सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

Reader from USA

Reader from USA

Hello Dear Reader (USA),

It has been observed that you are keenly reading my EVERY article since last two-three months. I would like to know you. 

Regards 

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०१५

Significance of Tripurari Purnima

Significance of Tripurari Purnima



The Full Moon Day or 15th Purnima day of the Shukla paksha (waxing moon) of the Kartika month is considered very auspicious. The full Moon is usually in Taurus and therefore exalted. At times this festival can take place with the full Moon in Aries- but it represents a strong and auspicious Moon. Usually this is the full Moon in the month of November. It has many names including the Diwali of the Gods and Tripuri Purnima. This day marks the victory of Lord Shiva over the demons Tripuri. The Kartik Purnima festival also coincides with the Jain light festival and Guru Nanak's Birthday. 



It is believed that lord Kartikeya- the chief of all gods was born on this day.




 



Kartik Purnima or Kartika Poornima, also known as Tripuri Poornima or Tripurari Punrima, is the Full Moon and auspicious day in Kartik month.  This day marks the ending of Kartik month as per the calendars of North India but in other calendars it is the 15th day in Kartik maas. During Kartik Purnima, Dev Diwali, Deepotsavam and Ganga Mahotsav are observed.
 

In Andhra Pradesh and some parts of Karnataka, ‘Shiva Linga Mahajala Abhishekam’ is observed on the day. Bhakteshwara Vratam is also performed on Kartika Pournami in some places of Andhra Pradesh 


On Kartik Purnima, some people in Gujarat n Rajasthan perform Tulsi Vishnu Vivah. It is observed on some other days – Bhodini Ekadasi or on Ksheerabdi Dwadashi. Kartik Poornima celebrations are associated with the legend of demon Tarakasur. Tarakasur was demolished by Lord kartik, also known as Skanda or Kumara. 



Another legend associated with Kartik Poornima is of Lord Vishnu’s Matsyavatar. It is believed that on this day, Vishnu was incarnated in Matsya incarnation and protected Manu, the first man, from Maha Pralay (deluge).
 

 

In Kashi Vishwanath temple at Varanasi, Rameshwaram temple, Arunachaleshwara temple at Thiruvannamalai, Manjunatha temple at Dharmasthala, Srisailam Mallikarjuna swamy temple, Vemulawada Rajarajeshwara swamy temple, Keesaragutta Ramalingeshwara swamy temple and Kaleshwaram Shiva temple and all other famous Shiva temples, Kartika Pournami is observed with much gusto. 



It is also believed that Lord Krishna worshipped Radha on the day of Kartik Purnima.
 
What to Do on This Auspicious Day ?
 
Chant Vishnu Names,Vishnu Sahstranaam etc.

मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५

Once again Earthquake in Pakistan Which was Predicted

Once again Earthquake in Pakistan 




A 5.9-magnitude quake struck northern Afghanistan late on Sunday, the US Geological Survey said, jolting New Delhi, parts of north India, and Pakistan according to local reports.

The tremor struck 22 kilometres (14 miles) southwest of Ashkasham, 300 kilometres northeast of the Afghan capital Kabul, at a depth of 92.4 kilometres. There were no immediate reports of damage or casualties.

The quake, which occurred at 02:16 am local time (1816 GMT), was felt across northern Afghanistan and northern Pakistan and in the Indian capital Delhi.

In October a 7.5-magnitude quake ripped across Pakistan and Afghanistan, killing almost 400 people and flattening buildings in rugged terrain that impeded relief efforts.

For many in Pakistan, October's quake brought back traumatic memories of a 7.6-magnitude quake that struck in October 2005, killing more than 75,000 people and displacing some 3.5 million.

Afghanistan is frequently hit by earthquakes, especially in the Hindu Kush mountain range, which lies near the junction of the Eurasian and Indian tectonic plates.



As I have mentioned in my earlier article about the Earthquake happened on 26th October 2015 in Afganistan. Here is the link - http://astroanupriya.blogspot.in/2015/10/earthquake-in-delhi.html 


Following were my observations and predictions - 

1) On that Day Moon was in Revathi Nakshtra. Mercury is lord of Revathi Nakshtra. Anything happens on Revathi Nakshtra gets repeated. 

2) Moon was in Meen Rashi ( Zodiac Sign - Pieces )

And Earthquake got repeated on 22nd November 2015. Moon was in again Meen Rashi ( Zodiac Sign - Pieces ) Moon was about to enter into Revathi Constellation. So it happened when Moon was in same Sign and same Nakshtra. Again I predict here that Earthquake will happen one more time in near Future.
 

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०१५

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा / Happy Diwali

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा / Happy Diwali 

सर्व ज्योतिषप्रेमी,ज्योतिष अभ्यासकांना,आणि ब्लॉगच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा. ही दिवाळी सुख,समृद्धीची लाभो हे सदिच्छा. 


Happy Diwali to all Astrology Believer,Researcher and all Blog Readers. This Diwali may bring you peace,wealth,health and prosperity.

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

Venus,Jupiter and Mars Visible in Sky

Venus,Jupiter and Mars Visible in Sky 

 In the morning at 4.30 I spotted Three Planets from Our Space. Jupiter,Venus and Mars. I immediately Captured them in my Nokia Lumia Camera. The brightest Star is Venus and on the top of it there is Jupiter. Mars is also visible by eye But I could not captured it as camera quality did not support. Mars is with Venus. It is just a small spot below the Venus. 

Astrologically Calculations are - 
Mars 27 degree in Leo Sign. 
Venus 26 degree in Leo Sign. 
Jupiter 22 degree in Leo Sign. 
So Venus is in Conjunction with Mars.

With Out any Effects I clicked the Snap.
Captured With Night Vision Option

Mars,Jupiter and Venus
After publishing This article people mailed me asking how to recognise these planets ? Answer is -  This requires practice and knowledge of Astronomy

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

Earthquake In Delhi

Earthquake In Delhi


Today Massive Earthquake shook Delhi at 14.45. Epicenter was in Afganisthan. Minor Tremors felt in Rajasthan,Gujrat, Himachal Pradesh, Haryana,Punjab.On Earthquake My Observations are- 

1) Whenever Full Moon day( Sun and Moon on 180 degree Astronomically) or No moon Day ( Sun And Moon on 0 degree Astronomically) ,

2) Moon or Sun in Ketu's or Rahu's Star ( Rashi - Mesh, Simha or Dhanu ) ,

earthquake had happened. 
 

Following is the list of some of my Onservations and Study on the Earthquakes happened  so far - 



A) 10-01-2001 - Kodaik Alaska.- Sun and Moon in Mithun Rashi - No Moon Day. ( Amavasya )

B) 26-01-2001 - Gujrat,India - Sun and Moon in Capricorn Sign. - No Moon Day ( Amavasya ) (Recorded 7.7 Richter Scale)

C) 05-04-2004 - Hindukush/ Afganisthan -  Sun in Aries Sign, Moon in Libra Sign. Full Moon Day (Poornima )

D) 15-10-2005 - Southwestern Kashmir - Sun in Virgo Sign and Moon Pieces Sign. Full Moon Day  ( Poornima)

E) 06-11-2007 - Gujrat, India - No Moon Day ( Amavasya )

F) 30-09-1993 - Latur/ Maharashtra - Full Moon Day (Poornima ) (Recorded 6.4 Richter Scale)

G) 26-10-2015 Hindukush/Afganisthan - Full Moon Day ( Poornima) (Recorded 7.6 Richter Scale)

So We should not Ignore Ancient Indian Astrological Calculations. Astrology is dependent on Astronomy. So one who studies Astronomy well, Astrological Predictions won't go wrong. 

Note - Earthquake happened on Revati Nakshatra. Revati is Mercury's Nakshatra. Any incident happens on Mercury's Nakshtra it gets repeated. Repetition of Earthquake might possible. 

Waiting for your Responses. You can mail me here - anupriyadesai@gmail.com

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०१५

वास्तू शांतीचे महत्त्व

वास्तू शांतीचे महत्त्व

वास्तुपुरुष नमस्तेस्तु भुशय्याभिरत प्रभो l 
मदगृहं धनधान्यादीनसमृरुद्धं कुरु सर्वदा ll





साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा. दसरयाच्या दिवशी सरस्वतीपूजन होतेच परंतु त्याच बरोबरीने शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या,लढाईसाठी वापरल्या जाणाऱ्या हत्यारांची पूजा करण्याची पद्धत आहे. आपल्या परंपरेत प्रत्येक वस्तू ही सजीव म्हणजेच त्यात जीव आहे ही भावना आहे. म्हणूनच नवीन वस्तू घरात आली की आपण औक्षण करतो आणि ती वस्तू आपल्याला लाभावी अशी प्रार्थना करतो. आपल्या संस्कृतीत प्रत्येक वस्तूची पूजा होतेच. मला आठवतेय लहानपणी जेंव्हा माझ्या शिक्षणाची सुरवात झाली तेंव्हा पाटीची पूजा करून त्यावर "श्री" असे आईने माझ्याकडून लिहून घेतले. अगदी आजच्या पिढीचे सांगायचे झाले तर संगणक जरी घरी आला तरी त्याची पूजा केल्याशिवाय तो सुरूही करत नाही. घरात नवीन फ्रीज येऊ दे,नवीन टी. वी. येऊ दे त्याची पूजा करूनच सुरवात होते. मग जेव्हा आपण नवीन वास्तूत प्रवेश करणार तेंव्हा त्या वास्तूची, तिथल्या वास्तू-पुरुषाची पूजा होणे, शांत होणे जरुरी आहे. 

कोणतेही बांधकाम सुरु करण्याआधी भूमिपूजन केले जाते. त्यांनतर इमारत उभी रहाते. त्या वास्तूत राहण्याआधी वास्तुशांत करण्याची पद्धत आहे. आपण ज्या वास्तूत राहतो त्या वास्तूशी आपले नकळतपणे एक भावनिक नाते जुळते. सुखदुखःच्या सर्व गोष्टींची साक्ष होत असते ती वास्तू. नोकरीवरून घरी परताना कधी एकदा घरी पोहोचतो असे वाटते. बाहेरगावी गेलो अगदी काश्मीरला गेलो आणि तिथे कितीही छान वाटले तरी आपले घर ते आपलेच घर. मग अशा वास्तूसाठी एक दिवस एक समारंभ(वास्तू शांत) तो ही आपल्या हिताचा करण्यास काय हरकत आहे. 

वास्तू हा शब्द "वस" ह्या शब्दापासून आला आहे.  “वस" हा संस्कृत भाषेतील धातू आहे याचा मराठीत अर्थ होतो वसणे, वास, निवास, वास्तव्य, वस्ती हे त्याचे समान अर्थी शब्द. पुराणात प्रजापती आणि उषा या दांपत्याला चार पुत्र होते. त्यातील सर्वात धाकटया पुत्राचे नाव होते वास्तोष्पती तथा गृहपती. पृथ्वी ही त्याची गृहस्वामिनी होय. स्वाभाविकच पृथ्वीवर निर्माण केलेल्या प्रत्येक वास्तूचा हा ‘ गृहपती ’ अथवा ‘ वास्तुपती ’ असतो, त्यालाच वास्तुपुरुष संबोधतात.

ज्याप्रमाणे मानवी शरीर हे ब्रम्हांडाची प्रतिकृती आहे. वास्तू पंचतत्वाच प्रतिक आहे.  अग्नि, पृथ्वी, वायू, जल आणि आकाश.



वास्तूला आठ दिशा आहेत  - पूर्व,पश्चिम,उत्तर,दक्षिण,ईशान्य,आग्नेय,वायव्य,नैऋत्य. ईशान्य दिशेत जलतत्व, आग्नेय दिशेत अग्नितत्व,वायव्य तत्वात वायूतत्व,नैऋत्य दिशेत पृथ्वी तत्व. ही सर्व तत्वे आपल्या शरीरातही आहेत.

वास्तूसंबंधी एक कथा सांगितली जाते ती अशी.. भगवान शंकराचं अंधकासुराशी ज्या वेळी युद्ध झालं त्या वेळी शंकराच्या घर्मबिंदूतून एक महाभूत निर्माण झालं. अंधकासुराचं रक्त प्राशन करूनही त्याची भूक शमली नाही आणि क्षुधातृप्तीसाठी त्याने घोर तप केले. त्या वेळी भगवान शंकरांनी त्याला असा वर दिला की, ‘वास्तुपुरुषाची पूजा करताना जो बलिभाग दिला जाईल, तो तुला अन्न म्हणून मिळेल आणि जे लोक वास्तुपुरुषाला बली न देता वास्तू उभारतील, ती वास्तूच तुझे भक्ष्य बनेल.’


वास्तुशांतीची सुरवात करताना प्रथम संकल्प, पुण्याहवाचनादी कृत्ये केल्यानंतर आचार्यपूजन करून पुढील कृत्ये त्याद्वारे केली जातात. देवतेच्या स्थापनेसाठी चौकोनी वेदी बनवून उत्तर वेदीच्या कोप-यावर लोखंडी खिळा ठोकतात. त्यावर भाताचा बळी ठेवतात. आग्नेयेस अग्नीची स्थापना करून घेतात. या सर्व रचनेला ‘वास्तुमंडल’ म्हणतात. ग्रहाचे आवाहन करून पूजन करतात. वेदीवर शिखी, पर्जन्य, जयंत इत्यादी ४५ देवतांचं आवाहन करतात. वास्तुपुरुषाच्या निरनिराळ्या अवयवांवर देवतांची स्थापना करायची असते. मध्यभागी वास्तुपुरुषाची प्रतिमा ठेवून इतर देवतेसह त्यांचं पूजन केलं जातं. प्रथम होमाच्या वेळी ग्रहाच्या समिधा, चरू, आज्य यांचे हवन करून वास्तुमंडल देवतेसाठी तीळ, पायस, आज्य यांच्या आहुत्या देण्यात येतात. त्याचप्रमाणे वास्तोस्पतीसुक्ताने वास्तुस्पतीसाठी बिल्वपत्राच्या आहुत्या देतात. प्रायश्चित्त होमानंतर सर्व देवतांना यथाविधी उडदासह चरूचा बली देतात. मग यजमान दाम्पत्यावर त्याच्या कुटुंबीयांसह ऋत्विज अभिषेक करतात. तिहेरी सूत घेऊन पवमान आणि रक्षान्घ ही सुक्ते म्हणतात. त्या घराभोवती ते गुंडाळताना यजमान आणि त्याची पत्नी दूध आणि पाणी यांची संततधार करतात.

वास्तुनिक्षेप आग्नेयेस करावा. तांब्याच्या लहान गड्डात यात सप्तधान्य, दही, भात, फुले, नदीतील शेवाळ ठेवून, वास्तूची प्रतिमा पालथी ठेवून (ईशान्येकडे मस्तक आणि नैऋत्येकडे पाय) तिचा नि:क्षेप करून प्रार्थना करावी. (वास्तुप्रतिमा ब्राह्मणास दान देऊ नये.)

हा विधी अत्यंत व्यवस्थित झाला पाहिजे. वास्तुशांती  एकदाच होते.  काहीवेळेस माझ्या पाहण्यात हे आले आहे की काही कुटुंबांना नवीन वास्तूत गेल्यावर लागलीच वास्तुशांत करणे जमत नाही. परंतु माझा सल्ला असा असेल की गणेशपूजन तरी करून घ्यावे मगच गृहप्रवेश करावा. त्यानंतर वर्षभराच्या आंत वास्तुशांत केलेली बरी. वास्तुशांत केल्यानंतर काही वर्षांनी उदकशांत,सप्तशतीचे पाठ घरी करून घ्यावेत.

ll वास्तू तथास्तु ll

 




बुधवार, १६ सप्टेंबर, २०१५

गणेश चतुर्थी च्या निमित्ताने …

गणेश चतुर्थी च्या निमित्ताने … 




गणेश,शिवसुताय,हेरंभ,वक्रतुंड,विघ्नहर्ता अशा बऱ्याच नावांनी आपण गणपतीला साद देतो. कुठल्याही पूजेची सुरवात गणेशवंदन झाल्याशिवाय होत नाही. नुसती पूजाच नव्हे तर अगदी वास्तूतही प्रवेश करतांना प्रथम गणेश पूजनाला महत्त्व आहे. म्हणूनच त्याला "प्रथम"ह्या नावानेही संबोधले जाते. गणेश विघ्नहर्ता,विघ्नविनाशक आहे. सुरवातीच्या काळी म्हणजेच अगदी पेशवेकालीन काळापासून संकटाच्या वेळेस पूजेतल्या गणपतीच्या मूर्तीला पाण्यात ठेवण्याची प्रथा होती. ते म्हणेज अगदी गणपतीला डांबून ठेवण्यासारखे आहे. प्रत्येकाचा श्रध्देचा भाग आहे.

 असो तर सांगण्याचा मुद्दा हा की ह्या दहा दिवसात लालबागच्या गणपतीला भेट द्या अथवा नका देऊ परंतु घरात असलेल्या गणेश मूर्तीवर अथर्वशीर्षाचे कमीतकमी ११ आणि जास्तीतजास्त २१ वेळेस दुधाचा अभिषेक करता करता पठण केल्यास नक्की फायदा होईल. गणेशाच्या १०८ नावांची आवर्तने करा. नावे पाठ नसतील तर  मोबाईलवर डावूनलोड करून घेऊ शकता. टेक्नोलोजीचा असा फायदाही होऊ शकतो. 

हे सर्व करून काय फायदा होईल ? होईल का नक्की ? अशा शंका मनात न आणता करून पहा. फायदा नक्की आहे.  

सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. 

ज्योतिषीय आणि वास्तू मार्गदर्शनासाठी इथे संपर्क करावा - anupriyadesai@gmail.com किंवा वेब साईट वरचा फॉर्म भरून पाठवणे - www.kpastrovastu.com

शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५

Readers and Followers of the Blog are Increasing


 Readers and Followers of the Blog are Increasing


संपूर्ण जगभरातून हा ब्लॉग वाचला जातोय आणि जातकांचे मला इ-मेल्सही येत असतात. ब्लॉगच्या वाचकांची एकूण संख्या ५३०६८ असून वाढतेच आहे परंतु सर्व मोठ्या देशातून वाचक आहे ह्याचा खूप आनंद आहे



 अमेरिका,जर्मनी,रशिया इ. देशातूनही ब्लॉग वाचणारे वाचक आहेत

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०१५

पिठोरी अमावस्या

पिठोरी अमावस्या 


श्रावण अमावास्येला पिठोरी अमावास्या म्हणतात. ज्यांची मुले जगत नाहीत, अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत करतात. हे व्रत पूजाप्रधान असून, चौसष्ट योगिनी या त्याच्या देवता आहेत. या व्रताचे विधान असे – श्रावण अमावास्येच्या दिवशी दिवसभर उपोषण करावे. सायंकाळी स्नान करून सर्वतोभद्र मंडलावर आठ कलश स्थापावे. त्यावर पूर्णपात्रे ठेवून त्यांत ब्राह्मी, माहेश्‍वरी, इ. शक्तींच्या मूर्ती स्थापाव्या. तांदुळाच्या राशीवर चौसष्ट सुपार्‍या मांडून त्यावर चौसष्ट योगिनीचे आवाहन करावे. त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर व्रतासाठी केलेले पक्वान्न डोक्यावर घेऊन ‘कोणी अतिथी आहे काय? असा प्रश्न विचारावा. मुलांनी ‘मी आहे’ असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे.
पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत. अलिकडे त्यांची छापील चित्रे मिळतात. या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. त्यावरून या तिथीला पिठोरी अमावास्या असे नाव पडले असावे.
पिठोरी अमावस्या किती घरात साजरी केली जाते, ठाऊक नाही. पूवीर् घराघरात ‘पिठोरी’ची पूजा होत असे. पिठोरी अमावस्येचंच दुसरं नाव मातृ दिन. वंशवृद्धीसाठी ही पूजा केली जाते. घरातली कतीर् स्त्री डोक्यावर ‘पिठोरी’चं वाण घेऊन ‘माझ्यामागे कोण आहे,’चा घोष करत असे. तिला ‘मीच, मीच’ म्हणत आपण प्रतिसाद दिला जायचा.
बेदाणे घातलेली भाताची खीर हा ‘पिठोरी’चा खास नैवेद्य. या साध्या खिरीला त्या दिवशी किती चव लागायची! ज्या घरांमध्ये गणपती येतो, अशा घरांमध्ये ‘पिठोरी’चं पूजन होतं. अन्यथा ही पूजा जवळजवळ कालबाह्यच झाली आहे.
मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी पिठोरी अमावस्येचे व्रत करण्याची प्रथा आहे. सायंकाळी स्नान करून सर्वतोभद मंडलावर आठ कलश स्थापन करून त्यावर पूर्णपात्रे ठेऊन ब्राह्मी, माहेश्वरी या शक्तींची पूजा करतात. तांदुळाच्या राशीवर चौसष्ठ योगिनींना आवाहन दिले जाते. पूवीर् या पूजेसाठी पिठाच्या मूतीर् तयार केल्या जात असे. तसेच पिठाच्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवला जात असे, म्हणून या तिथीला पिठोरी अमावस्या म्हणतात.
या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावास्येला मुले होत व ती लगेच मृत्युमुखी पडत.या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले.तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली. चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले.पुढे ती पुन्हा घरी आली.विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी असे आठ पुत्र झाले.अशा प्रकारे संतति रक्षणासाठी चौसष्ट देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वत…च्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव पिठेरी अमावास्या करून देते.म्हणून ही अमावास्या महत्वाची आहे.
या दिवशी मुलाबाळांच्या वंशवृद्धीकरिता पूजा करतात.या दिवशी सवाष्ण ब्राम्हण ही जेवावयास घालतात. पुरणावरणाचा महानैवेद्य दाखवतात. श्रावणाची अमावास्या असते पिठोरी अमावस्या. हा दिवस मातृदिन म्हणून फार पूवीर्पासून पाळतात. आपल्या संस्कृतीप्रमाणे घरात अगदी नवीन युगाचा Computer आणला तरी त्याची पूजा केल्याशिवाय आपण तो सुरु करत नाही, अशा निर्जीव वस्तूंचीही पूजा होते तिथे जन्म देणाऱ्या मातेला ही संस्कृती कशी विसरेल ? माता,जननी,मातृभूमी आणि  मातृभूमीतून धान्य उगवून देणाऱ्या बैलाचीही पूजा होते. या दिवशी बैलांना विश्रांती द्यायची. त्यांना ऊन पाण्याने आंघोळ घालायची , पुरणावरणाचा स्वयंपाक करून आधी त्याचे तोंड गोड करायचं. खूप ठिकाणी ‘ शिंगे रंगविली , बाशिंगे बांधिली , चढविल्या झुली ऐनेदार ‘ असाही बैलपोळ्याचा थाट उडवून देतात. बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक गावात शेतकरी बैलपोळा साजरा करतात.
तरी अशी ही पिठोरी अमावस्या. मातृदिन,पोळा आणि बाल गोपाळांच्या पूजेची कहाणी 


मंगळवार, २५ ऑगस्ट, २०१५

अनुभवाचे बोल

अनुभवाचे बोल 



एका जातकसखीने तिला वास्तूशास्त्राचा आलेला अनुभव आजच मला पाठवलाय. अनुभव तिच्याच भाषेत प्रसिद्ध करतेय - 

माझ्या नवऱ्याचे म्हणजेच महेशचे किराणा मालाचे दुकान होते. परंतु नंतर ते दुकान आणि वडिलोपार्जित मालमत्ता विकून आम्ही दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झालो. सर्व व्यवस्थित चालले होते,सगळीकडे सुखच सुख होते. त्यानंतर महेशने "Construction" व्यवसायात उडी घेतली.एका बिल्डिंगच्या  बांधकामातून भरपूर फायदा झाला आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला. परंतु तो आत्मविश्वासाचा अतिरेक ठरला कारण त्यांनी सगळीच्या सगळी Savings मुंबईतल्या एका जागेमध्ये बांधकामासाठी गुंतवली. त्यांच्या म्हणण्यानुसार एका वर्षातच ती गुंतवणूक नफ्यासहित परत मिळेल. आणि त्यांचे हे म्हणणे मलाही चुकीचे वाटले नाही. पण दुर्दैवाने त्याच वेळेस आमच्या नशिबाचे फासे उलटे पडायला सुरवात झाली. २००८ साली मंदी आली आणि त्यात आम्ही पूर्णपणे धुतले गेलो. आमच्या गुंतवणुकीची किंमत पावपट देखील उरली नाही. सगळीकडून संकटांचा मारा सुरु झाला. आमचे सगळे सुरळीत सुरु असतांना महेशने ४-५ जणांना मदत केली होती. कोणाला ५  लाख,कोणालातर १३ लाख -१५ लाख. पण आमची खायची भ्रांत असताना सुद्धा ह्यापैकी कोणालाही आमचे पैसे द्यावेसे वाटले नाहीत आणि कोणी दिलेही नाहीत. 

आम्ही मग छोटेखानी खानावळ सुरु केली. घरगुती जेवण मिळते म्हणून खानावळीस लवकरच प्रसिद्धी मिळू लागली. दुर्दैव पाठ सोडत नाही हेच खरे. काही गोष्टी अशा घडल्या कि ज्यामुळे खानावळ एका वर्षातच बंद करावी लागली. असे एक ना दोन बरेच व्यवसाय ह्यांनी करून पाहिले पण त्यात यशच मिळत नव्हते. मेहनत करूनही पदरात निराशाच पडत होती

काही जणांनी आमचे घर दक्षिणमुखी आहे त्यामुळे नुकसान होतेय असे सांगितले. आम्ही घर विकाण्याचा निर्णय घेतला. ह्या कालावधीतच मला अनुप्रियाचे वास्तू आणि ज्योतिष ह्या विषयावरचे विविध लेख इंटरनेटवर वाचायला मिळाले. त्यांची रीतसर appointment घेतली. आम्ही त्यांच्याबरोबर पत्रिकेबद्दल सविस्तर चर्चा केली. घर कुठे असेल ? जागा कशी असावी ? कोणता व्यवसाय चालेल ? कोणाच्या नावाने व्यवसाय चालवावा ? व्यवसाय कुठल्या Location मध्ये चालेल ? म्हणजे मुंबई की नवी मुंबई ? ठाणे ? ह्या सगळ्याप्रश्नांसाठी अनुप्रियाकडून खूप चांगले मार्गदर्शन मिळाले. त्यांनतरही आमची दोन ते तीन वेळेस गाठभेट झाली आणि त्यांनी अगदी आपलेपणाने प्रत्येकवेळेस मार्गदर्शन आणि सल्ला दिला. आता त्यांचावरचा विश्वास वाढला होता.   

मग नवीन जागेसाठी आमचा शोध सुरु झाला. आम्ही आमच्या बजेटमध्ये बसणारी भरपूर घरे पाहिली आणि अनुप्रियालाही दाखवली परंतु वास्तूशास्त्राप्रमाणे घर मिळत नसल्याने त्या पसंती देत नव्हत्या. त्यानंतर एका घरासाठी त्यांनी लगेच होकार दिला. आतापर्यंत पाहिलेल्या वास्तुपैकी ही वास्तू शास्त्राप्रमाणे चांगली असली तरी आर्थिक परिस्थितीच्या प्रगतीसाठी काही उपाय करावे लागतील असे त्यांचे मत होते. २-३ भेटीत आमचा त्यांच्यावर खूप विश्वास बसला होता त्यामुळे त्या सांगतील ते सर्व उपाय करायला आम्ही तयार झालो. म्हटले सर्व गेलेच आहे आता हे तरी वाचते का ते पाहावे. 

आणि आम्ही ते घर घेतले. अनुप्रियाने एका मुहूर्तावर संपूर्ण घरात वेगवेगळी रत्ने  प्रत्येक दिशेप्रमाणे त्या त्या दिशेत प्रस्थापित केली. ३ ते ४ महिन्यांत नशिबाचे फासे अनुकूल पडायला लागले. अनुप्रियाने आम्हाला जे जे भविष्य वर्तविले होते ते ते त्या प्रमाणेच तेंव्हा घडत गेले. अगदी उदाहरणच सांगायचे झाले तर - अमुक महिन्यात तुम्हाला जमिनीसंदर्भात पैसे येतील, हा व्यवसाय तुम्हाला नफा मिळवून देईल आणि तसेच झाले. आमचे छोट्या छोट्या स्वरूपाचे व्यवसाय सुरु झाले,मनाला उभारी येऊ लागली. आता आमचा अडकलेला प्रोजेक्टही हळूहळू सुरु होण्याच्या मार्गावर आहे. जिथे जिथे आमचे पैसे अडकलेले तिथून पैशांचे येणे सुरु झाले आहे. आमचा नवीन व्यवसायही अपेक्षेपेक्षा जास्त चांगला चालू लागला आहे. एकूण काय तर गाडी रुळावर येतेय. 

अनुप्रियाचे प्रत्येक बाबतीत अचूक ठरलेले भविष्य मार्गदर्शन,त्यांनी दिलेले उपाय ह्यामुळे आमचे आयुष्य व्यवस्थित चाललेले आहे. पैशांची आवक सुधारली आहे, घरातील वादविवाद संपुष्टात आलेले आहेत. सासूबाई अगदी प्रेमाने वागू लागल्या आहेत आणि त्यांचा आम्हांला आधार आहे. अजून काय पाहिजे ?

काळोख्या रात्री एखादी होडी वादळात सापडून वाट चुकलेली असताना त्या होडीचा नावाडी समुद्रात असलेल्या दीपस्थंभाच्या (LIGHT HOUSE ) मदतीने स्वतःची वाट शोधून काढतो. ती वाट शोधतांना आपला देवच आपल्याबरोबर दीपस्थांबाच्या रूपाने असतो अशी त्याची भावना असते. अनुप्रियाही आमच्या आयुष्यात दीपस्थंभाप्रमाणे आहेत. जर त्यांचे मार्गदर्शन मिळाले नसते तर कदाचित आताही आम्ही धडपडतच राहिलो असतो. अनुप्रिया तुमच्याबद्दल एवढेच बोलू शकते की प्रत्येक वेळी तुम्ही जी मदत केलीत त्याचे ऋण आमच्यावर सदैव राहील. 

धन्यवाद  
(सौ. साळवी )

ज्योतिषीय व वास्तू संदर्भातील मार्गदर्शनासाठी इथे संपर्क करावा - anupriyadesai@gmail.com किंवा www.kpastrovastu.com   

रविवार, ९ ऑगस्ट, २०१५

ज्योतिष शास्त्राने शोधून दिले - Location of Shop

ज्योतिष शास्त्राने शोधून दिले - Location of Shop

लंडनमध्ये पाच वर्ष नोकरी केलेल्या वृशंकला मुंबईत स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा अशी तीव्र इच्छा होती. दुसऱ्यांची गुलामी बसं झाली म्हणे. मार्च महिन्यात मुंबईत आल्या आल्या त्याने कुंडली मार्गदर्शनासाठी माझी appointment घेतली. कुठला व्यवसाय करावा ? त्याला स्वतःला कुठला व्यवसाय करावासा वाटतोय ?कुठला व्यवसाय कुंडलीप्रमाणे फायदेशीर ठरेल ? कुठे व्यवसाय करणार म्हणजे मुंबई की मुंबईबाहेर ह्या सर्व गोष्टींवर चर्चा झाली आणि वृशंक व्यवसायासाठी जागेच्या शोधाला लागला. 

जन्म कुंडलीच्या  गणितावरून ठळकपणे खालील गोष्टी कळण्यास मदत झाली - 

१) भर बाजारात दुकान असण्याची शक्यता आहे. 
२) ज्या भागात दुकान असेल तिथे मुख्यत्वे शाळा आणि बगीचा असेल. 
३) २४ ऑगस्टच्या आसपास व्यवसाय सुरु होईल. 

त्यांनतर वृशंकची व्यवसायासाठी जागा शोधण्याची मोहीम सुरु झाली. चार ते पाच महिने जागा शोधण्यात गेले होते. घरच्या मंडळींना टेंशन आले होते. नामांकित IT कंपनीची नोकरी सोडून वृशंकला हे कसले डोहाळे लागलेत ह्याची टीकाही झाली परंतु तो निश्चयी होता आणि आहे. अखेर त्याच्या दृढनिश्चयाचे फळ त्याला मिळाले. कालच त्याचा फोन आला आणि व्यवसायासाठी एक जागा आवडल्याचे त्याने सांगितले. इतके महिने शोध घेतल्याचा चांगला परिणाम झाला. त्यासंदर्भात अधिक चौकशी करता त्याने दिलेली माहिती, 


  • जागा भर बाजारात आहे. 
  •  जागेपासून अगदी हाकेच्या अंतरावर शाळा आहे. 
  • दुकानापासून काहीच अंतरावर बगीचाही आहे. 
  • आणि येत्या आठवड्यात व्यवसाय सुरु होईल. 


ज्योतिषशास्त्राच्या मदतीने इतके खोलात जाऊनही मार्गदर्शन करता येते. 

ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शनासाठी इथे संपर्क साधावा - www.kpastrovastu.com

  

सोमवार, २७ जुलै, २०१५

"आषाढी एकादशीचा अर्थ"

"आषाढी एकादशीचा अर्थ"



आषाढी एकादशीचा नक्की significance(प्रयोजन) काय असेल? हा प्रश्न 

आपल्याला कधी ना कधी पडलाच असेल!

आज आषाढी एकादशी म्हणजेच "देवशयनी एकादशी"...(स्मार्त 
एकादशी आज आहे व भागवत एकादशी उद्या आहे... हा फ़रक चांद्र 
गणनेमुळे पडतो [Lunar calendar] असो.)

पण देवशयनी एकादशी म्हणजे नक्की काय हो? देव शयनी म्हणजे देव 
ज्या दिवशी शयन करतात, निजतात तो दिवस...आणि कार्तिकी 
एकादशीला "देवोत्थान एकादशी" म्हणतात, अर्थात देव उठतात तो 
दिवस...आता मला सांगा, देव कधी असा निजेल किंवा उठेल का हो? 
तर यामागे फ़ार मोठे शास्त्रीय कारण दडलेले आहे!
आपला भारतदेश हा मान्सून पट्ट्यात येणारा! अर्थात इथे चारच महिने पाऊस!

ज्येष्ठ, आखाड (आषाढ), श्रावण आणि भादवा (भाद्रपद)...

त्यामुळे पेरण्या ज्येष्ठात होतात...त्या करायच्या आणि एकदा देवाला 
मनोमन भेटून त्याला निजवून यायचे! अर्थात तिथुन पुढच्या काळात
 शेतात अधिक कष्ट आवश्यक असल्याने, देवाला विनवायचे की बाबारे
, आता मला तुझ्या भजनात, पूजनात अधिक काळ नाही रमता यायचे,
 हे चारच महिने मला जरा मोकळीक दे,,,मी अपार कष्ट करून या ४ 
महिन्यात पीके उगवेन आणि मग पुन्हा तुला उठवायला येईन!

अश्विनात तोडणी, कार्तिकात मळणी आणि धान्याच्या गोण्या भरून 
झाल्या की देवोत्थान!!! किती सुंदर आणि डोळस शास्त्र आहे पहा!

भक्तीलाही पूर्ण न्याय आणि कर्तव्यालाही!!!

धन्य धन्य तो सनातन धर्म!!

समर्थही दासबोधात हेच सांगुन गेले आहेत...

आधीं प्रपंच करावा नेटका | मग घ्यावें परमार्थविवेका 
|
येथें आळस करूं नका | विवेकी हो ||

प्रपंच सांडून परमार्थ कराल | तेणें तुम्ही कष्टी व्हाल |

प्रपंच परमार्थ चालवाल | तरी तुम्ही विवेकी ||

प्रपंच सांडून परमार्थ केला | तरी अन्न मिळेना

खायाला | मग तया करंट्याला | परमार्थ कैंचा ||

पुंडलिकावरदे हरिविठठल!!! श्रीज्ञानदेव तुकाराम!!!!

 पंढरीनाथ महाराज की जय! माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय!!! जगद्गुरु तुकाराम महाराज की जय!!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

आपल्या मित्रांना हे माहिती नसेल असे वाटत असेल तर आवर्जुन शेअर करा...

जे जे आपणासी ठावे । ते ते हळू हळू सिकवावे।

शहाणे करुन सोडावे। अवघे जन ॥

-समर्थ रामदास

READERS ALL OVER THE WORLD