बुधवार, २२ मे, २०१३

कोणीतरी आहे तिथे - एक हटके Case

कोणीतरी आहे तिथे - एक हटके Case 

दोन वर्षापूर्वी माझ्याकडे एक विचित्र Case आली होती. विचित्र ह्यासाठी कारण प्रश्नच असा विचारला गेला होता. वैशाली माझ्याकडे २०१० च्या ऑगस्टला आली होती. "मी कुंडलीबद्दल नाही माझ्या घराबद्दल विचारायला आले आहे. तीन वर्ष झाली मला ह्या घरात. घर अतिशय छान आहे. प्रशस्त आहे. पण हॉलमधून किचन मध्ये जाताना जो Passage आहे तिथे एक विचित्र वास येतो. कुबट किंवा काहीतरी जाळल्यासारखा नाहीतर काहीतरी सडल्यासारखा." 
मी (गेल्या इतक्या वर्षांच्या consultation मध्ये पहिल्यांदा असा प्रश्न मला विचारला गेला)  म्हटले," घरी उंदीर वगैरे येतात का ?? किचन मध्ये जाताना वास येतो मग passage च्या बाजूलाच बाथरूम वगैरे आहे का ?" 
वैशाली," हो बाथरूम आहे. पण बाथरूम मध्ये check केले. हा वास तिथे येत नाही. आणि मलाही पहिल्यांदा उंदराचाच संशय आला त्यामुळे बरेच महिने Rat kill, Pest Control केले. पण काही फायदा झाला नाही."
"मग किचनमध्ये सिंक वगैरे खराब झालेय का ?" मी. 
वैशाली,"ते ही तपासून झालेय. पण हा वास संध्याकाळीच ६ ते ७ च्या दरम्यान येतो नंतर पुन्हा सगळे normal."
माझा बापुडा प्रश्न,"मग तुमच्या building मध्ये काही Drainage pipes खराब झालेत का?"
वैशालीचा कंट्रोल  सुटला,"नाही हो गेले तीन वर्ष हाच वास ठराविक वेळेस घरात त्या passage मध्येच येतो. सबंध घरात कुठेही हा वास येत नाही. संध्याकाळी ६ आणि ७ च्या दरम्यान हा वास येतो. अत्यंत असह्य असा वास आहे. अर्धवट जळल्यासारखा आणि सडल्यासारखा. पेस्ट कंट्रोल, Drainage Pipes, सिंक सगळे check  करून झालेय. कुठेही प्रोब्लेम नाही कारण बाकी घरात कुठेही हा वास येत नाही. १ तास हा वास continue राहतो मग आपोआप बंद होतो. घरी पाहुणे,मित्र-मंडळी सगळयांना हे जाणवले आहे. आता बरेचजण  घरी येण्यास पण नाकारतात. मलाही मग नको नको ते विचार येतात. मला लहान मुलगा आहे. तो शाळेतून घरी ५.३० पर्यंत येतो. मला कामावरून घरी पोहोचेपर्यंत ६.३० होतात. तोपर्यंत तो घरी एकटाच असतो त्यामुळे भीती वाटते. धावपळत घरी पोहोचते. कधी उशीर झाला कि खूप tension येत. घर बदलूही शकत नाही. कारण सध्या माझी तेवढी मिळकत नाही."
मी म्हटले,"ठीक आहे. तुमची समस्या तर समजली पण ह्यावर जे उपाय आहेत ते करण्याची तयारी आहे का ?" 
वैशाली," तुम्ही सांगा मी ते उपाय करते. कारण घर बदलू तर शकत नाही मग घरात जर काही उपायांनी ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या तर खरेच माझे खूप मोठे Tension दूर होईल." 
म्हटले," सर्वात पहिले घरात तुमच्या म्हणण्याप्रमाणे अनाहूत शक्ती आहे असे आपण समजू. जर तसे आहे तर
 १)घराची फारशी दिवसातून दोन्ही वेळेस खड्या मिठाने पुसून घ्या. (मीठामुळे  घरातील नकारात्मक उर्जा निघून जाण्यास मदत होते.) साधा वाटत असला तरी खूप effective उपाय आहे.  
२)संध्याकाळी घरी आल्यानंतर घरातील प्रत्येकाने पाय स्वछ धुतलेच पाहिजेत. 
३) सांजवात घरी झालीच पाहिजे. 
४) सर्वात महत्वाचे घरात रामरक्षा संध्याकाळच्या वेळेस म्हटली गेली पाहिजे. आपल्या स्तोत्रात बरीच अशी शक्ती आहे ज्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा थारा घरात राहत नाही. जर रामरक्षा म्हणता येत नसेल तर बाजारात ह्याची CD मिळते ती संध्याकाळच्या वेळेस सुरु ठेवावी. 
५) हनुमान चालीसा रोज सकाळी किंवा संध्याकाळी वाचावी आणि वाचताना हनुमान चालीसाचे पाणी तयार करावे. हे पाणी घरातील सर्वांनी पायचे आणि उरलेले पाणी संपूर्ण घरात शिंपडणे. 
६) दोन - तीन महिन्यातून एकदा तरी सप्तशतीचा पाठ गुरुजींकडून करून घेणे. 
हे सगळे करून पहा. एक दोन महिन्यात फरक पडावयास हवा. फरक नाही जाणवला तर कळवा मला."

वैशालीने निट सगळे लिहून घेतले. मधले बरेच महिने तिचा काही फोन आला नाही. २०१२ च्या डिसेंबर मध्ये वैशालीचा फोन आला. " भावाची कुंडली तुम्हाला दाखवायची आहे. लग्नाचे योग वगैरे." 
म्हटले,"ठीक आहे. ह्या रविवारी जमेल का?" 
भेटण्याची वेळ ठरली. तिला घराबद्दल विचारावेसे वाटले पण म्हटले ती येतेच आहे तेंव्हा विचारू. 
ठरल्यावेळी वैशाली आली. भावासंदर्भात बोलणे वगैरे झाले. मग तिला घराबद्दल विचारले. 
वैशाली हसत हसत म्हणाली," अहो काय सांगू. इतके वर्ष आम्ही इतके त्रस्त झालो होतो त्या वासाने. कळतच नव्हते वास कुठून येतोय. नको नको त्या शंका यायला लागल्या होत्या. घर सोडावे लागणार असे वाटत असतानाच तुमचा नंबर माझ्या मैत्रिणीने दिला. तुम्ही दिलेले उपाय केले आणि दीड महिन्यातच वास आपोआप बंद झाला. एवढे साधे वाटणारे उपाय इतके effective असतील असे वाटले नव्हते."
मी म्हटले," ही स्तोत्र म्हणजे आपल्या पूर्वजांनी देलेली अमुल्य अशी भेट आहे. घरात येणारा वास बंद झाला म्हणून उपाय बंद करू नका. सप्तशती पण सूरु  आहे ना ?"
वैशाली," उपाय आणि बंद ??? नाही अजिबात नाही. हे उपाय सुरु केल्यानंतर आम्हालाही खूप प्रसन्न वाटतेय. मनावरची मरगळ गेलीये. खूप प्रसन्न वाटतंय. सप्तशती सुरु आहेच. गुरुजींना सांगूनच ठेवले आहे. गेल्या दोन वर्षात तर ह्याची सवय झालीये. thanx to you अनुप्रिया."
"अरे मला काय thanx ??? हे तर त्या स्तोत्रांची कमाल आहे. continue ठेवा म्हणजे झाले."
खूप आनंद झाला हे सर्व ऐकून. आपली शास्त्र/स्तोत्रं ह्यात खूप ताकद आहे. काही लोकांचा ह्यावर विश्वास नाही. काहींचा विश्वास ठेवायचा कि नाही ह्यात संभ्रम आहे. कदाचित उद्या अमेरिकेने सिद्ध करून दाखवले कि हे लोक त्यावर विश्वास ठेवतील. काहीना ही अंधश्रद्धा वाटू शकेल. पण इथे फार मोठे कुठलेही अवडंबर/शांती/खर्च न सांगता घरच्या घरी करता येणारा,खर्चिक नसलेला उपाय सांगितला आहे आणि ज्या घरात तीन वर्ष सतत त्रास होता तिथे हे उपाय केल्यानंतर गेले दोन वर्ष त्रास कमी नव्हे बंद झालेला आहे ह्याची नोंद घ्यावी.

लोकांना असाच शास्त्राचा फायदा होवो ही सदिच्छा.                 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

शुक्रवार, १७ मे, २०१३

ईशान्य Toilets - वास्तू महादोष

ईशान्य Toilets - वास्तू महादोष


गेल्या लेखात पंचमहाभूते किंवा पंचतत्व ह्या बद्दल आपण वाचलेत. आज तुम्हाला एक Case सांगणार आहे ज्या वास्तूत ईशान्येला व पूर्वेला  Toilets आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम गृहस्वामिनी तसेच मुलांच्या तब्येतीवर कसा झाला ते पाहू. ह्या वास्तूबद्दल एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही वास्तू दिशाहीन आहे म्हणजेच पूर्व -पश्चिम -उत्तर -दक्षिण ह्या मुख्य दिशा ह्या वास्तूच्या चार कोपरयात निर्देशित आहेत. अशी वास्तू कुठल्याही मुख्य दिशेची सकारात्मक उर्जा वापरू शकत नाही. त्यामुळे शक्यतो अशी वास्तू घेणे टाळावे. 

ही Case सांगण्याआधी तुम्हाला background सांगते. जाधव कुटुंब आधी एकत्र कुटुंब पद्धतीने राहत होत. म्हणजे आई वडील,दोन भाऊ- सत्यम आणि निलेश. मोठया भावाची म्हणजेच सत्यमची बायको,दोन मुले असा परिवार 1BHK मध्ये रहात होता. छोट्या  भावाच्या लग्नाची बोलणी सुरु झाल्याबरोबर सत्यमने दुसरे घर शोधायला सर्वात केली. काही महिन्यातच सत्यमला एक घर आवडले. भावाचे लग्न झाले की रहायला येऊ असा plan होता. निलेशचे लग्न झाले आणि सत्यमही नवीन घरात रहायला आला.

काही दिवसांनी रेश्माला (सत्यमची बायको) पोटात खूप दुखू लागले. तपासणीत समजले तिच्या Appendixचे ऑपरेशन करावे लागेल. ऑपरेशन झाले रेश्मा घरी आली. एक दोन महिने व्यवस्थित गेले. रेश्माच्या भावाचे लग्न ठरले म्हणून रेश्मा आणि मुले लग्नाला गेले होते. तिथे मुलांच्या मस्तीत रेश्माच्या मुलीचा पाय बाईकच्या चाकात अडकला आणि Fracture झाले. लग्न सोडून हॉस्पिटलच्या फेऱ्या सुरु झाल्या. तिचा पाय बरा होतो न होतो तोच मुलाला काविळ झाली. दोन- तीन महिन्यांनी सत्यमला त्याच्या कपाळावर एक गाठ जाणवली. डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन करण्यास सांगितले. त्यातच सासूबाई बाथरूम मध्ये पडल्या आणि त्यांचा हात Fracture झाला. कहाणी वाटत असली तरी हे सत्य आहे. मी जेंव्हा हे ऐकले तेंव्हा मलाही खूप आश्चर्य वाटले. 

ह्यानंतर रेश्मा माझ्याकडे आली होती. सगळे कथाकथन झाल्यानंतर घरातील सगळ्यांच्या पत्रिका मागवून घेतल्या. पत्रिका अभ्यासल्यानंतर मी रेश्माला फोन केला तेंव्हा कळले रेश्माचा पाय Fracture झाला आहे. रेश्माला त्यानंतरच्या भेटीत मी वास्तूबद्दल विचारणा केली. तेंव्हा तिने घराचा नकाशा काढण्याचा प्रयत्न केला पण ती दिशा व्यवस्थित सांगू शकली नाही. मग वास्तू Visit चा दिवस ठरवून तिच्या घरी गेले. 
सत्यमची वास्तू 

अत्यंत स्वच्छ आणि ऐसपैस असे घर. मोठीशी बैठकीची खोली, स्वयंपाक घर, झोपण्याची खोली. पाहताक्षणी आवडावे असे घर. पण दिशेचे काय ?? होकायंत्र काढले आणि खरी गोम लक्षात आली. पूर्व दिशा घराच्या समोर न येता घराच्या एका कोपरयात आली होती त्या अनुषंगाने बाकीच्या दिशा. इथपर्यंत ठीक होते. परंतु घरातील एक Toilet हे ईशान्य दिशेला आहे आणि दुसरे आग्नेय दिशेला. मागच्या दोन- तीन लेखात मी उल्लेख केला होता जर आग्न्येय (South -East ) दिशेत जर दोष असेल तर त्याचे परिणाम म्हणजे घरातील स्त्रीला पोटाचे आणि पायाचे विकार. आणि इथे वास्तू नेमके हेच दर्शवत होती. वास्तूचे  खालीलप्रमाणे विश्लेषण :

१) दिशा-हीन वास्तू - मुख्य दिशा वास्तूच्या काटकोनात आहेत
२) ईशान्य दिशेत Toilet  
३) आग्न्येय दिशेत Toilet 
४) पूर्व दिशेला कट 
५) ब्रम्ह स्थानावर भिंत 
६) मुख्यद्वार वायव्य दिशेत. 

ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम घरातील स्त्रीवर होणार हा नियम आहे. आणि परिणाम हा पोट आणि पायावर होणार. त्यामुळे रेश्माबरोबर झालेल्या पहिल्या भेटीच्या चर्चेत मला तिचे बोलणे ऐकून आश्चर्य वाटले होते पण वास्तू निरीक्षणानंतर फार आश्चर्य राहिले नाही. लेख वाचतानाच तुमच्याही हे लक्षात आलेच असेल, पाय आणि पोटासंबंधीचे त्रास जास्त झाले आहेत. आता ह्यावर काय उपाय केले पाहिजेत आणि त्याचे कसे Results मिळतील ह्या संदर्भात रेश्मा आणि सत्यमला व्यवस्थित समजावले. ईशान्य आणि आग्नेय दिशेत असलेले toilet कसे विपरीत परिणाम देत आहेत आणि पुढे काय परिणाम होतील हे सांगितले. दोघांना माझे म्हणणे पटले. परंतु त्यानंतर त्यांचा फोनही नाही की भेटही नाही. 

ह्या त्यांच्या भेटीला दोन- तीन महिने उलटून गेले. मी ही विसरून गेले. आठवण तेंव्हा झाली जेंव्हा रेश्माचा मला फोन आला. मी म्हटले," काय चाललय ?" 
 रेश्मा,"गेल्या वेळेस तुम्ही वास्तूबद्दल समजावले होते तर त्याच संदर्भात बोलायचे आहे."  म्हटलं,"बोला." "काही नाही वास्तूने पुन्हां एकदा प्रत्यय दिला. ५- ६ दिवसांपूर्वी घराची साफ- सफाई करायला घेतली होती. दिवाळी जवळ येतेय ना. पंखा साफ करत होते स्टुलावर चढून. तोल जाऊन पडले आणि हात सध्या गळ्यात आहे. वैताग आलाय हॉस्पिटलच्या वा-या कधी संपणार. ऐन दिवाळीच्या तोंडावर हात मोडून बसलेय. मुलांचा आणि सत्यमचा तर हिरमोड झाला आहे. तुम्हीच सांगा काय करायचे."  
मी रेश्माला म्हटले," जे करायचे आहे ते मी तुम्हाला आधीच सांगितलेय आता तुम्हीच ठरावा."  
रेश्मा," हो ते आहेच लक्षात म्हणूनच call केलाय. पण सत्यमचा वास्तू वगैरे गोष्टींवर विश्वास नाहीये. त्या दिवशी तो तुमच्या समोर काही म्हणाला नाही पण …………… "

मी समजले. रेश्माला सांगितले," ठीक आहे तुम्हाला वास्तूचे उपाय नसतील करायचे तर निदान वास्तू बदला. दुसरी वास्तू घ्या आणि तिथे किमान दिशा काटकोनात नसतील हे नक्की तपासून घ्या."

त्यानंतर तिचा फोन आलेला नाही. आता ते नवीन वास्तूत राहायला गेले किंवा नाही हे माहीत नाही. दिवाळी नंतर आज सहा - सात महिने झालेत परंतु त्यांची काही माहिती नाही. जर वास्तू बदलली असेल तर अत्यंत उत्तम नाहीतर हा सिलसिला कायमच राहणार. 

सत्यमसारखे काही वाचक असतीलही ज्यांचाही ह्या गोष्टींवर विश्वास नसेल. कदाचित हे ही म्हटले जाईल रेश्माने स्वतःची काळजी घेतली तर हे प्रसंग उद्भभवणारच नाहीत. पण एखाद्या वास्तूत राहायला गेल्यानंतर लागोलाग इतक्या वेळेस हॉस्पिटलच्या वा-या झाल्या ???? वास्तूत येण्याच्या आधी रेश्माला किंवा इतर मंडळींना असा त्रास का नाही झाला ??? प्रत्येक एक - दोन महिन्याच्या अंतराने घरातील कोणीतरी आजारी आहे किंवा अपघात झालाय ??  हा निव्वळ योगायोग ???? मला तसे वाटत नाही. जर सत्यमने ही वास्तू घेण्याआधीच वास्तूतज्ञाला विचारले असते तर एवढा मानसिक आणि आर्थिक त्रास झाला नसता. 

म्हणूनच नवीन वास्तू घेण्याआधीच वास्तूतज्ञांची भेट घ्या, चर्चा करा. वास्तू नंतर Rectify करण्यापेक्षा आधीच काळजी घ्यावी. आणि हो वास्तूतज्ञ निवडतानाही काळजी घेणे.    

कशी वाटली ही case ??? जर अशा अजून काही Cases तुम्हाला वाचायच्या असतील तर मला जरूर कळवा : anupriyadesai@gmail.com 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

शुक्रवार, १० मे, २०१३

वास्तू तथास्तु

वास्तू तथास्तु 

गेल्या महिन्यात मानेंकडे वास्तुपरीक्षणासाठी गेले होते. बैठकीच्या खोलीचे परीक्षण झाल्यानंतर आम्ही स्वयंपाकघराकडे वळणार तेवढ्यात दाराची बेल वाजली आणि साठे काकूंनी घरात प्रवेश केला."हे कोण आले आहेत ? हे काय ते काय ??" ही विचारणा सुरूच होती त्यांची. शेवटी न राहवून माने काकूंनी त्यांना सांगितले, "ह्या वास्तू परीक्षणासाठी आल्या आहेत". "अच्छा म्हणजे ते वास्तुबिस्तु बघतात ते का ?… आम्हाला नाही हो विश्वास ह्यावर. माणसाने कसे स्वतःवर विश्वास ठेवून चालावे म्हणजे सगळे व्यवस्थित असते. हे असे वास्तू बघून का कधी प्रगती होते? उगीच आपले पैसे उकळायचे." - इति सौ. साठे. त्या त्यांच्याच धुंधीत माने काकुंना  सांगत होत्या आणि त्यांना कल्पनाच नव्हती मी त्यांच्या मागेच उभी आहे. मला पाहिल्यावर बाहेर पळाल्या.

हा माझा अनुभव इथलाच नाही तर नेहेमी मला हे अनुभवाला येते की लोक ह्या शास्त्राला खूप दुषणे देतात. ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र हे सगळे बकवास आहे. असे काही नसते. लोकांची Psychology वापरून हे लोक स्वतःचे Bank Balance वाढवतात,लोकांची फसवणूक करतात. एवढेच बोलून हे लोक थांबत नाहीत तर त्याही पुढे कोणाचेतरी उदाहरण देतात…अरॆ त्या अमुकच्या घरी "वास्तुवाले" आले होते … घरात सगळ्या गोष्टींची जागा बदलली,तोडफोड केली,Pyramids ठेवले तरी त्याला काही फायदा झालाय का ??  मला राग येण्यापेक्षा ह्या आणि अशा लोकांची कीव येते. 'कुठल्याही गोष्टीची पूर्ण माहिती नसेल तर आपण त्यावर भाष्य करू नये' अशी एक नीती आहे. आजारी असल्येल्या व्यक्तीला जेंव्हा आपण डॉक्टरकडे घेऊन जातो तेंव्हा त्या डॉक्टरचे औषध लागूच पडत नाही. बरयाच लोकांना असा अनुभव आला असेल. मग अश्यावेळी आपण काय करतो ?? डॉक्टर बदलतो की त्या Medical Science ला नावे ठेवतो ??????

विश्वासाचा आणि अविश्वासाचा प्रश्न नसून हे एक शास्त्र आहे आणि हे आपल्या ऋषीमुनीनी (जे काळाच्या बरेच पुढे होते ) लिहून ठेवलेले आहे. त्या शास्त्राचा आपल्याला फक्त फायदा घ्यायचा आहे. हे शास्त्र आहे तरी काय ?? खरेच खूप तोडफोड करावी लागते का ??  ह्याचा खरेच काही फायदा आहे का आणि असेल तर आम्हाला कसा फायदा होईल ?? खूप खर्चिक आहे का ?? वगैरे प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.

वास्तू म्हणजे फार काही complicated नसून ज्या घरात आपण राहतो ती जागा व आजूबाजूचा परिसर/वातावरण. इंजिनिअर्स कुठलेही बांधकाम करताना पंचमहाभूतांचा विचार करतात. उदाहरणार्थ फ्लायओवर बांधतानाही वातावरणाचा विचार केला जातो. पाऊस,भूकंप, वादळ इ गोष्टी ध्यानात घेऊन बांधकाम केले जाते. मग ज्या घराची ओढ आपल्याला कायमच असते, ज्या घरातून आपल्याला नेहेमीच चांगल्या उर्जेची अपेक्षा असते, कामावरून घरी कधी एकदा पोहोचतोय असे वाटते त्या घराची, एकदा घरी गेल्यावर relax वाटते. मग ह्या घराची, घरातल्या वातावरणाचाही आपण विचार केला पाहिजे. 

काही घरांमध्ये खूप कोंदट वातावरण असते. तिथे गेल्यानंतर कोंडल्यासारखे कोंडल्यासारखे वाटते. कधी एकदा तिथून निघतोय असे वाटते. काही घरात इतके Friendly वातावरण असते कि तिथे कधीही जा तुमचे स्वागतच असते. वातावरण खेळीमेळीचे आणि घरातील व्यक्ती आपल्याशी इतक्या आपुलकीने वागतात कि आपण त्या घरातीलच आहोत असे वाटू लागते. इथे घर लहान-मोठे, गरीब- श्रीमंत मला अजिबात म्हण्याचे नाही. हे आनंदी वातावरण तुम्हाला एखाद्या चाळीतही अनुभवास येईल आणि गर्भश्रीमंत घरात कोंडल्यासारखे वाटू शकेल. घर म्हणजे चार भिंती आणि त्यातील व्यक्ती.घराचा परिणाम त्या व्यक्तींच्या स्वभावावर,आरोग्यावर तर होतच असतो परंतु घरातील व्यक्तींचाही परिणाम त्या वास्तूवर होत असतो असा माझा अनुभव आहे. त्यामुळे घरातील सर्वांनी हे वातावरण कसे आनंदी राहील ह्यासाठी प्रयत्नशील असावे असे माझे स्पष्ट मत आहे.

पंचमहाभूते म्हणजेच 'अग्नि,पृथ्वी,वायू,जल  आणि आकाश'  ही पंचमहाभूते जर दुषित झाली नसतील म्हणजेच घरातील त्यांच्या दिशांना काही हानी झालेली नसेल तर ही पंचमहाभूते आपल्याला Positive results देतील अथवा काही काळानंतर त्याचे दुष्परिणाम जाणवायला लागतील. ही तत्वे जर बिघडली तर घरातल्या व्यक्तींना त्रास होण्यास सुरवात होते. ही पंचमहाभूते खालीलप्रमाणे स्थित असतात.



१) अग्नितत्व -  पूर्व दिशेच्या आणि दक्षिण दिशेच्या मध्ये ही आग्नेय दिशा असते. अग्नीतत्वाचा संबंध आपल्या पचनशक्तीशी निगडीत आहे. पोटातला अग्नी बिघडला तर काय होईल ? पित्ताचा त्रास,अंगावर उष्णतेचे पुरळ/गांधी इ. स्वयंपाक घर आग्नेय दिशेत अपेक्षित आहे. म्हणजेच ह्या आग्नेय दिशेत जर काही दोष असेल जसे की ह्या दिशेत मोठा कट असणे, खिडकी असणे,दरवाजा असणे हा एक वास्तूदोष आहे. ह्याचा परिणाम म्हणजे घरातील स्त्रीला पोटाचे विकार किंवा गुडघ्याचा त्रास. पुरुषाला पाठीच्या कण्याचा त्रास असणे. 

२)  पृथ्वीतत्व - नैऋत्य  दिशा ही दक्षिण आणि पश्चिम ह्यांच्या मधली दिशा. तिजोरी किंवा दागिने/ पैसे ह्या दिशेत असावेत. ह्या दिशेत जड वस्तू जसे कपाट , साठवणीच्या वस्तू - धान्य इ. असेल तर ह्या दिशेतून येणारी Negative ऊर्जा आपण Control करू शकतो. ही दिशा कधीही मोकळी असू नये. ह्या दिशेत जर दोष असेल म्हणजेच ह्या दिशेत Toilets असणे, विहीर असणे, underground water tank,गच्ची  असणे  म्हणजे संकटाला आमंत्रण देणे. असे दोष जर असतील तर अचानक आर्थिक संकट,अपघात किंवा आत्महत्या इ. घटना घडतात. (दक्षिण ही यमाची दिशा संबोधीत आहे. यमाची दिशा म्हणजे negative energy / confidence कमी असणे.) ह्या दिशेतील दोष लवकरात लवकर दुरुस्त करणे. 

३) वायुतत्व - वायव्य दिशा. पश्चिम आणि उत्तर ह्या दोन दिशेतील ही दिशा. ह्या दिशेची देवता पवनदेव आहेत. ह्या दिशेत दोष म्हणजे दरवाजा असणे, टेरेस असणे,विहीर असणे. ह्या दिशेतील दोष घरातील व्यक्तींना मानसिक व शारीरिक पिडा दर्शवते. मानसिक चंचलता, घराबाहेर वारंवार रहाणे इ. वायुत्तत्वाचा आणि व्यवसायाचा घनिष्ठ संबंध आहे. ह्या दिशेत वस्तू ठेवल्यास त्यांची लवकर विक्री होण्यास मदत होते. 

४) जलतत्व -  ईशान्य दिशा ही पूर्व व उत्तर दिशेच्या मधली दिशा. ईश म्हणजे ईश्वर- ईश्वराची दिशा. ह्या दिशेकडून प्राणिक उर्जा मिळते. त्यामुळे ह्या दिशेत जास्तीत जास्त खिडक्या असणे, मोकळी असणे म्हणजेच अडगळ अजिबात असू नये आणि अवजड वस्तू असे नये  हे अपेक्षित आहे. ह्या दिशेत जर दोष असेल तर शैक्षणिक प्रगतीत अडथळे निर्माण होतात. चांगला प्रवाह वाहण्यास अजून मदत व्हावी ह्यासाठी ह्या दिशेत देवघर,देवांच्या तसबिरी ह्यांची स्थापना करावी. अभ्यासासाठी व ध्यानासाठी उत्तम दिशा असे म्हटले गेले आहे. जर ह्या दिशेत कचरा,रद्दी इ. असेल खूप अवजड वस्तू ठेवल्या गेल्या असतील तर साहजिकच प्राणिक उर्जा मिळण्यास अडथळा निर्माण होतो. जलतत्व ह्या दिशेस असल्याने ह्या दिशेत Artificial Waterfall, पाण्याचा साठा असेल तर दुधात साखर. ह्या दिशेत सर्वात मोठा दोष म्हणजे इथे Toilets असणे. जर इथे Toilets असतील  तर ते तब्येतीच्या बाबतीत फार वाईट फळे मिळतात. (अशी एक वास्तू Case पुढील भागात मांडेन). ताबडतोब ह्या दोषाचे निवारण करावे. Toilets जर घराच्या दुसऱ्या जागी हलवता येणार नसतील तर त्यासाठी विनातोड्फोड उपाय आपल्या वास्तूशास्त्रात सांगितलेले आहेत. 

५) आकाशतत्व - आकाश म्हणजेच घराचे ब्रम्ह्स्थान (मध्यभाग) जर तुम्हाला आठवत असेल तर आधी गावच्या घरी घराचा मध्यभाग मोकळा ठेवून तिथे तुळशीवृंदावन असायचे. अजूनही कर्नाटक किंवा दक्षिण भारतात घराचा मध्यभाग मोकळा असून तिथे तुळशीवृंदावन असते. आणि त्या मोकळ्या जागेवर कधी कौलेही घातली जायची नाही.


संपूर्ण घराला कौले करणारे आपले पूर्वज घराचा मध्यभाग का बरे मोकळा आणि कौलाविना ठेवत असतील ?? असा कधी विचार केला आहे ?? आपल्या पूर्वजांना ह्याची संपूर्ण कल्पना होती कि सर्व तत्वांप्रमाणेच आकाशतत्वाची ही आपल्याला तितकीच गरज आहे. आकाशतत्व म्हणजेच ब्रम्हस्थान, वास्तुपुरुषाचा पोटाचा भाग. जर ह्या भागात अवजड वस्तू/अडगळ, भिंत, toilets इ  असेल तर हा महादोष आहे. ह्या दोषाचा परिणाम म्हणजे पोटाचे अत्यंत भयंकर विकार- आतड्यांचा त्रास, हार्निया,गर्भपात इ. त्यामुळे हा भाग मोकळाच असला पाहिजे. 

आता तुम्ही म्हणाल एवढे सगळे नियम आताच्या बांधकामात कसे काय बसणार ?? सध्या घर पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तसे घर मिळतानाच मुश्कील आहे त्यात हे सगळे नियम बघून घर म्हणजे तर झालेच…. आपले वास्तुशास्त्र इतके सक्षम आहे की काही साधे उपाय केल्यानेही(तोडफोडीशिवाय) घरातील दोष नष्ट होऊन घरात सकारात्मक उर्जा प्रवाहित तर होईलच आणि त्यामुळे सर्वांचे आरोग्य,आयुष्य उत्तम राहून प्रगती साधता येईल. काही उपाय तर मी वर नमूद केलेच आहेत जसे ईशान्य दिशेत अडगळ नको, नैऋत्य दिशेत कपाट- दाग-दागिने,पैसे वगैरे. जसे डॉक्टरांकडून औषध घेतले म्हणजे चमत्काराप्रमाणे रोग लगेच बरा होत नाही आणि पथ्यपाणी सांभाळल्याने रोग बरा होतो त्याप्रमाणे वास्तुदोष निवारण झाल्यानंतर सुद्धा वास्तूततज्ञाने सांगितलेल्या इतरही गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात. 


लक्षात ठेवा : १. वास्तू नेहेमी तथास्तु म्हणते.
२. त्यामुळे वास्तूत नकारात्मक गोष्टींची चर्चा,कटकट,सततचे वादविवाद टाळावेत. 
३. सकारात्मक संदेश देणारी चित्रे घरात लावावीत.  
४.मित्र मंडळी,नातेवाईक ह्यांच्या भेटीगाठी महिन्यातून एकदा तरी झाल्याच पाहिजेत. वास्तू हसत रहायला हवी. तुमची प्रसनत्ता तुमच्या वास्तूत प्रतिबिंबित होते. आणि नेहेमी हसणारी वास्तू आनंदी रहाते आणि आनंद देत राहते. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com




रविवार, ५ मे, २०१३

"सुखी सोनाराकडे आणि दुःखी ज्योतिषाकडे"

"सुखी सोनाराकडे आणि दुःखी ज्योतिषाकडे" 

"अनुप्रिया मैन बहौत थक गयी हुं. अभी सहेन नही होता. लगता है अब Suicide कर लु." हे धक्कादायक उदगार निशाचे. मला पहिल्यांदाच भेटायला आली आणि हे असे बोलणे. "सुखी सोनाराकडे आणि दुःखी ज्योतिषाकडे" अशी म्हण मला रोज प्रत्ययाला येते. लोकांना Problems असतील कि अनुप्रिया आठवते जसा Problem संपतो लोक ज्योतिषाला साधा फोन करून सांगण्याची तसदीही घेत नाहीत. फार कमी लोक फोन करून सांगतात,  "तुम्ही सांगितलेले तसे झाले ". पण काही लोकांना एवढे एक वाक्य सांगायलाही वेळ उरत नाही. "गरज सरो आणि वैद्य मरो" 

ज्योतिषी किंवा कुठलाही Professional हा आजीवन विद्यार्थी असतो. एका कुंडलीवर खोल अभ्यास करणे आणि त्या अभ्यासावरून जातकाला अमुक ह्या तारखेला तुझे काम होईल,तू ह्या क्ष्रेत्रात नोकरी कर तुझा फायदा होईल, तू नोकरीपेक्षा Business चांगला करू शकशील,तुझे लग्न ह्या महिन्यात होईल, तुला बाळ होईल पण ही काळजी घे, नॉर्मल कि सीझर इ. हे सांगणे हे सोप्पे मुळीच नाही.  त्यामुळे एखादी घटना ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे घडली हे त्याला सांगणे हे अत्यंत जरुरी आहे. तेंव्हा ज्योतिषाने सांगितलेले भविष्य बरोबर आले किंवा चुकले हे त्याला सांगितले पाहिजे. 

बरे आता निशाच्या Case कडे वळूया. निशाचे गेल्याचवर्षी लग्न झाले. ती स्वतः सिंधी आणि लग्न भरतेश ह्या गुजराथी मुलाबरोबर. निशा स्वतः माटुंग्याला रहाणारी आणि नोकरी करायची भायखळ्याला पण लग्न करून आली डोंबिवलीला. सुरवातीला सगळे छान चालले होते. नंतर नंतर निशाला घर आणि ऑफिस जमेना. मग काय नवरयाचा चांगला चालणारा Business होताच. निशाने चांगली लठ्ठ पगाराच्या नोकरीवर पाणी सोडले. घरी राहिल्यापासून निशाला  जास्तच त्रास होउ लागला. सासरकडची मंडळी जुन्या वळणाची,डोंबिवलीत पाणी न विजेचा लपंडाव, घरी सासू सतत तिच्या समोर बसून रहायची. निशा दुसरया समाजातली असल्याने आमच्या समजातल्या मुली किती वळणदार, कामसू ह्याचा पाढा रोज ऐकवला जाई. स्वयंपाक,धुणी कधी न केलेले आणि आता ते करावे लागतेय, घरी फोन करायचा झाला तरी निशाला फुरसत मिळायची नाही. आधीच नोकरी सोडलेली, कधी न केलेली कामे करावी लागत होती ,सासू येत जाता टोमणे मारायची,नवरा रात्री उशीरा आल्यानंतर तो तक्रार ऐकण्याच्या स्थितीत नसायचा, निशाचा कोंडमारा होऊ लागला. निशाने आत्महत्येचा विचार मैत्रिणीला सांगितला तेंव्हा निशाला तिच्या मैत्रिणीने माझा नंबर दिला. 
निशाची कुंडली 
निशाचे बोलणे ऐकता ऐकता तिची कुंडली अभ्यासत होते. (वैदिक पद्धतीने)(Married Life ) - :  १)वृषभ लग्न आणि वृषभ राशीची कुंडली. निशा दिसायलाही सुंदर वृषभ राशी सारखी. 
२)सप्तमात वृश्चिक राशीत बुध,रवि आणि नेपच्यून सारखे ग्रह. 
३)सप्तमाचा स्वामी मंगळ अष्टमात धनु राशीत. मागच्या जवळ जवळ सगळ्या लेखात आपण हे पहिलेच आहे की अष्टमाचा संबंध आला की अडथळे आलेच. इथे सप्तमाचा स्वामी अष्टमात आणि तो ही मंगळासारखा ग्रह. म्हणजे ती जे काही वैवाहिक जीवनाबद्दल सांगतेय ते खरे आहे. (ज्योतिषाने नेहेमीच जातकाने सांगीतल्येल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. जातक काही गोष्टी लपवू किंवा खोटेही सांगू शकतो.)

कृष्णमुर्ती पद्धतीने : १) सप्तमाचा सब लॉर्ड गुरु आणि तो ३, ८, ११ चा कार्येश. इथेही अष्टम स्थान आहेच. पण कोणताही ग्रह हा त्याच्या नक्षत्रस्वामी प्रमाणे फळ देतो त्यामुळे गुरुचा नक्षत्र स्वामी पहावा लागेल. गुरु आहे शनिच्या नक्षत्रात आणि शनि ४, ९, १० चा कार्येश म्हणजे फार Negative नाही. कुरबुरी आहेत त्या सगळ्याच वैवाहिक जीवनात असतात. त्यामुळे निशाला व्यवस्थित समजावणे गरजेचे होते. त्याप्रमाणे तिला समजावताना तिला नोकरी करण्याचा सल्ला दिला म्हणजे नोकरीत वेळ जाईल आणि काही काळासाठी ती घरापासून दूर राहील. तिचे म्हणणे आता लगेच नोकरी मिळेल ?  म्हटले हे योग आहेत का ते पाहू ? 

नोकरी(कृष्णमुर्ती पद्धतीने) :  सध्या निशाला गुरु महादशा चालू आहे. २०११ ते २०१४ शनि अंतर्दशा. शनि  ४, ९, १०  आणि शुक्राच्या नक्षत्रात. शुक्र ६,१, ६ चा कार्येश. निशा माझ्याकडे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आली होती. तेंव्हा तिच्या कुंडलीत चंद्र विदशा ३ मार्च २०१३ ते २० मे २०१३ पर्यंत आहे. चंद्र खालील प्रमाणे :
चंद्र १  ३  न.स्वा. चंद्र १  ३ सब गुरु ३, ८, ११ सब सब शनि ४, ९, १०  
म्हणजेच नोकरी एप्रिल -मे च्या दरम्यान मिळायलाच हवी. परंतु अष्टम स्थान विसरून चालणार नाही. नोकरीसाठी काळ अनुकूल असला तरी अष्टम स्थानामुळे काहीतरी तडजोड करावी लागते. म्हणजेच कदाचित कमी पगाराची नोकरी पदरात पडून घ्यावी लागेल. त्याप्रमाणे तिला सांगितले.  
आता नाईलाज को क्या इलाज? ह्या उक्तीप्रमाणे तिने ही ते मान्य केले. काही स्तोत्रे आणि उपाय तिला दिले. २४  एप्रिलला संध्याकाळी आनंदी स्वरात निशाचा फोन," अनुप्रिया मुझे Interview के लिये दो अलग अलग  कंपनीसे Call आया है. Thanx To You.  एक कंपनी मार्केटिंग related कामकाज है और दुसरी मेरेही बँकसे मुझे call आया है.लेकिन बँकमें Package कम मिल राहा है.  क्या करू ? बहोत Confusion  है."  म्हटल," ठीक आहे. मला अर्ध्या तासाने फोन कर". 

तिची कुंडली Marketing साठी कि बँकेच्या जॉबसाठी Suitable आहे ते पाहिले पाहिजे. marketing साठी द्वितीय स्थान, द्वितीयाचा सब लॉर्ड check करावा. वृषभ लग्न म्हणजेच द्वितीयात बुधाची मिथुन राशी. हे पाहिल्यावर marketing असे सांगावेसे वाटेल परंतु खोल अभ्यासल्यास बुध स्वतः मंगळाच्या वृश्चिक राशीत आणि शनीच्या नक्षत्रात. marketing ??? शक्यच नाही. षष्ठेश शुक्र तुळ राशीत (तुळ - वजाबाकी no marketing ) वजाबाकी ही बँकेतच होत असते रोज. शुक्र राहूच्या नक्षत्रात आणि राहू शनि बरोबर. (शनि - किचकट कामे,वेळ काढू कामे) . बँकेत तिचा Job लोन Department मध्ये असणार आणि तिथे तिला Documents Verificationचे काम. मग काय ? कळले का तिला कुठला Job Suggest  केला मी ???? 

Note : hmmmm बरोबर. मे  महिन्याच्या ६ तारखेपासून निशा तिच्याच बँकेत परंतु  घाटकोपरच्या Branch ला जाणार आहे.  आणि हो तिला सध्या कमी पगार मान्य करावा लागला. वरती आपण पहिलेच तिला तडजोड करावी लागेल. निशा अत्यंत खुश होती. आयुष्यातले खूप मोठे कोडे सुटल्यासारखा आनंद झाला होता तिला. ज्योतिषशास्त्राचा फायदा आत्महत्येचे विचार घेऊन आलेल्या निशाला अशा प्रकारे झाला. 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

READERS ALL OVER THE WORLD