शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०१४

वास्तू प्रश्न

वास्तू प्रश्न 

नमस्कार 

वास्तूवर लेख लिहिल्यानंतर बरयाच जणांनी ई-पत्राद्वारे वास्तू संदर्भात त्यांचे शंका निरसन करून घेतले. इतक्या लोकांची पत्रे मिळाल्यानंतर खूप आनंदही झाला आणि लोकांच्या मनामध्ये असलेल्या वास्तूशास्त्राबद्दलच्या उत्सुकत्तेबद्दल खूप कौतुकही वाटले. त्यापैकी सर्वांपैकी लक्षात राहील असा प्रश्न आहे सामीधाचा. गेल्या आठवड्यात लिहिलेल्या वास्तूशास्त्रावरील लेखाबाबत समीधाचा प्रश्न असा होता :

   समीधा, "माझ्या घरातच मंदीर आहे. माझ्या सासूबाइंची श्रीकृष्णावर अपर भक्ती होती आणि त्यांना सिद्धी प्राप्त होती. परंतु आम्हां कुटुंबियांना मंदीर व कृष्णाचा नेहेमीच आधार वाटतो आणि आशीर्वादाचा नेहेमीच प्रत्यय  येतो. मग मंदीर घरसमोर असणे हे शास्त्रीय दृष्टया चुकीचे असतांना आम्हांस मात्र असा कधीच अनुभव आलेला नाही. ह्यामागील नक्की शास्त्रीय कारण काय आहे हे सांगू शकाल का ?" 

त्यावर माझे उत्तर असे आहे :

खूप छान प्रश्न विचारला आहे. तुमच्या प्रश्नातच तुमचे उत्तर आहे. शास्त्रात 

असे म्हटले गेले आहे कि जर तुमच्या घराच्या समोर मंदिर असेल आणि 

त्याचा कळस तुमच्या दारासमोर किंवा खिडकीसमोरच असेल तर 

त्याच्या उर्जेमुळे घरातील व्यक्तींना त्रास होऊ शकतो. त्रास का होऊ 

शकतो? तर त्याचे कारण असे कि त्याची पवित्रता इतकी असते कि 

आपल्यासारख्या सामान्य लोकांना त्याचे तेज सहन होऊ शकत नाही.
ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पूर्वीच्या काळी "संध्या" करणे किंवा सूर्याला 

अर्ध्या देणे हे अनिवार्य होते. संध्या करताना किंवा सूर्याला अर्ध्य देताना 

कंबरेपर्यंतच्या पाण्यात उभे राहून संध्या करावी लागते. ह्याचे कारण 

म्हणजे जेंव्हा सूर्याची किरणे थेट तुमच्या हृदयाच्या चक्रांपर्यंत(Heart 

Chakra) पोहोचतात तेंव्हा शरीरात अत्यंत उष्णता निर्माण होते. त्या 

उष्णतेचा प्रतिकूल फळ न मिळता उष्णता शमवण्यासाठी व्यक्तीला 

पाण्यात उभे राहून अर्ध्या द्यावे लागते. 
 

सामान्य व्यक्तीमध्ये ते(कळसातले) तेज/ओज/उर्जा सामावून घेण्याची 

कुवत कमी असते.ज्यांना सिद्धी प्राप्त असते त्यांच्यात ही उर्जा/तेज 

सामावून घेण्याची शक्ती असते.
 तुमच्या सासूबाईंना सिद्धी प्राप्त होती असे तुम्ही लिहिले आहे. ज्यांना 

सिद्धी प्राप्त होते त्यांच्या पुढच्या सात पिढ्यांचा उत्कर्ष होतो अशी 

मान्यता आहे. त्यामुळे तुमच्या घरातच असलेले मंदिर हे तुमच्यासाठी 

नेहेमीच हितावह ठरेल परंतु घरातील सर्वांनीच अध्यात्माची ही 

मिळालेली संजीवनी सांभाळून ठेवणे. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com
      

READERS ALL OVER THE WORLD