शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

मुहूर्तशास्त्र आणि कमला मिल घटना


मुहूर्तशास्त्र आणि कमला मिल घटना 
Kamala Mill Compund caught Fire


नमस्कार,

आज झालेल्या कमला मिल कंपाऊंड घटनेमुळे वाईट वाटले. मध्यरात्री लागलेल्या ह्या आगीत संपूर्ण हॉटेल जाळून खाक झाले. १४ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यात १२ महिला आणि २ पुरुष ह्यांचा समावेश होता. आग कशामुळे लागली ह्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हॉटेलमध्ये होत असलेल्या हुक्का पार्टीमुळे आग लागली असल्याची शंका वर्तवली जात आहे. कारण काहीही असले तरी झालेले नुकसान आणि जीवितहानी भरून येण्यासारखी नाही.  एक ज्योतिषशास्त्री आणि वास्तूतज्ञ् म्हणून ह्या घटनेकडे पहाण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यासाठी हा लेख -

बातमी कळल्यापासून त्या हॉटेलच्या वास्तूचा आकार आणि प्रश्नकुंडली ह्याचे विवेचन सुरु होते. ह्यात काही गोष्टी लक्षात आल्या त्या तुमच्यासमोर मांडत आहे. 

वास्तू निरीक्षण - १) प्रत्यक्ष वास्तूला भेट देणे शक्य नसल्याने गूगल मॅपवरून हे हॉटेल शोधले आणि त्याचा आढावा घेतला. मॅपवरून लक्षात येईल एक तर ही वास्तू विदिशा आहे. बिल्डिंग संपूर्णपणे तिरपी आहे. म्हणजेच सर्व दिशा काटकोनात गेल्या. 

२) ओपन रूफ हॉटेल आहे. बिल्डिंगच्या पूर्व आणि आग्नेय (अग्नि देवता )दिशेला हे हॉटेल आहे. सूर्य मावळेपर्यंत सूर्याच्या किरणांचा मारा होत असणार जे शारीरिकदृष्ट्या हानिकारक आहे. 

घटना कळल्यानंतर ही घटना का घडली ह्याचा विचार करतांना हॉटेल ज्या दिवशी सुरु झाले (मुहूर्त )त्या दिवसाची कुंडली मांडली. ती कुंडली इथे देत आहे - 



१)  मंगळ आणि शनि ह्या ग्रहांचे योग हे नेहेमीच स्फोटक ठरतात. ह्या कुंडलीत म्हणजेच मुहूर्ताच्या दिवशी शनि आणि मंगळाचा षडाष्टक योग होत आहे. 
२) कुंडलीचे वृश्चिक लग्न असून लग्न २६ अंशावर आहे. ह्या अंशाच्या सर्वात जवळ शनि २८ अंश आहे. 
३) शनिपासून आणि लग्न स्थानापासून अष्टमात मंगळ आहे. मंगळाचे अंशही २७ आहेत. हा योगायोग चांगला नाही. 
४) अष्टमेश बुध अष्टम स्थानातच आहे. 

ह्या सर्व योगावरून असे वाटते की आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या "मुहूर्त शास्त्राला " अर्थ आहे. ज्या दिवशी आणि वेळेला आपण काही गोष्टी सुरु करतो ती वेळ,दिवस महत्त्वाचे ठरतात. नाहीतर हल्ली मुहूर्त पाळलाच जात नाही. अगदी लग्न लागतांना सुद्धा मुहूर्त लक्षात घेत नाहीत. अगदी काटेकोरपणे मुहूर्त मानणारे तुम्ही नसाल पण हे लक्षात घ्या लग्न लागतांना हल्ली लोक अवास्तव गोष्टींनाच जास्त महत्त्व देतात. मुलीकडच्या लोकांची धावपळ तर विचारायलाच नको. - फोटोसेशन,हेयरस्टाईल आणि मेकअप ह्या गोष्टींचे इतके कौतुक असते की वेळेवर ह्या गोष्टी आटपून मुहूर्त साधणारे अगदी कमी. जर मुहूर्त साधायचाच नसेल तर गुरुजींकडून मुहूर्त काढून घेण्याचा प्रपंचच कशाला ? तुम्हांला जी वेळ योग्य वाटते ती वेळ ठरवा.  

मुहूर्त शास्त्रात मुहूर्त जेंव्हा ठरवून दिला जातो किंवा सांगितला जातो तेंव्हा सर्व गोष्टींचा विचार केला जातो. पंचांगाचा विचार आलाच परंतु आपल्या कुंडलीप्रमाणे ही वेळ योग्य आहे का हे सखोल तपासून सांगितले जाते. त्यामुळे मुहूर्त हा विचारात घेतला पाहिजे. जेंव्हा आपण मुहूर्त काढून पूजा करतो त्या दिवशी आपण सर्व नकारत्मक गोष्टींचे उच्चाटन करून  सकारात्मक ऊर्जांना आपल्याला मदत करण्यासाठी आवाहन करतो. पाश्चत्य संस्कृतीचे कौतुक असणाऱ्या लोकांसाठी - We Invite all Positive Energy to our Workplace on Specific Day. फक्त ह्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत एक शुभ दिवस ठरवूंन दिला जातो. 

आता तुम्ही म्हणाला अशा प्रकारची हॉटेल्स भरपूर आहेत त्यांना नाही आगीने होरपळले. हो मान्य. अगदी शतप्रतिशत मान्य. ह्याला कारण वास्तूप्रमाणे मालकाची कुंडलीही अशा घटनेत महत्त्वाची ठरते. त्याच्या कुंडलीत जर ग्रहयोग आता चांगले नसतील तर त्याला अशा घटनांचा सामना करावा लागतो. आणि असे योग कुंडलीत आहेत असे समजल्यानंतर त्याने हॉटेल सुरु करू नये असे आपले शास्त्र सांगत नाही. शास्त्राचा खरा उपयोग तर इथेच होतो. असे काही घडणार असे कुंडलीत असेल तर ती घटना घडू नये म्हणून काळजी घेता येईल. मुहूर्तबद्दल मी वर सांगितलेच आहे त्याच बरोबर हॉटेल बांधतांना त्याने विशेष काळजी घायला हवी. हॉटेलमध्ये येण्यासाठी असणाऱ्या वाटेत फार अडथळा नसावा, रस्ता फार चिंचोळा नसेल ह्याची काळजी घ्यावी. ह्या जागेवर शक्यतो  fire resistant materials चा जास्तीत जास्त वापर करावा. आग लागल्यास ती आटोक्यात येण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी लवकर उपलब्ध होतील अशी व्यवस्था असावी. लोकांना लगेच बाहेर पडता येईल अशी दाराची रचना असावी. खरंतर अशा गोष्टींची काळजी सर्व हॉटेल्सने घेतलीच पाहिजे. परंतु आपल्याकडे घटना घडल्यावर जागृत होणे आहे. घटना घडण्याआधी जर काळजी घेतली तर त्याचा फायदा. 

ही काळजी जर हॉटेलच्या मालकांनी घेतली असती तर घटना टाळता आलीच असती आणि नाहक १४ बळी गेले नसते. 

बघा बरं विचार करून !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD