रविवार, २३ जून, २०१३

अनुभवाचे बोल



अनुभवाचे बोल 

गेल्या आठवडाभरात वाचकांचे सतत e-mails आणि फोन येत होते ब्लॉगवर लिहा म्हणून. पण पावसाला सुरु झाला आणि सर्दी-खोकला झाला त्यामुळे काही लिखाण करता आले नाही. क्षमस्व. एक लेख लिहायचा म्हणजे दोन तास गेले. त्यामुळे आजही लेख लिहिण्यापेक्षा एका आमच्या जातक- मित्राने त्याला आलेला शास्त्राचा अनुभव इथे नमूद करतेय. नाव गुप्ततेच्या कारणास्तव लिहिलेले नाही. अनुभव लिहिताना त्याने मोठेपणा मला दिलाय पण तो मोठेपणा शास्त्राचा आहे. त्यामुळे वाचकांनीही शास्त्रालाच महत्व देत हा अनुभव वाचावा. 


श्री स्वामी समर्थ !!!
माझा भविष्य अथवा पत्रिकेवर कधीच विश्वास नव्हता, मी २००७  साली दुबई मध्ये होतो त्या वेळेला सहज कुतहूल म्हणून मी माझी जन्मतारीख ,जन्म वेळ तसेच जन्मस्थान अशी माहिती अनुप्रिया देसाई यांना दिली ,त्यांना अभ्यास करण्यासाठी माझी माहिती हवी होती ,ती देताना पण मी त्यांना सांगितले की या सगळ्यावर माझा विश्वास नाही माझा स्वामींवर विश्वास आहे, पण एक कुतहूल म्हणून आणि तुम्हाला हवी आहे म्हणून मी तुम्हाला ही माहिती देतो. त्यांनी माझी कुंडली /पत्रिका बनवली अभ्यास केला आणि ठळकपणे दोन गोष्टी सांगितल्या. त्या म्हणजे १)तुझे लग्न जुलै-ऑगस्ट  २००८ मध्ये  होईल, २) तुझा प्रेमविवाह होईल. मला खरतरं थोडा धक्का बसला कारण त्यावेळेला मला एक मुलगी आवडत होती पण ही गोष्ट तेव्हा कोणाला माहिती नव्हती.  त्यामुळे मला हा सुखद धक्का होता. 

त्यांनी माझ्या भूतकाळाविषयीही   सर्व गोष्टी अचूक सांगितल्या ,तसेच भविष्यात घडणाऱ्या गोष्टी सांगितल्या ज्या कालांतराने शत प्रतिशत खऱ्या  निघाल्या. 
१) जुलै  २००८ मध्ये माझा प्रेम विवाह झाला ,
२)मला त्यांनी पुढील वाट चालीसाठी पण मार्ग दर्शन केले ,माझ्या संपूर्ण कुटुंबाची कुंडली त्यांनी बनवली ,माझ्या अनेक मित्रांना पण त्यांनी अचूक भविष्य सांगितले तसेच मार्गदर्शन पण केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD