शनिवार, १४ मे, २०१६

अनुभवाचे बोल



अनुभवाचे बोल 


वास्तुशास्त्रज्ञाचे भविष्य ह्या सदरात मी शेवटच्या प्रसंगात अमीताबद्दल सांगितले होते. तिच्या आणि तिच्या आईच्या आजारपणाला कंटाळून ती माझ्याकडे वास्तू संदर्भात भेटण्यास आली होती. त्यानंतर काय झाले हे तिच्याच शब्दात वाचा - 

First of all thanks thanks and thank you so much for everything you did for us.. Initially I wasn't believing in vaastu and as such. We shifted to a new house. All was good. But slowly we started suffering from small ailments to big diseases(diabetes, blood pressure, thyroid). It was only suffering for my mumma and me. Immune system was badly affected. I was on special diet with the help of dietitian and a renowned diabetologist. Nothing improvement as such. I being a really overweight person was getting depressed day by day.. Mumma's diabetes ,Bp, thyroid concerned me a lot.


I believe in my Sadguru. She was there with us with full support and her blessings when I lost my father. One day I was sitting in front of her and asked her what have we done so much to suffer this much..I am not employed so we had our financial problems too. That day I don't know how but I saw you on Facebook (through 1 mutual friend) and read about your vaastu related experiences and thought I should consult you immediately as it was a sign from my guru to contact you. 

You saw ,you did remedies. I'm so greatful to you. I can't mention in words. My mumma's thyroid came down. Her all doses came down to small mg's. She is fit and fine and a strong woman I can feel now.. 😊 

My family doctor was so surprised that she thought we shifted to another place or we might have found another doctor. From 9 months we haven't visited anyyyy doctor for any reason.  This is all because of you, Anupriya. Your Vaastu remedies did magic to us. My doctor didn't believe at first that we did vaastu remedies at our place and everything is fine now. I think she didn't liked it that much.. 😄 

We thank you from the bottom of our heart and yes not to forget your predictions were so damn perfect about everything I asked you regarding My Career, Property related issues. 

God bless you and your family with every good thing for you are doing so much good to people.
Thank you so much. 😊😚


Amita 


शुक्रवार, १३ मे, २०१६

वास्तुशास्त्रज्ञाचे भविष्य

वास्तुशास्त्रज्ञाचे  भविष्य

ज्योतिषाचे भविष्य ह्यावरचे लेखन मी २०१३ च्या जुलै ला प्रसिध्द केलेले. त्यावेळी बऱ्याच वाचकांची आणि जातकांची मला ई-पत्रे आली. त्यांना लेख खूप भावला होता. त्यानंतर बऱ्याच वेळेस सगळ्यांची विचारणा होत होती अनुप्रिया लेख लिही पुन्हा ह्यावर. तर आज योग जमला आहे. आज मी वास्तुशास्त्रावर लेख लिहिला आहे. 


प्रसंग १ -  Second Home 

हल्ली स्वतःचे घर असतांना बँका कर्ज देत आहेत म्हणून दुसऱ्या घराचा शोध सुरु असतो. त्याला ते "investment" असं म्हणतात. हे नवीन फ्याड आहे सॉरी "Trend" आहे. माझे असे मत आहे घर घेतानांच जर तुम्ही वास्तुतज्ञ व्यक्तीला घेऊन गेलात तर तुमची बरीचशी मेहनत वाचते आणि घेतानाच घर "Perfect" घेतले जाते. काही जातक मग मला मागाहून फोन करतात. घर book केलय. तुम्ही कधी येता ? एकदा तुमच्या वास्तू -शास्त्राप्रमाणे आहे का जरा बघून घ्या.  आता एकदा घर घेतल्यानंतर मी काय सांगणार ?? 

प्रसंग २ -  वास्तूचे मुख्यप्रवेशद्वार 

काही खूप हुशार मंडळी मला नुसताच दिशाहीन floor plan पाठवतात. आता त्यावरून मी काय सांगणार ? वास्तुशास्त्र हे दिशांवर अवलंबून आहे. तुम्ही त्या floor plan  वर दिशाच जर नमूद केल्या नाहीत  तर काय सांगणार मी ?? त्याहून पुढे, वास्तू -शास्त्रवरची काही पुस्तके वाचून त्यांना शास्त्र कळले अशा थाटात काही लोक सांगतात - "मैडम ईशान्य दिशेचा दरवाजा आहे. तुमच्या शास्त्राप्रमाणे (माझ्या शास्त्राप्रमाणे ? बरं बाबा बोल पुढे ) ईशान्य दिशा खूप चांगली मानतात ना ? त्याच दिशेत आहे "Entry". घेऊ ना हे घर ? " आता तुम्हालाच शास्त्र समजले आहे तर मला फोन करून माझा वेळ का बरं घेता ?  बरं माझ्या सर्व लेखात मी नेहेमी सांगते की, नुसता घराचा दरवाजा अमुक एका दिशेत आहे म्हणजे घर चांगले असा गैरसमज आहे लोकांचा.  संपूर्ण घर कसे आहे, घराच्या खिडक्या कोणत्या दिशेत आहे ? वॉश रूमस कोणत्या दिशेत आहेत ? बेडरूम, स्वयंपाक घर कोणत्या दिशेत आहे ते ही महत्वाचे आहे. घरात चांगल्या उर्जेच्या प्रवाहासाठी संपूर्ण घराची रचना महत्वपूर्ण ठरते. 

प्रसंग ३ - नंबरचा खेळ 



नंबरच्या खेळाचा शोध आपल्या वास्तू - शास्त्रात कोणी लावला ते मला माहीत नाही. अमुक एका नंबरचेच घर लोकांना हवे असते. गुढीपाडव्याला शिल्पाला घर घ्यायचे होते. वर्षभराच्या शोधानंतर तिला एक घर आवडले. पण तिच्या नवरयाचे वेगळेच गणित. त्याला दिशेप्रमाणे नाही तर नंबरप्रमाणे घर घ्यायचे होते. आता पंचाईत. मग मला फोन केला गेला. ह्यावर मी माझे मत जे होते ते सांगितले. नंबरपेक्षा वास्तू शास्त्राच्या नियमांना महत्त्व द्यायचे की नाही हा ज्याचा त्याचा व्ययक्तीक प्रश्न आहे. 

प्रसंग चार -  बिच्चारे देव 

ह्यानंतर नंबर येतो देवघराचा. मुख्य दरवाजानंतर घराच्या आकड्याचा नंबर आणि मग शेवटी देवघर कुठे ठेवायचे हे लोक विचारतात. त्यांना देवघर बेडरूम मध्ये नको असते. मग स्वयंपाक घरात नॉन-वेज मुळे काहींना ते तिथेही नको असते. राहता राहिला मुलांचा बेडरूम. मग त्या बेडरूममध्ये देवांची रवानगी होते. १ BHK असेल तर मग देव बैठकीच्या खोलीत बसतात. मला आजपर्यंत देवघर कुठे असावे ?  हा सर्वात पहिला प्रश्न एक - दोन जणांनीच विचारलाय. :-)
    
प्रसंग पाच -  रात्रीस खेळ चाले 

अमी माझ्याकडे पहिल्यांदा आली होती तेंव्हा खूपच साशंक होती. तिचा स्वभाव आजकालच्या पिढीसारखा. बाप दाखव नाहीतर श्राध्द कर अशा स्वभावाची. माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून माझा नंबर मिळाला तिला. Consultation च्या सुरवातीला फार बोलतच नव्हती. तिच्या वास्तूच्या संदर्भात प्रश्न घेऊन आलेली. घर बाबांच्या नावावर. बाबांच्या पत्रिकेत सदोष वास्तू असण्याचे योग. त्यामुळे तिला मी काही प्रश्न विचारले," तुझ्या वास्तूच्या आजूबाजूला अमुक गोष्टी आहेत का ? घरापासून काही अंतरावर "अमुक हे" आहे का ? घराच्या खिडकीतून नदी दिसते का ? वगैरे… विस्फारलेल्या तिच्या डोळ्यांनी मला पोचपावती दिली. मी म्हटले कोणाला काही घरात भास होतात का ? त्यावर तिचे उत्तर," हो. आजीला घरात रात्रीच्या वेळेस माणसे वावरतांना दिसायची. ती बरयाच वेळेस म्हणायची रात्री तुम्ही सगळे का भांडत होतात ? आणि वस्तुस्थिती अशी असायची कि आम्ही सर्व गाढ झोपलेले असायचो. आम्हाला वाटले हिला भास होत आहेत. बरेच डॉक्टर्स झाले. आम्ही नंतर तिच्याकडे दुर्लक्ष करायला लागलो. परंतु पुढच्या काही वर्षात आम्हाला असे लक्षात आले की आमच्या विंगच्या सर्वांनाच कधीना कधी अशा प्रसंगाचा सामना करावा लागलेला आहे. मग आम्ही सर्वांनी ठरवून सोसायटीत महायज्ञही करून घेतला. नंतर दोन तीन वर्ष कोणाला काही त्रास झालेला नाही. पण आता पुन्हा ते सगळे सुरु झाले आहे. काय करायचे ? तुम्हीच सांगा". अंधश्रद्धा आणि भुताटकी वगैरेच्या भानगडीत न पडता जर तुम्हा सर्वांना तिथे comfortable नसेल ते घर सोडवे हा सल्ला दिला. आणि घर लगेच सोडता येणार नसेल तर घरात रोज रामरक्षा म्हणण्यास सांगितले. त्याने फरक दिसेल.  

प्रसंग पाच -  

अमिता मला २०१४ च्या नोव्हेंबरला भेटायला आली होती. २५-२६ वर्ष वय तिचं. आईने साठी उलांडलेली. आईला बी. पी. चा त्रास. त्याच्या गोळ्या सतत सुरूच. एक दिवसही गोळी घेतली नाही तर आईची तब्येत बिघडायची. घरात कमवणारं कोणीही नाही. त्यात भरीसभर म्हणून अमिताला डायबेटीस. तिची रोजची औषधे सुरूच. अमिताने नोकरीसाठी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले परंतु २ महिन्यांच्यावर कुठल्याही नोकरीत  टिकली नाही. तब्येतीच्या कारणामुळे तिला प्रवासही फार करता येत नव्हता. अत्यंत हालाखीची परिस्थिती होत चाललेली. अशा परिस्थितीत तिला तिच्या ओळखीच्या व्यक्तीने माझा नंबर दिला. 
चर्चेनंतर तिने वास्तू विजीटसाठी बोलावले. ( सविस्तरपणे  ह्या विषयावर लिहीनच कधीतरी. सध्या जास्त लांबवत नाही. ) वास्तूसाठी जे उपाय करण्यास सांगितले ते तिने २०१५ च्या फेब्रुवारी महिन्यात करून घेतले. त्यानंतर तिचा मला ऑगस्ट महिन्यात फोन आला की सगळे व्यवस्थित सुरु आहे. आईच्या तब्येतीत सुधारणा होतेय. आधीपेक्षा बरयाच कमी पॉवरच्या बी. पी च्या गोळ्या घेतेय ती. अमिताचा स्वतःचा डायबेटीसचा त्रास खूपच कमी झालाय. विशेष म्हणजे आधीसारखी औषधे अजिबात घ्यावी लागत नाहीत. ती जेंव्हा तिच्या डॉक्टरांकडे परवा सर्दीच्या औषधांसाठी गेली होती तेंव्हा डॉक्टरांनी तिला काय विचारले असेल ? गेल्या वर्षभरापासून अमिता त्यांच्याकडे गेलीच नसल्याने त्यांना वाटले ही दुसरीकडे shift झाली. तिने जेंव्हा डॉक्टरांना वास्तूमध्ये करून घेतलेल्या उपायांनबद्दल सांगितले तेंव्हा डॉक्टर आ वासून बघत राहिल्या.  
हे आणि असे बरेच प्रसंग आणि घटना आहेत. हळूहळू ह्यावर लेख लिहिण्याचा मानस आहे. तूर्तास ऐवढेच.  


For Consultation - anupriyadesai@gmail.com
Website - www.kpastrovastu.com

गुरुवार, १२ मे, २०१६

शासक ग्रहांनी सावध केले

शासक ग्रहांनी सावध केले  

पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच्या संध्याकाळी आमच्याच सोसायटीत राहणाऱ्या सौ. रेवती सावंत घरी आल्या. चेहेऱ्यावर भरपूर प्रश्न दिसत होते. आज अचानक कशा काय वगैरे विचारण्याआधीच रेवतीचा प्रश्न - "मला ना एक प्रश्न विचारायचा आहे. मला एक business proposal आले आहे. त्या व्यक्तीबरोबर माझी मिटिंग आहे उद्या. तर मी पुढे जावे की न जावे ? आणि त्यात किती Risk घ्यावी ? Risk घेऊ कि नको ?"
मी म्हटले," आपण शासक ग्रहांच्या माध्यमाने तुमचा प्रश्न तापासून पाहू. उत्तर हो किंवा नाही मध्येच अपेक्षित असावे. " 
रेवती हो म्हणाली मग शासक ग्रह मांडले - २२ मार्च २०१६ संध्याकाळी ७ वाजून ४१ मिनिटे ठाणे. 

L - बुध ६,१,१० शनि ३,५,६ 
S - रवि ६,१२ शनि ३,५,६
R - रवि ६,१२ शनि ३,५,६
D - मंगऴ २,३,८ शनि ३,५,६ 

चंद्र राहूच्या युतीमध्ये आहे.तोही व्ययात. लाभेश व्ययात आहे तोही वक्री गुरु बरोबर आणि राहूच्या युतीत. हा योग धरून सांगितले ज्या व्यक्तीने तुम्हांला व्यवसायाबद्दल सांगितले आहे त्याने तुम्हाला अर्धवट माहिती दिली आहे किंवा माहिती लपवून ठेवली असावी. त्यावर रेवतीचा प्रश्न -"असं कशाला ती व्यक्ती करेल ?" मी म्हणाले,"हे बघ ते मला काही माहित नाही. शासक ग्रह तरी तुला ह्या पासून लांब राहायला सांगताहेत. आता तूच ठरवं. उद्या काय होतेय ते मला येऊन सांग आठवणीने". "बरं " म्हणून रेवती गेली.   
दुसऱ्या दिवशी रेवती आली. खूप खुश होती. माझ्याकडून गेल्यानंतर ती जरा सावध झालेली. तिने त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती जवळच्या इतर व्यक्तींकडून घेतली आणि तिला धक्काच बसला. सदर व्यक्ती गेले कित्येक वर्ष एका व्यवसायात असून तो व्यवसाय संपूर्णपणे दिवाळखोरीत निघालेला आहे अशी माहिती तिला मिळाली. तो व्यवसाय म्हणजे हल्ली जे chain marketing करतात तोच. फरक इतकाच की हा व्यवसाय tourist शी संबंधीत होता. म्हणजे तुम्ही सुरवातीला रू. ५०००/- भरून स्वतःचे नाव नोंदवायचे आणि पुढे इतर तुमच्या ओळखीच्या व्यक्तींना ह्यात रु.५०००/- गुंतवण्यास सांगायचे मग ५० च्या वर मेंबर झाले कि तुम्हाला एक ट्रीप फ्री मिळणार कंपनीतर्फे आणि प्रत्येक व्यक्तीमागे तुम्हला कमिशन मिळेल. ह्या अशा भूलथापांना बरेच लोक फसतात. 

ह्या व्यवसायात त्या व्यक्तीला स्वतःला काही प्रगती करता आली नाही परंतु दिवाळखोरीचे पैसे काढायचे कुठून ? त्यांनी भोळ्याभाबड्या रेवतीला गाठले. 


हा सर्व प्रकार लक्षात येताच रेवतीने काढता पाय घेतला. त्याच संध्याकाळी तिने माझी भेट घेतली आणि सर्व प्रकार सविस्तरपणे सांगितला. शासक ग्रहांची किमया दुसरे काय ? शतशः नमन त्या शासक ग्रहांना. 

पुन्हा एकदा शासक ग्रहांनी नुसता मार्गच नाही दाखवला तर सावध करून काहीतरी गौडबंगाल असल्याचे निर्देशही दिले. 

For Consultation - anupriyadesai@gmail.com

My Website - www.kpastrovastu.com

बुधवार, ११ मे, २०१६

Transit of Mercury across the Sun बुधाचे अधिक्रमण

Transit of Mercury across the Sun

बुधाचे अधिक्रमण

सोमवार, 9 मे रोजी बुध ग्रहाचे अधिक्रमण संपूर्ण भारतातून सूर्यास्तापर्यंत दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. या दिवशी सायंकाळी 4 वाजून 41 मिनिटांनी बुध ग्रह सूर्यबिंबावर येण्यास प्रारंभ होईल. सायंकाळी 4 वाजून 44 मिनिटानी संपूर्ण बुध सूर्यबिंबावर येईल. आकाशात सूर्यबिंबाच्या वरच्या बाजूने बुधाचा प्रवेश सुरू होईल. तर बुध ग्रह सूर्यबिंबावर असतानाच सूर्यास्त होईल. मुंबईतून सायंकाळी 7 वाजून 3 मिनिटांपर्यंत हे दृश्य पाहता येईल.    
ही बातमी सतत wats app आणि फेसबुक वरून फिरत होती. ही दुर्मिळ संधी सोडायची नाही असे ठरवून त्यादिवशीच्या सगळ्या appointments पुढे ढकलल्या. ९ मे रोजी वरळी सी फेसला नेहेरु तारांगणातर्फे दुर्बिणीतून बुधाचे हे अधिक्रमण पाहता येणार आहे हे कळले. 
ठरल्याप्रमाणे साडेपाचला आम्ही तिथे पोहोचलो. उत्साही लोकांची प्रचंड गर्दी. अगदी ५ वर्षाच्या मुलांपासून ते ७५ वर्षाच्या आजी-आजोबांपर्यंत सवर्जण हा दुर्मिळ क्षण टिपण्यासाठी जमले होते. नेहेरु तारांगणातर्फे दुर्बिणी उपलब्ध होत्या त्याचप्रमाणे उत्साही लोकांनी स्वतःच्याही दुर्बीणी आणल्या होत्या. सर्वांचे एकाच लक्ष्य- बुधाचे अधिक्रमण. पहिला फोटो जो आहे त्यात सूर्याचे प्रतिबिंब दिसतेय. फोटो झूम केल्यास दोन काळे ठिपके सूर्यावर दिसताहेत. त्यातील सूर्याच्या मधोमध जो ठिपका आहे तो सुर्यावरचा डाग आहे आणि उजव्या हाताला वरती जो ठिपका दिसतोय तो आहे "बुध".  


बुध 
मी दुर्बीणीतून बुधाचे अधिक्रमण  पाहताना 
हा दुर्मिळ घटना टी. वी. वर पाहण्यापेक्षा स्वतः दुर्बिणीतून पाहतांना अत्यंत आनंद झाला. बुध पाहतांना space station ही पाहता आले. 
Space Station 


दुसऱ्या दुर्बीणीतून 
सूर्यावर आलेल्या ढगांमुळे काही काळ बुध पाहता आला नाही.  
सूर्यावर आलेले ढग 






एकंदरीत अत्यंत विस्मरणीय अनुभव होता. 

READERS ALL OVER THE WORLD