मंगळवार, ४ मार्च, २०१४

Missing Person - तो परत येईल का ??

Missing Person -  तो परत  येईल का ??

मार्चच्या पहिल्या तारखेला सकाळी ८.३३वाजता ज्योतीचा फोन. एवढ्या सकाळी फोन केला म्हणजे नक्कीच अत्यंत गंभीर प्रश्न असणार. ज्योतीचा प्रश्न तिच्या मैत्रिणीच्या नवऱ्याबाबत होता. "मैडम माझ्या मैत्रिणीचा नवरा शेखर जो software Engg आहे तो काल संध्याकाळपासून घरीच आलेला नाही. म्हणजे सकाळी नेहेमीप्रमाणे कामावर गेला आणि निघतांना संध्याकाळी त्याचा फोन सुद्धा आला होता कि ऑफिस मधून निघतोय म्हणून. पण नंतर रात्री उशीरापर्यंत तो घरीच आला नाही. आता तर त्याचा फोनही लागत नाहीये. सहसा कामावरून तो लगेच घरीच येतो आणि खूप साधा मुलगा आहे. घरी अत्यंत काळजीचे वातावरण झालेय."  मी म्हटले," ठीक आहे तुला कळवते थोड्या वेळेत". 

दिवसाचा पहिलाच प्रश्न असल्याने प्रश्न कुंडलीने सोडवायचे ठरवले :

प्रश्न विचारला तेंव्हाची कुंडली आणि शासक ग्रह खालील प्रमाणे : 


प्रश्न कुंडली 

शासक ग्रह :  

L  - गुरु(वक्री) ४, १, १०   न. स्वा.-  राहू ७, ३, ८ 
S  - राहू ७, ३, ८            न. स्वा. - राहू ७, ३, ८ 
R  - शनि ८, ११, १२       न. स्वा. - गुरु(वक्री) ४, १, १० 
D  - शनि ८, ११, १२       न. स्वा. - गुरु ४, १, १० 

हरवल्येल्या अथवा परागंदा झालेल्या व्यक्तींबद्दल काही जाणून घ्यायचे झाल्यास प्रश्न कुंडली अत्यंत उपयुक्त ठरते. सर्वात आधी मनात प्रश्न येतो तो हा कि,


 ही व्यक्ती सुखरूप आहे का ?(जिवंत आहे ना ?) 
ह्या प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास नियम असा आहे की लग्नाचा सब लॉर्ड जर शासक ग्रहांमध्ये असेल तर व्यक्ती हयात असते. शेखरच्या case मध्ये लग्नाचा सब लॉर्ड गुरु आहे आणि तो शासक ग्रहांमध्ये आहे. त्यामुळे शेखरच्या मृत्यूची शक्यता नाहीच. परंतु  लग्नेश गुरु स्वतः वक्री आहे. लग्नेश जर वक्री असेल तर व्यक्तीला काही इजा झाली असण्याची शक्यता असते.      कुंडलीतील चंद्र हरवल्येल्या व्यक्तीबद्दल माहिती देतो.चंद्रावर गुरुची दृष्टी आहे. (म्हणजेच शेखर Safe आहे.) कुंडलीत चंद्र व्यय स्थानात कुंभ राशीत रविच्या युतीत आहे. चंद्र व्ययात असेल तर व्यक्ती हॉस्पिटल/जेल किंवा बंधनात असणे - Kidnapping असू शकेल. चंद्र जर पापग्रहांबरोबर असेल तर व्यक्तीला कोणीतरी डांबून ठेवले असण्याची अथवा गुंडांच्या तावडीत सापडली असण्याची शक्यता असते. 

व्यक्ती कुठे आहे ?

पुढचा येणारा प्रश्न म्हणजे जर व्यक्ती जिवंत आहे तर ती आहे कुठे ? त्यासाठी नियम असा आहे कि चंद्र जर स्थिर राशीत असेल तर व्यक्ती एका जागी असते. जर चंद्र चर राशीत असेल तर व्यक्ती प्रवासात असते. इथे चंद्र कुंभ राशीत म्हणजेच स्थिर राशीत आहे. ह्याचाच अर्थ शेखर एकाच ठिकाणी आहे आणि प्रवासात नाही. चंद्र जर केंद्र स्थानात असेल तर व्यक्ती राहत्या शहराच्या आसपासच असते परंतु ह्या कुंडलीत चंद्र केंद्रात नाही  म्हणजेच शेखर स्वतःच्या घरापासून बराच लांब असण्याची शक्यता आहे. 

हरवल्येल्या व्यक्ती बरोबर कोण आहे का ?

ह्या प्रश्नासाठी चंद्राबरोबर असणारे ग्रह तपासावेत. इथे चंद्राबरोबर रवि सारखा "पापग्रह" आहे (युतीत आहे.) चंद्र रवि बरोबरीनेच नेपच्यून बरोबर सुद्धा युतीत आहे. (काही ज्योतिषी हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो सारख्या ग्रहांचा विचार करत नाहीत परंतु ह्या Case मध्ये मी आवर्जून ह्याचा अभ्यास अंतर्भूत केला) ह्याचाच अर्थ व्यक्ती बरोबर कोणी पुरुष व्यक्ती (रवि) आणि नेपच्यून (नेपच्यून हा बेशुद्धाअवस्थेत नेणारा ग्रह आहे ) असल्या कारणाने शेखरला भूल दिली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

व्यक्ती परत केंव्हा येईल ?

शासक ग्रहांमध्ये दोनदा शनि आणि एकदा गुरु जे Slow Moving Planets असल्याने शेखर आजच्या आजच घरी येईल असे वाटत नाही. 

शासक ग्रहांनुसार गुरु ग्रह चतुर्थाचा कार्येश असला तरी बाकी शनि आणि राहू अष्टम,व्यय आणि सप्तम स्थानाचे कार्येश आहेत. त्यामुळे व्यक्ती घरी जरी आली तरी व्यक्तीला अत्यंत गंभीर स्वरूपाची इजा झाली असण्याची शक्यता नाही Guarantee आहे

तेंव्हा एकूण विचार करता मी ज्योतीला उत्तर दिले कि, 

१) शेखर कुठेतरी अडकला असण्याची शक्यता आहे. गंभीर स्वरूपाने त्याला इजा झालेली असावी. तो घरी नक्की परतेल परंतु माझे शास्त्र असे सांगते कि काहीतरी गोष्ट शेखरने लपवली असावी आणि त्याचाच परिणाम आज त्याला मिळतोय जसे कि, कोणाकडून उधार घेतले असावेत आणि ते परत दिले नसतील व म्हणूनच अशा व्यक्तींकडून त्याला मारहाण वगैरे झाली असावी. 

२) शेखर जरी परत आला तरी धडधाकट परत येईल ह्याची शाश्वती नाही. तेंव्हा सांभाळून. 

३) चंद्र व्ययात असल्याने मी पोलिस चौकीत रीतसर तक्रार नोंदवून हॉस्पिटलमध्ये वगैरे तपासण्यास सांगितले. 

४) शेखरला घरी परतायला वेळ लागेल म्हणजेच आजच परत येईल असे नाही असे तिला सांगितले. (शासक ग्रहांमध्ये गुरु एकदा तर शनि दोनदा आलेला आहे. Slow Moving Planets ) 

५) कुंडलीत अष्टमात असल्येल्या मंगळ व राहू ह्यांची युती आणि शनिमुळे आणि व्ययात असल्येल्या रवि चंद्र नेपच्यून युती ह्यामुळे प्रकरण बरेच गंभीर असलेले दिसतेय तेंव्हा शेखरच्या पत्नीला काही उपाय करण्यास दिले. 

त्याच दिवशी साडे चार वाजता ज्योतीचा फोन आला. "मैडम तुम्ही सांगितले तसेच झाले ……… ".  पुढे तिने दिलेल्या माहितीनुसार,  

१) दिलेले सर्व उपाय शेखरच्या पत्नीने केले. 
२) शेखर दुपारी सव्वा तीन आणि साडे तीनच्या सुमारास घरी परत आला. (कर्क लग्नावर ) 
३) घरात आल्या आल्याच तो खाली कोसळला. त्याला कोणीतरी गंभीररित्या मारहाण केलेली दिसत होती. तो अजिबात शुद्धीत नव्हता. त्याच्या पाकिटातील पैसे,कार्डस सर्व गायब होते. (कार्डस वापरून सर्व पैसे काढण्यात आले होते हे मागाहून पोलीस तपासणीत कळले)
४) त्याला ताबडतोब हॉस्पिटलला भरती करण्यात आले. पोलीस आणि घरच्यांनी वारंवार विचारल्यानंतरही कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शेखरने दिले नाही. किंबहुना आल्यापासून तो बोलतच नाहीये आणि नुसताच शून्यात पहात राहतो असे घरच्यांचे म्हणणे आहे. त्याला नेमके काय झाले आहे ते येत्या काही काळात कळेल अशी अशा आहे. 

पुढे जी काही माहिती मिळेल ती ज्योती मला कळवेलच.

Note : ज्योतीने पहिल्यांदा फोन केला तेंव्हा व्ययात अमावास्या योग होत आहे. ही अमावास्या त्यादिवशी शेखरच्या मूळ कुंडलीत सप्तम स्थानात होत होती. सप्तम स्थान हे मारक स्थान मानले जाते.  इथे मी वर्तवल्येल्या सर्व गोष्टींपैकी शेखर त्याच दिवशी परत येणार नाही हे एकच माझे वर्तवलेले भविष्य चुकले.  

  प्रश्न कुंडली आणि शासक ग्रहांनी स्पष्टपणे किंबहुना ठळकपणे घडल्येल्या घटनेचे स्वरूप दर्शविले आणि शेखर परत येईल ह्याची शाश्वती दिली. ह्या शास्त्राचे आणि शास्त्राचा सातत्याने अभ्यास करून संशोधन करणाऱ्या ज्योतिषांचे आभार मानावे तितके कमीच. त्या सर्वांनाच माझे कोटी कोटी प्रणाम.  

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD