होती म्हणजेच ह्या दिशेत एकही खिडकी नव्हती. पूर्व दिशेत जर दोष असेल तर घरातील पुरुषांचे वर्चस्व कमी होते,ठाम Decision घेत येत नाही, अत्यंत मानसिक गोंधळ होतो. 

२)ईशान्य दिशा म्हणजेच ईश्वराची दिशा. ईश्वर सर्व दिशेस असतो परंतु इथे ईशान्य दिशेत "Positive Energy" च्या संदर्भात आपण ही दिशा विचारात घेतो. साहजिकच इथे देवघर किंवा तत्सम चांगल्या गोष्टी असल्या तर घरातील चांगल्या उर्जेचा प्रवाह वाहण्यास मदत होते. नीलच्या घराचे प्रवेशद्वार नेमके ईशान्य दिशेत. आता तुम्ही म्हणाल ईशान्य दिशेत प्रवेशद्वार चांगली गोष्ट आहे ना Boss. वरकरणी चांगली वाटत असली तरी प्रवेशद्वार म्हणजेच वास्तूला त्या दिशेत कट आला असे वास्तुशास्त्र सांगते. ईशान्य दिशेत आलेल्या ह्या कटमुळे कर्त्या पुरुषाच्या प्रगतीत अडथळे येतात. 

३)आग्नेय दिशेत मोठी खिडकी होती. इथेच मोठी गोम होती. आग्नेय दिशेत जर कट असेल म्हणजेच खिडकी/मुख्य-प्रवेशद्वार असेल तर वंश वाढण्यास बरेच अडथळे निर्माण होतात. आग्नेय म्हणजेच अग्नि. ह्या दिशेतल्या दोषांचे परिणाम घरातील स्त्रियांना भोगावे लागतात. स्त्रीला पोटाचे विकार/तक्रारी सुरु होतात. 

ह्या सर्व गोष्टी मी नीलला विचारल्यानंतर त्याने हे मान्य केले कि ह्या वास्तूत आल्यापासून त्याला नोकरीत खूप त्रास होत होता. सात महिन्यांपुर्वीच त्याला परदेशात नोकरी मिळाली होती. पगार चांगला व इतर सुविधाही होत्या परंतु दोन वर्षांसाठी तिथे गेलेल्या नीलला चार महिन्यातच करमेनासे झाले व तो तडकाफडकी इथे निघून आला. इथे आल्यानंतरही त्याला काही ठरवता येईना. ( पूर्व दिशा दोष - निर्णयक्षमता कमकुवत), परीला नुकतीच नवीन नोकरी लागली होती परंतु तब्येतीच्या वारंवार तक्रारीमुळे तिला कामावर लक्ष केंद्रित करता येईना. तब्येतीच्या काय तक्रारी आहेत असे विचारल्यावर परीने सांगितले तिला गर्भाशयात "Fibroids" आहेत व त्याची Treatment चालू आहे. ( आग्नेय दोष  - स्त्रियांना पोटाचे विकार/ तक्रारी) सर्व कहाणी लक्षात आल्यानंतर नील व परीला वास्तुदोष नीट समजावले. त्यावरील उपाय काय आहेत ? कसे करायचे इ. त्यांना explain केले. त्यांनाही ते पटले. 

वास्तू-दोष परिहाणार्थ  काढलेल्या मुहूर्तावर काही ठराविक धातू - रत्ने दोष असलेल्या ठिकाणी मंत्रोच्चार करून पुरण्यात आली. नील व परीला काही स्तोत्रे दररोज वाचण्यास सांगितली. 

त्यानंतर दोन महिन्यांनी परीच मला भेटण्यास आली. काही बोलण्याच्या आधीच तिच्या चेहेरयावरील तेजस्वीपणा व टवटवीतपणा गोड बातमी सांगत होता. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नील भेटायला आला तोच पेढे घेऊन… "मुलगा झालाय …. बारसे आहे ३० नोव्हेंबरला.. तुम्ही यायचेच… कुंडली तुमच्याकडून बनवून घ्यायची आहे."  त्याला कुंडली बनवून दिली व बाळासाठी काही नावेही सुचवली. त्याला बारश्याला येण्याचे आश्वासन दिले व मनोमन शास्त्राला दंडवत घातला. 

काय ?? तुम्हीही मानले कि नाही ? मग कळवा मला ह्या ई-मेल ID वर - anupriyadesai@gmail.com
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

मंगळवार, २६ मार्च, २०१३

कधी होणार मी आई ??

कधी होणार मी आई ??


नोकरी - व्यवसाय ह्यावर आपण मागील लेखात काही उदाहरणे पहिली आज आपण कुंडलीतल्या "पंचम स्थानावर" अभ्यास करणार आहोत. पंचम स्थानावरून खालील गोष्टी कळू शकतात  : 
१) पंचम स्थान म्हणजे प्रेम (निःस्वार्थी प्रेम) २) संतत्ती होणार की नाही ? ३) होणारी संतत्ती कशी असेल ? मतिमंद तर नसेल ना ?  इ. गोष्टी पाहता येतात. 

पण ह्या पंचम स्थानाचा संबंध जर "लाभ" स्थानाशी असेल तर संतत्ती होण्यास काही त्रास नसतो. परंतु पंचमाचा संबंध जर "अष्टम", "चतुर्थ" किंवा "व्यय" स्थानाशी आला तर मात्र संतत्ती होण्यास त्रास असतो. आता हा त्रास म्हणजे नक्की काय तर, 
१) काही वेळेस कुंडलीतल्या बाकी योगांबरोबर पंचम स्थान जर अष्टमाशी व लाभ स्थानाशी निगडीत असेल तर संतत्ती होते परंतु पाहिल्यावेळेस "Miscarriage" होण्याची शक्यता असते किंवा संतत्ती होते परंतु "सिझरियान" पद्धतीने.  
२) जर पंचमाचा चतुर्थ व व्यय स्थानाशी संबंध आला तर "Miscarriage" तर होतेच परंतु पुन्हा "Conceive" होण्यासाठी व झाल्यावर प्रचंड काळजी घ्यावी लागते.  

आज आपण अश्याच एका कुंडलीचा आढावा घेणार आहोत ज्या कुंडलीत पंचम स्थानाशी निगडीत चतुर्थ व व्यय स्थाने असून एकदा "Abortion" करावे लागले व नंतर संतती झाली आहे. आज पारंपारिक व कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडलीचा अभ्यास करणार आहोत : 

ज्योतीची कुंडली 

पारंपारिक पद्धतीने : मिथुन लग्न व कुंभ राशीची ही कुंडली आहे. ह्या कुंडलीत पंचम स्थानात शनि व रवि सारखे ग्रह आहेत. पंचमात तुळ रास व त्या राशीचा मालक शुक्र स्वतः "चतुर्थ" स्थानात. (वरती आपण पहिलेच कि पंचमाचा जेंव्हा चतुर्थाशी संबंध येतो तेंव्हा संतत्ती होण्यास त्रास असतो.) 

कृष्णमुर्ती पद्धतीने : पंचम स्थानाचा उप-नक्षत्र स्वामी  (Sub Lord) हा शनि आहे व शनि पुढीलप्रमाणे कार्येश : शनि - ४,८,९ . शनि स्वतः राहूच्या नक्षत्रात व राहू - १ ,५,१२. तुमच्या लक्षात आलेच असेल इथेही पंचमाचा चतुर्थ व अष्टम स्थानाशी संबंध आला आहे. 

 वरील नमूद केलेल्या योगांमुळे ह्या स्त्री जातकाला( नाव : ज्योती) गर्भधारणा झाली परंतु ही गोड बातमी तिला स्वतःला कळण्या आधी एक घटना घडली. ज्योती नेहेमीप्रमाणे कामावर जात असताना तिला पोटात दुखू लागले परंतु फारसे दुखत नसल्याने तिने दुर्लक्ष केले व नेहेमीचे तिचे Jobचे  Routine सुरु झाले. दुपारी जेवणानंतर तिच्या पोटात जास्तच दुखू लागले. Office मधून सुट्टी घेऊन डॉक्टरांकडे जावे असे तिने ठरवले व ललितलासुद्धा  (नवरयाला ) तसे कळवले.  Office मधून निघून रेल्वेचा प्रवास करत(याही परिस्थितीत) ज्योती घरी आली. नेहेमीच्या डॉक्टरनी तपासल्यावर ताबडतोब Hospital मध्ये Admit करण्यास सांगितले. Hospital ला पोहोचेपर्यंत ज्योतीची शुद्ध हरपली. आता सर्वांना गांभीर्याची कल्पना आली व ज्योतीची काळजी वाटू लागली.

तिच्या सर्व तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून ललितला धक्का बसला. ज्योती गरोदर होती व दीड महिना उलटून गेला होता. (मुलींना pregnancyची news दीड ते दोन महिन्यानंतर  कळते.) आणि बाळची वाढ ही गर्भाशयात न होता Fallopian Tube मध्ये होत होती ज्यामुळे बाळ वाढू शकले नाही व अंतर्गत रक्तस्त्राव सुरु झाला व ज्यामुळे ज्योतीच्या जीवालाही धोका निर्माण झाला. वेळीच ज्योती हॉस्पिटलमध्ये दाखल झाली व परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली. काही दिवसांच्या उपचारानंतर ज्योतीला घरी पाठवण्यात आले व पुढचे काही महिने आराम व काळजी घेण्यास सांगितले.

ह्या सगळ्या घटनेनंतर जेंव्हा ज्योती मला भेटण्यास आली तेंव्हा तिला काही उपाय व एका स्तोत्रचे पठण नियमित करण्यास सांगितले. मधल्या काही महिन्यांनतर ज्योतीचा फोन आला तो गोड बातमी देण्यासाठी परंतु बातमी देताना तिच्या आवाजात काळजीही मला स्पष्ट ऐकू येत होती. तिला दिलेल्या स्तोत्राच्या पठणाची  पुन्हा आठवण करून दिली व हे ही सांगितले की तुला संतत्ती होईल, सिझर करावे लागेल त्यामुळे तशी मनाची तयारी ठेवणे.  

म्हणजे पहा ग्रह आपले काम कसे चोख निभावतात. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ललितचा फोन आला, हसता हसता म्हणाला," मुलगा झाला. तुम्ही म्हणल्याप्रमाणे सिझर करावे लागले. ज्योतीची तब्येतही व्यवस्थित आहे. बाळाबरोबर भेटायला येऊ नक्की".

कशी वाटली ही Case ? नक्की कळवा मला माझ्या ई-मेलवर - anupriyadesai@gmail.com

Bye


 Note : 

इथे पंचम स्थानाचा सब-लॉर्ड शनि हा  ४,८,९ चा कार्येश असून राहूच्या नक्षत्रात आहे व राहू पंचमाचा कार्येश आहे. त्यामुळे आधी Abortion करावे लागले परंतु नंतर संतत्ती झाली. 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com


READERS ALL OVER THE WORLD